लेखाचे विषय

सोमवार, १ जून, २०२६

'पोरकी पोरं' मन हेलावून टाकणारे साप्ताहिक सदर

मुल ही देवा घरची फुले, रम्य ते बालपण, या सारख्या वाक्यप्रचारातून कोणत्याही व्यक्तीचा लहानपणाचा काळ हा सुखाचा असतो असे सांगितले जाते. मात्र प्रत्येक नियमाला अपवाद हा असतोच,असतो. तसा या नियमाला देखील आहे,हो काही लहान मुलांचे आयुष्य करपलेले, दु:खाने ग्रस्त, प्रेमाचा अभावातच सरते. लहानपणी जे मिळणे कोणत्याही व्यक्तीचा मुलभुत म्हणा किंवा नैसर्गिक अधिकार असतो,तो त्यांचापासून दुरावला जातो. आई- वडील किंवा जवळचे सांभाळणारे नातेवाईक नसणारी अनथालयातील मुला-मुलींचाच नव्हे,तर आई -वडील जिवंत असलेल्या काही अभागी मुला-मुलींचा आयुष्याचे देखील रखरखीत वाळवंट झालेले असते. हे सर्व आपणास उलगडते, ते दैनिक तरुण भारतच्या पुणे आवृत्तीत दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या आसमंत या साप्ताहिक पुरवणीतील लेखमालिकेद्वारे. नाशिकचे रहिवासी असलेल्या डॉ.तूषार सावरकर यांनी लिहलेल्या पोरकं पोरं या लेखमालिकेद्वारे आपणास या अभागी मुला-मुलींचा आयुष्यातील दाहक वास्तव समजते‌.

आपल्यापेक्षा कितीतरी मोठे दु:ख ही मुले-मुली भोगत आहेत.यांचा तूलनेत आपले दू:ख काहीच नाही,या जाणिवेतून आपल्या दु:खाला विनाकारण कुरवाळीत बसण्याची कृती किती निरर्थक आहे, याचे आकलन होते.आसमंत ता पुरवणीत शेवटच्या ६ क्रमांकाच्या पानावरील घडीच्या खालच्या अर्ध्या भागातील डाव्या कोपऱ्यातील ही लेखमाला प्रत्येकाने पेफर हातात आल्यावर पहिल्यांदा वाचावीच,असी आहे. थोर क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आडनाव असलेले या लेखमालिकेचे लेखक स्वत:च्या लेखाद्वारे आपणास अरे यांचे दु:ख बघ आणि स्वत:चा दुखातून 'सावर रे' असा जणू उपदेश देतायं,असे लेख वाचताना सातत्याने वाटते.साधरण:  तात्कालीक, त्या त्या वेळी चर्चेत असणारे विषयांवर लेख प्रसिद्व करण्यावर वृत्तपत्रांचा भर असतो,मात्र या सारखे सार्वकालिक जनतेचे खरे दु:ख समाजासमोर आणल्याबद्दल तरुण भारत नागपूर च्या संपादकीय विभागाचे देखील कौतूक करायला हवे.
या लेखमालिकेत आतापर्यत प्रसिद्ध लेखांचा विचार करता, गुन्हेगारांच्या अपत्यांबाबतचा समाजाचा दृष्टिकोन, बांधकाम मजूरांची मुले, रस्त्यावर, सिग्नलवर फिरणारी, रेल्वे स्टेशन रेल्वेत राहणारी मुले, लहान भावंडाची जवाबदारी जवाबदारी पार पाडणारी मुले, रिमांड होम, बालसुधारगृहातील, अनाथालयातील मुले - मुली, तसेच पालकांच्या सवयीमुळे, आई-वडीलांच्या सतततच्या होणाऱ्या भांडणामुळे,झालेल्या घटस्फोटामुळे पालकांचा प्रेमाला मुकलेल्या मुला-मुलींविषयी माहिती मिळते.
समाजासाठी काही करु इच्छिणाऱ्या, महाविद्यालयात एम.एस डब्ल्यु या सारखे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्यासाठी ही लेखमाला अत्यंत महत्त्वाची आहेच.मात्र लेखाच्या सुरुवातीला सांगितले, त्या प्रमाणे विनाकारण स्वत:,चे दू:ख मोठे आहे,असे समजून त्याला कुरवाळीत बसणाऱ्या,व्यक्तींना त्यांच्या वागण्यातील फोलपणा लक्षात यावा यासाठी देखील त्यांनी ही लेखमाला वाचायलाच हवी.

बुधवार, २७ मे, २०२६

आपल्या शरीरातील बहुमोल ईश्वरी देणगीची माहिती देणारे पुस्तक 'रक्त'

अरे,तो माझा रक्ताचा नातेवाईक आहे,तरी असा कसा काय वागला ? लोक सध्या रक्ताची नाती देखील विसरत चालली आहेत. रक्ताच्या नात्यातील माणसे एकवेळ दगा देतील मात्र आमची माणसे नाहीत.रक्तातील माणसांसारखीच काळजी आमच्या येथे घेतली जाते .या प्रकारची अनेक वाक्ये आपण अनेकदा ऐकतो, बोलतो .हिंदी चित्रपटाचा विचार करता, मै तुम्हारा खून पी जाऊंगा हा एकेकाळचा सुप्रसिद्ध डायलॉग . त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीचा विचार करता त्या राक्षसांच्या प्रत्येक थेंबापासून नवीन दैत्य जन्मला येत असल्याचा कथा आहेत .इतिहासात रक्त सांडून लढाई जिंकल्याचे अनेक दाखले देण्यात येतात . रक्ताचे पाणी होणे. या सारख्या अनेक म्हणी वाक्यप्रचार आपल्या मराठीत आहेत  जास्त रक्तस्त्राव होऊन रुग्णाचा मृत्यू या बातम्या देखील आपल्या परिचयाचा आहेत .तर असा आपल्या शरीरातील महत्वाचा घटक जो आपल्या संस्कृतीशी देखील जोडला गेला आहे तो घटक म्हणजे रक्त. इतके असून देखील या घटकांविषयी आपल्या मराठीत शास्त्रीय दृष्ट्या अचूक माहिती देणाऱ्या पुस्तकाचा मात्र अभाव होता . 

मात्र मराठीत ज्या विषयावर   माहितीचा अभाव तिथे अच्युत गोडबोले हजर  या सुप्रसिद्ध फॉर्मुल्याप्रमाणे अच्युत गोडबोले यांनी डॉ वैदेही लिमये यांना  बरोबर घेऊन  रक्त  या विषयावर पुस्तक लिहले आहे. जे मी नुकतेच वाचले.  अच्युत गोडबोले यांनी एकट्याने लिहलेली आणि सहलेखक/सहलेखिका घेऊन लिहलेल्या ७५ पुस्तकांचा

एकत्रित विचार करता अच्युत गोडबोले यांनी लिहलेले आणि  मी वाचलेले हे १८ वे पुस्तक (त्यातील ९ पुस्तके माझ्या वैयक्तिक संग्रहात आहेत. तर उर्वरित पुस्तके मी वाचनालयातून आणून वाचली आहेत )   

अच्युत  गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये लिखित ‘रक्त’ हे पुस्तक विज्ञान, इतिहास आणि मानवी जीवन यांची एकत्रितपणे माहिती देणारे  विविध गोष्टीना साजेने स्पर्श करणारे लेखन आहे. सुमारे ३५०  पानांच्या या पुस्तकात  ‘रक्त’ या जीवनावश्यक घटकाचा सर्वांगाने विचार केल्याचे जाणवते. . केवळ शरीरशास्त्रापुरते मर्यादित न राहता, हे पुस्तक वाचकाला विज्ञान, संस्कृती, समाज आणि मानवी अनुभव यांची सविस्तर माहिती पुस्तकातून मिळते 

पुस्तकात रक्ताचे स्वरूप, त्याचे घटक आणि घटकांची कार्ये  जसे लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स, यांची कार्ये अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितली आहेत. रक्त शरीरात ऑक्सिजन वाहून नेते, रोगांशी लढते आणि संतुलन राखते, हे स्पष्ट करताना  उदाहरणांचा मोठ्या खुबीने वापर केला आहे. त्यामुळे गुंतागुंतीचा विषयही सहज कळतो. 

या पुस्तकाचीएक चांगली बाजू म्हणजे रक्ताच्या शोधाचा आणि प्रयोगांचा इतिहास. प्राचीन काळातील अंधश्रद्धा, चुकीच्या समजुती आणि सुरुवातीचे धाडसी प्रयोग यांचे वर्णन वाचताना खिळवून ठेवले जाईल अश्या  पद्धतीने

केले आहे. पुढे रक्ताभिसरणाचा शोध, रक्तगटांची ओळख आणि रक्तसंचार तंत्रज्ञानाचा विकास यामुळे वैद्यकशास्त्रात झालेली प्रगती  छान पद्धतीने  सांगितली  आहे. विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रक्तपेढ्यांची गरज आणि त्यांचा विकास कसा झाला, हेही सांगितले आहे. 

याशिवाय, रक्ताशी संबंधित आजार, फॉरेन्सिक सायन्समधील उपयोग आणि गुन्हे उलगडण्यात रक्ताची भूमिका यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. रक्तदानाची संकल्पना आणि त्यामागील मानवतावादी दृष्टिकोन हा देखील पुस्तकाचा महत्त्वाचा भाग आहे. रक्तदान हे केवळ वैद्यकीय गरज नसून सामाजिक जबाबदारी आहे, याची जाणिव  हे पुस्तक वाचनातून आपल्याला स्पष्टपणे जाणवते 

पुस्तकात रक्ताचा सांस्कृतिक आणि प्रतीकात्मक अर्थही मांडला आहे. साहित्य, कला आणि परंपरेत रक्त कधी शौर्याचे, तर कधी नातेसंबंधांचे प्रतीक म्हणून दिसते. या विविध दृष्टिकोनामुळे विषय अधिक समृद्ध होतो.एकूणच, ‘रक्त’ हे पुस्तक ज्ञान, इतिहास आणि भावना यांचा सुंदर मेळ साधणारे आहे. सोपी भाषा, सखोल मांडणी आणि व्यापक दृष्टीकोन यामुळे हे पुस्तक वाचकाची जिज्ञासा वाढवते आणि विज्ञानाकडे नव्या नजरेने पाहायला शिकवते.

शनिवार, २३ मे, २०२६

कॉस्टिंग आणि मॅनेजमेन्ट या विषयाची इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक, 'कॉस्ट अँड मॅनेजमेंट'

नाशिक येथे मुख्यालय असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त  विद्यापीठाच्या विद्यापीठ गीतात एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे  'ज्ञानाची साधना निरंतर ' साधारणतः १९८० ते १९९० या दरम्यान कविवर्य कुसुमाग्रजांनी लिहीहेले गे विद्यापीठ आजच्या काळात देखील त्यांत महत्वाचे आहे .किंबहुन सध्याच्या चॅट जीपीटी, आर्टिफिशियल इंटेलिजिनसिनच्या काळात तर त्याचे महत्व अजूनच वाढले आहे.जर मनुष्याने सतत काहीतरी नवीन शिकले नाही तर तो या स्पर्धेत पार दूरवर फेकला जाईल,हे कटू असले तरी सत्य आहे ,माझ्याकडून हि चूक होऊ नये यासाठी मी कॉमर्सच्या अभ्यास सुरु केला आहे .या अभ्यासाला मदत होण्यासाठी मी अच्युत गोडबोलेंहि लिखित 'कॉस्ट अँड मॅनेजमेंट' हे पुस्तक नुकतेच वाचले,असो .
 'कॉस्ट अँड मॅनेजमेंट'  हे पुस्तक मॅनेजमेंट  आणि अकाउंटिंग या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक म्हणून ओळखता येऊ शकते . गुंतागुंतीच्या  आर्थिक व व्यवस्थापकीय संकल्पना या पुस्तकात खूपच सोप्या,  शाळेत असताना ९ आणि १० त शिकलेले अर्थशास्त्र  सोडून  कॉमर्सच्या काहीही गंध नसलेल्या माझ्यासारख्या देखील समजू शकतात या भाषेत लिहिलेल्या आहेत.मी वाचली ती पुस्तकाची पहिली आवृत्ती असेल म्हणून असेल कदाचित,  पुस्तकात हे पुस्तक क्रमिक पुस्तक म्हणून देखील

वापरता येऊ शकते असा थेट उल्लेख नसला तरी पुस्तकाची एकूण रचना त्याच प्रकारची आहे. पुस्तक दोन भागात विभागले आहे.पहिल्या भागात संकल्पना एक्सप्लेन करण्यावर भर देण्यात आला आहे तर दुसऱ्या पार्ट मध्ये याची डिटेल्स इन्फो देऊन काही एक्ससाईज सोडवायला दिल्या हेत या चाचण्यांमुळे विषय आपण नक्की किती समजला आहे हे समजते या पुस्तकात ‘कॉस्टिंग’ आणि ‘मॅनेजमेंट अकाउंटिंग’या दोन प्रमुख संकल्पना रोजच्या जगण्यात नेहमी अनुभवायास येणाऱ्या गोष्टीच्या आधारे सामावून सांगितल्या आहेत . उत्पादन खर्च कसा ठरवला जातो, खर्चाचे विविध प्रकार (Fixed, Variable, Semi-variable), तसेच खर्च नियंत्रणाची तत्त्वे  या सारख्या अनेक गोष्टीची सविस्तर माहिती आपणस या पुस्तकातून मिळते. त्यामुळे हे पुस्तक केवळ कॉमर्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच उपयोगी आहे असे नाही, तर ज्याला या विषयाबाबत जाणून घेण्याची इच्छुकता आहे असा कोणीही सायन्स ग्रॅज्युएट, इंजिनियर आर्ट्सवाला कोणीही म्हणजे कोणोही वाचून याविषयी समजवून घेऊ शकतो. या प्रकारे हे पुस्तक गोडबोले सरानी लिहलेलं 

पुस्तकातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे एखाद्या कंपनीत डिसिजन मेकिंगमध्ये  कॉस्टिंगची भूमिका. एखाद्या कंपनीने उत्पादन वाढवावे की कमी करावे, नवीन प्रकल्प हाती घ्यावा की नाही, किंमत धोरण कसे

असावे अशा अनेक कमर्शियल  निर्णयांमध्ये ‘कॉस्ट अॅनालिसिस’ कसा उपयोगी पडतो, हे अच्युत गोडबोले यांनी  उदाहरणांसह स्पष्ट केले आहे. यामुळे वाचकाला केवळ थेरॉटिकल  नॉलेज मिळत नाही, तर प्रत्यक्ष जीवनातील उपयोगही समजतो.

याशिवाय ‘बजेटिंग’, ‘स्टँडर्ड कॉस्टिंग’, ‘ब्रेक-ईव्हन अॅनालिसिस’ यांसारख्या संकल्पनाही अरे ! या संकल्पना इतक्या सोप्या आहेत तर ! मी उगीच  काहीतरी अवघड गोष्टी आहेत असे समजत होतो असे विचार वाचल्यावर यावेत अश्या पद्धतीने मांडल्यात. 

एकंदरीत, ‘कॉस्ट अँड मॅनेजमेंट’ हे पुस्तक केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार करण्याची सवय लावते. आर्थिक निर्णयांच्या मागील तर्क समजून घेण्यासाठी आणि व्यावसायिक दृष्टी विकसित करण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरते.

सोमवार, १८ मे, २०२६

अकाउंटिंगची मुळाक्षरे गिरवण्यापासून निभाव लागू शकेल असे अकाउंटींग ची माहिती देणारे पुस्तक"अकाउंट फॉर डमीज'


 
सध्याच्या ए. आय च्या काळात आपणास जॅक ऑफ ऑल ट्रेडस असणे अत्यावश्यकच आहे. त्याशिवाय आपला निभाव लागणे निव्वळ अशक्य.मात्र आपल्या रोजच्या आयुष्यात फार मोठ्या प्रमाणात आवश्यक असणाऱ्या 'अकाउंटंसी' या विषयाबाबत माझे ज्ञान खूपच तुकडे होते सध्याचा काळात आपल्यला ज्या विषयाची काहीही माहिती नाही. त्या विषयावरची मुळाक्षरे गिरवण्यापासून सुरुवात करण्याची आवश्यकता आहे अश्या विषयाबाबत आपणास मदत करायचा एकच उपाय आहे तो म्हणजे त्या विषयावर अच्युत गोडबोले यांचे एखादे पुस्तक आहे का ?हे बघणे मी देखील तेच  केले आणि मला त्यांची दोन पुस्तके सापडली त्यातील एक म्हणजे "अकाउंट फॉर डमीज' आणि दुसरे म्हणजे 'कॉस्ट अँड मॅनेजमेन्ट ' माझ्या घरी कॉमर्सची मोठी परंपरा असली तरी शाळेत नववी आणि दहावीला शिकलेल्या अर्थशात्राच्या पुस्तकांखेरीज मला कॉमर्सचा  गंध नव्हता त्यामुळे मी चटकन ती पुस्तके विकत घेतली

काही जण मी विनाकारण पुस्तके विकत घेतली असे म्हणतील त्यांच्यामते चॅट जीपीटीमुळे थेट माहिती मिळत असताना पुस्तके का विकत घेयची ? तर अश्या मित्र - मैत्रीणींना मी सांगू इच्छितो की चॅट जीपीटीमुळे माहिती मिळते ज्ञान नाही जर तुम्हला एखाद्या विषयात  ज्ञानी होयचे असल्यास अजूनही पुस्तकांशिवाय तरणोपाय नाही.  मात्र तुम्हला फक्त माहितीगार होयचे असल्यास 'जय हो चॅट' जीपीटी असे तुम्ही म्हणू शकता. थोडक्यात तुम्हाला भूक लागली असता तुमच्या जिभेवर थेट  मॅगी ठेवणे म्हणजे चॅट जीपीटी तर मॅगी कशी तयार करायची याची प्रात्यक्षिकासह उजळणी करत मॅगी खायची  म्हणजे पुस्तकाचे वाचन .आता थेट जिभेवर मॅगी ठेवल्याने पोट भरत असले तरी स्वतः तयार करून मॅगी खाण्यातीळ मजा काही औरच ना ?  आणि आपली हि गरज पुस्तकेच पूर्ण करू शकतात .म्हणून आज देखील पुस्तके महत्वाची आहेतच असो 

तर या दोन पुस्तकांपैकी  "अकाउंट फॉर डमीज या पुस्तकाचे दुसरे वाचन मी नुकतेच केले (कोणत्याही अभ्यासविषयक पुस्तकाचे तीन वाचन केल्यास फायदा होतो. पहिल्या वाचनात पुस्तक चाळणे होते .दुसऱ्या वाचनात पुस्तक
सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचणे होते या दुसऱ्या वाचनात पुस्तक आपणास बऱ्यापैकी समजते तर टिपऱ्या वाचनांत आपणास पुट खूपच मोठ्या प्रमाणात समजते ज्यामुळे पण त्यावर परीक्षेत प्रश्न सोडवू शकतो ) दुसऱ्या वाचनात मालपुस्तक किती समजले हे सांगण्यासाठी आजचे लेखन 

.तर अच्युत गोडबोले यांच्या इतर पुस्तकासारखीच यही पुस्तकांची भाषा सहजसोपी आहे .मराठीत पुस्तक आहे ना ! मग भलेही व्यवहार वापरता नसेना वापर संस्कृतचा प्रभाव असलेले शब्द ज्यामुळे संकल्पना समजत असली  तरी संकल्पनेत वापरलेले शब्द मुळात वापरत नसल्याने वाचकाचा व्यवहारत शब्दाचा गोंधळ झाला तरी कुठे बिघडले असा इतर मराठी पुस्तकात दिसणारा प्रकार अच्युत गोडबोले याचा पुस्तकात कधीही नसतो तो याही पुस्तकात नाहीये याही पुस्तकात त्यांनी आपल्यकडे रूळलेले इंग्रजी शब्दच वापरलेले आहेत . साधारणपणे अकाउंटिंग हा विषय अनेकांना कठीण, कंटाळवाणा वाटतो . मात्र गोडबोले यांनी आपल्या खास सोप्या आणि संवादात्मक शैलीत हा गैरसमज दूर केला आहे.

या पुस्तकात अकाउंटिंगची  मूलभूत संकल्पना अगदी ग्राउंड लेव्हलपासून स्पष्ट केली आहे. “अकाउंटिंग म्हणजे काय?”, “ते का आवश्यक आहे?” यापासून सुरुवात करून व्यवहारांची नोंद, जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट यांसारख्या संकल्पना टप्प्याटप्प्याने समजावून सांगितल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक संकल्पना दैनंदिन जीवनातील उदाहरणांद्वारे स्पष्ट केल्यामुळे वाचकाला ती सहज कळते 

याशिवाय, पुस्तकात केवळ सैद्धांतिक माहिती न देता व्यवहारात अकाउंटिंग कसे उपयोगी पडते, आर्थिक निर्णय कसे घ्यावेत, याबाबतही मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे वाचकाला फक्त ज्ञानच मिळत नाही, तर ते प्रत्यक्षात वापरण्याची दिशा देखील मिळते.पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे पुस्तकाच्या  शेवटी २७ पानांमध्ये अकॉंटिंगच्या वेगवेगळ्या संकल्पांची सुमारे २० ते २५ शब्दात एक संकल्पना या प्रकारे करून दिलेली ओळख ज्यामुळे पुस्तकात शिकलेल्या गोष्टीची सहजतेने उजळणी होते. तसेच याच्या आधी वाचकला पुस्तक किती कळालेले आहे हे समजावे यासाठी काही प्रश्न देखील दिलेली आहेत 

एकूणच, "अकाउंट फॉर डमीज' हे पुस्तक अकाउंटिंग विषयाची भीती दूर करून त्याला सोप्या, उपयुक्त आणि समजण्यासारख्या स्वरूपात मांडणारे उत्कृष्ट मार्गदर्शक आहे.

गुरुवार, ७ मे, २०२६

उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे बीज असलेली कादंबरी, 'फकिरा'

 आपल्या मराठीचे साहित्यविश्व अत्यंत समृद्ध आहे. उकृष्ट चित्रपट निर्मिती होऊ शकते अश्या कादंबरीची मराठीत अक्षरशः खाण आहे. गो नि दांडेकर यांची शितू असो किंवा डॉ सुमती देशपांडे यांनी लिहलेली सुप्रसिद्ध अशी महाश्वेता ही त्यांची प्रमुख उदाहरणे त्यापैकी महाश्वेता या कादंबरीवर आधारित मालिका खूपच गाजली होती.  याच मालिकेत समाविष्ट होऊ शकेल मात्र तिच्यावर  चित्रपट किंवा मालिका निघालेली नाही अशी कादंबरी म्हणजे अण्णा भाऊ साठे लिखित फकिरा. लौकिक अर्थाने फारसे शिक्षण नसले तरी अंगभूत प्रतिभा, जगताना आलेले अनुभव यातून किती उत्कृष्ट कलाकृती जन्माला येऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'फकिरा ही  कादंबरी जी मी नुकतीच वाचली जी वाचताना आपल्याला एका योध्याची संघर्षाची कथा वाचत आहोत हे पदोपदी जाणवते 

फकिरा ही मराठी साहित्यातील अत्यंत गाजलेली आणि सामाजिक आशयाने समृद्ध अशी कादंबरी आहे  आजपासून ६५ वर्षांपूर्वी १९५९ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळालाय. 
या कादंबरीची कथा ब्रिटिशकालीन ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर घडते. जी प्रामुख्याने सध्याच्या कराड सातारा बेळगाव या परिसराच्या पार्शवभूमीवर आधारित आहे ‘ समाजातील धाडसी, स्वाभिमानी आणिअन्यायाविरुद्ध लढणारा फकिरा कादंबरीचा नायक आहे,जो वयाने  तरुण आणि जातीने फकिरा मातंग आहे. 
 समाजातील खालच्या स्तरातील लोकांवर होणारे अत्याचार, जातीय भेदभाव आणि सत्ताधाऱ्यांची दडपशाही याविरोधात तो आवाज उठवतो. गावातील गरीब आणि वंचित लोकांचे दुःख पाहून त्याच्या मनात बंडाची ठिणगी पेटते. आपल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तो संघर्षाचा मार्ग स्वीकारतो.त्याचीच ही कथा 'फकिरा' 

फकिराचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावीपणे उभे कऱण्यात अण्णा भाऊ साठे यशस्वी ठरलेत.   तो केवळ शूर योद्धाच नसून संवेदनशील आणि लोकांप्रती कर्तव्यभावना असलेला नेता आहे. दुष्काळ, उपासमार आणि अन्यायाने त्रस्त
झालेल्या लोकांसाठी तो ब्रिटिश सत्तेविरोधात उभा राहतो. गरिबांसाठी धान्य मिळविण्याच्या उद्देशाने तो सरकारी खजिन्यावर धाड टाकतो. त्यामुळे तो सत्ताधाऱ्यांच्या नजरेत गुन्हेगार ठरतो; मात्र सामान्य जनतेसाठी तो नायक बनतो. हे आहे कादंबरीचे कथासूत्र. 

फकिरा ही केवळ एका व्यक्तीची कथा नसून शोषित समाजाच्या संघर्षाची गाथा आहे. अण्णा भाऊ साठे यांनी ग्रामीण बोलीभाषेचा प्रभावी वापर करून कथेला वास्तवतेची ताकद दिली आहे. कादंबरीतून स्वातंत्र्य, समता आणि मानवी प्रतिष्ठेचा संदेश दिला जातो. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे हे साहित्य आजही तितकेच महत्त्वपूर्ण वाटते.
फकिरा त्याच्या कार्यात खरच यशस्वी होतो का ,की सरकार विऱोधोई कृत्ये केले म्हणून  होते ? अटक झालेली असेल तर त्याच्या मृत्यू कोठडीतच होतो कि त्याची सुटका होत ? जर सुटका होत असेल तर कशी होते या सारख्या प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यसाठी आपण हि कादंबरी अवश्य वाचावी कादंबरी फार मोठी नसल्याने सहज आठवडा पंधरवड्यात पूर्ण होते मग वाचणार ना फकिरा 

लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या महाश्वेता कादंबरीविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

सोमवार, २० एप्रिल, २०२६

जाणून घेऊया पुस्तक वाचण्याच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकांविषयी (भाग ३ )

पुस्तकाच्या विश्वात सध्या मोठ्या प्रमाणात आणि वेगाने बदल होत आहेत. हे बदल पुस्तकाच्या स्वरूपात जसे प्रिंटेड पुस्तक, इ बुक आणि ऑडिओ बुक या सर्वच प्रकारात होत आहेत त्यामुळे पुस्तकाचे वितरण साठवणूक यात देखील मोठया प्रमाणात  बदल होत आहे. या बदलामुळे सध्या आहे त्या प्रकारे प्रकाशकाचे स्थान राहिला का अशा प्रश्न देखील काही प्रमाणात उपस्थित होत आहे. प्रिंटेड पुस्तकाच्या बाबत लेखकाला मेंदू म्हटल्यास ज्याला हृदय म्हणावे लागेल असा घटक म्हणजे प्रकाशक असतो.एकवेळ मेंदू काम करेनासा झाला तरी व्यक्ती कोमात  जाऊन जिवंत राहू शकतो.  मात्र हृदयचे तसे नसते.  हृदयाचा खेळ संपला कि मानवाचा मृत्यू होतो आधुनिक वैद्यकशास्त्र सुद्धा मनुष्याच्या मृत्यू म्हणजे हृदयक्रिया बंद पडणे असे समजते . हे समजून घेतल्यास पुस्तकाच्या बाबत प्रकाशक किती महत्वाचा असतो हे अंजुटे आणि सध्या पुस्तकाच्या क्षेत्रात होणारे बदल या प्रकाशकलालाच बाहेरचा रस्ता दाखवत आहेत यामुळे ते समजून घेणे आवश्यक आहे 

तर पुस्तकांच्या क्षेत्रातील हृदयाला अर्थात प्रकाशकला धडकी भरवणारा घटकाचे नाव आहे पुस्तक ऑन डिमांड ज्यात पुस्तक आधी छापले जात नाही, तर जेव्हा कोणी ऑर्डर देतो तेव्हाच ते छापले जाते.पुस्तकाचा मजकूर (PDF/फाईल) डिजिटल स्वरूपात ठेवला जातो जेव्हा ग्राहक ऑर्डर करतो तेव्हा ते पुस्तक प्रिंट करून बाइंड करून पाठवले जाते . पारंपरिक पद्धतीत   पुस्तके आधी छापावी लागतात तर पुस्तक व डिमांड मध्ये फक्त 1 कॉपी ऑर्डर आली तरी छापली जाते. यामुळे काय फायदा होतॊ याचा विचार केला तर स्टॉक ठेवण्याची गरज नाहीअर्थात  गोदाम लागत नाही खर्च कमी होतो न विकल्या गेलेल्या पुस्तकामुळे होणाऱ्या नुकसानाचा धोका कमी होतो तसेच लवकर प्रकाशन शक्य होते .नवीन लेखक (self-publishing), शाळा/
कॉलेज नोट्सकमी मागणी असलेली पुस्तके जर्नल, प्लॅनर, वर्कबुक आदींसाठी हि पद्धत सध्या मोठ्या प्रमाणात वापरली जाते आपल्या मराठीत सध्या या प्रकारची पुस्तके कमी आहेत मात्र नाहीतच असे म्हणणे चुकीचे ठरेल हे नक्की 

अर्थात जगात बदल हे होतच असतात या जगात कोणतीच गोष्ट चिरकाल टिकणारी नाही  यात फक्त एकाच गोष्टचा  अपवाद आहे तो म्हणजे स्वतः बदलाचा तो कधीही थांबत नाही नेहमीच घडत असतोपुस्तकाच्या विश्वाला देखील हा नियम लागू होतो हेच पुस्तक व डिमांड यातून दिसून येत आहे असे म्हणता येईल 

याचा दुसरा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

 https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2026/02/2.html


याचा पहिला  भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर  क्लिक करा 

https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2026/02/blog-post_22.html


सोमवार, ३० मार्च, २०२६

कहाणी अथक परीक्षम,जिद्द कष्टाची आणि विनाकारण झालेल्या अपमानाची ....

यावर्षी मी प्रामुख्याने आत्मचरित्र, चरित्र आणि अनुभव कथन विषयक पुस्तकांचे वाचन करणे ठरवले आहे ,हे एव्हना आपणास माहिती झालेच असेल.  मी आतापर्यंत, 'यस आय एम गिल्टी, बलुतं,  उपरा, लोकवन आनंदवन, डायरी ऑफ ऍना फ्रॅंक ही  पुस्तके वाचली आहेत . याच आत्मचरित्र, चरित्र आणि अनुभव कथन विषयक पुस्तकांच्या साखळीत सहजतेने समाविष्ट होऊ शकेल असे पुस्तक, ' कहाणी लंडनच्या आजीबाईची' सुद्धा मी नुकतेच वाचून पूर्ण केले आहे. माझे आजचे लेखन तुम्हाला या पुस्तकाविषयी सांगण्यासाठी 

तर वाचक मित्रहो , इंग्रजीचा गंध सोडा, धड मराठी सुद्धा न येणाऱ्या विदर्भातील एका पूर्ण अर्थाने अशिक्षित असणाऱ्या राधाबाई बोरकर,  ज्यांना  लंडन देश आहे की एखादे शहर हे सुद्धा माहिती नाही‌‌. त्यांनी जिद्दीने प्रयत्नपूर्वक आणि कष्टाने उभारलेल्या लंडनमधील सुप्रसिद्ध हॉटेलची कथा या सांगण्यात आली आहे.सरोजिनी वैद्य लिखित १८८ पानी या पुस्तकाचे प्रकाशक आहेत राजहंस प्रकाशन.  कष्ट केले की यश मिळतेच हा संदेश आपणांस या पुस्तकातून मिळतो. 

१८ प्रकरणात विभागलेल्या या पुस्तकात आपणास स्वातंत्र्यपूर्व काळात तसेच स्वातंत्र्यानंतरचं सुरुवातीच्या काही वर्षात यवतमाळ जिल्हा आंणि लगतच्या मराठी प्रदेशातील समाजजीवन- लोकजीवन कसे होते ? स्त्रियांबाबतचा दृष्टिकोन कसा होता ? स्त्रियांबाबत अधिक सविस्तर बोलायचे झाल्यास पती निधनानंतरची  स्थिती, बालविवाह, यांची माहिती मिळते . जे काहीसे महिलांबाबत वाईट या श्रेणीत मोडणारे आहे.
महिलांविषयक अश्या काहिस्या प्रतिकूल परिस्थितीचा यशस्वी सामना करत, प्रसंगी जवळपास स्वतःच्या वयाइतकेच वय असलेल्या मुलांची आई होत या मुलांकडून मिळणारी अपमानाची वागणूक मूग गिळून सहन करत कष्टाने मेहनीतीने  लंडनमध्ये  स्वःताचे लॉजिंग आणि हॉटेल यशस्वीपणे उभारलेल्या राधाबाई बोरकर,यांची संघर्ष गाथा आपणास या पुस्तकातून वाचावयास मिळते लंडन शहरात राहत असलेल्या राधाबाई बोरकर यांना तेथील भारतीय त्यातही प्रामुख्याने महाराष्ट्रीयन समाज हा आजीबाई या नावाने ओळखत असल्याने, त्यांच्या या संघर्ष गाथेला ' कहाणी लंडनच्या आजीबाईंची हे नाव देण्यात आले आहे. 

पुस्तकाची रचना हिंदी चित्रपटात दाखवतात त्या प्रमाणे पहिल्यांदा व्यक्तिमत्वाचा सत्कार आणि मग लहानपणापासूनची माहिती अश्या प्रकारे आहे .एलिझाबेथचा शिक्का असे शीर्षक असलेल्या पहिल्या प्रकरणात आजीबाईंची ओळख झाल्यावर दुसऱ्या प्रकरणात त्यांच्या जन्मापासून पहिल्या लग्नापर्यंतचा काळाविषयी माहिती मिळते  तिसऱ्या प्रकरणात त्यांचा पहिला विवाह कोणत्या प्रकारे झाला याची तर  चवथ्या आणि पाचव्या  प्रकरणात त्यांच्या पहिल्या संसाराची आणि पती निधनानंतर दिराने दिलेल्या वागणुकीची, त्यांनी पती निधनानंतर कष्टाने केलेल्या मुलींच्या संगोपनाची माहिती मिळते . सहाव्या प्रकरणापासून अकराव्या
प्रकरणापर्यंत  राधाबाई बोरकर यांच्या दुसऱ्या लगाच्या विषयी माहिती मिळते ज्यामध्ये त्या परिवाराची माहिती,पहिल्या लग्नाचा वेळच्या दिराने जबरदस्ती लावून दिलेले लग्न, त्यांच्या लंडनपर्यतचा प्रवास , दुसऱ्या लग्नाच्यावेळी त्यानं मनुष्याच्या घोळक्यात राहून आलेले रितेपण, दुर्दैवाने त्यांच्या दुसऱ्या पतीचा झालेला मृत्यू दुसऱ्या पतीच्या निधनानंतर सावत्र मुलांनी दिलेली अत्यंत अपमानास्पद वागणूक याची माहिती मिळते. 

आजीबाईंना ज्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीयांमध्ये सम्मानाची ओळख मिळाली त्या त्यांनी लंडन शहरात  २५ खूप लेन मध्ये उभारलेल्या लॉजिंग आणि हॉटेल विषयीची, त्यांनी ग्राहकांवर केलेल्या मायेची,स्वतःच्या कुटूंबियांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी घेतलेल्या कष्टाची, त्यांनी लंडन शहरात सुरु केलेल्या विविध उपक्रमांची, त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षाची, त्यांच्या अंत्यविधीची आणि विविध प्रसिद्ध व्यक्त्तिमतांची त्यांच्या विषयीच्या मतांविषयी आपणास १२ ते १८ प्रकरणात माहिती मिळते. 

लेखात सुरुवातीला सांगितले त्या प्रमाणे कष्ट केले की यश मिळतेच हा संदेश प्रत्यक्ष कश्या प्रकारे अस्तित्वात येतो हे समजण्यासाठी लंडनमधील या मराठी भाषिक महिला उद्योजिकेचे हे चरित्र किमान एकदा  तरी वाचायलाच हवे 
 

'पोरकी पोरं' मन हेलावून टाकणारे साप्ताहिक सदर

मुल ही देवा घरची फुले, रम्य ते बालपण, या सारख्या वाक्यप्रचारातून कोणत्याही व्यक्तीचा लहानपणाचा काळ हा सुखाचा असतो असे सांगितले ज...