वाचू आनंदे
या ब्लॉगवर आपण माझे पुस्तक वाचनावेळचे अनुभव , मी वाचलेली पुस्तके, याविषयी जाणून घेऊ शकाल या खेरीज माझे पर्यटनविषयक लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartetraveller.blogspot.com तर प्रचलित घडामोडीविषयक वाचायचे असल्यास www.ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com या ब्लॉगला भेट देऊ शकतात या खेरीज माझे ललित निबंधवजा लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartelalitlekhan.blogspot.com तर या सर्व लेखनाचा एकत्रितपणे आनंद घेयचा असल्यास www.ajiankyatarte.blogspot.com या ब्लॉगला भेट द्यावी
लेखाचे विषय
- पुस्तक प्रकार - नियतकालिके (13)
- पुस्तक प्रकार - वाचनीय वृत्तपत्रीय सदरे (1)
- पुस्तक प्रकार -मराठीत अनुवादित (10)
- पुस्तक प्रकार ईबुक (2)
- पुस्तक प्रकार छापील (25)
- पुस्तक प्रकार- चर्चेत असणारी (1)
- पुस्तक प्रकार- विवेकानंद केंद्रातर्फे प्रकाशित (1)
- भाषा - इंग्रजी (4)
- भाषा - मराठी (39)
- माझे स्वत:चे वाचनाच्यावेळचे अनुभव (8)
- लेखक - स्वातंत्र्यवीर सावरकर (1)
- लेखक- अच्युत गोडबोले (19)
- लेखक- गिरीश कुबेर (6)
- लेखिका मीना प्रभू (4)
- विचसारसरणी -हिंदुत्ववादी (2)
- विचारसरणी - दलित साहित्य (1)
- विचारसरणी - विद्रोही साहित्य (3)
- विचारसरणी - समाजवादी (1)
- विषयानुसार - पर्यावरण (3)
- विषयानुसार - क्रीडाविश्व (3)
- विषयानुसार - अभिनेता गुरुदत्त (4)
- विषयानुसार - अर्थशास्त्राविषयक (4)
- विषयानुसार - इतिहास (4)
- विषयानुसार - गुन्हेगारी (3)
- विषयानुसार - चीन (3)
- विषयानुसार - तंत्रज्ञान (2)
- विषयानुसार - नाशिक (4)
- विषयानुसार - महिलांचे भावविश्व (6)
- विषयानुसार - मानसशास्त्र (6)
- विषयानुसार - व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित (1)
- विषयानुसार -वैद्यकीय (3)
- विषयानुसार :संगीत (1)
- विषयानुसार- पश्चिम आशिया (3)
- विषयानुसार- राजकीय (11)
- सर्वसाधारण (9)
- साहित्य (11)
- साहित्य प्रकार - विनोदी या प्रकारात मोडणारे. (1)
- साहित्य प्रकार - कथासंग्रह (4)
- साहित्य प्रकार - कांदबरी (7)
- साहित्य प्रकार - काव्यसंग्रह (1)
- साहित्य प्रकार - नाटक (1)
- साहित्य प्रकार- निबंध (2)
- साहित्येत्तर (15)
- साहित्येत्तर प्रकार - चरित्र (22)
- साहित्येत्तर प्रकार - प्रवासवर्णन (6)
- साहित्येत्तर प्रकार - माहितीप्रधान (29)
- साहित्येत्तर प्रकार - वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह (2)
बुधवार, १९ ऑगस्ट, २०२६
आयुष्यात काहीतरी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचावेच, असे पुस्तक 'दिनचर्या'
मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६
जीवनपट: लोकांप्रती कर्तव्याची जाणिव असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा
अस्या या बहुधंगी, बहुरंगी देशाचे प्रशासन चालवणे मोठे कष्टाचे काम. त्यासाठी विस्तृत अशी यंत्रणा उभारणे आलेच. ही यंत्रणा सुरळीत चालवण्यासाठी नियम सुद्धा आलेच. भारतीय संविधानाचा कलम 304 ते 314 मध्ये ते सुद्धा आहेतच. मात्र हे प्रशासन ज्या सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी भल्यासाठी प्रगतीसाठी झटणार आहे. त्यांना या प्रशासनाचा फायदा होतो की जाचच ठरतो आहे. हा मात्र प्रश्न अनुत्तीतच राहिला आपल्या भारतात. प्रशासन खरंच लोकांना उत्तरदायित्व आहे का ? हा प्रश्न मात्र कधीच विचारात घेण्यात आला नाही. लोकही सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हणत शांत बसत असतात. प्रशासनाचे काम व्यवस्थित चालावे म्हणून त्यांना काही सवलतीदेण्यात आल्या, मात्र या सवलतीचा गैरफायदा घेत स्वतःचेच फायदे करून घेणारी लोकं या प्रशासन व्यवस्थेत आली.ज्या सर्वसामान्य लोकांसाठी हे प्रशासन आहे ती मात्र दूरच राहिली. कविवर्य कुसुमाग्रजांनी त्यांच्या सुप्रसिद्ध अस्या 'स्वातंत्र्यदेवची विनवणी' या फटका प्रकारातील काव्य प्रकारात तसे सांगितले सूद्धा , जनसेवेस्तव असे कचेरी डाकूंची ती गुहा नसे .मेजा खालूनी मेजा वरतूनी द्रव्य कुणाचे लुटू नका. प्रशासनातील बहुसंख्य यंत्रणेला त्याचा बहुदा विसरच पडला
आपल्याला समुद्रात एखादा हिमनग तरंगताना दिसतो. तो वरती जेवढा असतो त्याचा नऊ पट खाली असतो असे म्हणतात. कोणत्याही कर्तृत्वान माणसाच्या बाबत असेच म्हणता येऊ शकते त्याचे कर्तुत्व आपल्याला जेवढे दिसते त्याच्यापेक्षा नऊ पट कष्ट त्यांनी घेतलेले असतात जे आपल्यापासून अनेकदा दूरच राहतात. सामान्यपणे लोक त्याच्या वरवर दिसणाऱ्या रूपाकडे बघत त्याच्या अनुकरण करण्याचे प्रयत्न करतात मात्र त्यासाठी त्याने घेतलेले कष्ट हे लोकांना फारसे कळतच नाहीत त्यामुळे होतं काय लोक त्यासारखं होण्याचे प्रयत्न करतात मात्र होत नाहीत हे टाळायचं असेल आणि माणसाची एक साखळीच निर्माण करायची झाल्यास त्याकरता माणसाने घेतलेले कष्ट जनतेसमोर आलेच पाहिजे.
सध्या चॅट जीपीटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या बोल बाला असला तरी पुस्तकाचे महत्व अजूनही अनन्यसाधारण आहे. मी आधी सांगितले, त्याप्रमाणे कर्तृत्वान माणसाचे कष्ट समोर येण्यासाठी पुस्तकांखेरीज अजूनही प्रभावी आणि उत्तम मार्ग अस्तित्वात नाहीये आणि हेच लक्षात घेत सध्या विशेष चर्चेत असणारे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या यांच्या आत्तापर्यंतचा जीवन प्रवास उलगडतो तो शफी पठाण यांनी लिहिलेल्या तुकाराम या पुस्तकातून.न्यू एरा या पब्लिकेशनच्या या पुस्तकात आपणास त्यांनी कोणकोणत्या अडचणींना तोंड देत भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला त्यांच्या प्रोबेशन पिरीयड मध्ये त्यांनी केलेले काम, त्यांना भारतीय प्रशासन सेवेत यावेसे का वाटले ? त्यासाठी त्यांना कोणी कोणी आणि कोणत्या प्रकारे मदत केली ? तसेच भारतीय प्रशासन सेवेत येण्यासाठी आवश्यक असणारी जीवन कौशल्य त्यांनी कोणत्या पद्धतीने आत्मसात केली हे समजते
216 पानांच्या या पुस्तकाचे आपण तीन भागात तुकडे करू शकतो पहिल्या भाग हा 108 पानांचा आहे. दुसरा भाग हा पुढील 54 पानांचा आहे तर तिसरा आणि शेवटचा भाग सुद्धा 54 पानांचा म्हणता येऊ शकतो. ज्यांना गणित समजतं त्यांना हे लगेच लक्षात येईल की 216 चा अर्धा भाग म्हणजे 108 आणि 108 चा अर्धा भाग म्हणजे 54 म्हणजेच पहिला भाग अर्धा पुस्तक. त्या पुढील दुसरे आणि तिसरे भाग हे पाव पाव भाग व्यापतात. अर्थात हे शफी पठाण यांनी ठरवून केलेला आहे की लेखनाच्या ओघात झालेला आहे हे त्यांनाच माहिती. मात्र हे भाग झालेले आहेत हे नक्की, आणि ते वाचताना लक्षात सुद्धा येतात. तर पहिल्या भागात आपणास तुकाराम मुंढे यांच्या दहावीपर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेता येतो. दुसऱ्या भागात त्यांच्या अकरावी पासून ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास शफी यांनी मांडलाय तिसऱ्या भागात त्यांच्या प्रोबेशन काळातील आढावा घेण्यात आला आहे.बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या छोट्या गावातील सामान्य कुटुंबातून सुरू झालेला तुकाराम मुंढे यांचा प्रवास अनेक अडचणींवर मात करत भारतीय प्रशासकीय सेवेत पोहोचतो. आर्थिक परिस्थिती, मर्यादित साधने आणि ग्रामीण पार्श्वभूमी या अडथळ्यांवर मात करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले यामध्ये त्यांनी क्षेत्रफळाचा विचार करता मोठी म्हणता येईल अशी मात्र पाणी नसल्याने फारशी उत्पादन न देणारी शेती कशी केली ?वडिलना त्या शेतीमध्ये मदत कशी केली शेतीच्या अडचणी पार करत शिक्षण कसे केले ? याची माहिती पहिल्या भागात मिळते. दुसऱ्या भागात त्यांनी त्या वेळच्या औरंगाबाद आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर या शहरात राहून कष्ट घेत कसे शिक्षण पूर्ण केले ? यूपीएससीची तयारी कशी केली ? त्यासाठी पुणे मुंबई आदी ठिकाणी कोणत्या संस्थेत आणि कोणत्या प्रकारे प्रवेश मिळवला ? यादरम्यान आलेल्या अडचणींवर नैराश्यावर कोणत्या प्रकारे मात केली?. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना त्यांनी पैशाची तरतूद करताना तसेच येणाऱ्या अपयश बघत करिअरमधील अन्य कोणते मार्ग निवडण्याचा प्रयत्न केला का केला असल्यास ते कसे निवडले ?त्यासाठी काय काय विचार केला? याची माहिती मिळते. मुंडेंविषयी बातमी वाचताना आपल्याला त्यांच्यातील स्पष्टवक्तेपणा, कठोर शिस्त, पारदर्शकता आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी या गुणांची जाणीव होते हे गुण त्यांनी कोणत्या पद्धतीने आत्मसात केले याची माहिती आपणास प्रामुख्याने दुसऱ्या भागात होते. अर्थात पहिल्या भागात याचा ओझरता उल्लेख होतोच.
तिसरा भागाविषयी बोलायचं झाल्यास मुंढे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत घेतलेले कठोर निर्णय आणि भ्रष्टाचार अथवा गैरप्रकारांविरोधातील भूमिका यामुळे ते अनेकदा चर्चेत राहिले. त्यांच्या वारंवार झालेल्या बदल्याही त्यांच्या कारकिर्दीचा महत्त्वाचा भाग ठरल्या. मात्र प्रत्येक नव्या ठिकाणी त्यांनी आव्हान म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि कामाला प्राधान्य दिले.याविषयी माहिती मिळते.
स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तींनी मिळणाऱ्या सोयी सवलतींमुळे हुरळुन न जाता वास्तव्याची जाण येण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे
बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६
वारसा ६७ वर्षाचा
‘मार्मिक’ची खरी ओळख म्हणजे त्यातील धारदार व्यंगचित्रे. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुशल हातातून साकारलेली ही व्यंगचित्रे तिखट, टोचणारी आणि वास्तववादी होती. सामान्य माणसाच्या मनातील भावना आणि नाराजी यांना चित्ररूप देण्याची ताकद ‘मार्मिक’मध्ये होती. त्यामुळे वाचकांना केवळ माहिती मिळत नव्हती, तर त्यांना विचार करायलाही भाग पाडले जात होते.
या साप्ताहिकाने मराठी माणसांच्या हक्कांसाठी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला. विशेषतः मुंबईतील स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी ‘मार्मिक’ने
सातत्याने भूमिका मांडली. याच विचारसरणीमधून पुढे सामाजिक आणि राजकीय पातळीवर मोठी चळवळ उभी राहिली. त्यामुळे ‘मार्मिक’ हे केवळ साप्ताहिक न राहता एका परिवर्तनशील आंदोलनाचे माध्यम बनले.‘मार्मिक’ची भाषा साधी, थेट आणि प्रभावी होती. त्यामुळे ते सर्वसामान्य वाचकांपर्यंत सहज पोहोचले. लेखनातील स्पष्टता आणि व्यंगचित्रातील नेमकेपणा यामुळे या साप्ताहिकाने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. अनेक तरुण व्यंगचित्रकार आणि लेखकांसाठी ‘मार्मिक’ हे प्रेरणास्थान ठरले.
.सध्याच्या राजकीय वातावरणामुळे मार्मिक आता काहीसे मागे पडले असले तरी एकेकाळी मराठी पत्रकारितेत व्यंगचित्रांचा प्रभावी वापर करून समाजमनावर ठसा उमटवण्याचे कार्य ‘मार्मिक’ने केले होते हे नाकारता येणे अशक्यच . . हसवत-हसवत विचार करायला लावणारे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे साप्ताहिक मराठी अस्मितेचा बुलंद आवाज म्हणून मार्मिक सदैव स्मरणात राहीलहे नक्की
.
शुक्रवार, ३१ जुलै, २०२६
साप्ताहिक ‘विवेक’ : विचारजागृती आणि संस्कृती संवर्धनाचे प्रभावी माध्यम
या साप्ताहिकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील लेखनाची सखोलता आणि अभ्यासपूर्ण मांडणी. राजकारण, अर्थकारण, शिक्षण, विज्ञान, इतिहास, साहित्य आणि सामाजिक घडामोडी अशा विविध विषयांवर ‘विवेक’मध्ये नियमितपणे लेख प्रसिद्ध होतात. त्यामुळे वाचकांना केवळ माहिती मिळत नाही, तर त्या मागील विचारसरणी आणि व्यापक संदर्भ समजून घेण्याची संधी मिळते. अनेक नामवंत लेखक, विचारवंत आणि अभ्यासक या साप्ताहिकातून आपले विचार मांडत असतात. साप्ताहिक विवेक एका विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कर्ता आहे असा आरोप त्यावर सातत्याने केला जातो मात्र मी गेल्या कित्येक महिन्यापासून मी साप्ताहिक विवेकाचा वाचक आहे मला तरी तसे आढळले नाहीये. नाही म्हणायला देशविघातक प्रवृत्ती विरोधात यावर सातत्याने बोलले जाते आता देशविघातक शक्तींच्या प्रेमात असणाऱ्या व्यक्तींना साप्ताहिक विवेक एकांगी वाटणारच,असो .
‘विवेक’चा उद्देश केवळ माहितीपुरता मर्यादित नसून वाचकांच्या विचारप्रक्रियेला चालना देणे हा आहे. सामाजिक प्रश्नांवर तर्कसंगत विश्लेषण, मूल्याधिष्ठित भूमिका आणि सकारात्मक दृष्टीकोन यांमुळे हे साप्ताहिक वाचकांमध्ये वेगळी ओळख निर्माण करते. भारतीय परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधत समाजाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न साप्ताहिक विवेकमधून केला आत असल्याचे या साप्ताहिकाचे सात्यत्याने वाचन केल्यास सहजतेने लक्षात येतेयाशिवाय ‘विवेक’चे विशेषांक आणि दिवाळी अंक हे त्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या अंकांमधून विविध विषयांवर सखोल, संशोधनपर आणि दर्जेदार लेखन वाचकांना उपलब्ध होते. विविध क्षेत्रांतील तज्ञ व्यक्तींचे लेख, मुलाखती आणि लेखमालिका यांमुळे साप्ताहिकाची गुणवत्ता अधिक वृद्धिंगत होते.
एकंदरीत, ‘साप्ताहिक विवेक’ हे केवळ एक नियतकालिक नसून समाजजागृती, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रीय विचारांची रुजवण करणारे प्रभावी माध्यम आहे. समाजाला सजग, संवेदनशील आणि राष्ट्राभिमानी बनविण्यात त्याचे योगदान निश्चितच मोलाचे आहे.हे नाकारता अशक्यच.
रविवार, २६ जुलै, २०२६
नादवेध संगीताची अदभूत सफर घडवणारे पुस्तक
“साहित्यसंगीतकलाविहीन
साक्षात् पशुः पुच्छविषाणहीनः।”
आताच्या मराठीत सांगायचे झाल्यास ज्या मनुष्याला साहित्य, संगीत आणि कला यांची आवड नसते, तो प्रत्यक्षात शेपूट आणि शिंगे नसलेला पशूच आहे
तर या संगीताचा विचार करता अत्यंत महत्वाचा धडक म्हणजे राग . सामान्यांना याची पुरेशी माहिती नसल्याने बहुसंख्य जनता याच्या पुरेपूर आंनद घेण्यास मुकते हे टाळले जावे या साठी मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा व्हावी यासाठी कायम प्रयत्नशील असणारे अच्युत गोडबोले पुन्हा एकदा आपल्याला मदत करायला पुढे येतात त्यांनी सुलभ पिशवीकर त्यांच्या मदतीने लिहलेले 'नादवेध' हे पुस्तक आपली संगीतातील विविध रागाची नसलेली माहितीची कमतरता मोठ्या प्रमाणात कमी करते .
‘नादवेध’ या पुस्तकाकडे ताच्या विश्वाचा सखोल आणि रसपूर्ण वेध घेणारे एक महत्त्वपूर्ण साहित्य म्हणून आपण सहज बघू शकतो. या पुस्र्कात या पुस्तकात भारतीय आणि पाश्चात्य संगीताच्या विविध पैलूंवर अत्यंत सोप्या, चटकन समजणाऱ्या मात्र वाचताना वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या भाषेत माहिती देण्यात आलेली आहे संगीताची सुरुवात त्याची प्रगती तसेच स्वर, ताल आणि लय यांसारख्या मूलभूत घटकांची सविस्तर माहिती या पुस्तकात आहे.
शुक्रवार, २४ जुलै, २०२६
भारताच्या विकासदृष्टीचे समग्र दर्शन घडवणारी मासिके
आपल्याकडे भारताच्या विकासाबाबत विविध दावे प्रतिदावे सातत्याने करण्यात येतात.आपण ज्या माध्यमातून याबाबत माहिती घेतो आहोत त्या माध्यमाच्या विचारसरणीनुसार आपणास माहिती मिळते .जर माध्यम केंद्र सरकारच्या माताच पुरस्कर्ता असेल तर वास्तवात नसलेली आदर्श स्थिती थंडी अधिक उजळ करून आपल्यापुढे सादर करेल.याउलट जर माध्यम विरोधी पक्षाच्या बाजूचे असेल तर वास्तवातील चांगली बाजू कारण नसताना ऋणात्मक दाखवत भारताची प्रगती दाखवणार नाही . अश्या स्थितीत भारताचे जसे आहे तसे चित्र उभे करणारे कोणतेच माध्यम नाही का स प्रश्न आपणस पडलं असेल तर सांगतो चित्रफारच निराशजनक नाहीये आपणास खरे चित्र समोर करणारी दोन मासिके सहज सापडतात ती म्हणजे स्पर्धा परिक्षतेची तयारी करणाऱ्या विदयार्थ्यांच्या मुखाशी असणारी मासिकाने अर्थात योज़ना आणि कुरुक्षेत्र . मी हो दोन्ही मासिके गेली सुमारे १५ वर्ष नियमिपणे वाचत असे सुरुवातीला मराठी भाषेतील वाचत असे आता मात्र थेट इंग्रजी भाषेतील वाचतो
. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागामार्फत प्रकाशित होणारी ही दोन्ही मासिके देशाच्या विकास प्रक्रियेच्या वेगवेगळ्या बाजू समजावत .ज्यामुळे ही मासिके केंद्र सरकाच्या यशापयशाच्या अभ्यास करणाऱ्या व्यक्ती, पत्रकार स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार आणि आपल्या सारखे देशाच्या प्रगतीबाबत नवीन खरी माहिती जाणण्याची इच्छा असलेले सर्वसामान्य नागरिक यांना खरी स्थिती समजवून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात. हि दोन्ही मासिक जरी भारत सरकारकडून प्रकशित करण्यात आलेली असली तरी सरकारी प्रचार यात डोकावत नाही .सरकारची विचारसरणी काहीही असो त्याचे प्रतिबिब मासिकात पडल्याचे मला तरी दिसून आलेले नाही
‘योजना’ मासिकाची सुरुवात १९५७ साली झाली. या मासिकाचा मुख्य उद्देश म्हणजे केंद्र सरकारच्या विविध योजना, धोरणे आणि विकास उपक्रमांची सविस्तर माहिती देणे. अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, डिजिटल परिवर्तन, पर्यावरण अशा विविध विषयांवर तज्ज्ञांचे लेख ‘योजना’मध्ये प्रकाशित होतात. या लेखांमधून केवळ योजनांची माहितीच मिळत नाही, तर त्यांच्या परिणामांचे विश्लेषण आणि भविष्यातील दिशा देखील स्पष्ट होते. मराठीच नाही तर सोपी, समजण्यासारखी इंग्रजी भाषा आणि वस्तुनिष्ठ मांडणी ही ‘योजना मासिकाचा स्ट्रॉंग पॉईंट म्हणता येईल मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असल्यामुळे हे मासिक जवळपास सर्वच भारतीय सहजतेने वाचून दंशाची खरी स्थिती समजवून घेऊ शकतोतर ‘कुरुक्षेत्र’ मासिक १९५२ पासून प्रकाशित होत असून ते मुख्यतः ग्रामीण विकासावर केंद्रित आहे. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश असल्यामुळे ग्रामीण भागाचा विकास हा राष्ट्रीय प्रगतीचा कणा मानला जातो. ‘कुरुक्षेत्र’मध्ये शेती, जलसंधारण, ग्रामीण उद्योग, स्वयंसहायता गट, पंचायत राज व्यवस्था, शाश्वत विकास यांसारख्या विषयांवर सखोल माहिती दिली जाते. ग्रामीण भागातील समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरील उपाययोजना यांचा समतोल आढावा या मासिकातून मिळतो. शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य, संशोधक आणि
ग्रामीण प्रशासनाशी संबंधित व्यक्तींसाठी ‘कुरुक्षेत्र’ उपयुक्त आहेच त्याशिवाय स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण विकासाशी संबंधित प्रश्नांची तयारी करण्यासाठी हे मासिक महत्त्वाचे संदर्भसाहित्य म्हणूस सुद्धा खूप मदत करणारे ठरते‘योजना’ आणि ‘कुरुक्षेत्र’ ही दोन्ही मासिके एकमेकांना पूरक ठरणारी आहेत. ‘योजना’ राष्ट्रीय स्तरावरील धोरणे आणि त्यामागील विचारधारा सांगते , तर ‘कुरुक्षेत्र’ त्या धोरणांची अंमलबजावणी खेडयात कशी होते आणि त्याचे परिणाम काय होतात , हे दाखवते . त्यामुळे या दोन्ही मासिकांचे एकत्रित वाचन केल्यास देशाच्या विकासाचे खरे वास्तव समजू शकते असे माझे दोन्ही पुस्तके वाचुन झलेले मत आहे
थोडक्यात समाजजीवन, प्रशासन, अर्थव्यवस्था आणि ग्रामीण विकास यांविषयी माहिती मिळवण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी मजबूत करण्यासाठी ‘योजना’ आणि ‘कुरुक्षेत्र’ ही मासिके ज्ञानाचा समृद्ध आणि विश्वासार्ह स्रोत आहेत
मी स्पर्धा परीक्षा क्षेत्राचा अभ्यास सोडून कितीतरी वर्ष झाली आहेत तरी देखील मी ती अजून वाचतोय आपण देखील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे नसाल तरी ही मासिके आवर्जून वाचाच असे मी तुम्हाला संगी इच्छितो कारण या दोन्ही मासिकांमधून मिळणारे ज्ञान तुम्हला रोजच्या जगण्यात सुद्धा नक्कीच उपयोगी पडेल अशी माझी खात्री आहे मग करणार ना वाचायला सुरुवात
गुरुवार, २३ जुलै, २०२६
बदलत्या काळाची दिशा ओळखत 'साप्ताहिक सकाळ'चे स्वागतार्ह्य पाउल
आपल्या मराठीला साप्ताहिकाची मोठी परंपरा आहे.वेगवेगळ्या विषयावरची साप्ताहिके मराठीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रसिद्ध आलेली आहेत.समाजाचा वचनाबद्दलच्या बदलणारा दृष्टिकोन, आपसातील स्पर्धा, तसेच छपाईच्या दारात झालेली वाढ या सारख्या अनेक कारणामुळे त्यातील काही बंद देखील पडली आणि अजून देखील बंद होत आहे . मात्र डार्विनचा सक्षम तोच टिकणार या सिद्धांतानुसार काही साप्ताहिकांनी काळाची पाऊले उचलत आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करत आजदेखील त्यांच्या वाचकवर्ग खप मोठ्या प्रमाणात टिकवून ठेवला आहे. या कालानुरूप बदललेल्या साप्ताहिकांमध्ये नवा घ्यावेच लागेल ते म्हणजे साप्ताहिक सकाळचे सकाळ माध्यम समूहाचे पूर्णतः राजकारणावर आधारित साप्ताहिक 'सरकारनामा 'या दही अनेकदा छापील स्वरूपात आले आणि बंद होऊन ऑनलाईन स्वरूपात घेणे .मात्र गेली ४० वर्ष छापील रूपात प्रसिद्ध होणारे त्याच माध्यम वॉमूहाचे साप्ताहिक मात्र अजून टिकून आहे सध्याचा साप्तहिक सकाळचे वैशिष्ट म्हणजे विशेषांक होय. सध्या साप्ताहिकाचा प्रत्येक अंक एक विशेषांक असतो. एका विशेषांकांत एका विषयावरील लेख सर्वात जास्त असतात अर्थात पूर्वीप्रमाणे नेहमी चालणारी सदरे देखील आहेतच मात्र त्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी आहेत असे माझे ढोबळ निरीक्षण आहे आणि जी सदरे सुरु आहेत ती देखील साप्ताहिकाच्या शेवटच्या अर्ध्या भागात छापलेली अढळतात सुरुवातीचा अर्धा भाग हाविशेषांकांनी भरलेला असतो ज्याचे विषय देखील निवडीला दाद देण्यासारखे असतात. एखाद्या विशिष्ट वर्गालाच अपील होतील असे विषय खूप मोठ्या वर्गाला अपील होतील ज्याचा वर्तमानाशी काहीतरी संपर्क असेल असे विषय या साप्ताहिकता घेतलेले मला दिसले आता लोकांना अपील होणारे विषय आहेत नः ?मग लेखाचा दर्जा काहीका असेना हा प्रकार मला यात आढळलेला नाही सर्वच लेख माहितीपूर्ण तरीही सहजसोप्या मराठीत लिहिलेले अढळतात त्याबद्दल त्यांच्या संपादकीय तोमेचे कौतुक करायलाच हवे माझ्या मते सकाळ माध्यम समूहाने सरकारनामा मध्ये या प्रकारचे काही बदल करून त्याला स्थायी स्वरूप देता येईल का हे बघावे म्हणजे वाचकांना वाचनाच्या स्वर्गसुखाचा नक्कीच घेता येईल हे नक्की
आयुष्यात काहीतरी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचावेच, असे पुस्तक 'दिनचर्या'
महान व्यक्ती कोणतेही वेगळे काम करत नाहीत तर आपण जे काम करतो तेच काम करतात मात्र आपण करतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करतात त्यामुळे ते महान ...
-
आपल्याला एखाद्या रमणीय तलावात बदक शांतपणे पोहतांना दिसले तरी आपल्याला शांत वाटणाऱ्या त्या तलावात बदकाचे स्वत:च्या देहाच्या खाली ...
-
मला अनेकजण अजिंक्य तूझा आवडता लेखक कोण ? असा प्रश्न सातत्याने विचारतात, त्या व्यक्तींना सविस्तर उत्तर देण्यासाठी आजचे लेखन . तर ...
-
मला अनेकाकडून बऱ्याचवेळा एक प्रश्न विचारला जातो ? अजिंक्य मला वाचायला एखादे पुस्तक सुचव. तू इतकी पुस्तके वाचतो तुला माहिती असेलच. मला हा प्र...


















