गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

माहितीपट एका धडपडीचा .. शहाण्यांचा सायकिऍट्रिस्ट

                

मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे  सांगत समर्थ रामदास स्वामी १७व्या शतकातच एखादे कार्य यशस्वी होण्यासाठी निरोगी प्रसन्न मनाचे किती महत्व आहे हे सांगितले समर्थ रामदास स्वामी यांच्याच मनाचे श्लोकात देखील मन किती महत्वाचे आहे  "हे मना सांगा मना रावणा काय झाले अकस्मात राज्य ते राज्यही सर्वही बुडाले या सारख्या श्लोकातून मन खंबीर असणे किती आवश्यक आहे हे पुन्हा पुन्हा सडांगितले आहे . समर्थ रामदास स्वामी यांच्यानंतर २० व्या शतकात जळगावच्या कवियत्री बहिणाबाई यांनी त्यांच्या "मन वढाय  वढाय" सारख्या कवितेतून मनाच्या चंचलतेबाबत  सांगितले आहे आपल्या दुर्दैवाने या सारख्या  मोजक्या व्यक्तींचा अपवाद वगळता  आपल्या आयुष्यातील महत्वाच्या मात्र दुर्लक्षित अश्या मन या गोष्टीकडेआपण दुर्लक्षच केलेलं दिसते . मानवी वर्तनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवणाऱ्या मन या गोष्टीबाबत सकारात्मक दृष्टिकोन उराशी बाळगत फक्त रुग्णासाठीच नव्हे तर सर्वसामन्य व्यक्तींच्या उत्कर्षासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती,  संस्था त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.  या अश्या महत्त्वाच्या गोष्टीपैकीच एक म्हणजे ठाणे  या शहरातील इन्स्टटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ  अर्थात आय  पी एच आणि तिचे संस्थापक सुप्रसिद्ध मनोविकारतज्द्न्य डॉ  आनंद नाडकर्णी 

           इन्स्टटयूट फॉर सायकॉलॉजिकल  हेल्थ   ही संस्था कोणत्या स्थितीत स्थापन झाली?  या संस्थेचे कार्य कोणकोणत्या समाजघटकासासाठी आहे ? संस्थेचेभौगोलीक कार्यक्षेत्र काय आहे ? संस्थेच्या कार्यामुळे समाजात काय काय फरक पडला ? समाजातून त्यांना कशा पाठिंबा मिळाला ? त्यात बदल झाला का ? संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीत कोणत्या अडचणी आल्या .? त्यावर कॊणत्या उपाययोजना कऱण्यात आल्या? संस्थेचे दैनंदिन कामकाज कश्या प्रकारे चालते ? तिथे काम करणारे कोणत्या सामाजिक आणि मानसिक अवस्थेतून गेलेलेअसू शकतात ? संस्थापक  डॉ  आनंद नाडकर्णी यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या संस्था कार्यावर परिणाम झाला का ? असल्यास तो कश्या प्रकारे सकारात्मक होता ? संस्थेने समाजातील दृलक्षित अश्या मनोरुग्ण या घटकांना समाजात उजळ माथ्याने जगता यावे या साठी काय उपक्रम राबविले अश्या अनेकविध प्रश्नाची उत्तरे आपणास हवी असतील तर आपण  इन्स्टटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्प अर्थात आय  पी एच संस्थापक सुप्रसिद्ध मनोविकारतज्द्न्य डॉ  आनंद नाडकर्णी  यांनी लिहलेले शहाण्यांचा सायकिऍट्रिस्ट हे पुस्तक वाचायलाच हवे मी हि हे पुस्तक नुकतेच वाचले 

       सुमारे पावणेतीनशे पानाच्या या पुस्तकात २६ विविध प्रकरणांतून लेखकाने तो स्वतः मानसशास्त्राकडे कश्या प्रकारे ओढला गेला ? त्याला याबाबत घरच्यांकडून कश्या प्रकारे आणि का विरोध झाला /? मात्र त्या विरोधावर लेखकाने आपले मित्र प्राध्यापकांच्या मदतीने कशी मात्र केली संस्था उभारावी याची कल्पना त्यांच्या मनात कशी आली ? संस्थेच्या श्रीगणेशा करताना त्यास कोणकोणत्या अडचणी आल्या मात्र या अडचणीत सुद्धा मदत करणारे हात कसे पुढे आले या हाताच्या मदतीने स्वतःच्या मानसशास्त्रीय ज्ञानाचा आधाराने त्याने या संकटाचा कसा यशश्वी सामना केला ? संस्थेचे कार्य कसे तळागाळापर्यंत नेले ? हे नेताना संस्था उभारण्यापूर्वी मुंबईच्या रुग्णालयात दिलेल्या सेवेतील अनुभवाचा  कशा फायदा करून घेतला . आपला व्यस्त दिनक्रम यशस्वीपणे पुढे नेताना संस्थेतील कर्मचाऱ्यांची त्यास कशी मदत होते ? संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवताना ते उपक्रम कोणकोणत्या टप्यातून गेले आदी विषय उलगडले आहेत 

      काही जणांना हे संक्षिप्त स्वरूपाचे आत्मचरित्र वाटेल मात्र  हे कोणत्याही अंगाने आतमचरित्र  नाही या पुस्तकात सुरवातीची हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी पाने सोडता कुठेही लेखकाने स्वतःच्या उल्लेख केला आहे असे आपणास आढळत नाही सुरवातीची पाने वगळता  लेखकाने आपल्या लेखनात कायम आपल्या संस्थेला आणि

संस्थेतील कर्मचारीवृन्द लेखनाच्या केंद्रस्थानी येतील अशी काळजी घेतल्याचे वारंवार दिसून येत  आहे सुरवातीच्या ज्या पानांमध्ये स्वतःच्या उलेल्ख केला आहे त्यामध्ये कुठेही स्वतःचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी केला आहे असे जाणवत नाही किंबहुना पुस्तकाची गरज म्हणून अपरिहार्यतेतून केलेला उल्लेख म्हणूनच स्वतःचा उल्लेख केलेला आहे हे लेखनातून जाणवते एका अर्थाने हा माहितीपटच  आहे . माहितीपट एका धडपडीचा .. शहाण्यांचा सायकिऍट्रिस्ट 

गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

चीनच्या प्रगतीची कुळकथा सांगणारे पुस्तक "चिनी महासतेचा उदय - डेंग झिओपेंग ते क्षी जिनपिंग"

    

चीन,भारता  इतकीच प्राचीन संस्कृती असणारा देश , भारताच्या महासत्ता पडला अडथळा ठरणारा देश , भारताबरोबर सीमावाद असणारा आणि त्या वादाला वेळोवेळी ताजे करणारा देश म्हणजे चीन भारताच्या पश्चिमेला असणाऱ्या पाकिस्तानसह भारताच्या सर्व शेजाऱ्यांना आपल्या नियंत्रणात घेण्यासाठी धडपडणारा देश म्हणजे चीन भारताबरोबर शांघाय को ऑपरेशन हे संघटन तसेच  ब्रिक्स संघटना  आदी विविध आंतराष्ट्रीय व्यासपीठवरील सहकारी.   स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या पहिल्या अमेरिकी दौऱ्यात ज्या २ देशांचा उल्लेख हे देश  निद्रिस्त ड्रॅगन  आहेत आणि हे  ड्रॅगन जागे होतील तेव्हा जगाची झोप उडवेल असा केला होता त्यापैकी एक देश म्हणजे चीन  (दुसरा देश जपान ) स्वामी विवेकानंद यांनी निद्रिस्त ड्रॅगन म्हणून उल्लेल्ख केलेला चीन हा खरोखर १९७८ पासून जागा झाला आणि तो आता खरोखर जगाची झोप उडवत आहे या दरम्यानचा त्याचा प्रवास सांगणारे पुस्तक म्हणजे निवृत्तीनंतर नाशिकच्या इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असलेले सनदी अधिकारी सतीश बंगाल यांनी लिहलेले आणि साधना प्रकाशनतर्फे प्रकाशित पुस्तक  "चिनी महासतेचा उदय - डेंग  झिओपेंग ते क्षी जिनपिंग" जे मी नुकतेच नाशिकमधील सांस्कृतिक संघटना असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना ) च्या पुस्तक संग्रहाच्या मदतीने वाचले 

      सन २०२० साली साधना मासिकात लेखमालिका स्वरूपात प्रसिद्ध लेखांचे विस्तारित स्वरुपाप्त केलेले एकत्रीकरण म्हणजे सदर पुस्तक मूळच्या लेखांमध्ये वाढ करत लेखकाने  लिहलेले आहे सुमारे चारशे पानाचे हे हे पुस्तक ९ भागात विभागले असून प्रत्येक भाग सुमारे तीन  ते पाच प्रकरणात विभागाला आहे पुस्तकात

३९ प्रकरणे असून त्याद्वारे लेखकाने आपणास चीनरूपी ड्रॅगन कसा जागा झाला?  याची ओघवत्या शैलीत मात्र तपशीलवारपणे माहिती दिली आहे 

         पहिल्या भागात एकच प्रकरण असून या मध्ये लेखकाने नेतृत्वाच्या पाच पिढ्या या प्रकरणातून माओ यांच्या कालखंडातून क्षी जिनपिंग यांच्या कालखंडातपर्यंत चीन कसा प्रकारे बदलत गेला याविषयी माहिती दिली आहे या प्रकरणाद्वारे पुस्तकाची बैठक आपल्याकडे तयार होते समाज आणि क्रांती या या दुसऱ्या भागात चीनच्या सुप्रसिद्ध क्रांतीची पार्श्वभूमी दोन प[प्रकरणातून लेखकाने आपल्या समोर मांडली आहे तिसऱ्या भागात सहा प्रकरणातून माओचा कालखंडात चीन कसा होता ?याविषयी आपणस माहिती मिळते आर्थिक सुधारणांचे पहिले पर्व असे नाव असलेल्या चवथ्या भागात आपणास १९७६ ते १९८८या कालखंडात चीनमध्ये कसे बदल झाले या बदलामागे तैवान आणि हाँगकाँगमधील बदल कसे कारणीभूत होते स्पेशल इकॉनॉमी झोन या आपल्याकडे काहिस्या उशिरा आलेल्या संकल्पनेद्वारे चीनचा विकास कश्या प्रकारे झाला याविषयी समजते पाचवा भाग  चीनमध्ये मानवी हक्कांची कशी पायमल्ली होते चीनमध्ये कशी लोकशाही नाही याविषयी बोलताना नेहमी केला जातो त्या तिआनमेन चौकातील हत्याकांडविषयीच्या घटनांवर प्रकाश टाकतो चार  प्रकरणातून हि दुर्दैवी घटना होण्यामागे पहिल्या  सुधारणा पर्वामुळे झालेल्या आर्थिक समृद्धीचा कसा रोल होता हे सांगण्यात आले असून पहिल्या दोन प्रकरणात यामागची पार्श्वभूमी सांगण्यात आलेली आहे तर तिसऱ्या प्रकारांत प्रत्यक्ष घटनेची माहिती दिली आहे या भागाच्या शेवटच्या चवथ्या प्रकरणात या घटनेमुळे निर्माण झालेल्या नंतरच्या घटना कश्या हाताळल्या ते सांगितले आहे सहाव्या भागात चार प्रकरणाद्वारे डेंग  झिओपेंग यांच्याकडून  हू जिंताओ यांच्याकडे सत्ता जाताना काय बदल झाले यावर आर्थिक सुधारणानाचे दुसरे पर्व या शीर्षकाखाली माहिती देण्यात आलेली आहे सातव्या भागात क्षी जिनपिंग" यांच्याकडे सत्ता कशी आली त्यांनी कोणकोणत्या सुधारणा केल्या याबाबत सांगण्यात आले आहे आठव्या भागात बदलत्या आर्थिक समीकरणात चीनच्या परराष्ट्र धोरणात काय बदल;झाले याबाबत

महत्वकांक्षी चीन या शीर्षकाखाली आढावा घेण्यात आला आहे शेवटच्या ९ व्या भागात भारत चीन संबंध कसे आहेत ?त्यामध्ये काय बदल होणे भारताला उत्तम ठरेल याबाबत तसे चीनची भविष्यतील वाटचाल कशी असेल याबाबत सांगण्यात आले आहे

       हार्ड बाउंड कव्हर असेले चीनचा रंग म्हणून विख्यात असणाऱ्या  लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर  डेंग  झिओपेंग  आणि क्षी जिनपिंग" यांच्या फोटो असलेले मुखपृष्ठ बघता क्षणी आपले लक्ष वेधून घेते ५०० रुपयाचा या पुस्तकात मलपृष्ठावर पुस्तकाची थोडक्यात ओळख करून देण्यात आलेली आहे इंग्रजीत या विषयावर लिहलेली अनेक पुस्तके ताहेत मात्र आपल्या मातृभाषा असलेल्या मराठीत या विषयावर माहितीपूर्ण असणाऱ्या पुस्तकाची मोठ्या प्रमाणात वानवा आहे हि अडचण हे पुस्तक मोठ्या प्रमाणात कमी करते मग वाचणार ना हे पुस्तक 

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...