वाचू आनंदे
या ब्लॉगवर आपण माझे पुस्तक वाचनावेळचे अनुभव , मी वाचलेली पुस्तके, याविषयी जाणून घेऊ शकाल या खेरीज माझे पर्यटनविषयक लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartetraveller.blogspot.com तर प्रचलित घडामोडीविषयक वाचायचे असल्यास www.ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com या ब्लॉगला भेट देऊ शकतात या खेरीज माझे ललित निबंधवजा लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartelalitlekhan.blogspot.com तर या सर्व लेखनाचा एकत्रितपणे आनंद घेयचा असल्यास www.ajiankyatarte.blogspot.com या ब्लॉगला भेट द्यावी
सोमवार, ३० मार्च, २०२६
कहाणी अथक परीक्षम,जिद्द कष्टाची आणि विनाकारण झालेल्या अपमानाची ....
सोमवार, २३ मार्च, २०२६
प्रत्येक कुमारवयीन मुला- मुलीने वाचलेच पाहिजे असे पुस्तक ' यस आय एम गिल्टी'
वाचक मित्र,मैत्रीणीनो इसवी सन २०२६ या वर्षात माझ्या वाचनाचा रोख प्रामुख्याने आत्मचरित्र, चरित्र आणि अनुभव कथन असलेल्या पुस्तकांवर असणार आहे, हे एव्हाना तुम्हाला माहिती झालेच असेल. तर याच साखळीतील एक पुस्तक म्हणून मी हे एका गुन्हेगाराचे अनुभव कथन वाचले. संपूर्ण महाराष्ट्रात त्यातही पुणे शहरात एके काळी खूप चर्चेत असलेल्या जोशी - अभ्यंकर खून खटल्यातील आरोपीने त्याचे अनुभव लिहले तेच म्हणजे हे पुस्तक एक अत्यंत साधा- सरळ, पापभिरू, धार्मिक संस्कारात लहानाचा मोठा झालेला मुलगा चुकीच्या संगतीमुळे फासावर जातो त्यामुळे आपली सांगत किती महत्त्वाची असते हे आपणास हे पुस्तक स्पष्टपणे दाखवून देते.
२०० पानी या पुस्तकाची सुरवातीची सुमारे १६ पाने प्रकाशकाचे मनोगत, पूर्वी हे पुस्तक वाचल्याची मनोगते ,या पुस्तकांचे संपादन केलेल्या शुभदा गोगटे यांचे तसेच मुनव्वर शाह यांची मनोगते या पुस्तकांच्या विक्रीतून येणारे उत्पन्न कोणत्या कामासासाठी वापरले जाते.आणि त्याच कामासाठी का वापरले जाते या पुस्तकाच्या निर्मितीतयोगदान दिलेल्या व्यक्तींचे आभार या सारख्या बाबींवर खर्च करण्यात आलेली आहेत.हा मजकूर ज्या पानावर छापला आहे त्या पानांना क्रमांक क्रमांक देताना त्यांना अक्षरी एक ,दोन तीन असे क्रमांक दिले आहेत तर सुरुवातीचा हा भाग संपल्यावर जेथून मुनव्वर आपले अनुभव मांडायला सुरुवात करतो त्याला १, २, ३, असे अंकी क्रमांक दिले आहेत अंकी आणि अक्षरी दिलेल्या पानाच्या क्रमांकाचा एकत्रित विचार करता १७ व्या पानापासून पुस्तक सुरु होते त्यातही सुरवातीची दोन पाने एखादा व्यक्ती एखादा गुन्हा करतो ,यामध्ये व्यक्तीचे स्वतःचे कर्म आणि दैव प्रारब्ध, देवाची इच्छा या गोष्टींचा किती प्रभाव असतो या सारख्या बाबींवर आध्यत्मिक दृष्टीने चर्चा केली आहे अध्यात्मिक बाबींवरील मजकुराबाबत सांगायचे झाल्यास माझा या विषयातील अभ्यास खूपच कमी असेल किंवा मुनव्वरने/ संपादिका शुभदा गोगटे यांनी तो मुळातच किचकट भाषेत लिहला असेल मला वैयक्तिकरित्या तो मोठ्या प्रमाणात कंटाळवाणा वाटला असोतर ही दोन पाने वाचल्यावर ३ ऱ्या पानापासून मुनव्वरने स्वतःविषयी सांगायला सुरवात केली आहे . जे पान क्रमांक १४३ पर्यंत आहे पान क्रमांक १४३ ते १४८ पर्यंत मुनव्वरने सह आरोपीच्या व्यक्तिमत्तविषयी लिहले आहे . त्या नंतरची पाच पाने पुन्हा कंटाळवाणी आहेत ज्यात विविध सुविचार देण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुस्तक प्रकाशनादरम्यान प्रकाशक शरद गोगटे आणि मुनव्वर यांच्यातील पत्रव्यवहार आणि प्रकाशकास एका गुन्हेगाराचे अनुभव कथन प्रसिद्ध केल्यावर काय काय अनुभव आले याबाबत माहिती देते .
मुनव्वरने स्वतःच्या आयुष्यावर लिहलेले वाचताना ७३ व्या पानापर्यंत आपण एखाद्या गुन्हेगाराचे नव्हे तर एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने त्याचे रोजचे लिहलेले अनुभव तर वाचत नाहीना असे वाटावे असे वाटते .
मुनव्वरला ज्यामुळे कुप्रसिद्धी मिळाली तो जोशी - अभ्यंकर खून खटल्याच्या ठळक स्पष्टपणे उल्लेल्ख ७४व्या पानावर होतो तेथून पान क्रमांक १४३ पर्यंत जोशी - अभ्यंकर खून कसा झाला ? त्याला कसे अटक केली ?अटक केल्यावर त्याला कशी वागणूक मिळाली ? अटक झाल्यावर त्याचा दिनक्रम काय होता ? तुरंगात असताना धार्मिक बाबींविषयी अभ्यास करण्याची आवड त्यात कशी निर्माण झाली ?तुरुंग प्रशासनाकडून त्याची पूर्तता कोणत्या प्रकारे झाली या विषयी सांगण्यात आले आहे .ज्यांना क्रिमीनल सायकॉलॉजीच्या दृष्टीने या पुस्तकाकडे बघायचे असेल त्यांनी ७४ व्या पानापासून १४८ पानपर्यंतच वाचले तरी चालण्यासारखे आहे .ज्यांना आपण कोणत्या संगतीत राहतो हे का महत्त्वाचे आहे या विषयी वाचायचे असेल त्यांनी पान क्रमांक १ पासून ७३ पर्यंत वाचलेले चालू शकते .ज्यांना समाजाचा विचार कोणत्या प्रकारे कार्य करतो या विषयी जाणून घेण्यात स्वारस्थ आहे त्यांनी पान १६६ पासून शेवटच्या पानपर्यंत वाचावे ते त्यांना माहिती देणारे असेल .ज्यांना गुन्हेगार देखील एक माणूसच असतो त्याला देखील भावना असतात हे समजून घेयचे असेल तर त्यांनी पानं क्रमांक १५४ ते १६५ मध्ये छापण्यात आलेला मुन्नावर शाह आणि प्रकाशक शरद गोगटे यांच्यात झालेला पत्रव्यवहार वाचावा
मुन्नावर याने केलेला गुन्हा निंदनीयच होता ज्याची क्षिक्षा त्यास मिळाली .मात्र लेखाच्या सुरुवातीला सांगितलेल्या प्रमाणे आयुष्यात जगताना आपली एखादी छोटीशी चूक आपले आयुष्य कसे पूर्णतः नासवू शकते हे समजण्यासाठी आपण हे पुस्तक वाचलाच यावे
बुधवार, ४ मार्च, २०२६
समाजाचे दाहक चित्र दाखवून देणारे पुस्तक 'बलुतं'
मी या २०२६ वर्षी प्रामुख्याने आत्मचरित्र,चरित्र वाचण्याचे ठरवले आहे, हे एव्हाना तुम्हाला माहिती झालेच असेल. तर याचा मालिकेत समाविष्ट होणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, दया पवार लिखित 'बलुतं' हे सुप्रसिद्ध विद्रोही साहित्यातील महत्त्वाचे आत्मचरित्र मी नुकतेवच वाचले. समाजाचे दाहक चित्र दाखवून देणारे पुस्तक 'बलुतं' असे त्याचे एका वाक्यात वर्णन करता येईल आपल्याच समाजातील एका घटकाचे आयुष्य किती त्रासदायक आणि कष्टकरी होते याचे मन सुन्न करणारे वर्णन सुमारे २०० पानी पुस्तकात आहे.समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे स्वच्छतेचे काम करून सुद्धा समाज आपल्यातील एकाला कोणत्या प्रकारे हीन वागणूक देत होता हे या पुस्तकाच्या वाचनातून मला पुन्हा एकदा समजले.
मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६
समाजाच्या एका भीषण वास्तवाचे वास्तविक स्वरूप दखवणारे पुस्तक. 'उपरा'
या पुस्तकाला सहित अकादमीचा पुरस्कार मिळाला आहेत्यामुळे हे छोटेखानी आत्मचरित्र संहिताच विचार करता ऊत्तम आहे हे सांगायला नकोच भटक्या जातीत अन्य समाज घटकात शिक्षणाचा प्रचार प्रसार कसा झाला त्यांचे प्रश्न मुळात काय आहेत ?गरिबीबरोबर क्षिक्षण घेताना समाजातील समजुतीमुळे त्या समाजातील मुलं मुलींना घेताना कोणत्या अडचनांसमोर जावे लागते याचे कारण अर्थात आरक्षणाची गरज का आहे याचे
आकलन या पुस्तकातून समजते अर्थात आता पुस्तक प्रसिद्ध होऊन अर्ध्या शतकाचा यातील दाहकता झालेली असावीएकंदरीत समारोपाचे बोलायचे झाल्यास आपल्या समाजातील गुंतागुंत त्यातील विविध प्रश्न समजून घेण्याचे सहजसोपे माध्यम म्हणजे उपरा हे आत्मचरित्रपार पुस्तक
जाणून घेवूया पुस्तक वाचनाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकाविषयी ( भाग 2)
रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६
जाणून घेवूया पुस्तक वाचनाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकाविषयी ( भाग 1)
सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६
जगाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम करणाऱ्या शहराची सैर घडणारे पुस्तक ' न्यूयॉर्क'
आपल्याकडे ज्या ज्या गोष्टीमूळे शहाणपण येते असे संगितले जाते त्यामध्ये पर्यटन , फिरण्याच देखील समावेश होतो. अर्थात प्रयेकाचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगवेगळी असते .तसेच जग एव्हढे मोठे आहे की,पण राहतो तो आंणि त्याला लागून असलेले ४ ते ५ जिल्हे जरी फिरायचे म्हंटले तरी एक ते दोन वर्ष सहज लागू शकतात. (आता अति परिचयात अवज्ञा किंवा आपण लांबचे एरिया आधी बघू . हा भाग काय जवळचा आहे कधीही बघता येईल,असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले तर भाग वेगळा ) तर दुसरे देश किमान राज्य बघयाला घेतले तर सर्व आयुष्य देखील पुरणार नाही . मग याला ऊत्तर ते काय ? तर दुसऱ्याच्या अनुभवातून फिरायचे . म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीने लिहलेल्या प्रवास वर्णनातून एखादा प्रदेश समजून घेयचाकहाणी अथक परीक्षम,जिद्द कष्टाची आणि विनाकारण झालेल्या अपमानाची ....
यावर्षी मी प्रामुख्याने आत्मचरित्र, चरित्र आणि अनुभव कथन विषयक पुस्तकांचे वाचन करणे ठरवले आहे ,हे एव्हना आपणास माहिती झालेच असेल. मी आतापर्...
-
मला अनेकजण अजिंक्य तूझा आवडता लेखक कोण ? असा प्रश्न सातत्याने विचारतात, त्या व्यक्तींना सविस्तर उत्तर देण्यासाठी आजचे लेखन . तर ...
-
आपल्याला एखाद्या रमणीय तलावात बदक शांतपणे पोहतांना दिसले तरी आपल्याला शांत वाटणाऱ्या त्या तलावात बदकाचे स्वत:च्या देहाच्या खाली ...
-
कालचीच गोष्ट आहे , मला एका मित्राने फोन करून त्याच्या मुलाची व्यथा ऐकवली . त्यांची व्यथा अशी होती की, कितीही सांगितले...















