लेखाचे विषय

सोमवार, २० जुलै, २०२६

मुंबईच्या ऐतिहासिक गिरणी कामगाराच्या संपानंतरची गुन्हेगारी विश्वाची माहिती देणारे पुस्तक, 'भायखळा ते बँकॉक'


मुंबई,  आपल्या भारताची आर्थिक राजधानी, जगात सर्वात जास्त चित्रपट निर्मिती करणाऱ्या भारतीय सिनेमाचे मुख्य केंद्र (बॉलिवूड ही संज्ञा प्रामुख्याने हिंदी चित्रपटांना वापरतात हिंदीत्तेर भाषांसाठी वेगवेगळी नवे आहेत सबब भारतीय सिनेमा )“भारताच्या लोकसंसंख्येंत सुमारे ९ टक्के प्रतिनिधित्व करणाऱ्या  महाराष्ट्राची राजधानी मुबई . मुळात सात बेटावर वसलेल्या या शहराची वेगाने जडणघडण सुरु होते . ती पोर्तुगीजांनी लग्नात हुंडा म्हणून ब्रिटिशांना मुंबईचा प्रदेश दिल्यावर .तेव्हापासून आता २०२६ पर्यतचा शहराचा आढावा घेतल्यास गिरणी कामगारांचा ऐतिहासिक म्हणता येईल असा संपाचा उल्लेख करावाच लागेल. या संपामुळे मुंबई शहराचाचेहरामोहरा खूपच मोठ्या प्रमाणात बदलला या बदलात तेथील मराठी समाजजीवन आणि आर्थिक उलाढाल हे तर बदललेच त्याशिवाय ज्याला आता  अंडरवर्ल्ड  म्हणतात ते विश्व देखील मोठ्या प्रमाणात बदलले गिरणी कामगारांच्या संपामुळे आलेल्या आर्थिक  अडचणीवर मात करण्यासाठी येथील अनेक  तरुण गुन्हेगारीकडे वळाले आणि मुंबईतील गुन्हेगारीने वेगळे वळण घेतले या वेगळ्या वळणाची आपणास माहिती होते ती आपल्या गुन्हेगारीविषक रिपोर्टींग मुळे प्रसिद्ध झालेले  पत्रकार  एस. हुसेन झैदी यांनी मुळात इंग्रजीत लिहिलेले आणि उज्ज्वला बर्वे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या  'भायखळा ते बँकॉक' या पुस्तकामुळे. जे मी नुकतेच वाचले  
पुस्तक मुंबईच्या अंडरवर्ल्डचा सखोल आणि वास्तववादी वेध घेणारे महत्त्वपूर्ण साहित्य म्हणता येईल  “डोंगरी ते दुबई” या गाजलेल्या पुस्तकाचा हा पुढचा भाग आहे  ज्यात दाऊद  इब्राहिम सोडून मुंबईतील अन्य गुन्हेगारांच्या जसेर छोटा राजन टोळी , नाईक  टोळी, अरुण गवळी टोळी  या सारख्या १९९० नंतरच्या काळातील मुंबईतील गुन्हेगारी विश्वाचा मागोवा घेण्यात आला आहे या पुस्तकात या  कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांच्या प्रमुखांच्या आयुष्याची  सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या बालपणापासून ते गुन्हेगारी जगतातील प्रवेश आणि पुढील वाटचाल  हा प्रवास लेखक पत्रकार  एस. हुसेन झैदी यांनी अत्यंत तपशीलवार
आणिवास्तवदर्शी पद्धतीने मांडला आहे. साध्या कुटुंबातील तरुण कशा परिस्थितीत गुन्हेगारीकडे वळतात, यामागील सामाजिक, आर्थिक आणि मानसिक करणे देखील आपल्याला या पुस्तकाच्या वाचनातून समाजात 
या पुस्तकाचे एक प्रमुख वैशिष्ट  म्हणजे पत्रकार झैदी यांची  संशोधनाधारित मांडणी. पोलीस नोंदी, प्रत्यक्ष मुलाखती आणि विविध ऐतिहासिक संदर्भ यांच्या आधारे त्यांनी  घटनांची माहिती दिली आहे . त्यामुळे हे पुस्तक केवळ गुन्हेगारी कथा न राहता, त्या मागील यंत्रणा, सत्तासंघर्ष आणि वास्तव परिस्थिती यांचेही खरे चित्र आपल्या समोर मांडते . 
पुस्तकात मुंबई पोलिसांच्या ‘एनकाऊंटर स्पेशालिस्ट’ अधिकाऱ्यांचाही उल्लेख आहे. गुन्हेगार आणि पोलिस यांच्यातील संघर्ष, त्यातील धाडस, ताणतणाव आणि निर्णयप्रक्रिया यांचे प्रभावी चित्रण वाचकांना गुंतवून ठेवते. यामुळे पुस्तकाला  थरारक आणि चित्रपटासारखी गती मिळते . याशिवाय, आधीच्या परिच्छेदात उल्लेख केला त्या प्रमाणे गिरणी कामगारांच्या संपामुळे मुंबईत झालेले सामाजिक बदल,ज्यात  राजकीय हस्तक्षेप झाल्याने उदयास आलेली नवी गुन्हेगारी आणि   या सर्व घटकातील गुंतागुंतीचे नातेही उलगडते. गुन्हेगारी ही केवळ वैयक्तिक चुकीचा परिणाम नसून, ती परिस्थिती, संधी आणि सामाजिक रचनेशी निगडित असते, हा महत्त्वाचा मुद्दा झैदी यांनी ठळकपणे अधोरेखित केल्याचे पुस्तक वाचनातून अप[नास समजते . एकूणच, “भायखळा ते बँकॉक” हे पुस्तक गुन्हेगारी विश्वाचा इतिहास, मानवी स्वभाव आणि समाजातील बदल यांचा अभ्यास घडवणारे, माहितीपूर्ण आणि अत्यंत वाचनीय असे साहित्य ठरते.
गुन्हेगारीविषक रिपोर्टींग मुळे प्रसिद्ध झालेले  पत्रकार  एस. हुसेन झैदी यांच्या याशिवाय प्रसिद्ध असलेल्या डोंगरी ते दुबई या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 


गुरुवार, ९ जुलै, २०२६

जगाच्या छप्पराची सफर घडवणारे प्रवासवर्णन :वाट तिबेटची

प्रवासवर्णन हा लेखन प्रकार मराठीत मोठ्या प्रमाणात रुळला आहे. सन १८५७ साली गोडसे गुरुजी या नावाने प्रसिद्ध असलेल्या विष्णू भट गोडसे यांनी लिहलेले माझा प्रवास हे मराठीतील पहिले प्रवासवर्णन समजले जाते १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी लेखकाने ऊत्तर भारतात केलेल्या प्रवासाचे यात वर्णन आहे . सध्या आपल्या मराठीत 'अपूर्वाईआणि 'पूर्वरंग' 'धुक्यातून लाल ताऱ्याकडे' 'माझा युरोपचा प्रवास' 'विलायतेचा प्रवासया सारखी अनेक प्रवासवर्णन प्रहद आहेत.किंबहुना काही लेखक फक्त त्यांच्या प्रवासवर्णनासठीच प्रसिद्ध आहेत. मूळच्या पुणे शहराच्या रहिवाशी असलेल्या मात्र लग्नानंतर लंडन शहरात स्थायिक झालेल्या मीना प्रभू या अश्याच प्रवासवर्णांसाठी प्रसिद्ध असलेल्या लेखिका मी नुकतेच त्यांचे 'वाट तिबेटची हे पुस्तक वाचले 

मीना प्रभू या आपल्यला  ‘वाट तिबेटचीया पुस्तकातून  हिमालयाच्या कुशीत वसलेल्या तिबेट या गूढ, आध्यात्मिक आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रदेशाची सखोल ओळख करून देतात . हे पुस्तक केवळ प्रवासवर्णन म्हणून मर्यादित नाहीये. आपण त्याला  सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि मानवी भावनांचा वेध घेणारी एक समृद्ध अनुभवयात्रा  म्हणू शकतो . तिबेटचा प्रवास हा भौगोलिकदृष्ट्या कठीणउंच पर्वत, विरळ हवा आणि अनिश्चित परिस्थिती होत असला, तरी त्याच्या पलीकडे असलेली शांतता, साधेपणा आणि तिबेटियन बुधदी धर्माची अध्यात्मिकतेची ओढ मीना प्रभू यांनी  अत्यंत सहजसोप्या शब्दात मात्र  प्रभावी शब्दात मांडली आहे.

या पुस्तकात ल्हासा शहर, पोताला पॅलेस, विविध बौद्ध मठ आणि तेथील धार्मिक परंपरा यांचे जिवंत चित्रण दिसते. बौद्ध धर्माचा दैनंदिन जीवनावर असलेला प्रभाव, प्रार्थना चक्रे, साधूंचे जीवन आणि श्रद्धेने जगणारे

सामान्य लोक यांचे सविस्तर केलेले वर्णन वाचकाला त्या वातावरणाचा पुस्तकाच्या माध्यमातून का होईना  अनुभव देते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.  मीना प्रभू यांनी मांडलेले तिबेटी लोकांचे जीवन अत्यंत साधे, कष्टमय आणि तरीही समाधानाने भरलेले आहे. कठीण परिस्थितीतही त्यांनी जपलेली आनंदी वृत्ती आणि अध्यात्मिक निष्ठा वाचकाला विचार करायला भाग पडते 
याचबरोबर तिबेट म्हंटल्याबरोबर बौद्धर्माखेरीज आपणासमोर जे चित्र सहजतेने डोळ्यासमोर येते त्या चीनच्या अधिपत्याखालील त्याच्या राजकीय परिस्थितीचीही जाणीव या पुस्तकातून होते. तिबेटी संस्कृतीवर झालेले परिणाम, त्यांच्या स्वातंत्र्यभावनेवरील मर्यादा आणि त्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली वेदना लेखिका मीना प्रभू यांनी  अत्यंत संवेदनशीलतेने मांडली आहे. दलाई लामांविषयी असलेली लोकांची निष्ठा आणि त्यांच्या प्रती असलेला आदर हा या समाजाचा महत्त्वाचा भावनिक आधार असल्याचेही या पुस्तकात स्पष्ट करण्यात आले आहे.  त्यामुळे हे पुस्तक वाचताना वाचकाला केवळ माहिती मिळत नाही, तर त्या समाजाशी एक भावनिक नातेही निर्माण होते.

लेखिका मीना प्रभू यांनी पुस्तकात वापरलेली  भाषाशैली साधी, प्रवाही आणि चित्रमय असल्यामुळे प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. प्रवासातील अडचणी, निसर्गाचे अद्भुत वैभव आणि मानवी जीवनातील साधेपणा

यांचा सुंदर मेळ या पुस्तकात गुंफलेला आढळतो  वाचकाला वाचताना असे सातत्याने  तो स्वतः या प्रवासाचा एक भाग आहे आणि प्रत्येक अनुभव प्रत्यक्ष अनुभवत आहे.असे वाटावे या पद्धतीनेच लेखन लेखिका मीना प्रभू यांनी केले आहे 

एकूणच, ‘वाट तिबेटचीहे पुस्तक तिबेटच्या भौगोलिक सौंदर्याबरोबरच तेथील संस्कृती, अध्यात्म आणि सामाजिक-राजकीय वास्तव यांचे सखोल दर्शन घडवणारे, विचारप्रवर्तक आणि मनाला स्पर्श करणारे उत्कृष्ट प्रवासवर्णन आहे. प्रवासप्रेमींसह वेगळ्या संस्कृतींची ओळख करून घेण्याची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक निश्चितच वाचननीय ठरते.


मुंबईच्या ऐतिहासिक गिरणी कामगाराच्या संपानंतरची गुन्हेगारी विश्वाची माहिती देणारे पुस्तक, 'भायखळा ते बँकॉक'

मुंबई,  आपल्या भारताची आर्थिक राजधानी, जगात सर्वात जास्त चित्रपट निर्मिती करणाऱ्या भारतीय सिनेमाचे मुख्य केंद्र (बॉलिवूड ही संज्ञा प्रामुख्य...