शुक्रवार, ३० जानेवारी, २०२६

मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)

माझ्या कालच्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याबाबद्दल माझा लेख वाचणाऱ्या,यावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. या प्रतिक्रियांमध्ये एकाने  मला विचारले होते की, अजिक्य  कोणती पद्धत वापरून पुस्तके निवडतो . म्हणजे तू माहितीवर पुस्तके मोठ्या संख्येने वाचतो. हे माहिती आहे मात्र विविध विषयावरची माहिती देणारीं पुस्तक असताना,  एखादे  पुस्तक वाचायचे किंवा एखादे पुस्तक वाचायचे नाही हे तू कोणते निकष वापरून ठरवतो हे मला जाणून घेयला आवडेल. तर माझे आजचे लेखन याच प्रश्नाच्या उत्तरासाठी 

तर मित्रानो माझ्या पुस्तक निवडण्याचे दोन निकष आहेत .पहिला निकष आहे लेखकाचा तर दुसरा निकष आहे विषयाचा. मी माझे वाचन भाग ४  मध्ये सांगितल्याप्रमाणे माझे आवडते  लेखक आहेत अच्युत गोडबोले आणि गिरीश  कुबेर. (आता मला ते लेखक की आवडतो हे ज्यांना माहिती करायचे असेल त्यांनी या लेखालिकेचा भाग क्रमांक ४ वाचावा.त्या ठिकणी मी हा मुद्दा सविस्तर मांडल्याने तो पुन्हा इथे मांडत नाही ) या दोन्ही लेखकांनी

नवीन काही लिहले कि ते वाचण्यास माझी पहिली पसंती आहे मी आतार्यंत अच्युत गोडबोले यांची २० हुन अधिक आणि गिरीश कुबेर यांची जवळपास सर्वच मराठी पुस्तके कितीतरी वेळा वाचली आहेत 

मी जी पुस्तके वाचनासाठी निवडतो.त्यातील दुसरा निकषाविषयी अर्थात  विषयाविषयी  झाल्यास मी इयत्ता चवथीपासून मार्ताहीत खगोलशात्राचा मराठी भाषेत प्रचारप्रसार करणार्याखगल मंडळाशी निगडित  असल्याने असेल मला नॅचरल सायन्स विषयी पुस्तके वाचण्याची आवड निर्माण झाली आहे त्यामुळे मी जी पुस्तके वाचण्यासाठी निवडतो त्यामध्ये इतिहास किंवा त्यासारख्या विषयांची माहिती देणाऱ्या पुस्तकाच्या ऐवजी नॅचरल सायन्सविषयी माहिती देणारी पुस्तके अधिक वाचतो मी अच्युत गोडबोले आणि गिरीश कुबेर यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या शिवाय मी जी माहिती देणारी पुस्तके वाचतो त्यांची यादी तुम्ही बघितल्यास तुम्हाला हा मुदा अधिक उत्तमरीत्या समजेल 

        नॅचरल सायन्स सोडून मला आवडणारा दुसरा विषय म्हणजे भारताची आणि अन्य देशांची परराष्ट्र नीतीत्यामुळे त्या विषयवार लिहलेली पुस्तके सुद्धा मी वाचनासाठी निवडतो.माझ्यामध्ये ही  आवड निर्माण होण्याचे कारण म्हणजे मी केलेला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास.मी यूपीएससीच्या सिव्हिल सर्विस एक्समचा भाया करताना पहिला ऑप्शनल विषय म्हणून भूगोल हा विषय निवडला होता तर दुसराऑप्शनल विषय म्हणून मी

पोलिटिकल सायन्स हा विषय निवडला होता . या दुसऱ्या ऑप्शनल चा अभ्यास करताना माझी भारताची आणि अन्य देशांची परराष्ट्र नीती या विषयात आवड निर्माण झाली या आवडीतूनच माझी वाचनाची आवड विकसित होत गेली                      

 अर्थात मी फक्त या दोनच विषयाची पुस्तके वाचतो असे नाही. माझ्या माहिती देणाऱ्या पुस्तकाचे वाचन करण्याच्या वाडीस कोणताही विषय वर्ज नाही फक्त या दोन विषयाचे प्रमाण अन्य विषयापेक्षा काहीसे जास्त असते इतकेच तसेच मी फक्त माहितीपर पुस्तकेच वाचतो असे नाही.तर मी सर्व प्रकारची पुस्तके वाचतो फक्त त्यात माहिती देणाऱ्या पुस्तकाचाचे प्रमाण काहीसे जास्त असते इतकेच आता मी माहितीपर पुस्तकेच का जास्त वाचतो याविषयी सुद्धा माझे वाचनच्या दुसऱ्या भागात सविस्तर लिहले आहे त्यामुळे त्याविषयी सुद्धा इथे जास्त लिहीत नाही 

मी जे वाचन करतो ते परिपूर्ण आहे असा माझा मुळीच दावा  नाही.  .किंबहुना माझे वाचन अत्यंत  त्रोटक विस्कळीत काहीच विषयवार आधारित  आहे असे म्हणले  तरी वावगे ठरणार नाही माझ्यामध्ये ज्या प्रकारे वाचनाची सवय विकसित झाली त्याचा प्रकट अविष्कार म्हणजे माझी ववाचनाची आवड आणि या आवडीतून दिसत असणारी माझी पुस्तक निवडीची पद्धत मी निवडलेली पुस्तके. (हा विकास कसा होतो याविषयी मी

तिसऱ्या भागात लिहले आहे सबब या विषयी देखील मी द्विरुक्ती टाळतो ) अन्य लोकांचा देखील प्रवास याच पद्धतीने होईल असे नाही  मात्र  हा प्रवास होण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे. मग करणार ना वाचन 


माझे वाचन या मालिकेतील सातवा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2026/01/blog-post_87.html

माझे वाचन या मालिकेतील सहावा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartebookreview.blogspot.com/search/label/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3

माझे वाचन या मालिकेतील ५वा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा











गुरुवार, २९ जानेवारी, २०२६

वाचनाची इच्छा आहे पण ... (माझे वाचन भाग क्रमांक ७ )

मला अनेक व्यक्ती  अश्या भेटत असतात ,ज्या  मला सांगत असतात अरे अजिंक्य काय आहे ना आम्हाला वाचायला आवडते. पूर्वी मी देखील तुझ्यासारखी अनेक पुस्तके  वाचली आहेत.पण आता काय हे ना ? रोजचा दिवस एर्व्हढा बिझी जातो ना की,वाचायला वेळच भेटत नाही. पण मी वाचणार आहे /कोणी मला असे सांगितले कि मला हसायला येते. जर यावेळी वेळ मिळत नसेल तर पुढे भविष्यात काय चमत्कार होणार आहे ज्यामुळे त्यांना वाचायला वेळ मिळणार आहे हे त्यांचं त्यांनाच माहिती असो  

माझे म्हणाल तर माझ्या बँगमध्ये नेहमी एक पुस्तक असतेच जर कोणाला भेटायला गेलो आंणि त्या ठिकाणी व्यक्ती भारतीय प्रमाणवेळेला जागून उशिरा आली तर मोबाईल बघण्यापेक्षा मी पुस्तक वाचायला सुरुवात करतो.  मी घरापासून दूर राहत असल्याने मेसमध्ये जेवतो  त्यावेळेस सुद्धा मेसमध्ये नंबर येण्यापर्यंत वाचू शकतो मी माझे उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपात दिले आहे .आपण आपल्या  रुटीन प्रमाणे यात बदल करू शकतात. ऑफिसमध्ये चहा पिणे जेवण करतो या वेळेस सादर गोष्ट लवकर करुंन आपण वाचण्यास सुरवात करू शकतो. एखादा व्यक्ती प्रवाश्यात वाचू शकतो .एखादा वक्ती अलार्म लावत सकाळी लवकर उठत तो वेळ वाचनसाठी देऊ शकतो . केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हा  मंत्र  जपत आपण वाचनाला सुरुवात केल्यास  आपले वाचन होऊ शकतो .

 चटकन वाचून होणारी कमी पानाची पुस्तके वाचल्यास  आपणास अरे माझे आठवड्यात एक पुस्तक वाचून संपले याचा आंनद आपण घेऊ शकतो   प्रौढ असलो तरी लहान मुलांची कॉमिक्स वाचून जर पूर्वी वाचले नसेल तर वाचनाची सवय  स्वतःला लावून घेऊ शकतो.कॉमिक्स सहजतेने समजत असल्याने वाचनाचा फारसा थकवा देखील येणार नाही‌.

कमी वेळात जास्तीत जास्त वाचन होण्यासाठी आपण वाचन वेग वाढवण्याचा सराव करु शकतो.वाचन वेग कोणत्या पद्धतीने वाढवता येतो,या विषयी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात माहिती आहे.ती समजून घेऊन त्यानुसार वाचन केल्यास आपण कमी वेळात जास्त वाचू शकतो‌.वाचनवेग वाढल्याने आपणास जो मोजक वेळ मिळतो त्यामध्ये एखादे पुर्ण पुस्तक देखील वाचून संपवू शकतो.कमी वेळात पुस्तक वाचून पुर्ण झाल्याने आपला आत्मविश्वास वाढून आपला वाचनवेग वाढू शकतो. ज्यामुळे पुर्वीपेक्षा कमी वेळात आपले पुस्तक वाचून पुर्ण होईल.

मी लेखात आधी सांगितले तसे भले ही पाच मिनीटे का होईना मात्र नियमित वाचन केल्यास केल्याने होत आहे.आधी केलीची पाहिजे या म्हणीनुसार आपले वाचन सहजतेने होऊ शकते. मग करणार ना सुरवात बंद करणार ना ,वेळ नाहीची सबब सांगायला.

 माझे वाचन या मालिकेतील सहावा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartebookreview.blogspot.com/search/label/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3

माझे वाचन या मालिकेतील ५वा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा











मानववतेच्या तिर्थस्थानाची माहिती देणारे पुस्तक "आनंदवन प्रयोगवन'


जे दुःखी, कष्टी आणि पीडित आहेत, त्यांना जो माणूस आपलं मानतो, तोच खरा साधू (संत) आहे आणि त्याच्या ठिकाणीच देव वास करतो हे सांगणारा संत तुकाराम यांचा 
'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा' हा अभंग सुरसिद्ध आहे.अभंग सुप्रसीद असला तरी प्रत्यक्षात त्या प्रमाणे वागणारे हाताचा बोटावर मोजता येतील इतकेच लोक आचरण करत असल्याचे आपणास सहज दिसते. या मोजक्या लोकांमध्येच मोजता येतील असे महान व्यक्तिमत्व म्हणजे बाबा आमटे होय. बाबा  आमटे यांनी कुष्ठरोगी, दिव्यांग, वनवासी व्यक्ती आणि यासारख्या समाजातील मूळ प्रवाहापासून दूर गेलेल्या नागरिकांना समजाजच्या मूळ प्रवाहात आणण्यसासाठी  लोक बिरादरी, हेमलकसा, आनंदवन सोमनाथ आदी प्रकल्प उभारले आहेत . या प्रकल्पाची माहिती देणारी पुस्तकेसुद्धा प्रसिद्ध आहेत अश्याच प्रसिद्ध असणाऱ्या पुस्तकांपैकी एक  म्हणजे बाबा आमटे यांचे सुपुत्र असलेल्या डॉ विकास आमटे यांनी लिहलेले "आनंदवन लोकवन हे पुस्तक .या पुस्तकात डॉ विकास आमटे "आनंदवन चा इतिहास उलगडला आहे .हे पुस्तक मी नुकतेच वाचले 
              या पुस्तकात १९० पानाच्याद्वारे ७ प्रकरणातूनरंजक पद्धतीने  आनंदवनची गोष्ट उलगड जाते.पुस्तकाची भाषा सहजसोपी आहे. जी वाचल्यावर चटकन समजते .सलग वाचल्यास कंटाळा येतो हे लक्षात
घेऊन जाणीपूवक पुस्तकात विविध चित्रे देखील देण्यात आलेली आहेत ज्यामुळे पुस्तक वाचताना आपण त्यात रंगून जातो आणि पुस्तक कधी वाचून संपले हे लक्षात सुद्धा येत नाही. 
  पहिल्या प्रकारांत डॉ विकास आमटे यांनी गोष्ट सांगण्यापूर्वी या शीर्षकाखाली हे पुस्तक का लिहले? हा हेतू सांगितला आहे ज्यात त्यानी अधिकृत माहिती व्हावी यासाठी हे पुस्तक लिहले असल्याचे सांगितले आहे. या पुस्तकाचे लेख कसे झाले ? कोणी त्यास मदत केली हे या प्रकरणातून सांगण्यात आले आहे. एका प्रकारे हि पुस्तकाची प्रस्तावनाचं ते असे पण म्हणू शकतो दुसऱ्या  प्रकरणात बाबा आमटेयांना आनंदवनाची संकल्पना कशी सुचली ?त्यांनी आनंदवन उभारण्याच्या आधी कोणते प्रकल्प उभारले ? त्यावेळी त्यांना काय अनुभवलं आले ? आनंदवन उभारण्याचं आधी बाबा आमटे उदर्निर्वाहासासाठी काय करत होते हे सांगितले आहे.आनंदवनची निर्मिती करताना बाबा आमटे यांनी आलेल्या अडचणींवर कोणत्या प्रकारे मात केली ? आनंदवनची सुरुवात कोणत्या प्रकारे झाले डॉ  विकास आमटे यांचे आनंदवनातील बालपणीचे अनुभव सांगितले आहे.झडलेली बोटे ,निर्मितीक्षम हात असे शीर्षक असलेल्या या प्रकरणातून आनंदवन काय आहे हे समजण्याची आपली पूर्वपीठिका तयार होते    तिसऱ्या प्रकरणात ?रोगमुक्तीचा वाढता परीघ या शीर्षकाखाली आपण आनंदवनचे करी कसे विस्तारित गेले कुष्ठरोग्यांच्या सेवेतून सुरु झालेले आनंदवनच्या कर्यणारे अपंग कल्याण
आणि अन्य आरोग्यविषयक सेवा देण्यास कोणत्या प्रकारे सुरुवात केली .किंबहुना असे करणे  सुरु करावे असे बाबा आमटे आणि आनंदवन व्यवस्थापनास का वाटले हे संगितले आहे 
चौथ्या प्रकरणात आनंदवनात शेती करणे कोणत्या पद्धतीने सुरु कऱण्यात आले , मुळात त्यांची गरज का भासली आजमितीस आनंदवनातील शेतीचे स्वरूप काय आहे ? आज आनंदवनास भेट दिली असता आपणास दाट जंगलात आल्यासारखे वाटते ? या जंगलाची निर्मिती कशी झाली ?याची माहिती देण्यात आली आहे २९ पानाच्या या प्रकरणाचे नाव हिरव्या निर्मितीचा ध्यास असे आहे / उद्योगातून आत्मसन्मान असे शीर्षक सलेल्या पाचव्या प्रकरणात ३० पानांद्वारे डॉ विकास आमटे यांनी आनंदवनातविविध प्रकारचे व्यवसाय करणे कसे सुरु झाले? आनन्दानात कोणते उद्योग सध्या सुरु आहेत ? आनंदवनात सुरु झालेले कोणते उद्योग काही कारंणारे बॅड झाले आहेत का ? याची माहिती मिळते या प्रकरणात आनंदवनाखेरीज बाबत आमटे त्यांच्याकडून अन्य कोणते उपक्रम राबवण्यात येतात याची तोंडओळख करून देण्यात अली आहे तर पुढच्या म्हणजेच सहाव्या प्रकरणात ज्याचे नाव कुष्ठमुक्तांचे हात वंचितांच्या मदतीला असे आहे त्यात या विषयी सविस्तर सांगण्यात आले आहे अखेरच्या सातव्या प्रकरणात आनंदवनाच्या व्यस्थापनविषयी आणि आमटे परिवाराच्या सध्याच्या शिलेदारणमाची ओळख करून देण्यात आले आहे 
आनंदवन म्हणजे फक्त कुष्ठरोगाशी संबंधित संस्था नव्हे तर त्याही पलीकडे आनंदवनाचे कार्य आहे हे कार्य समजून घेण्यासाठी किमान एकदा तरी हे पुस्तक वाचाच 


मी थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्याविषयी वाचलेले हे दुसरे पुस्तक मी वाचलेल्या पहिल्या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

सोमवार, २६ जानेवारी, २०२६

अनुभवकथन, एका कुमारवयीन प्रगल्भ मात्र योग्य संधी न मिळालेल्या लेखिकेचे, 'डायरी ऑफ ऍना फ्रॅंक'

पुस्तकाची दुनिया मोठी  अफलातून आहे. पुस्तक लेखनाचा प्रत्येक प्रकार आपणस काहीतरी शिववून जातो .ना सी फडके यांनी मराठीत मोठ्या प्रमाणात रुजवलेला असा निबंध हा प्रकार जो  विचारशक्तीला चालना देतो. उत्तम काव्य 'आपणास शब्दाची जादू उलगडून सांगते. कथा कादंबरी हा प्रकार आपले ऊत्तम मनोरंज करतो  तर चरित्र तसेच  आत्मचरित्र हा प्रकार आपणस  आयुष्यचं सुखदुःख सांगतो.  एखाद्या कठीण स्थितीत प्रतिभावान माणसे कोणत्या प्रकारे स्थिर चित्र राहिली. . त्यांना याचे काय फळ मिळाले ?  हे आपणास समजते. त्यामुळे आपण देखील जर आपणावर तशी स्थिती उद्भवलीच तर शांत राहायचे हे समजून घेऊ शकतो तसेच दुसऱ्याचे दुःख समजून घेण्याची आपली मानसिकता  तयारहोण्यासाठी आत्मचरीत्रे ,चरित्रे मदत करतात असे अनेक मानसशास्त्रज्ञाचे मत आहे, याचा अनुभव घेण्यासाठी या २०२६ वर्षी मी अधिकाधिक चरित्रे आणि आत्मचरीत्रे वाचण्याचे ठरवले आहे. तर या विशिष्ट हेतू ठेवून सुरु केलेल्या या २०२६ च्या वाचनातले पहिले पुस्तक मी नुकतेच वाचले. ते होते   'डायरी ऑफ ऍना फ्रॅंक'
 डायरी ऑफ ऍना फ्रॅंक', एक असे अनुभवकथन जे  एका कुमारवयीन अल्पयुषी मात्र प्रगल्भ सशक्त अश्या योग्य संधी न मिळालेल्या  लेखिकेने तिच्या आयुष्यातील २ वर्षाच्या विदारक स्थिती सांगताना केले आहे असे आपण या पुस्तकाबाबत एका वाक्यात सांगायचे झाल्यास म्हणू शकतो. .एखाद्या समाजाला विनाकारण
खलनायकाच्या भूमिकेत उभे केल्यास काय होऊ, शकते ? याचे हृद्यद्राक चित्र आपण या पुस्तकातून समजते.  या फक्त ऍना फ्रॅंक या कुमारवयीन मुलीच्या ८० वर्षांपूर्वी लिहलेल्या आठवणी नाहीत.  या आहेत कोणत्याही प्रकारची कट्टरता किती वाईट असते हे सांगणाऱ्या आठवणी. सुमारे २७० पानाच्या या पुस्तकात आपणास दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी ज्यू  धर्मियांवर कोणत्या प्रकारे अत्याचार करण्यात आला. हे समजते .                      या आठवणी वाचताना  आपणास एक कुमारवयीन मुलगी ताणतणावांना कोणत्या प्रकारे सामोरे जाते ? कुमारवयीन भावना कोणत्या प्रकारे असतात. ?  युद्ध खरोखरीच कोणत्या समस्येचे उत्तर असू शकते का ? युद्धामुळे जनजीवन कोणत्या प्रकारे विस्कळीत होते. ? या सध्याची स्थिती बघता अत्यंत आवश्ययक असणाऱ्या प्रश्नांनाबाबत विचार करायला भाग पडते. ज्यांना इस्राईल पेलेस्टाईन या सारख्या संघर्षात तेथील मुलेमुली काय अनुभवत असतील याचे वर्णन वाचायचे असेल मात्र त्यांना तेथील अनुभव वाचता येत नसतील त्यांना हे पुस्तक वाचून त्याबाबत मोठ्या प्रमाणात कल्पना सहज येऊ शकते . पुस्तक सुमारे ८० वर्षांपूर्वी लिहलेले आहे तेव्हाची स्थिती आणि ताची स्थिती पूर्णतः बदलली आहे असे सांगून या पुस्तकाकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही.
किंबहुना  मी हा मजकूर लिहीत असताना रशिया - युक्रेन युद्धाला लवकरच ४ महिने पूर्ण होतील अद्याप त्याचे ऊत्तर सापडले नाहीये . अमेरिका आणि युरोपीय राष्ट्र यांच्यात तणाव आहे त्या पार्शवभूमीवर हे प्रश्न अधिकच महत्त्वाचे ठरतात                                                                या डायरीत ऍना  फ्रॅंक' फक्त त्यावेळी ज्यू लोकांना कोणत्या हालापेष्टाना सामोरे जावे लागले हेच सांगत नाही.  तर त्यावेळी तिला भेटायला येणाऱ्या आणि काही कारणामुळे भेटायला न येऊ शकणाऱ्या व्यक्तींविषयी  देखील अत्यंत मनमोकळ्या पद्धतीने विचार मांडते. या विचारांमध्ये कुमारवयीन आकर्षण देखील आहे. या पुस्तकाच्या प्रास्ताविकेत मूळ डायरीचे संपादन करताना हो भाग मोठ्या प्रमाणात वगळला असल्याचे सांगण्यात आले आहे त्यातही भडकपणा मोठ्या प्रमाणात कमी केला आहे असे  सांगण्यात आले आहे मात्र तो पूर्णतः काढून टाकला नसल्याचे या पुस्तकाच्या वाचांतून समजते .आई नई मुलगी यांचे नातेसंबंध कसे असतात? या नटे संबंधात कोणत्या गोष्टीमुळे दुरावा निर्माण होऊ शकतो.  या गोष्टी या पुस्तकाच्या वाचनाने उलगडतात .ऍनाने  या  खेरीज अन्य लेखेन सुद्धा केले त्याची तयारी तिने कशी केली( ज्यात दोन अशंतः लेखन केलेल्या दोन कादंबरी आणि काही निबंध स्वरूपातील लेखन याचा समावेश होतो ) याची माहिती मिळते .स्वतःतील लेखनाचा स्पार्क तिने कसा ओळखला होतायुद्ध संपल्यावर तिने त्याला गती देण्यासाठी काय करता येईल याचे नियोजन कसे केले होते. याची देखील माहिती आपणास मिळते . ज्यामुळे अनुभवकथन, एका कुमारवयीन प्रगल्भ मात्र लेखिकेचे,  मात्र ' योग्य संधी न मिळालेल्या लेखिकेचे,  'डायरी ऑफ ऍना फ्रॅंक'असेच म्हणावे लागते 


या आत्मपर कथनाशिवाय  ऍना फ्रॅंक' यांनी लिहलेल्या मात्र फारश्या प्रसिद्ध नसलेल्या कादंबरीविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

लाईट.. ‌कॅमेरा.... ॲक्शन

विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात इथे दर बारा मैलावर  भाषा बदलते असे सांगण्यात येते. जो देश जगातील सातवा मोठा देश आहे. आणि ज्या देशाच्या अधिकृत अशा 22 भाषा आहेत. तसेच जगातील बहुतेक सर्व प्रमुख धर्माचे लोक ज्या भारतात राहतात. अश्या खंडप्राय देशाला ज्या तीन गोष्टी जोडतात त्यातील एक गोष्ट म्हणजे चित्रपट. ज्याची ओळख होते तीन शब्दातून. 'लाईट कॅमेरा ॲक्शन' हे तीन शब्द ऐकल्यावर आपल्या समजते येथे कोणत्यातरी मालिकेचे अथवा चित्रपटाचे चित्रकरण सुरू आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या विचार केला असता जगात 210 देश आहेत. या प्रत्येक देशात काही प्रमाणात चित्रपट निर्मिती होते. मात्र या 210 देशांमध्ये सर्वाधिक चित्रपट निर्मिती होते ती आपल्या भारतात. त्यामुळे जगात चित्रपट निर्मितीत काय सुरू आहे? आपण काय करतो आहोत? याची माहिती असणे हे आवश्यक ठरते, आणि ही माहिती मिळते विविध ठिकाणी होणाऱ्या चित्रपट महोत्सवात. या चित्रपट महोत्सवात वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट एकाच छताखाली दाखवले जातात. त्यामुळे चित्रपट रसिकांना चित्रपट निर्मितीसाठी कोणते तंत्र वापरले जाते ? आपण कोणते तंत्रज्ञान वापरतो आहोत? कोणत्या विषयावर चित्रपट बनतात? आपण कोणत्या चित्रपट विषयावर चित्रपट तयार करतो या सारख्या विषयांची माहिती सविस्तर मिळते. त्यामुळे हे चित्रपट महोत्सव हे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. जगभरात आणि आपल्या भारतात सुद्ध वेळ ठिकाणी हे चित्रपट आयोजित केले जातात. त्यातीलच आपल्या महाराष्ट्राचा विचार करता अत्यंत महत्त्वाचा असा चित्रपट महोत्सव म्हणजे 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' होय. 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026' सध्या सुरू आहे. या चित्रपट महोत्सवाचे निमित्त साधत दर आठवड्याला एका वेगवेगळ्या विषयावर विशेषांक प्रकाशित करणाऱ्या साप्ताहिक सकाळकडून या आठवड्याचा  विशेष अंक हा चित्रपट विषयावर काढण्यात आलेला आहे. जो मी नुकताच वाचला.
 
या अंकात आपणास सिनेमाची भाषा , चित्रपट निर्मितीची प्रक्रिया चित्रपट घडताना कोणत्या गोष्टीचे काळजी घ्यावी तसेच त्यांचे प्रमोशन करताना सुद्धा कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी गेल्या पंचवीस वर्षात कोणते मोठे चित्रपट भारतात येऊन घेऊन गेले लहान चित्रपटांनी आणि निर्मात्यांनी कश पद्धतीने सुरुवात करावी ? चित्रपटातील महिलांचे चित्रीकरण आणि महिला सबलीकरण यांचा सहसंबंध याविषयी माहिती मिळते तसेच
 चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात? चित्रपटाचे मानसशास्त्र म्हणजे नक्की काय चित्रपट निर्मिती करताना मानसशास्त्र असतील कोणत्या बाबींचा अभ्यास असल्या तर फायदा होतो ? कोणत्याही चित्रपटाचा काढला जातो आणि या या सिक्वेलचे व्यवसाय गणित कसे ठरते जगभरात कोणकोणत्या चित्रपट करण्यात आला आहे आणि त्यांना चित्रपट रसिकांचा कसा प्रतिसाद मिळाला? अमिताभ बच्चन हे बॉलीवूड मधील अत्यंत महत्त्वाचे अभिनेते का समजले जातात द्या पूर्वीच्या चित्रपटांचा रिलीज चे जे युग आलेले आहे त्याची कारणे काय आहेत आणि त्याच्या कितपत फायदा होतो तसेच ओटीपी प्लॅटफॉर्म आणि चित्रपटगृहातील चित्रपट बघणे यातील फरक काय ओटीपी ती प्राथमिक चा सकारात्मक बाजू आणि चित्रपटगृहातील चित्रपट बघणे याचे सकारात्मक बाजू डॉक्युमेंटरी तयार केल्यास त्याच्या चित्रपट निर्मितीसाठी कोणता पर्याय त्यांनी फायदा होतो. मानसशास्त्र सारख्या बाबींचा प्रचार प्रसार करण्यासाठी चित्रपट या माध्यमांचा कोणत्या पद्धतीने फायदा होतो. घ्या पुणे येथे सुरू असलेल्या चित्रपट  महोत्सवात चित्रपट बघण्यासाठी काय पुर्व तयारी करावी आणि कशी करावी. मुळात या चित्रपट महोत्सवांच्या स्वरूप काय असे असते आयोजन कोणत्या पद्धतीने होते तिकिटांचे वाटप कसे असते या विषयांची सुद्धा माहिती आपल्याला  साप्ताहिक सकाळच्या या विशेषकांतून मिळते.चित्रपटांचा विविध तांत्रिक बाजूंची मुद्देसूद मात्र जास्त चिकित्सक सखोल पद्धतीने न जाता आणि चटकन समजेल या भाषेमध्ये माहिती आपणास साप्ताहिक सकाळच्या सध्याच्या  चित्रपट विषयक या विशेषांकाचा वाचनातून आपणास होते. अंकात 12  लेख समावेश करण्यात आलेले आहेत. 
ज्यांचे चित्रपट निर्मिती क्षेत्रात मोठे योगदान आहे आणि चित्रपट विषयक लेखनाच्या मोठा अनुभव आहे असा तज्ञांचे हे लेख आहेत

मी लेखाच्या सुरुवातीला सांगितले त्या पद्धतीने आपल्या भारताला ज्या तीन गोष्टी जोडतात त्यातील एक गोष्ट असणाऱ्या चित्रपटांचे विश्व किती मनोहारी आहे तसेच हा चित्रपट तयार करताना किती मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते आधी विषयांची माहिती हे आपणास या साप्ताहिक महत्त्वाचा वाचातून समजते भलेही आपण चित्रपट कमी बघत असू मात्र हे विश्व किती मनोहारी आहे हे माहिती व असणे आपल्याला एक नवीन अनुभूती देऊन जाते तरी आपण हा अंक अवश्य वाचावा.


गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

प्रसिद्ध पुस्तकांचे वाचन आणि मी (माझे वाचन भाग क्रमांक ६)

मी मोठ्या प्रमाणात पुस्तके वाचतो, हे समजल्यावर सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तीशी माझी जूजबी ओळख असते,अश्या व्यक्ती मला तुम्ही राधेय वाचले असेल. ययाती वाचले असेल. पानिपत वाचले असेल, असे प्रश्न विचारतात. माझे सर्वसाधारण असे निरीक्षण आहे की या व्यक्ती ज्या पुस्तकांची नावे घेतात ती नावे सुप्रसिद्ध पुस्तके या वर्गवारी मोडणारीच असतात. तसेच या पुस्तकांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणता येऊ शकते ते म्हणजे ही सर्व पुस्तके काही मोजके अपवाद वगळता कादंबरी या प्रकारातील असतात. कादंबरी खेरीज अन्य साहित्यप्रकार जसे नाटक, काव्यसंग्रह, प्रवासवर्णने, चरित्र, कथासंग्रह, किंवा ना. सि.फडके यांनी जो साहित्यप्रकार मराठीत मोठ्या प्रमाणात रूजवला तो साहित्यप्रकार अर्थात ललित निबंध लेखन या प्रकारातील पुस्तके नसतात. नाही म्हणायला काही चरित्र आत्मचरित्र असतात. मात्र त्यांची संख्या फारच नगण्य असते‌‌. मुख्य भर हा कादंबरीवरच असतो. या व्यक्तींशी थोडा जास्त संवाद साधला की या व्यक्तींचे वाचन काहीसे कमी असल्याचे माझे निरीक्षण असते. माझ्या अनुभव हा त्रिकाल बाधित सत्य आहे असे मुळीच म्हणता येणार नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. किंबहुना माझ्या व्यक्तिमत्त्वामुळे ज्यांचे वाचन चौफर आहे. साहित्यातील विविध प्रकाराचे ज्यांचे वाचन आहे  अशा व्यक्ती मला भेटतच नसतील, असे देखील म्हणता येऊ शकते असो. मात्र ज्या व्यक्तींचे वाचन कमी आहे अशा व्यक्ती एखाद दुसरे प्रसिद्ध पुस्तक वाचतात, जे सुप्रसिद्ध असतेच.फारस्या प्रसिद्ध नसलेल्या पुस्तकाविषयी ते बोलतच नाही. हे मात्र  ठामपणे म्हणता येऊ शकते.

माझा बाबत बोलायचे झाल्यास मी 'माझे वाचन' या मालिकेच्या आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे, माझे कथासंग्रह, कादंबरी या प्रकारचे साहित्य वाचन काहीसे कमीच आहे. मी मुख्यतः विविध प्रकारची माहिती देणारी पुस्तके वाचतो. काही प्रमाणात विविध व्यक्तींनी लिहिलेली आत्मचरीत्र आणि चरीत्र मी वाचतो. आता काही जण माझे कथासंग्रह आणि कांदबरी वाचन कमी असल्याने माझे वाचनच नाही, असे म्हणू शकतात.मात्र मी आहे असा आहे, स्विकारा अथवा नका स्विकारू हा माझा दृष्टिकोन असल्याने मी त्यावर अधिक बोलू इच्छित नाही.
माझ्या आतापर्यतच्या अनुभवानुसार तयार झालेली आवड आणि माझी व्यावसायिक गरज लक्षात घेत, माझ्यात माहितीपर आणि चरित्र वाचनाची आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्या सुप्रसिद्ध कादंबऱ्या ते लोक सांगतात, त्यातील काही मी वाचलेल्या नसतात.मात्र त्यामुळे माझे फारसे अडत नाही. मात्र मला जी लोक पुस्तकाविषयी विचारतात. त्यांचा मते वाचन म्हणजे कांदबरीवाचन असे म्हणता येवू शकते. त्यांना वाचण्याचे विविध पर्याय माहिती नसावेत,असेच त्यांच्याशी बोलल्यावर जाणवते‌.वाचनातील विविधतेचा त्यांना गंध देखील नसतो.अर्थात वाचनाचा आनंद काय असतो.हे त्यांना माहिती नसल्याने ते स्वाभाविक आहे. त्यात त्यांना बोल लावून चालणार नाही,हे ही तितकेच खरे.























बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

वाच ग घूमा ...काय मी वाचू ?( माझे वाचन भाग५)

मला अनेकाकडून बऱ्याचवेळा एक प्रश्न विचारला जातो ? अजिंक्य मला वाचायला एखादे पुस्तक सुचव. तू इतकी पुस्तके वाचतो तुला माहिती असेलच. मला हा प्रश्न विचारला की मीच त्याला प्रतीप्रश्न विचारतो तूला कोणती पुस्तके वाचायला आवडतात,?कथासंग्रह, कादबरी, काव्यसंग्रह, नाटके, माहितीपर की ना.सी फडके यानी मराठीत मोठ्या प्रमाणात आणलेला निबंंध हा प्रकार? माझ्या या प्रश्नावर जर समोरच्या व्यक्तीने त्याचा आवडता प्रकार सांगितला आणि त्याविषयी माझ्याकडे माहीती असेल तर मी त्याला पुस्तक सुचवतो.

मात्र ज्यांचे वाचन मुळातच कमी आहे अशी व्यक्ती माझ्या प्रश्नाने गडबडते. ती म्हणते माझे असे काही ठरलेले नाहीये.मग मला त्याला सांगावे लागते,समोर येईल ते वाच.सतत वाचले की तूला समजेल तूला काय वाचायला
आवडते.एकदा प्रकार समजला की पुन्हा माझ्याकडे ये.मी तूला पुस्तके सुचवतो.

मी आतापर्यत जी पुस्तके वाचली आहेत, त्यावेळी आलेल्या अनुभवानुसार  किंवा पुस्तके वाचणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती ऐकल्या  आहेत त्यानुसार सांगतोय वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी आवडीच्या विषयावरची पुस्तके सुरवातीच्या काळात मिळणे आवश्यक ठरते‌.जर त्यावेळी कंटाळा येणारी पुस्तके मिळाली तर वाचनाची नावडच निर्माण होणे शक्य आहे. आता एखाद्या विषयात आवड किंवा नावड निर्माण होण्यामागची कारणे मानसशास्त्रज्ञच जाणो,आणि मी काही मानसशास्त्र नसल्याने ते सोडून देउया.

मी माझे वाचन  या मालिकेच्या आधीच्या भागात सांंगितले आहे.त्याप्रमाणे माझे वाचन कॉमिक्सने सुरू झाले.मी अगदी सातवी आठवीपर्यत बालसाहित्य वाचत असे. राधेय,ययाती, स्वामी,या सारख्या कांदबरी मी त्यामुळे बऱ्याच उशिरा वाचल्या, खूप मोठा काळ बालसाहित्य वाचल्याने मला ते चटकन समजत गेले.वाचलेले समजतयं हे बघून मी अजून अजून वाचायला लागलो.परिणाम तूमच्या समोर आहे.आता सर्वांनीच खुप वेळ बालसाहित्यच
वाचले पाहिजे असे नाही.तूम्हाला जर प्रौंढाच्या कांदबरी समजत असतील तर बालसाहित्य न वाचता तूम्ही थेट तेच वाचू शकतात.शेवटी वाचलेले मनाला भावणे,आणि त्यातून आवड निर्माण होणे महत्त्वाचे आहे. कारण वाचलेले भावले तर तूम्हालाच तूमचा वाचनाचा सुर गवसेल आणि मग मला जसे लोक विचारतात काय वाचू ते तसे कोणाला विचारावे लागणार नाही.उलट लोकच तूम्हाला वाचण्याविषयी प्रश्न विचालतील माझ्यासारखे.मात्र त्यासाठी आपल्याला काय आवडते हा सुर सापडणे आवश्यकच.मग शोधणार ना सुर आपला वाचण्याचा

माझे वाचन या लेखमालिकेचा चवथा भाग वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 


माझे वाचन या लेखमालिकेचा तिसरा  भाग वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 



माझे वाचन या लेखमालिकेचा दुसरा भाग वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 


माझे वाचन याचा पाहिला भाग वाचण्यसासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 


मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)

माझ्या कालच्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याबाबद्दल माझा लेख वाचणाऱ्या,यावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. या प्...