लेखाचे विषय

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२६

लोकमान्य टिळकांच्या राजकीय जीवनावर भाष्य करणारे चरित्र - मंडालेच्या राजबंदी

आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला विविध कंगोरे असतात , असे मानसशात्रात मानले जाते . या सर्व कंगोरेच्या एकत्रीकरणतुंन आपले व्यक्तिक्त्व घडते .एकाचवेळी सर्वांच्या सर्व कंगोरे सामोरे येतीलच असे नाही .किंबहुना येतच नाहीत. त्यामुळे एखाद्याला आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्तवाचे आकलन होईलच अस ठामपणे सांगता येत नाही . आपल्या सारख्या सर्वसाम्याची ही  कथा तर स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या बहुआयामी प्रकांड पंडित तीक्ष्ण बुद्धीच्या व्यक्तिमत्वाविषयी ही बाब तर आणखी  प्रखर होते. 
लोकमान्य टिळकांचीच गोष्ट करायची झाल्यास त्याच्या राजकीय सुधारणा आधी  आणि सामाजिक सुधारणा नंतर  याविषयी च्या मातांना महत्व देयचे की सामाजिक एकतेच्या माध्यमातून जातिभेद मिटत असल्याने सामाजिक सुधारणांच्या भाग म्हणता येईल अश्या  छत्रपती शिवाजी महाराज यांची  जयंती, सार्वजनिक गणेशोत्सव यांचा विचार करत त्यांनी काही प्रमाणात  सामाजिक सुधारणा देखील केल्या असे म्हणायचे असा प्रश्न निर्माण होतो . माझ्यामते या सारख्या प्रश्नाचे ऊत्तर हवे असल्यास आपणास या सारख्या थोर  व्यक्तिमत्वाच्या विविध कंगोरेना समोर ठेवत लिहिलेली चरित्रे मदत करतात . लोकमान्य टिळकांच्या पहिल्या राजद्रोहाच्या बंदिवासला १०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांनी लिहिलेले आणि राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित मंडालेच्या राजबंदी हे पुस्तक याच प्रकारचे आहे.  लोकमान्य टिळकांच्या  राजकीय जीवनावर भाष्य करणारे चरित्र म्हणजे मंडालेच्या राजबंदी असे आपण म्हणू शकतो  

अरविंद गोखले लिखित आणि राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेले ‘मंडालेचा राजबंदी’ हे पुस्तक लोकमान्य टिळकांच्या अढळ विचारशक्तीची, राष्ट्रनिष्ठेची आणि संघर्षाची प्रभावी ओळख करून देते.एखाद्या राष्ट्रनेत्याला आपल्या देशापासून हजारो किलोमीटर दूर नेऊन तुरुंगात डांबले, तर त्याचा आवाज थांबेल आणि त्याचे विचारही थांबतील, असे सत्ताधाऱ्यांना वाटू शकते. मात्र असे वाटणे चुकीचे ठरू शकते याची जाणिव लोकमान्य टिळकांच्या बंदिवासातून इंग्रजांना कोणता प्रकारे झाली याची माहिती आपणस या ३०० पानी  पुस्तकातून मिळते . 

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या योगदानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ब्रिटिश सत्तेविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवल्याची किंमत त्यांना कारावासाच्या रूपाने मोजावी लागली. भारतापासून दूर असलेल्या मंडाले येथे त्यांना ठेवण्यात आले. अपरिचित वातावरण, कठीण परिस्थिती,
एकाकीपणा आणि शारीरिक कष्ट यांमुळे हा काळ त्यांच्या मनोधैर्याची कसोटी पाहणारा होता. मात्र
राष्ट्रकार्यासाठी समर्पित झालेल्या टिळकांची विचारशक्ती आणि आत्मविश्वास या प्रतिकूल परिस्थितीतही डळमळला नाही. आपल्या  कारागृहातील कालावधीचा सुयोग्य वापर करतआर्टिक होम ऑफ वेदाज आणि गीतारहस्य या महान ग्रंथाची रचना कारण्यासह, जर्मनी पाली भाषा सवयंअध्यायाच्या मार्फत कोणत्या पद्धतीने आत्मसात करायच्या  वस्तुपाठच त्यांनी त्यांनी आपल्या आचरणतून कोणत्या पद्धतीने घालून दिला , हे आपल्यास या पुस्तकातून समजते . 

लोकमान्य टिळकांना त्यांच्या आयुष्यात जे तीन कारावास भोगायला लागले त्यापैकी सर्वत कठीण कारावास असलेल्या मंडालेच्या संदर्भ देऊन शीर्षक असलेल्या या पुस्तकात अरविंद गोखले यांनी  मंडालेच्या कारावासाकडे केवळ एका ऐतिहासिक घटनेच्या रूपात पाहिलेले नाही. त्या घटनेमागील राजकीय परिस्थिती, टिळकांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची मानसिकता आणि राष्ट्रवादी विचार यांचा मागोवा घेत त्यांनी या पर्वाचे अधिक व्यापक चित्र उभे केले आहे. त्यामुळे वाचकाला टिळकांच्या जीवनातील एक महत्त्वाचा कालखंड समजतो आणि त्याचवेळी तत्कालीन भारताचे राजकीय वातावरणही उलगडत जाते. मी वाचली ती पुस्तकाची ४ आवृत्ती होती याचवथ्या आवृत्तीत आधीच्या तीन आवृत्तीत नसलेल्या लोकमान्य टिळकांना भोगाव्या लागलेल्या पहिल्या कारावासाची गोष्ट देखील समाविष्ट केली आहे  १७  प्रकरणात विभागलेल्या या पुस्तकातील ९ वे प्रकरण लोकमान्य टिळकांच्या  दुसऱ्या राजद्रोहाच्या खटल्याची माहिती देते . पण क्रमांक १३१ ते २०२ असे सुमारे ७० पाने असलेल्या या प्रकरणात या खटल्यात न्यायालयासमोर आलेला युक्तिवाद मांडण्यात आला आहे ज्याद्वारे लोकमान्य टिळकांच्या बुद्धिमत्तेची आपणासझलक पाहायवास मिळते. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर
यांच्या राजकीय सुधारणा पहिले की  सामाजिक सुधारणा पहिले य वादावर पहिल्या प्रकरणात काही प्रमाणात उल्लेख केला आहे जे ५ पानाचे आहे त्यानंतर सुमारे अर्ध्या ते पाऊण  एका पानाच्या अपवाद वगळता संपूर्ण पुस्तक लोकमान्य टिळकांचार राजकीय त्यातही त्यांना भोगायला लागलेल्या २ राजद्रोहविषयी माहिती देते   स्वातंत्र्य हे केवळ राजकीय ध्येय नसून त्यासाठी वैयक्तिक सुख-सोयींचा त्याग करण्याची तयारी असावी, हा संदेशलोकमान्य टिळकांनी  त्यांच्या जीवनातून दिल्याचे पुस्तक वाचताना  प्रकर्षाने जाणवते 

या पुस्तकाचे आणखी एक महत्त्व म्हणजे ते इतिहासाकडे पाठ्यपुस्तकी नजरेने पाहण्याऐवजी त्यामागील मानवी आणि वैचारिक पैलू समजून घेण्याची संधी देते. कारावासातील एकाकीपणा आणि संकटे यांचा सामना करताना ध्येयाशी प्रामाणिक राहण्याची टिळकांची वृत्ती वाचकाला प्रेरणा देते. त्यातून स्वाभिमान, धैर्य, चिकाटी, राष्ट्रनिष्ठा आणि प्रतिकूल परिस्थितीतही न खचण्याची शिकवण मिळते.आज स्वातंत्र्य आपल्यासाठी सहज
उपलब्ध असलेले वास्तव आहे. त्यामुळे त्यामागे असलेला त्याग आणि संघर्ष अनेकदा विस्मरणात जातो. अशा वेळी ‘मंडालेचा राजबंदी’सारखे पुस्तक इतिहासातील संघर्षांची केवळ आठवण करून देत नाही, तर त्या संघर्षातून निर्माण झालेल्या मूल्यांचा पुनर्विचार करण्यास भाग पाडते.

एका राजबंदीच्या कारावासाची कथा म्हणून सुरू होणारे हे पुस्तक अखेरीस विचारांच्या स्वातंत्र्याची, अढळ राष्ट्रनिष्ठेची आणि ध्येयासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची कथा बनते. इतिहासाची आवड असणाऱ्या तसेच प्रेरणादायी चरित्रात्मक लेखन वाचू इच्छिणाऱ्या प्रत्येक वाचकाने अनुभवावे असे हे पुस्तक आहे.

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

प्रवास एका ध्यासपुर्तीचा 'माझंही एक स्वप्न होतं’

अमिताभ बच्चन यांच्या नेत्रदानाविषयी टिव्हीवरील एका  जाहिरातीमध्ये एक वाक्य आहे त्यावेळेस कॅमेरा त्यांच्या पायावर स्थिर असतो कुछ लोगों के लिए मेरी आवाज ही मेरी पहचान है!  भारतातील सर्वात मोठा सहकारी दुग्ध प्रकल्प असणाऱ्या अमूल बाबत सुद्धा आपल्याला असेच म्हणता येईल भारतातील दुग्ध प्रकल्प म्हणजे अमूल असीच जगभरात फार मोठ्या प्रमाणात ओळख आहे. अमुल टेस्ट ऑफ इंडिया अमुल दूध पीता हे इंडिया अर्टली बर्टली डेलिशियस अमुल या  अनेक स्लोगननी अमुलला आपल्या भारताच्या घराघरात स्थान दिले आहे. मी एस पी कॉलेजमध्ये शिकत असताना स्पर्धा परिक्षेचा सुद्धा अभ्यास करत होतो त्यावेळेस कॉलेज संपल्यावर क्लासला जाण्याचा आधी जो थोडासा मोकळा वेळ मिळत असे. त्यावेळेस पोट भरण्यासाठी मी अमुल कुल  पीत असे. आपला देखील अमुलबाबत हाच अनुभव असेल असो 
गुजरात मधील काहीसा दुष्काळी भागातील असणाऱ्या आनंद या गावी  केरळी ख्रिश्चन असलेल्या वर्गिस कुरीयन यांनी  कष्टाने उभारलेल्या प्रकल्प म्हणजे अमुल. भारतातील दुधाचे उत्पादन वाढावे यासाठी  वर्गीस कुरियन यांनी दिलेल्या योगदानामुळे आपण त्यांना मिल्क मॅन ऑफ इंडिया असे म्हणतो. त्यांनी अमुलच्या उभारणीतील योगदान त्यासाठी त्यांनी केलेले कष्ट त्यांना अमूल उभारण्याची प्रेरणा याविषयी त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेले आहे. आपल्या सुदैवाने राजहंस प्रकाशन तर्फे प्रकाशित 'माझे एक स्वप्न होतं' या त्यांच्या अनुवादित आत्मचरित्रात हे आपणास मराठी भाषेत वाचायला मिळते.या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुजाता देशमुख यांनी केला आहे.
वर्गीस कुरियन यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नव्हता. गुजरातमधील आनंद येथे काम करताना त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जवळून पाहिल्या. शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाचा योग्य मोबदला मिळावा,मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी व्हावे आणि दूध उत्पादकांच्या मालकीची सक्षम सहकारी व्यवस्था उभी राहावी, या विचारातून त्यांच्या कार्याला दिशा मिळाली. याच प्रयत्नांतून ‘अमूल’ची सहकारी चळवळ बळकट झाली आणि पुढे भारतीय दुग्धक्षेत्रात मोठे परिवर्तन घडले.या वाटचालीत अडचणींची कमतरता नव्हती. नोकरशाही, जुन्या कार्यपद्धती, हितसंबंध, राजकीय हस्तक्षेप, बाजारातील स्पर्धा आणि परदेशी कंपन्यांचे वर्चस्व अशा अनेक आव्हानांना कुरियन यांना सामोरे जावे लागले. मात्र स्पष्ट ध्येय, व्यवस्थापनकौशल्य आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी या अडथळ्यांवर मात केली. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू स्वतःचे वैयक्तिक यश नसून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण हा होता.
सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सामान्य शेतकऱ्याला उत्पादन व्यवस्थेचा मालक आणि विकासाचा
भागीदार बनविण्याची त्यांची कल्पना अत्यंत महत्त्वाची होती. हे सर्व आपल्या या आत्मचरित्रात वाचायला मिळते.
या आत्मचरित्राचे वैशिष्ट्य म्हणजे कुरियन केवळ आपल्या यशाची गाथा सांगत बसत नाहीत. संघर्ष, अडथळे, व्यवस्थेतील त्रुटी आणि विरोधाभास यांचीही ते स्पष्टपणे नोंद करतात. त्यामुळे हे पुस्तक एका व्यक्तीच्या आत्मकथनापेक्षा एका मोठ्या सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा ग्रंथ सुद्धा होते.माझंही एक स्वप्न होतं’ वाचताना एक मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी केवळ स्वप्न पाहणे पुरेसे नसते; त्या स्वप्नाला स्पष्ट ध्येय, योग्य दिशा, संघटनकौशल्य, परिश्रम आणि अडचणींवर मात करण्याची जिद्द यांची जोड द्यावी लागते, हा संदेश देखील आपणाला मिळतो.म्हणूनच वर्गीस कुरियन यांचे हे आत्मचरित्र विद्यार्थी, उद्योजक, शेतकरी, व्यवस्थापनाचा अभ्यास करणारे आणि समाजपरिवर्तनाची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवे.

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६

सध्याच्या ऑनलाईनच्या तडाख्यात टिकून राहिलेले पाक्षिक 'वाटसरू'

सध्या सर्वच गोष्टी सहजतेने ऑनलाइन मिळत असल्याने छापील माध्यमांना काहीसा कठीण का आला आहे.  घटलेली वाचक संख्या आणि या घटलेल्या वाचक संख्येमुळे  रोडवलेल्या जाहिराती.कमी झालेल्या  जाहिराती मुळे घसरलेले  उत्पन्न आणि कमी उत्पानमुळे इच्छा असून देखील अनेक उपक्रम राबवता येणे अवघड होणे आणि  उपक्रम नसल्यामुळे वाचक संख्या अजूनच कमी होणे  आणि परत सुरुवातीपासून सांगितलेले चक्र सुरू  सुरु होणे या चक्रात  सध्या छापील नियतकालिके  अडकलेली आढळतात. या चक्रामुळे अनेक नामवंत प्रतिष्ठित अशी नियतकालिकाने बंद देखील पडली. इंग्रजी आणि हिंदी भाषेतील नियतकालिकांची स्थिती अन्य प्रादेशिक नियतकालिकांपेक्षा तुलनेने काहीशी बरी आहे इतकेच  .लॉक डाऊन नंतर इंग्रजीतील सायन्स रिपोर्टर तसेच इकोनॉमिकल अँड पोलिटिकल विकली सारखी नामांकित इंग्रजी नियतकालिके बंद पडली लोकसत्ता चे भावंडं असलेले लोकप्रभा हे साप्ताहिक आणि  मूळचे गुजराती असलेले मात्र मराठी सारख्या अनेक भाषेत प्रसिद्ध होणारे चित्रलेखा हि दोन दोन साप्ताहिके बंद होऊन बराच काळ लोटला .  मात्र असे असून देखील काही निययतकालिके अजून देखील सुरु आहेत  पुणे शहरातून प्रसिद्ध होणारे पाक्षिक 'वाटसरू' त्यापैकीच एक . 

सध्या सुरु असलेल्या मराठी  नियतकालिकांचा विचार करता अत्यंत तरुण म्हणजे जेमेतेम २८- २९ वर्षाच्या या  पाक्षिकाचे १६ जुलै ते ३१ जुलै, १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट आणि १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट असे तीन अंक मी नुकतेच वाचले. काही मोजक्या चित्रांचा अपवाद वगळता पूर्णतः कृष्णधवल असलेल्या आणि जाहिराती देखील मोजक्याच असलेल्या या पाक्षिकामुळे छापील व्यवसाय चालवणे सध्या किती अवघड आहे.हे नव्याने उमगले . सध्या मराठीत जी हाताच्या बोटावर मोजता येतील अशी नियतकालिके जसे साप्ताहिक विवेक, साधना, सकाळ 
मार्मिक ही सर्व रंगीत असताना भलेही कृष्णधवल स्वरूपात अनेक छापू मात्र समाजाला काहीतरी वैचारिक खाद्य पुरवूनच हि तळमळ मला तरी सुखावून गेली 

तिन्ही अंक ५० पानाचे होते तसेच किंमत ४५ रुपये होती. जी सध्या छापल्या जाणाऱ्या साप्ताहिकाचा विचार करता साप्ताहिक विवेक, साप्ताहिक मार्मिक  आणि साप्ताहिक सकाळचा  अपवाद  करता योग्यच म्हणता येईल  विवेक आणि सकाळ,मार्मिक  यांना अन्य उद्योगाचा आधार असल्याने ही  साप्ताहिके १५ ते २५ रुपयात मिळू शकतात.तसेच त्यामध्ये जाहिराती देखील मोठ्या प्रमाणात असतात या अश्या वातवरणात जाहिरातीचे प्रमाण खूपच कमी ठेवून वाचकांना वैचारिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रकाशकांचा प्रयत्न खरोखरीच कौतुकास्पदच म्हणावा लागेल 

अप्पा बळवंत चौकातील वृत्तपत्र आणि नियतकालिके विकणाऱ्या विक्रेत्याकडे सायन्स रिपोर्टरची चौकशी करताना गवसलेल्या या साप्ताहिकाचे संपादक मंडळ बघितले असता यामध्ये डाव्या चळवळीचा संबंध असलेल्या व्यक्तींचा भरणा अधिक जाणवत असला तरी लेखाचा सुरु मोठ्या प्रमाणात संतुलित आढळला
.साप्ताहिकात घेतलेल्या विषयामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वैविध्य आढळले अन्य सप्तहहिकमध्ये मला तरी ना आढळलेली गोष्ट अर्थात इंग्रजी चित्रपटांची आणि पुस्तकाची विशेष दाखल तसेच इतर भाषेतील सुप्रसिद्ध कवितांचे मराठी भाषेत भाषांतर करणे या गोष्टी या साप्ताहिकाच्या संपादक मंडळाचे कौतुक करणे योग्यच ठरेल 
डाव्या विचारसरणीमुळे देशाची प्रगती काहीशी मंदावली असली तरी हिंदू धर्मात शैव पंथ आणि वैष्णव पंथ आहेत आणि सर्व हिंदूंनी त्यांचे अस्तिव मान्य केले आहे अनेकांना आवडणार नाही अशी मते मांडणाऱ्या चार्वाक याना महर्षी म्हणून गौरवले आहे. त्याच प्रमाणे डाव्या विचारसरणीचे अस्तिव मान्य करत सध्याच्या ऑनलाईनच्या तडाख्यात टिकून राहिलेले पाक्षिक  'वाटसरू' म्हणून आपण त्यांच्याकडे बघायला हवे .विचारसरणी काहीशी बाजूला सारत अजून देखील छापील नियतकालिक स्वरूपात प्रसिद्ध होणारे म्हणून आपण त्यांस समर्थन देणे योग्य ठरेल 


मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६

स्वामी विवेकानंदाचे विचार समजण्यासाठी वाचावेच असे पुस्तक, 'हिंदूतेज जाग रे'

स्वामी विवेकानंद. साडेसात अक्षरी शब्द, मात्र मात्र ज्यांचे नाव घेतल्यावर प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने गौरव आणि भरून येते असे भारताचे अत्यंत महत्त्वाचे सुपुत्र 19 या शतकाचा शेवटी जेव्हा भारत आपला प्राचीन गौरवशाली इतिहास विसरला होता सत्व विसरला होतात त्यावेळेस भारतीय  आपल्या प्राचीन गौरवाची वारस्याची आठवण करून देणारा त्याच वेळी जगाला भारताची नवी ओळख करून देणारा योद्धा संन्याशी स्वामी विवेकानंद. उणेपुरे 39 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या कार्याची सांगावी तेवढी महती कमीच‌ त्यांचे ओजस्वी विचार आज देखील अत्यंत महत्त्वाचे आणि उपयोगाची आहेत आज देखील त्यांचे विचार तितकेच प्रासंगिक आहेत. 21 वर्षांनी आपण भारताचा स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत असू त्यावेळेस आपण जे भारताचे महासत्ता हे स्वप्न बघत आहोत ते सत्यात उतरण्यासाठी काय करावे लागेल काय केल्याने ही एकेकाळी जगद्गुरु माता म्हणून ओळखले जाणारे भारत भूमी पुन्हा एकदा आपले वैभव प्राप्त करेल हे माहिती करुन घेण्यासाठी आपणास स्वामी विवेकानंद यांचे विचार माहिती असणे अत्यावश्यक आहेच याची  खात्री आपणास पटते ते स्वामी विवेकानंद यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी१९६३ ला प्रसिद्ध झालेल्या  रायझींग कॉल टु इंडिया या इंग्रजी भाषेतील  पुस्तकामुळे. आपल्या सुदैवाने या पुस्तकाचा मराठी अनुवाद विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग यांच्यातर्फे हिंदूतेज जाग रे या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आला आहे.  माझ्या सुदैवाने मी नुकतेच हे अनुवादीत पुस्तक वाचले.

विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे संस्थापक मा.एकनाथजी रानाडे, यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत अद्वैत प्रकाशनातर्फे प्रकाशित स्वामी विवेकानंद यांचे चरीत्र, प्रबुद्व भारतचे जूने अंक यासारख्या अधिकृत संसाधनातून स्वामी विवेकानंद यांच्या संदेशाचे एकत्रीत संकलन करत पुस्तक प्रसिद्व केले ते म्हणजे रायझींग कॉल टु इंडिया. मुळच्या इंग्रजी भाषेतील  पुस्तकाचा  १९८६साली विवेकानंद केंद्र, मराठी
प्रकाशन विभागातर्फे  ज्ञान प्रबोधिनी येथील  स्वर्णलता भिशीकर यांच्या मदतीने अनुवाद प्रसिद्ध करण्यात आला.  अत्युत स्फुर्तीदायी, चैतन्याने भारलेले वाचल्यावर रोमारोमात उत्साहाचा संचार होईल असेच या पुस्तकाबाबत म्हणता येईल‌

१६०पानी हे अनुवादीत पुस्तक ४ भागात विभागले आहे. प्रत्येक भाग पुढे आणखी विभागून प्रकरणात उपविभाजन करण्यात आला आहे. अनुवादीत पुस्तकाची भाषा सहजसोपी जणूकाही हे पुस्तक मराठी भाषेतच लिहले गेले आहे, असी वाटावी असी आहे.त्यामुळे काहीसा अवघड विषय असून देखील चटकन समजतो. संदेश. व्याख्याने, मुलाखती आणि लेख यातील निवडक वेचे आणि काही भाष्ये, काही आवाहने  तसेच व्यक्तित्व-विकास अथवा कार्यकर्त्यांचे शिक्षण हे ते चार भाग आहेत.

पहिल्या संदेश या भागात स्वामीजींचे राष्ट्रविषयक विचार हे प्रामुख्याने सांगण्यात आले आहेत. त्यांच्या असंख्य व्याख्यानांमधून, पत्रांमधून आणि लेखांमधून त्यांनी जे विचार मांडले आहेत, त्यांचे हे प्रबंधवजा संकलन आहे. हे विचार जरी विविध भागांतून एकत्रित केलेले असले तरी त्यांची रचना अशी केलेली आहे, की त्यातून स्वामीजींच्या राष्ट्रचिंतनाची सहज सुलभ मनातून असलेली भावना प्रकट होते.
व्याख्याने, मुलाखती आणि लेख यांतील निवडक वेचे  या दुसऱ्या भागात  पहिल्या भागात  नेमके बसू शकणार नाहीत; परंतु स्वामीजींच्या मुख्य संदेशांशी जे अत्यंत निगडित आहेत असे  स्फुट  महत्वाचे विचार सांगितले आहेत
काही भाष्ये, काही आवाहने या तिसऱ्या भागात स्वामीजींच्या मनात कोणते विचार घोळत होते. त्यांच्या हृदयाची भावना काय होती, भारताविषयीची त्यांची तळमळ काय होगी याचे चित्र उभे करणारे काही वेचे या भागात
वाचयला मिळतात. स्वामी विवेकानंद यांच्या स्थिर आणि वस्तुनिष्ठ वैचारिक मांडणीच्या मागे भावनेचे रहस्य काय होते ते या भागात आपल्याला समजते
व्यक्तित्व-विकास अथवा कार्यकर्त्यांचे शिक्षण असे शीर्षक असलेल्या शेवटच्या भागात स्वामीजींचे लेखन समाविष्ट केले आहे. स्वामीजींच्या या  लेखनातून आणि वक्तव्यांतून समजते की, ते हिंदु मनाची घडण एका विशिष्ट पद्धतीने व्हावी अशी ते अपेक्षा करीत आहेत. राष्ट्रघडणीच्या कामासाठी आसुलेल्या कार्यकर्त्यांजवळ काही बुद्धिगुण आणि अन्य जीवनावश्यक कौशल्ये असावी असा त्यांचा आग्रह आहे.  हे सांगताना मा.एकनाथजींनी या भागाला ४ प्रकरणात विभागले आहे.१. संघटना, २. नेतृत्व ३. गुरुपदाचे दायित्व, ४. यशस्वी जिवनाचे रहस्य  असे ते चार भाग आहेत. प्रत्येक भागात विषयानूसार स्वामी विवेकानंद यांचे विचार संकलित केले आहेत‌.

स्वामी विवेकानंद यांच्या  सगळ्या कामाची विचारांची आपल्याला थोडक्यात मात्र एकही मुद्दा न वगळता माहिती हवी असल्यास पुस्तक वाचणे अतिशय आवश्यक आहे‌.

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२६

आयुष्यात काहीतरी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचावेच, असे पुस्तक 'दिनचर्या'

महान व्यक्ती कोणतेही वेगळे काम करत नाहीत तर आपण जे काम करतो तेच काम करतात मात्र आपण करतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करतात त्यामुळे ते महान होतात असे एक सुप्रसिद्ध इंग्रजी वाचन आहे. हा वेगळेपणा त्यांनी त्यांच्या आयुष्याला एक शिस्त लावून घेतल्यामुळे आलेला असतो आपण सुद्धा आयुष्याला शिस्त लावून घेतल्यास आपण सुद्धा सहजतेने महान म्हणून देऊ शकतो मात्र केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या म्हणीनुसार सुरुवात करायची तीच काय अडचण. 
आता जर आता तुम्हाला वाटले की आपल्याला सुरुवात करायची पण कुठून सुरुवात करायची कोण मार्गदर्शन करेल तर  विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित दिनचर्या याशिवाय उत्तम पर्याय तो कोणता असेच म्हणावे लागेल मी नुकतेच हे पुस्तक वाचले आहे त्या पुस्तक वाचनातून आलेल्या अनुभवातून हे सांगत आहेत 
 विवेकानंद केंद्र कन्याकुमारी संस्थापक एकनाथजी रानडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त निमित्त साधत विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाश विभागातर्फे तीन पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली होती ज्यामध्ये
अत्यंत सोप्या चटकन आकलन होणाऱ्या भाषेत एकनाथजी रानडे यांचे विचार भाषणे प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यातील पहिले पुस्तक म्हणजे दिनचर्या .
एकनाथजी रानडे यांनी जरी कार्यकर्त्यांना उद्देशून संदेश दिलेला असला तरी तो संदेश खूप महत्त्वाचा आहे सर्वसामान्य व्यक्तींना रोजच्या जगण्यात अत्यंत उपयुक्त पडणाऱ्या अनेक बाबी यामध्ये सहज सोप्या शब्दात सांग उघडून सांगण्यात आलेले आहेत. त्यामुळे विवेकानंद केंद्राशी माझा काही संबंध नाही असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःचा पायावर धोंडा पाडून घेणे ठरवू शकते आजचा काळात अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या सॉक्स स्किल याचे अत्यंत सोप्या भाषेत केलेले विवेचन म्हणजे हे पुस्तक म्हणता येऊ शकते आणि हे पुस्तक फार मोठे सुद्धा नाहीये जेमतेम चाळीस पानांचे जे एका बैठकीत सहज वाचून होते मात्र यामध्ये सांगितलेल्या बाबी आयुष्य काढता हे नक्की
आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानप्रधान जीवनात वेळेचे नियोजन अधिकच महत्त्वाचे झाले आहे. मोबाईल, सामाजिक माध्यमे आणि मनोरंजनाच्या विविध साधनांमुळे वेळ कसा निघून जातो, हे अनेकदा लक्षातही येत नाही. अशा परिस्थितीत ‘दिनचर्या’ आपल्याला वेळ कमी नसतो, तर त्याचा योग्य उपयोग करण्याची शिस्त आवश्यक असते, याची जाणीव करून देते.
 दिनचर्या या पुस्तकात वेळेचे व्यवस्थापन, काम आणि विश्रांती यांच्यातील समतोल, पैश्याचे व्यवस्थापन, कायम जगाशी जोडलेले कसे रहावे, (सोशल मिडीयद्वारे नव्हे तर ऑफलाईन पद्धतीने ) मनुष्याला  वेगवेगळ्या
भाषा  येणे का आवश्यक आहे? नोटस काढणे, मुद्दे लिहुन घेणे का आवश्यक आहे. यासारख्या अनेक मुद्द्यावर सविस्तर मात्र सोप्या भाषेत माहिती देण्यात  आली आहे. त्यामुळे पुस्तक उपदेशाचे डोस देणारे न वाटता, मित्रत्वाच्या नात्याने आपुलकीने ज्येष्ठ व्यक्तीने दिलेला सल्ला वाटतो.जो चटकन अंमलात आणावासा वाटतो.
‘दिनचर्या’ हे वाचून बाजूला ठेवण्याचे पुस्तक नाही; तर त्यातील विचार आपल्या जीवनात उतरविण्याचे पुस्तक आहे. माझी दिनचर्या माझ्या ध्येयाला पूरक आहे का? माझा वेळ योग्य ठिकाणी खर्च होतो का? माझ्या वैयक्तिक विकासाचा समाज आणि राष्ट्राच्या विकासाशी संबंध आहे का? अशा प्रश्नांचे आत्मपरीक्षण करण्यास हे पुस्तक प्रवृत्त करते.म्हणूनच ‘दिनचर्या’ म्हणजे केवळ वेळेचे वेळापत्रक नव्हे, तर शिस्तबद्ध, ध्येयवादी, सेवाभावी आणि राष्ट्रनिष्ठ जीवनाकडे नेणारा विचारमार्ग आहे.

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६

जीवनपट: लोकांप्रती कर्तव्याची जाणिव असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा

भारत, जगातील २१०देशांपैकी लोकसंख्येच्या बाबत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमकाचा देश.क्षेत्रफळाचा विचार करता जगातील सातवा मोठा देश,  हिमालय सारखा बर्फाळ प्रदेश राजस्थानमधील वाळवंटाचा प्रदेश कोकणाचा समुद्रकिनारा ,उत्तर प्रदेश बिहार मधील गाळाची मैदाने ,इशान्य भारत आणि मध्यप्रदेश मधील विपुल वनसंपत्ती त्याचवेळी कच्छ मधील विराण भुमी. जगातील सर्व प्रकारची भौगोलिक विविधता एकटकवेला प्रदेश या बरोबर २२ अधिकृत भाषा, तसेच हजारोंच्या संख्येत मोजता येतील अस्या त्यांचा बोलीभाषा, ज्यु धर्मीय वगळता जगातील प्रत्येक प्रमुख धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदणारा देश म्हणजे आपला भारत

अस्या या बहुधंगी, बहुरंगी देशाचे प्रशासन चालवणे मोठे कष्टाचे काम. त्यासाठी विस्तृत अशी यंत्रणा उभारणे आलेच. ही  यंत्रणा सुरळीत चालवण्यासाठी  नियम सुद्धा आलेच. भारतीय संविधानाचा कलम 304 ते 314 मध्ये ते सुद्धा आहेतच. मात्र हे प्रशासन ज्या सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी भल्यासाठी प्रगतीसाठी झटणार आहे. त्यांना या प्रशासनाचा फायदा होतो की जाचच ठरतो आहे. हा मात्र प्रश्न अनुत्तीतच राहिला आपल्या भारतात. प्रशासन खरंच लोकांना उत्तरदायित्व आहे का ? हा प्रश्न मात्र कधीच विचारात घेण्यात आला नाही. लोकही सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हणत शांत बसत असतात. प्रशासनाचे काम व्यवस्थित चालावे म्हणून त्यांना काही सवलतीदेण्यात आल्या, मात्र या सवलतीचा गैरफायदा घेत स्वतःचेच फायदे करून घेणारी लोकं या प्रशासन व्यवस्थेत आली.ज्या सर्वसामान्य लोकांसाठी हे प्रशासन आहे ती मात्र दूरच राहिली. कविवर्य कुसुमाग्रजांनी त्यांच्या सुप्रसिद्ध अस्या 'स्वातंत्र्यदेवची विनवणी' या फटका प्रकारातील काव्य प्रकारात तसे  सांगितले सूद्धा , जनसेवेस्तव असे कचेरी डाकूंची ती गुहा नसे .मेजा खालूनी  मेजा वरतूनी द्रव्य कुणाचे लुटू नका. प्रशासनातील बहुसंख्य यंत्रणेला त्याचा बहुदा विसरच पडला 

मात्र काळाकुट्ट अंधारात ज्याप्रमाणे पणती सुद्धा महत्त्वाचे काम करून जाते त्याप्रमाणे या अवाढव्य यंत्रणेत काही लोकहिताचा विचार करणारी आपले  कर्तव्य अचूकपणे काम करणारी माणसे होती आणि अजूनही आहेत. भारतीय निवडणूक प्रणाली मोठ्या प्रमाणात सुधारण्याचे करणारे टी.एन .शेषन, कोकण रेल्वेच्या प्रकल्प मार्गी
लावणारे इ श्रीधरन, ठाणे या मुंबई शहराचे उपनगरच म्हणता येऊ शकते अशा शहरातील अतिक्रमण हटवणारे टी चंद्रशेखर ही त्यातील काही प्रमुख नावे म्हणता येऊ शकतात. याच मालिकेत एक नाव सध्या फारच मोठ्या प्रमाणात गाजतंय बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या गावात लहानाचे मोठे झालेले भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी तुकाराम मुंडे. प्रशासनातील गैर शिस्त, गैरवर्तन सहन न करणारे कवीवर्य कुसुमाग्रजांचा जनसेवेस्तव असे कचेरी डाकूंची ती नसे गुहा हा मंत्र प्रत्यक्षात यावा यासाठी झटणारे अधिकारी म्हणून आपण त्यांना ओळखतो.

आपल्याला समुद्रात एखादा हिमनग तरंगताना दिसतो. तो वरती जेवढा असतो त्याचा नऊ पट खाली असतो असे म्हणतात. कोणत्याही कर्तृत्वान माणसाच्या बाबत असेच म्हणता येऊ शकते त्याचे कर्तुत्व आपल्याला जेवढे दिसते त्याच्यापेक्षा नऊ पट कष्ट त्यांनी घेतलेले असतात जे आपल्यापासून अनेकदा दूरच राहतात. सामान्यपणे लोक त्याच्या वरवर दिसणाऱ्या रूपाकडे बघत त्याच्या अनुकरण करण्याचे प्रयत्न करतात मात्र त्यासाठी त्याने घेतलेले कष्ट हे लोकांना फारसे कळतच नाहीत त्यामुळे होतं काय लोक त्यासारखं होण्याचे प्रयत्न करतात मात्र होत नाहीत हे टाळायचं असेल आणि माणसाची एक साखळीच निर्माण करायची झाल्यास त्याकरता माणसाने घेतलेले कष्ट जनतेसमोर आलेच पाहिजे.

 सध्या चॅट जीपीटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या बोल बाला असला तरी पुस्तकाचे महत्व अजूनही अनन्यसाधारण आहे. मी आधी सांगितले, त्याप्रमाणे कर्तृत्वान माणसाचे कष्ट समोर येण्यासाठी पुस्तकांखेरीज अजूनही प्रभावी आणि उत्तम मार्ग अस्तित्वात नाहीये आणि हेच लक्षात घेत सध्या विशेष चर्चेत असणारे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या यांच्या आत्तापर्यंतचा जीवन प्रवास उलगडतो तो शफी पठाण यांनी लिहिलेल्या तुकाराम या पुस्तकातून.न्यू एरा या पब्लिकेशनच्या या पुस्तकात आपणास त्यांनी कोणकोणत्या अडचणींना तोंड देत भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला त्यांच्या प्रोबेशन पिरीयड मध्ये त्यांनी केलेले काम, त्यांना भारतीय प्रशासन सेवेत यावेसे का वाटले ? त्यासाठी त्यांना कोणी कोणी आणि कोणत्या प्रकारे मदत केली ? तसेच भारतीय प्रशासन सेवेत येण्यासाठी आवश्यक असणारी जीवन कौशल्य  त्यांनी कोणत्या पद्धतीने आत्मसात केली हे समजते 

216 पानांच्या या पुस्तकाचे आपण तीन भागात तुकडे करू शकतो पहिल्या भाग हा 108 पानांचा आहे. दुसरा भाग हा पुढील 54 पानांचा आहे तर तिसरा आणि शेवटचा भाग सुद्धा 54 पानांचा म्हणता येऊ शकतो. ज्यांना गणित समजतं त्यांना हे लगेच लक्षात येईल की 216 चा अर्धा भाग म्हणजे 108 आणि 108 चा अर्धा भाग म्हणजे 54 म्हणजेच पहिला भाग अर्धा पुस्तक. त्या पुढील दुसरे आणि तिसरे भाग हे पाव पाव भाग व्यापतात. अर्थात हे शफी पठाण यांनी ठरवून केलेला आहे की लेखनाच्या ओघात झालेला आहे हे त्यांनाच माहिती. मात्र हे भाग झालेले आहेत हे नक्की, आणि ते वाचताना लक्षात सुद्धा येतात. तर पहिल्या भागात आपणास तुकाराम मुंढे यांच्या दहावीपर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेता येतो. दुसऱ्या भागात त्यांच्या अकरावी पासून ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंतचा  प्रवास शफी यांनी मांडलाय तिसऱ्या भागात त्यांच्या प्रोबेशन  काळातील आढावा घेण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या छोट्या गावातील सामान्य कुटुंबातून सुरू झालेला तुकाराम मुंढे यांचा प्रवास अनेक अडचणींवर मात करत भारतीय प्रशासकीय सेवेत पोहोचतो. आर्थिक परिस्थिती, मर्यादित साधने आणि ग्रामीण पार्श्वभूमी या अडथळ्यांवर मात करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले यामध्ये त्यांनी क्षेत्रफळाचा विचार करता मोठी म्हणता येईल अशी मात्र पाणी नसल्याने फारशी उत्पादन न देणारी शेती कशी केली ?वडिलना त्या शेतीमध्ये मदत कशी केली शेतीच्या अडचणी पार करत शिक्षण कसे केले ? याची माहिती पहिल्या भागात मिळते. दुसऱ्या भागात त्यांनी त्या वेळच्या औरंगाबाद आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर या शहरात राहून कष्ट घेत कसे शिक्षण पूर्ण केले ? यूपीएससीची तयारी कशी केली ? त्यासाठी पुणे मुंबई आदी ठिकाणी  कोणत्या संस्थेत आणि कोणत्या प्रकारे प्रवेश मिळवला ? यादरम्यान आलेल्या अडचणींवर नैराश्यावर कोणत्या प्रकारे मात केली?. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना त्यांनी पैशाची तरतूद करताना तसेच येणाऱ्या अपयश बघत करिअरमधील अन्य कोणते मार्ग निवडण्याचा प्रयत्न केला का केला असल्यास ते कसे निवडले ?त्यासाठी काय काय विचार केला? याची माहिती मिळते.  मुंडेंविषयी बातमी वाचताना आपल्याला त्यांच्यातील  स्पष्टवक्तेपणा, कठोर शिस्त, पारदर्शकता आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी या गुणांची जाणीव होते हे गुण त्यांनी कोणत्या पद्धतीने आत्मसात केले याची माहिती आपणास प्रामुख्याने दुसऱ्या भागात होते. अर्थात पहिल्या भागात याचा ओझरता उल्लेख होतोच.

तिसरा भागाविषयी बोलायचं झाल्यास मुंढे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत घेतलेले कठोर निर्णय आणि भ्रष्टाचार अथवा गैरप्रकारांविरोधातील भूमिका यामुळे ते अनेकदा चर्चेत राहिले. त्यांच्या वारंवार झालेल्या बदल्याही त्यांच्या कारकिर्दीचा महत्त्वाचा भाग ठरल्या. मात्र प्रत्येक नव्या ठिकाणी त्यांनी आव्हान म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि कामाला प्राधान्य दिले.याविषयी  माहिती मिळते.

स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि व्यक्तींनी मिळणाऱ्या सोयी सवलतींमुळे  हुरळुन न जाता तसेच अपयश आल्यास खचून न जाता त्यांना वास्तव्याची जाण यावी. तसेच सर्व सामान्य व्यक्तींमध्ये केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हा मंत्र लक्षात घेउन  तूकाराम मुंढे करतील आपण का करायचे अश्या वृत्तीने न वागता  आपल्या परीने व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा निर्माण होवो, त्यांनी आपल्या मुला-बाळांमध्ये तूकाराम मुंढे यांच्यासारखा स्पष्टवक्तेपणा,कायदा आणि सर्वसामान्यप्रती असलेली निष्ठा,कर्तव्य यांची निर्भिडता यावी यादृष्टीने त्यांचे पालनपोषण करावे.तसेच स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे असो अथवा सामान्य नागरिक यांना ' मंजिले उसिको ही मिलती है,जो कितनीही कठीणांऐ आऐ उसका दतकर सामना करता है' हे तत्व खरोखरच अस्तिवात आहे, हे समजण्यासाठी पुस्तक वाचणे अत्यंत आवश्यक आहे.

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

वारसा ६७ वर्षाचा

१३ ऑगस्ट १९६० या दिवसाला मराठी पत्रकारितेत अनन्य साधारण महत्व आहे .नुकत्याच काही महिन्यापूर्वी द्विभाषिक मुंबई राज्यातून मराठी भाषिकांचे महाराष्ट्र हे राज्य साकारले होते. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यासाठी मराठी व्यक्तीने मोठा लढा उभारला होता. या संघर्षातून मिळालेल्या महाराष्ट्राचा तेथील जनतेचा विकास करण्याचा प्रयत्न सर्वच जण करत होता.मात्र से असून देखील  त्यावेळी असणाऱ्या अनेक समस्यांना वाचा फोडण्यात येत नव्हते .मात्र ते विषय महत्वाचे होते समाजावर या समस्यांचा मोठा परिणाम होत होता   अश्या या वातावरणात ज्याच्या घरात समाज सुधारणेचा मोठा वारसा आहे अश्या तिशीतील एक युवक  जो मुळात एका नावाजलेल्या साप्ताहिकात व्यंगचित्रकार म्हणून काम करत आहे तो तेथील नोकरी सोडून स्वतःचे एक व्यंगचित्राद्वारे सामाजितल उणिवा अवगुणांवर कोणालाही त्रास होणार नाही मात्र अचूक संदेश देता येईल  असे साप्ताहिक सुरु करण्याचा तो दिवस आहे. त्या तिशीतील युवकाने सुरु केलेले साप्ताहिक अजून देखील सुरु आहे आज या साप्तहिकाला पण मार्मिक म्हणून ओळखतो आणि ते सुरु करणारे होते श्रद्धेय आदरणीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे .  २०२६ ऑगस्ट  १३ रोजी  मार्मिक सुरु होऊन ६७ वर्ष  पूर्ण होत आहेत त्यामुळे पूर्वी अनेकांचेअत्यंत  आवडते असणारे मात्र आता सध्याच्या राजकीय स्थितीमुळे काहीसे कमी आवडणाऱ्या मार्मिकच्या वर्धापनदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 

मराठी पत्रकारितेच्या इतिहासात ‘मार्मिक’ या साप्ताहिकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. . त्या काळात समाजातील अनेक प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळत नव्हते. अशा वेळी ‘मार्मिक’ने केवळ बातम्यादेण्यापेक्षा समाजातील विसंगती, अन्याय आणि राजकीय ढोंग यांवर व्यंगचित्रे व लेखांच्या माध्यमातून थेट प्रकाश टाकला.

‘मार्मिक’ची खरी ओळख म्हणजे त्यातील धारदार व्यंगचित्रे. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुशल हातातून साकारलेली ही व्यंगचित्रे तिखट, टोचणारी आणि वास्तववादी होती. सामान्य माणसाच्या मनातील भावना आणि नाराजी यांना चित्ररूप देण्याची ताकद ‘मार्मिक’मध्ये होती. त्यामुळे वाचकांना केवळ माहिती मिळत नव्हती, तर त्यांना विचार करायलाही भाग पाडले जात होते.

या साप्ताहिकाने मराठी माणसांच्या हक्कांसाठी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला. विशेषतः मुंबईतील स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी ‘मार्मिक’ने

सातत्याने भूमिका मांडली. याच विचारसरणीमधून पुढे सामाजिक आणि राजकीय पातळीवर मोठी चळवळ उभी राहिली. त्यामुळे ‘मार्मिक’ हे केवळ साप्ताहिक न राहता एका परिवर्तनशील आंदोलनाचे माध्यम बनले.

‘मार्मिक’ची भाषा साधी, थेट आणि प्रभावी होती. त्यामुळे ते सर्वसामान्य वाचकांपर्यंत सहज पोहोचले. लेखनातील स्पष्टता आणि व्यंगचित्रातील नेमकेपणा यामुळे या साप्ताहिकाने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. अनेक तरुण व्यंगचित्रकार आणि लेखकांसाठी ‘मार्मिक’ हे प्रेरणास्थान ठरले.

.सध्याच्या राजकीय वातावरणामुळे मार्मिक आता काहीसे मागे पडले असले तरी एकेकाळी मराठी पत्रकारितेत व्यंगचित्रांचा प्रभावी वापर करून समाजमनावर ठसा उमटवण्याचे कार्य ‘मार्मिक’ने केले होते हे नाकारता येणे अशक्यच . . हसवत-हसवत विचार करायला लावणारे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे साप्ताहिक मराठी अस्मितेचा बुलंद आवाज म्हणून मार्मिक  सदैव स्मरणात राहीलहे नक्की 

.

लोकमान्य टिळकांच्या राजकीय जीवनावर भाष्य करणारे चरित्र - मंडालेच्या राजबंदी

आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला विविध कंगोरे असतात , असे मानसशात्रात मानले जाते . या सर्व कंगोरेच्या एकत्रीकरणतुंन आपले व्यक्तिक्त्व घडत...