लेखाचे विषय

शुक्रवार, २४ जुलै, २०२६

भारताच्या विकासदृष्टीचे समग्र दर्शन घडवणारी मासिके



आपल्याकडे  भारताच्या विकासाबाबत विविध दावे प्रतिदावे सातत्याने करण्यात येतात.आपण ज्या माध्यमातून याबाबत माहिती घेतो आहोत त्या माध्यमाच्या विचारसरणीनुसार आपणास माहिती मिळते .जर माध्यम  केंद्र सरकारच्या माताच पुरस्कर्ता असेल तर वास्तवात नसलेली आदर्श स्थिती थंडी अधिक उजळ करून आपल्यापुढे सादर करेल.याउलट जर माध्यम विरोधी पक्षाच्या बाजूचे असेल तर वास्तवातील चांगली बाजू कारण नसताना ऋणात्मक दाखवत भारताची प्रगती दाखवणार नाही . अश्या स्थितीत भारताचे जसे आहे तसे चित्र उभे करणारे कोणतेच माध्यम नाही का स प्रश्न आपणस पडलं असेल तर सांगतो चित्रफारच निराशजनक  नाहीये  आपणास खरे चित्र  समोर करणारी दोन मासिके सहज सापडतात ती म्हणजे स्पर्धा परिक्षतेची तयारी करणाऱ्या विदयार्थ्यांच्या मुखाशी असणारी मासिकाने अर्थात योज़ना आणि कुरुक्षेत्र . मी हो दोन्ही मासिके गेली सुमारे १५ वर्ष नियमिपणे वाचत असे सुरुवातीला मराठी भाषेतील वाचत असे आता मात्र थेट इंग्रजी भाषेतील वाचतो 

. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागामार्फत प्रकाशित होणारी ही दोन्ही मासिके देशाच्या विकास प्रक्रियेच्या वेगवेगळ्या बाजू  समजावत .ज्यामुळे ही मासिके  केंद्र सरकाच्या यशापयशाच्या अभ्यास करणाऱ्या व्यक्ती, पत्रकार स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार आणि आपल्या सारखे देशाच्या प्रगतीबाबत नवीन खरी माहिती जाणण्याची इच्छा असलेले सर्वसामान्य  नागरिक यांना खरी स्थिती समजवून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात.  हि दोन्ही मासिक जरी भारत सरकारकडून प्रकशित करण्यात आलेली असली तरी सरकारी प्रचार यात डोकावत नाही .सरकारची विचारसरणी काहीही असो त्याचे प्रतिबिब मासिकात पडल्याचे मला तरी दिसून आलेले नाही 

‘योजना’ मासिकाची सुरुवात १९५७ साली झाली. या मासिकाचा मुख्य उद्देश म्हणजे केंद्र सरकारच्या विविध योजना, धोरणे आणि विकास उपक्रमांची सविस्तर माहिती देणे. अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, डिजिटल परिवर्तन, पर्यावरण अशा विविध विषयांवर तज्ज्ञांचे लेख ‘योजना’मध्ये प्रकाशित होतात. या लेखांमधून केवळ योजनांची माहितीच मिळत नाही, तर त्यांच्या परिणामांचे विश्लेषण आणि भविष्यातील दिशा देखील स्पष्ट होते. मराठीच नाही तर सोपी, समजण्यासारखी इंग्रजी  भाषा आणि वस्तुनिष्ठ मांडणी ही ‘योजना मासिकाचा स्ट्रॉंग पॉईंट म्हणता येईल मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असल्यामुळे हे मासिक जवळपास सर्वच भारतीय सहजतेने वाचून दंशाची खरी स्थिती समजवून घेऊ शकतो

तर  ‘कुरुक्षेत्र’ मासिक १९५२ पासून प्रकाशित होत असून ते मुख्यतः ग्रामीण विकासावर केंद्रित आहे. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश असल्यामुळे ग्रामीण भागाचा विकास हा राष्ट्रीय प्रगतीचा कणा मानला जातो. ‘कुरुक्षेत्र’मध्ये शेती, जलसंधारण, ग्रामीण उद्योग, स्वयंसहायता गट, पंचायत राज व्यवस्था, शाश्वत विकास यांसारख्या विषयांवर सखोल माहिती दिली जाते. ग्रामीण भागातील समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरील उपाययोजना यांचा समतोल आढावा या मासिकातून मिळतो. शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य, संशोधक आणि

ग्रामीण प्रशासनाशी संबंधित व्यक्तींसाठी ‘कुरुक्षेत्र’ उपयुक्त आहेच  त्याशिवाय स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण विकासाशी संबंधित प्रश्नांची तयारी करण्यासाठी हे मासिक महत्त्वाचे संदर्भसाहित्य म्हणूस सुद्धा खूप मदत करणारे ठरते 

‘योजना’ आणि ‘कुरुक्षेत्र’ ही दोन्ही मासिके एकमेकांना पूरक ठरणारी आहेत. ‘योजना’ राष्ट्रीय स्तरावरील धोरणे आणि त्यामागील विचारधारा सांगते , तर ‘कुरुक्षेत्र’ त्या धोरणांची अंमलबजावणी खेडयात कशी होते आणि त्याचे परिणाम काय होतात , हे दाखवते . त्यामुळे या दोन्ही मासिकांचे एकत्रित वाचन केल्यास देशाच्या विकासाचे खरे वास्तव समजू शकते असे माझे दोन्ही पुस्तके वाचुन झलेले मत आहे 

थोडक्यात  समाजजीवन, प्रशासन, अर्थव्यवस्था आणि ग्रामीण विकास यांविषयी माहिती मिळवण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी मजबूत करण्यासाठी ‘योजना’ आणि ‘कुरुक्षेत्र’ ही मासिके ज्ञानाचा समृद्ध आणि विश्वासार्ह स्रोत आहेत 

मी स्पर्धा परीक्षा क्षेत्राचा अभ्यास सोडून कितीतरी वर्ष झाली आहेत तरी देखील मी  ती अजून वाचतोय आपण देखील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे  नसाल तरी ही मासिके आवर्जून वाचाच असे मी तुम्हाला संगी इच्छितो कारण या दोन्ही मासिकांमधून मिळणारे ज्ञान तुम्हला रोजच्या जगण्यात सुद्धा नक्कीच उपयोगी पडेल अशी माझी खात्री आहे मग करणार ना वाचायला सुरुवात 

गुरुवार, २३ जुलै, २०२६

बदलत्या काळाची दिशा ओळखत 'साप्ताहिक सकाळ'चे स्वागतार्ह्य पाउल

 

आपल्या मराठीला साप्ताहिकाची मोठी परंपरा आहे.वेगवेगळ्या विषयावरची साप्ताहिके मराठीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रसिद्ध  आलेली आहेत.समाजाचा  वचनाबद्दलच्या बदलणारा   दृष्टिकोन, आपसातील स्पर्धा, तसेच छपाईच्या दारात झालेली  वाढ या सारख्या अनेक कारणामुळे त्यातील काही बंद देखील पडली आणि अजून देखील  बंद होत आहे . मात्र डार्विनचा सक्षम तोच टिकणार या सिद्धांतानुसार काही साप्ताहिकांनी काळाची पाऊले उचलत आपल्यामध्ये  मोठ्या प्रमाणात बदल करत आजदेखील त्यांच्या वाचकवर्ग खप मोठ्या प्रमाणात टिकवून ठेवला आहे. या कालानुरूप बदललेल्या साप्ताहिकांमध्ये नवा घ्यावेच लागेल ते म्हणजे साप्ताहिक सकाळचे सकाळ माध्यम समूहाचे पूर्णतः राजकारणावर आधारित साप्ताहिक 'सरकारनामा 'या दही अनेकदा छापील स्वरूपात आले आणि बंद होऊन ऑनलाईन स्वरूपात घेणे .मात्र गेली ४० वर्ष छापील रूपात प्रसिद्ध होणारे त्याच माध्यम  वॉमूहाचे साप्ताहिक मात्र अजून टिकून आहे 

सध्याचा साप्तहिक सकाळचे  वैशिष्ट  म्हणजे विशेषांक होय. सध्या साप्ताहिकाचा  प्रत्येक अंक  एक विशेषांक असतो. एका विशेषांकांत एका विषयावरील लेख सर्वात जास्त असतात अर्थात पूर्वीप्रमाणे नेहमी चालणारी सदरे देखील आहेतच मात्र त्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी आहेत असे माझे ढोबळ निरीक्षण आहे आणि जी सदरे सुरु आहेत ती देखील साप्ताहिकाच्या शेवटच्या  अर्ध्या भागात छापलेली अढळतात सुरुवातीचा अर्धा भाग हाविशेषांकांनी भरलेला असतो ज्याचे विषय देखील निवडीला दाद देण्यासारखे असतात. एखाद्या विशिष्ट वर्गालाच अपील होतील असे विषय  खूप मोठ्या वर्गाला अपील होतील ज्याचा वर्तमानाशी काहीतरी संपर्क असेल असे विषय या साप्ताहिकता घेतलेले मला दिसले आता लोकांना अपील होणारे विषय आहेत  नः ?मग लेखाचा दर्जा काहीका असेना हा प्रकार मला यात आढळलेला नाही सर्वच लेख माहितीपूर्ण तरीही सहजसोप्या मराठीत लिहिलेले अढळतात त्याबद्दल त्यांच्या संपादकीय तोमेचे कौतुक करायलाच हवे माझ्या मते सकाळ माध्यम समूहाने  सरकारनामा मध्ये या प्रकारचे काही बदल करून त्याला स्थायी स्वरूप देता येईल का हे बघावे म्हणजे वाचकांना वाचनाच्या स्वर्गसुखाचा  नक्कीच घेता येईल हे नक्की 


साधना’ साप्ताहिक – प्रबोधनाची परंपरा जपणारे मराठी साप्ताहिक


साप्ताहिकांनी फार पूर्वीपासून समाजाचे मनोरंजन करण्यासह त्यांना विविध प्रकारची माहिती देण्यात मोठी भूमिल्का बजावली आहे . रोज प्रसिद्ध होणाऱ्या न्यूजपेपरमधून ज्या गोष्टी वेळेच्या प्रेशरमुळे  येणे अवघड आहे . महिन्याच्या अंतराने दिल्यास खूप उशीर झालेला असू शकतो त्या गोष्टी देण्याचे मोठे काम साप्ताहिकाने  केल्याचे आपणास सहजतेने दिसते .  आपल्या मराठीत अनेक विषयावरची अनके विचारधारणेची साप्ताहिके आली आणि अनेक  कारणाने बंद  देखील  पडली मात्र विविध अडचणींना तोंड देत काही अजून देखील सुरु आहेत .या सुरु असलेल्या साप्तहिकापैकीच एक म्हणजे पुणे शहरातील शनवार पेठ येथून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक साधना 
साधना’ हे मराठीतील एक प्रतिष्ठित साप्ताहिक आहे ज्याची  स्थापना १९४८ साली साने गुरुजी यांच्या प्रेरणेने झाली. समाजातील प्रबोधन, समता, न्याय आणि मानवी मूल्ये यांचा प्रसार करणे हा या साप्ताहिकाचा मूलभूत उद्देश आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही मूल्यांची जपणूक आणि सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी ‘साधना’ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आजच्या काळात मागे पडलेल्या किंबहुना आज देशाच्या प्रगतीला खीळ बसवणारी विचारधारा अशी ओळख असलेल्या समाजवादी विचार धारणेचे साप्ताहिक अशी ओळख असली तरी साधनाचे महतव अजून देखील कमी झाले नाही मी नियमितपणे नाही मात्र अनेकदा साधना मासिक वाचतो 
‘साधना’ साप्ताहिकात राजकारण, समाजकारण, शिक्षण, संस्कृती, साहित्य, ग्रामीण प्रश्न, मानवाधिकार, स्त्री-पुरुष समानता यांसारख्या विविध विषयांवर सखोल आणि चिकित्सक लेख प्रसिद्ध होतात.  वस्तुनिष्ठ दृष्टिकोन, विचारांची मोकळीक आणि सामाजिक बांधिलकी. केवळ बातम्या देण्यापेक्षा विचार प्रवृत्त करणारे लेख हे ‘साधना’चे वैशिष्ट्य आहे असे मला वाटते 
या साप्ताहिकाने अनेक प्रगतिशील विचारवंत, लेखक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचा इतिहास आहे  समाजातील अन्याय, विषमता आणि अंधश्रद्धा यांविरुद्ध ठाम भूमिका घेणे ही ‘साधना’चीपरंपरा समजण्यात येते त्यामुळे हे साप्ताहिक केवळ माहिती देणारे माध्यम न राहता समाजपरिवर्तनाचे साधन आहे अशी समाजमान्यता अजून देखील टिकून आहे आजच्या आर्टिफिशियल
इंटेलिजियन्सच्या युगातही ‘साधना’ साप्ताहिक आपली वैचारिक परंपरा जपत आधुनिक विषयांवर भाष्य करत आहे. समाजातील जाणीव जागृत ठेवणे आणि विवेकनिष्ठ विचारसरणीला चालना देणे या दृष्टीने ‘साधना’चे योगदान अत्यंत मोलाचे आहे. म्हणूनच मराठी वाचकांसाठी ‘साधना’ हे केवळ साप्ताहिक नसून एक विचारप्रवाह आहे.

सोमवार, २० जुलै, २०२६

मुंबईच्या ऐतिहासिक गिरणी कामगाराच्या संपानंतरची गुन्हेगारी विश्वाची माहिती देणारे पुस्तक, 'भायखळा ते बँकॉक'


मुंबई,  आपल्या भारताची आर्थिक राजधानी, जगात सर्वात जास्त चित्रपट निर्मिती करणाऱ्या भारतीय सिनेमाचे मुख्य केंद्र (बॉलिवूड ही संज्ञा प्रामुख्याने हिंदी चित्रपटांना वापरतात हिंदीत्तेर भाषांसाठी वेगवेगळी नवे आहेत सबब भारतीय सिनेमा )“भारताच्या लोकसंसंख्येंत सुमारे ९ टक्के प्रतिनिधित्व करणाऱ्या  महाराष्ट्राची राजधानी मुबई . मुळात सात बेटावर वसलेल्या या शहराची वेगाने जडणघडण सुरु होते . ती पोर्तुगीजांनी लग्नात हुंडा म्हणून ब्रिटिशांना मुंबईचा प्रदेश दिल्यावर .तेव्हापासून आता २०२६ पर्यतचा शहराचा आढावा घेतल्यास गिरणी कामगारांचा ऐतिहासिक म्हणता येईल असा संपाचा उल्लेख करावाच लागेल. या संपामुळे मुंबई शहराचाचेहरामोहरा खूपच मोठ्या प्रमाणात बदलला या बदलात तेथील मराठी समाजजीवन आणि आर्थिक उलाढाल हे तर बदललेच त्याशिवाय ज्याला आता  अंडरवर्ल्ड  म्हणतात ते विश्व देखील मोठ्या प्रमाणात बदलले गिरणी कामगारांच्या संपामुळे आलेल्या आर्थिक  अडचणीवर मात करण्यासाठी येथील अनेक  तरुण गुन्हेगारीकडे वळाले आणि मुंबईतील गुन्हेगारीने वेगळे वळण घेतले या वेगळ्या वळणाची आपणास माहिती होते ती आपल्या गुन्हेगारीविषक रिपोर्टींग मुळे प्रसिद्ध झालेले  पत्रकार  एस. हुसेन झैदी यांनी मुळात इंग्रजीत लिहिलेले आणि उज्ज्वला बर्वे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या  'भायखळा ते बँकॉक' या पुस्तकामुळे. जे मी नुकतेच वाचले  
पुस्तक मुंबईच्या अंडरवर्ल्डचा सखोल आणि वास्तववादी वेध घेणारे महत्त्वपूर्ण साहित्य म्हणता येईल  “डोंगरी ते दुबई” या गाजलेल्या पुस्तकाचा हा पुढचा भाग आहे  ज्यात दाऊद  इब्राहिम सोडून मुंबईतील अन्य गुन्हेगारांच्या जसेर छोटा राजन टोळी , नाईक  टोळी, अरुण गवळी टोळी  या सारख्या १९९० नंतरच्या काळातील मुंबईतील गुन्हेगारी विश्वाचा मागोवा घेण्यात आला आहे या पुस्तकात या  कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांच्या प्रमुखांच्या आयुष्याची  सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या बालपणापासून ते गुन्हेगारी जगतातील प्रवेश आणि पुढील वाटचाल  हा प्रवास लेखक पत्रकार  एस. हुसेन झैदी यांनी अत्यंत तपशीलवार
आणिवास्तवदर्शी पद्धतीने मांडला आहे. साध्या कुटुंबातील तरुण कशा परिस्थितीत गुन्हेगारीकडे वळतात, यामागील सामाजिक, आर्थिक आणि मानसिक करणे देखील आपल्याला या पुस्तकाच्या वाचनातून समाजात 
या पुस्तकाचे एक प्रमुख वैशिष्ट  म्हणजे पत्रकार झैदी यांची  संशोधनाधारित मांडणी. पोलीस नोंदी, प्रत्यक्ष मुलाखती आणि विविध ऐतिहासिक संदर्भ यांच्या आधारे त्यांनी  घटनांची माहिती दिली आहे . त्यामुळे हे पुस्तक केवळ गुन्हेगारी कथा न राहता, त्या मागील यंत्रणा, सत्तासंघर्ष आणि वास्तव परिस्थिती यांचेही खरे चित्र आपल्या समोर मांडते . 
पुस्तकात मुंबई पोलिसांच्या ‘एनकाऊंटर स्पेशालिस्ट’ अधिकाऱ्यांचाही उल्लेख आहे. गुन्हेगार आणि पोलिस यांच्यातील संघर्ष, त्यातील धाडस, ताणतणाव आणि निर्णयप्रक्रिया यांचे प्रभावी चित्रण वाचकांना गुंतवून ठेवते. यामुळे पुस्तकाला  थरारक आणि चित्रपटासारखी गती मिळते . याशिवाय, आधीच्या परिच्छेदात उल्लेख केला त्या प्रमाणे गिरणी कामगारांच्या संपामुळे मुंबईत झालेले सामाजिक बदल,ज्यात  राजकीय हस्तक्षेप झाल्याने उदयास आलेली नवी गुन्हेगारी आणि   या सर्व घटकातील गुंतागुंतीचे नातेही उलगडते. गुन्हेगारी ही केवळ वैयक्तिक चुकीचा परिणाम नसून, ती परिस्थिती, संधी आणि सामाजिक रचनेशी निगडित असते, हा महत्त्वाचा मुद्दा झैदी यांनी ठळकपणे अधोरेखित केल्याचे पुस्तक वाचनातून अप[नास समजते . एकूणच, “भायखळा ते बँकॉक” हे पुस्तक गुन्हेगारी विश्वाचा इतिहास, मानवी स्वभाव आणि समाजातील बदल यांचा अभ्यास घडवणारे, माहितीपूर्ण आणि अत्यंत वाचनीय असे साहित्य ठरते.
गुन्हेगारीविषक रिपोर्टींग मुळे प्रसिद्ध झालेले  पत्रकार  एस. हुसेन झैदी यांच्या याशिवाय प्रसिद्ध असलेल्या डोंगरी ते दुबई या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 


गुरुवार, ९ जुलै, २०२६

जगाच्या छप्पराची सफर घडवणारे प्रवासवर्णन :वाट तिबेटची

प्रवासवर्णन हा लेखन प्रकार मराठीत मोठ्या प्रमाणात रुळला आहे. सन १८५७ साली गोडसे गुरुजी या नावाने प्रसिद्ध असलेल्या विष्णू भट गोडसे यांनी लिहलेले माझा प्रवास हे मराठीतील पहिले प्रवासवर्णन समजले जाते १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी लेखकाने ऊत्तर भारतात केलेल्या प्रवासाचे यात वर्णन आहे . सध्या आपल्या मराठीत 'अपूर्वाईआणि 'पूर्वरंग' 'धुक्यातून लाल ताऱ्याकडे' 'माझा युरोपचा प्रवास' 'विलायतेचा प्रवासया सारखी अनेक प्रवासवर्णन प्रहद आहेत.किंबहुना काही लेखक फक्त त्यांच्या प्रवासवर्णनासठीच प्रसिद्ध आहेत. मूळच्या पुणे शहराच्या रहिवाशी असलेल्या मात्र लग्नानंतर लंडन शहरात स्थायिक झालेल्या मीना प्रभू या अश्याच प्रवासवर्णांसाठी प्रसिद्ध असलेल्या लेखिका मी नुकतेच त्यांचे 'वाट तिबेटची हे पुस्तक वाचले 

मीना प्रभू या आपल्यला  ‘वाट तिबेटचीया पुस्तकातून  हिमालयाच्या कुशीत वसलेल्या तिबेट या गूढ, आध्यात्मिक आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रदेशाची सखोल ओळख करून देतात . हे पुस्तक केवळ प्रवासवर्णन म्हणून मर्यादित नाहीये. आपण त्याला  सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि मानवी भावनांचा वेध घेणारी एक समृद्ध अनुभवयात्रा  म्हणू शकतो . तिबेटचा प्रवास हा भौगोलिकदृष्ट्या कठीणउंच पर्वत, विरळ हवा आणि अनिश्चित परिस्थिती होत असला, तरी त्याच्या पलीकडे असलेली शांतता, साधेपणा आणि तिबेटियन बुधदी धर्माची अध्यात्मिकतेची ओढ मीना प्रभू यांनी  अत्यंत सहजसोप्या शब्दात मात्र  प्रभावी शब्दात मांडली आहे.

या पुस्तकात ल्हासा शहर, पोताला पॅलेस, विविध बौद्ध मठ आणि तेथील धार्मिक परंपरा यांचे जिवंत चित्रण दिसते. बौद्ध धर्माचा दैनंदिन जीवनावर असलेला प्रभाव, प्रार्थना चक्रे, साधूंचे जीवन आणि श्रद्धेने जगणारे

सामान्य लोक यांचे सविस्तर केलेले वर्णन वाचकाला त्या वातावरणाचा पुस्तकाच्या माध्यमातून का होईना  अनुभव देते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.  मीना प्रभू यांनी मांडलेले तिबेटी लोकांचे जीवन अत्यंत साधे, कष्टमय आणि तरीही समाधानाने भरलेले आहे. कठीण परिस्थितीतही त्यांनी जपलेली आनंदी वृत्ती आणि अध्यात्मिक निष्ठा वाचकाला विचार करायला भाग पडते 
याचबरोबर तिबेट म्हंटल्याबरोबर बौद्धर्माखेरीज आपणासमोर जे चित्र सहजतेने डोळ्यासमोर येते त्या चीनच्या अधिपत्याखालील त्याच्या राजकीय परिस्थितीचीही जाणीव या पुस्तकातून होते. तिबेटी संस्कृतीवर झालेले परिणाम, त्यांच्या स्वातंत्र्यभावनेवरील मर्यादा आणि त्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली वेदना लेखिका मीना प्रभू यांनी  अत्यंत संवेदनशीलतेने मांडली आहे. दलाई लामांविषयी असलेली लोकांची निष्ठा आणि त्यांच्या प्रती असलेला आदर हा या समाजाचा महत्त्वाचा भावनिक आधार असल्याचेही या पुस्तकात स्पष्ट करण्यात आले आहे.  त्यामुळे हे पुस्तक वाचताना वाचकाला केवळ माहिती मिळत नाही, तर त्या समाजाशी एक भावनिक नातेही निर्माण होते.

लेखिका मीना प्रभू यांनी पुस्तकात वापरलेली  भाषाशैली साधी, प्रवाही आणि चित्रमय असल्यामुळे प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. प्रवासातील अडचणी, निसर्गाचे अद्भुत वैभव आणि मानवी जीवनातील साधेपणा

यांचा सुंदर मेळ या पुस्तकात गुंफलेला आढळतो  वाचकाला वाचताना असे सातत्याने  तो स्वतः या प्रवासाचा एक भाग आहे आणि प्रत्येक अनुभव प्रत्यक्ष अनुभवत आहे.असे वाटावे या पद्धतीनेच लेखन लेखिका मीना प्रभू यांनी केले आहे 

एकूणच, ‘वाट तिबेटचीहे पुस्तक तिबेटच्या भौगोलिक सौंदर्याबरोबरच तेथील संस्कृती, अध्यात्म आणि सामाजिक-राजकीय वास्तव यांचे सखोल दर्शन घडवणारे, विचारप्रवर्तक आणि मनाला स्पर्श करणारे उत्कृष्ट प्रवासवर्णन आहे. प्रवासप्रेमींसह वेगळ्या संस्कृतींची ओळख करून घेण्याची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक निश्चितच वाचननीय ठरते.


भारताच्या विकासदृष्टीचे समग्र दर्शन घडवणारी मासिके

आपल्याकडे  भारताच्या विकासाबाबत विविध दावे प्रतिदावे सातत्याने करण्यात येतात.आपण ज्या माध्यमातून याबाबत माहिती घेतो आहोत त्या माध्यमाच्या वि...