वाचू आनंदे
या ब्लॉगवर आपण माझे पुस्तक वाचनावेळचे अनुभव , मी वाचलेली पुस्तके, याविषयी जाणून घेऊ शकाल या खेरीज माझे पर्यटनविषयक लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartetraveller.blogspot.com तर प्रचलित घडामोडीविषयक वाचायचे असल्यास www.ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com या ब्लॉगला भेट देऊ शकतात या खेरीज माझे ललित निबंधवजा लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartelalitlekhan.blogspot.com तर या सर्व लेखनाचा एकत्रितपणे आनंद घेयचा असल्यास www.ajiankyatarte.blogspot.com या ब्लॉगला भेट द्यावी
रविवार, १ सप्टेंबर, २०२४
पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'
रविवार, १० मार्च, २०२४
माझे वाचन (भाग३)
पुढे माध्यमिक शाळेत असताना शाळेतील ग्रंथपालांनी माहितीपर पुस्तकांची गोडी लावली त्यामुळे माझे ज्ञान समृद्ध होण्यास मदत झाली
सरमिसळ केल्यामुळे दोन्ही गोष्टिंचा विचका होतो त्यामुळे संस्कार होत नाहीत आणि मुलांना वाचनाची गोडी देखील लागत नाही.माझ्या सुदैवाने मी लहानपणी जे साहित्य वाचले त्यात ही गल्लत माझ्यासाठी तरी झाली नाही,आणि मला वाचनाची गोडी लागली.चांदोबा या मासिकात संस्कार करणाऱ्या काही कथा असतं मात्र त्यातून अत्यंत सुक्ष्म संस्कार होत असे तर मनोरंजन मोठ्या प्रमाणात होत असे त्यामुळे त्यांना मनोरंजन करणारे लेखन म्हणूनच बघावे लागेल.चंपकमधून संस्कार नाहीच्याच पातळीवर होत असे. मनोरंजन मात्र मोठ्या पातळीवर होत असे.आणि याच मनोरंजनामुळे मला वाचनाची गोडी लागली याच गोडीतून मी पुढे राहता झालो.ज्याचे दृश्यस्वरुप आपल्या पुढे दिसतच आहे
सोमवार, ४ मार्च, २०२४
जागतिक स्तरावरच्या अभिजात साहित्यिकांची ओळख मराठी भाषिकांना करून देणारे पुस्तक "झपुर्झा भाग ३"
बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४
नाशिकची इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक, "तपोभूमी नाशिक"
नाशिक, महाराष्ट्रातील चवथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर.स्वातंत्र्यवीर सावरकर,दादासाहेब फाळके, श्रीपाद अमृत डांगे, यांच्यासारख्या अनेक नामवंत व्यक्तींची जन्मभूमी असणारे शहर.जगात ज्या ४ ठिकाणी कुंभमेळा भरतो त्यातील एक ठिकाण म्हणजे नाशिक.खाद्यपेयांचा विचार करता द्राक्ष वाइन निर्यातीद्वारे आपल्या भारताला मोठ्या प्रमाणात परदेशी चलन मिळवून देणारे शहर म्हणजे नाशिक . तर अस्या नाशिकची इतिहास काळापासून जडण घडण कशी झाली.दक्षीण काशी असी ओळख असणाऱ्या या शहर आणि परिसरात कोणकोणती मंदिरे आहेत? त्यांचा इतिहास काय आहे? तसेच प्राचीन काळात नाशिकला कोणकोणत्या परदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे? नाशिकचे सांस्कृतिक जीवन कोणत्या पद्धतीने समृध्द आहे? नाशिकची प्रसिद्ध व्यक्तिमत्वे कोणती? नाशिकची जगभरात ओळख असणारा कुंभमेळा मुळात काय आहे? कुंभमेळा कस्या प्रकारे आयोजित करण्यात येतो?नाशिक परिसरात कोणकोणत्या लेण्या आहेत? नाशिक परिसरात नाशिक वगळता कोणकोणती धार्मिक स्थळे आहेत? या सारख्या नाशिकविषयी आपणास पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची योग्य उत्तरे आपणास हवी असतील तर आपणास महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत असणारे ज्येष्ठ पत्रकार रमेश पडवळ सरांनी लिहलेल्या तपोभूमी नाशिक या पुस्तकाखेरीज अन्य सक्षम उपाय तो कोणता? मी नुकताच नाशिकमधील महत्त्वाची सांस्कृतिक संस्था असणाऱ्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावनाच्यामार्फत वाचले.
ग्रेनीयर वर्ष २०२३चा सविस्तर वृत्तांत "लोकसत्ता वर्षवेध २०२३"
शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४
आपली राजकीय समज प्रगल्भ करणारे पुस्तक,"हिंदूत्व,बंधूत्व आणि नरेंद्र मोदी"
गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४
माझे वाचन (भाग २ )
माझ्या आतापर्यतच्या अनुभवानुसार सांगतोय मी ज्या प्रकारचे वाचन करतो तेच वाचन उत्तम असे समजणे चुकीचे आहे. जर कोणी साहित्यकृतीचे वाचन करत असेल तर ते देखील योग्यच ठरेल. वाचनाचा कोणताच प्रकार योग्य किंवा अयोग्य नाहीये . वाचनाच्या प्रत्येक जातकुळीचे काही फायदे आहेत, तसेच तोटे आहेत.आता फक्त तोटे बघत, एखाद्या वाचनाच्या प्रकारास अयोग्य ठरवणे, पुर्णतः चूकीचे आहे.आता मी प्रामुख्याने ज्या प्रकारची पुस्तके
वाचतो, त्यामुळे मला विविध विषयांचे ज्ञान होत असले तरी, भाषाशैली,शद्बांचे भांडार याबाबत मी काहीसा मागे पडतो,हे नाकारण्यात काही अर्थ नाही.माझ्याउलट जर एखादा जण साहित्यकृती वाचत असेल तर, भलेही त्यांचे ज्ञान कमी असेल, मात्र तो शद्ब साठ्याबाबत प्रचंड श्रीमंत असेल ,हे सुद्धा नाकारण्यात अर्थ नाही.आता विविध प्रकारचे ज्ञान,की विपूल प्रकारचा शद्बसाठा यापैकी कश्याला महत्व देयचे?आणि कश्याला नाही,? हे पूर्णपणे व्यक्तीवर अवलंबून आहे.त्याबाबत काहीही सांगणे सहजशक्य नाही. कोणत्याही प्रकारचे असले तरी चालेल मात्र ती व्यक्ती वाचन करत आहे का? याला महत्त्व देयला पाहिजे असे मला वाटते कारण अखेर वाचाल तर वाचाल!या लेखाचा पहिला भाग वाचायचा असल्यास पुढील लिंकवर क्लिक करा
https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2024/02/blog-post_22.html
पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'
जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...
-
अल्पसंख्याकवाद आणि बहुसंख्यांकवादाचे राजकारण लोकांचे आयुष्य किती मोठ्या प्रमाणात उद्धवस्त करते ? यावर अनेक पुस्तके देखील ...
-
" वाचाल तर वाचाल , ' " एखाद्या व्यक्तींकडे असणारी ग्रंथसंपदा हीच खरी संपत्ती " किंवा समर्थ रामदास स्वामी ...
-
आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयामुळे नावारूपास आलेल्या आहेत , वहिदा रेहमान त्यापैकीच एक मूळच्या ...