शनिवार, १६ मे, २०२०

कश्यासाठी वाचनासाठी

 

कालचीच गोष्ट आहे, मी सहजच टीव्हीवर सर्फिंग करत असताना लोकसभा टीव्ही या वाहिनीवर एक साहित्यिकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम दिसला , अन मनात विचार आला, टीव्हीसारख्या ताकदवान माध्यमांचा साहित्यप्रसार अश्या गोष्टीसाठी वापर फक्त सरकारी मालकीच्या वाहिन्यांनीच का करावा ? नाही म्हणायला  नेटवर्क 18लोकमत या वाहिनीवर सुमारे पाच वर्षांपूर्वी दर रविवारी साहित्यीकांचा मुलाखतीचा कार्यक्रम लागत असे . (त्यावेळी या वाहिनीचे नाव आय बी एन लोकमत होते ) मात्र सध्या तो कार्यक्रम बंद आहे   त्यामुळे माझ्या

माहितीत लोकसभा टीव्हीवरील सदर कार्यक्रम वगळता , पुस्तके आणि साहित्यिकांचा बाबत दुसरा कार्यक्रम नाही . जर असेल तो या पोस्टच्या खाली सांगावा ?  त्याचप्रमाणे डीडी नॅशनलवर 'किताबनामा हा कार्यक्रम प्रकशित होत असे मात्र ते देखील सरकारी मालकीचेच ठरते ना  .

                                     विविध वृत्तपत्रातून आणि काही  नियतकालिकांमधून  नवीन प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची माहिती येते .मराठीतील तुरळक अशी फक्त याचसाठी प्रकाशित होणारी काही नियतकालिके मला माहिती आहेत . आणि अशी नियतकालिके मला नाशिकमध्ये दिसत नाही . पुण्यामध्ये काही प्रमाणात

दिसतात . मात्र प्रिंट माध्यमांपेक्षा अधिक बलशाली असणाऱ्या  इलेट्रीक चॅनेलवर मात्र या बाबाबत अनास्थाच जास्त दिसतेय . कोणतेही माध्यम हे आर्थिक बाजूच्या विचार करूनच चालवले जात असले तरी कोणत्याही टीव्ही चॅनेलला यात रस वाटू नये ? हे आपले दुर्दैव नाही का ?

                 नाही म्हणायला चित्र फारच वाईट नाही , फेसबुक , व्हाट्सअप आधी समाजमाध्यांव्दारे पुस्तकांबाबत चर्चा केली जाते . स्टोरी टेल , प्रतिलिपी सारखी अँप यासाठी आहेत .  मात्र याला काही प्रमाणात मर्यादा आहेत . इलेट्रीक वाहिन्यांसारखी याला सहजता नाही . त्यामुळे या सर्व माध्यमांमुळे जरी काही प्रमाणात पुस्तकांचा परिचय होत असला तरी  इलेट्रीक वाहिन्यांचे  अपयश लपत नाही . काही म्हणतील

सरकारी वाहिन्यांवरील का होईना पुस्तकाविषयी कार्यक्रम आहेना ? मला  त्यांना विचारायचे आहे ? या सरकारी चॅनेलची दर्शक संख्या किती ? किती जण त्या वाहिन्या बघतात .? मराठी दिन, जागतिक पुस्तक दिन अश्या

मोजक्या दिवशी पुस्तकांविषयी बोलता , जर इलेट्रीक चॅनेलवर कायस्वरूपी पुस्तकाविषयी कार्यक्रम झाल्यास सोन्याहून पिवळे ठरेल हेच खरे ! ते करण्याची सुबुद्धी लवकरात लवकर इलेट्रीक माध्यांना  येवो अशी सदिच्छा व्यक्त करून सध्या पुरते थांबतो , नमस्कार .

रविवार, ३ मे, २०२०

ओळख एका वन कथा संग्रहाची

   मारुती चितमपल्ली....... पेशाने वनखात्यात वरिष्ठ पदावर कार्यरत असणारे मराठीतील नामवंत साहित्यिक . अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्याक्ष . जंगले आणि त्यातील समाजजवीन तसेच  प्राणीजीवनावर आधारित साहित्य जगविख्यात आहेत . त्यांच्या \प्रसिद्ध असणाऱ्या साहित्यामध्ये "केशराचा पाऊस " या कथासंग्रहाचा बराच वरचा क्रमांक लागतो . सध्याच्या लोकडाऊनच्या काळात मी ते पुस्तक   नुकतेच वाचले .

            पुस्तकात त्यांच्या नोकरीच्या कार्यकाळाळतील आठवणी कथारूपाने सांगण्यात आलेल्या आहेत . पुस्तकात 16कथा असून पहिल्या दोन कथांमध्ये अनेक प्रकरणे आहेतपुस्तकाची भाषा संवादी असल्याने पुस्तक जरी माहितीविषयी असले तरी पुस्तक वाचणे कंटाळवाणे होता ज्याला  ज्ञानवर्धक (  INFOTAINMENT ) म्हणता येईल असे झाले आहे .सदर पुस्तकामध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख माधव असा केला असून . या कथासंग्रहातील कथांमध्ये सुरवातीच्या 9 कथांमध्ये नायका बरोबर त्याची नायिका "सुमित्रा  यांच्या भावविश्वाचा आधार घेत लेखक मेळघाटातील वनांची तेथील प्राण्यांची वैशिष्ट्ये अलगदपणे उलगडली आहेत , ज्यामध्ये अस्वलाशी कसे वागावे ? मेळघाटातील आदिवासी जनतेचे

जीवन कॊणत्या प्रकारचे आहे ? तेथील वनस्पती जीवन कोणत्या प्रकारचे आहे ? भारतातील वन खात्यातील अधिकाऱ्यांचे जीवन कसे असते ?जंगलात कसे वागावे ? जर जंगलात काही अडचण आल्यास त्यास कोणत्या प्रकारे तोंड देता येऊ शकतेआदी मुद्यांशी आपली ओळख होते   पुस्तकाच्या 10ते 16 क्रमांकाच्या कथा या कोणत्याही एका नायका अथवा नायिका भोवती गुंफलेल्या नाहीत . या कथांमध्ये प्रत्येक कथाच नायक वेगळा आहे . काही कथांमध्ये तर नायिकेचा उल्लेख देखील करण्यात  आलेला नाहीये . पहिल्या भागाच्या तुलनेत या भागातील कथा काहिस्या कंटाळवाण्या वाटतात . मात्र पहिल्यादाच सांगितल्याप्रमाणे संबंध पुस्तकातील भाषा संवादी असल्याने पुस्तकाची रंजकता कमी होत नाही . या कथांमध्ये मेळघाट परिसरातील आदिवासींच्या खाद्य संस्कृती , तसेच वनाधिकाऱ्याचे कार्य अधिक पहिल्या भागापेक्षा  विस्तुतपणे सांगितले आहे . तसेच मेळघाटच्या आदिवासी भागातील विविध लोककथा , समजुतीवर भाष्य करण्यात आले आहे .  दोनशे पानाच्या या पुस्तकात असणाऱ्या सर्वच कथा या ज्ञान देणाऱ्या आहेत . काही कथांमध्ये विविध तत्वज्ञानाची चर्चा देखील करण्यात आली आहे . एकंदरीत सदर पुस्तक किमान एकदा तरी वाचावे या सदरामध्ये मोडणारे आहे . तर मग वाचताय ना हे पुस्तक मिळवून

 

 

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...