शुक्रवार, ३१ मार्च, २०२३

वर्तमान जागतिक राजकारणाचे पैलू उलगडणारे पुस्तक ; तेल नावाचे वर्तमान

 एखाद्या व्यक्तीची एखाया विषयावरची मते आपणास पटली नाहीत ,म्हणून त्या व्यक्तीच्या सर्वच कामाकडे कानाडोळा कारणे तसे चुकीचेच .समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे "उत्तमाची ते घ्यावे, मिळमिळीत ते टाकुनी द्यावे हे वचन याबाबत अमलात आणले तर आपला फायद्याचं असतो . ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुमार यांना हे वचन चपखल लागू होते त्यांची देशातील\राजकारणाविषयीची  मते काहीही असो ते  क्षणभर बाजूला ठेवत बघितले तर  त्यांच्या आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नैसर्गिक इंधनाच्या विषयातील हुकूमत नाकारता येणे अवघडच .  या विषयावर त्यांनी चार पुस्तके लिहली आहेत ती म्हणजे हा "तेल नावाचा इतिहास आहे. एका तेलियाने  अधर्म युद्ध आणि तेल नावाचे वर्तनमान. या पुस्तकातील तेल नावाचे वतर्मान हे पुस्तक मी नुकतंचसार्वजनिक वाचनायलाय  नाशिक यांच्यासहकार्याने  वाचले  (त्यातील हा "तेल नावाचा इतिहासआहे   .आणि  एका तेलियाने हि पुस्तके मी या आधीच  वाचली आहेत ज्यांना त्याविषयी जाणून घेयचे असेल त्यांनी या लेखाच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे )  

      सुमारे सव्वा दोनशे पानाच्या या पुस्तकात तेरा प्रकरणाद्वारे या पुस्तकात तेल आणि सध्याच्या जागतिक राजकारणाची माहिती दिली आहे दक्षिण मलेरिकेतील व्हेनिझुला या देशातील आणि अमेरिकेचे संबंध कोणत्या कारणामुळे खराब झाले? तेल किमतीतील चढउताराराचा आपल्या देशातील राजकारणावर कशा फरक पडला ?इस्लामिक स्टेट ऑफइराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेची निर्मिती होण्यामागची पार्श्वभूमी काय होती ?अन्य दहशतव्वदी संघटनेच्या तुलनेत ती अधिक धोकादायक कशी ? २०११ साली झालेल्या अरब स्प्रिंग मागे
तेलाच्या राजकारणाची काय भूमिका होती ? आफ्रिका खंडातील तेल उत्पादक देशातील दहशत्वादला साह्य ठरतील अश्या राजकीय घटना कोणत्या ? पश्चिम आशियाई देशांच्या तेल विषयक काहीश्या मनमानी कारभाराला छाप बसावा या ससाठी भारत आणि अमेरिकेने काय उपाययोजना केल्या या तेल विषयक घडामोडींसह भविष्यात इलेट्रीक वाहने आल्यावर ते राजकारणे कसे बदलू शकते / इलेट्रीक वाहन निर्मितीचा काय इतिहास आहे याबाबत पुस्तकामध्ये आपणास मिळते 
       पुस्तकाची भाषा अत्यंत सोपी असल्याने पुस्तक सहजतेने समजते पुस्तक कुठेही कंटाळवाणे बोजड होत नाही लेखाच्या ओघात ज्यांचे नामउल्लेख आलेले आहेत  त्यांच्या फोटो वापरला असल्याने फक्त मजकुराचीच भारंभार भरती असल्यावर लेखाला येणारा बोजडपणा कुठेही जाणवत नाही पुस्तकासाठी वापरलेली फॉन्टसाईझ देखील उत्तम आहे त्यामुळे डोळ्यांवर विशेष ताण येत नाही त्यामुळे पुस्तक वाचनाची रंजकता वाढते 
           आपल्या मराठीत सध्या अनेक विषयावरची   नवनवीन पुस्तके येत आहेत ज्यामुळे मराठी समृद्ध होत आहे  हे नक्की मात्र या जागतिक राजकारण आणि त्याचा केंद्रबिंदू असलेल्या ऊर्जासाधनाची मालकी या
विषयवरची पुस्तके काहीशी कमीच आहे हि उणीव हे पुस्तक काही अंशी भरून काढते गिरीज कुबेराचा भारतीय राजकारांविषयीचा दृष्टिकोन काहीसा संजमान्यतेच्या विरोधात जात असला तरी तो क्षणभर बाजूला ठेवत हे पुस्तक वाचल्यास आपणस नवीन माहिती नक्कीच मिळू शकेल याबाबत खात्री बाळगा मग वाचतायना हे पुस्तक 
( हा "तेल नावाचा इतिहास आहे  .आणि  एका तेलियाने या  पुस्तकाविषयी मी आधी लिल्ल्या लेखाविषयी जाणून घेण्यासासाठी पुढील लिंकवर क्लीक करा )

https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2018/12/blog-post.html 

शुक्रवार, २४ मार्च, २०२३

तंत्रज्ञानाची अत पासून इती पर्यंत माहिती देणारे पुस्तक इन्फोटेक

               
सध्याचे आपले संपूर्ण विश्व हे तंत्रज्ञाने व्यापलेले आहे हे कोणीही मान्यच करेल आपल्यास तंत्रज्ञाने निर्मण केलेले उपकरण वापरतना त्यामागील तांत्रिक बाजूचे ज्ञान नसले तरी फारसे बिघतड नाही मात्र ते तांत्रीक ज्ञान समजल्यावर होणारा  आंनद काय तो वर्णावा . मात्र ते ज्ञान इंग्रजीत असल्याने अनेकजण त्यापासून मुकतात . बरे या माहितीचा  मराठी अनुवाद वाचून या संकल्पना समजून घ्याव्यात तर मूळच्या इंगजी भाषेतील मात्र रोजच्या दैनंदिन जीवनात वापरताना सहजतेने वापरल्या जाणाऱ्या संकल्पनेचे संस्कृतच्या प्रभावाखालील भाषांतर वाचून मुळात अवघड नसलेला विषय अवघड झाल्याने समजत नाही त्यामुळे अनेकजण ज्ञानाचा आनंदाला पारखे होतात.  हीच बाब लक्षात घेऊन या संकल्पना मराठी भाषिकांना सहजतेने समजावा या उद्देश्याने  मूळच्या इंगजी भाषेतील संकल्पना तसाच ठेवत संकल्पनेतील आशय मराठीत मांडणारे लेखक म्हणजे अच्युत गोडबोले . अच्युत गोडबोले यांनी मानसशात्र, अर्थशास्त्र, बायोलॉजी नॅनोशास्त्र ,फिजिक्स  ,वेस्टन म्युझिक , आदी विविध विषयांची माहिती सोप्या मराठी भाषेत जवळपास २९ पुस्तके लिहली आहेत यातीलच एक पुस्तक म्हणजे त्यांनी इन्फॉर्मनशन टेक्नॉलॉजी या विषयाची माहिती देणारे इन्फोटेक हे पुस्तक 
                      नाशिक जिल्ह्यातील घोटी या गावचे मूळ प्रकाशन असलेलय मधुश्री प्रकाशनतर्फे प्रकाशित हे पुस्तक आपणास इन्फॉर्मनशन टेक्नॉलॉजी च्या विविध गोष्टींची अत्यंत सोप्या भाषेत ज्यांचे आठवावीपर्यंत शिक्षण झाले आहे अश्या व्यक्तीला देखील समजले अश्या भाषेत अत्यंत सविस्तर माहिती देते . मराठीत ब्लॉकचेन सारख्या तांत्रिक विषयाची माहिती  देणारे पुस्तक असो किंवा ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या द फ्री व्हाईस या अत्यंत गाजलेल्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणारे पुस्तक अश्या नवनवीन विषयावरची माहितीपूर्ण पुस्तके प्रसिद्ध करणारे प्रकाशन म्हणून घोटीचे मधुश्री प्रकाशन ओळखले जाते त्यांची हीच परंपरा हे पुस्तक पुढे नेते ४८८ पानाच्या या पुस्तकात ९ भागामध्ये आपणास इन्फॉर्मनशन टेक्नॉलॉजी या विषयाच्या विविध घटकांची सविस्तर म्हणता येईल अशी ओळख होते या पुस्तकाच्या प्रत्येक भागाची विभागणी विविध प्रकरणामध्ये करण्यात आलेली आहे त्याद्वारे
लेखकाने ही माहिती आपल्यासमोर मांडली आहे नाशिकमधील महत्वाची अग्रगण्य साहित्यिक संस्था असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना ) च्या पुस्तक संस्ग्रहातून मी हे पुस्तक मी नुकतेच वाचले 
                ९ घटाकांमध्ये विभागलेल्या या पुस्तकातील पहिला घटक डेटा या विषयाबाबत माहिती देतो या घटकामध्ये सहा प्रकरणामध्ये बिट्स आणि बाइट्स म्हणजे काय आपण सहजतेने म्हणतो कि कम्प्युटरला फक शून्य आणि एकची भाषा समजते ते नक्की काय असते  मल्टिमीडिया  डेटा कॉम्प्रेशन -एन्क्रिशन . डीएमएस  एफएमएस तसेच डीबीएमएस या सारख्या डेटा मॅनेजमेंट सिस्टीम , डेटा मायनिंग आणि डेटा वेअर  हाऊस बिग डेटा आदी विषयी माहिती मिळते दुसऱ्या घटकाचे नाव जीपीएस गूगल मॅप्स जी आय एस हे आहे यामध्ये ४ प्रकरणाद्वारे सॅटेलाईट्स जिओग्राफ़िकल पोझीशनींग सिस्टीम अर्थात (जीपीएस ० गूगल मॅप्स आणि जी आय एस गूगल स्ट्रीट व्ह्यू , गूगल अर्थ याविषयी महती मिळते ४ प्रकणात विभागलेल्या सेन्सर्स IOT , IIOT असे नाव असलेल्या तिसऱ्या प्रकरणात बारकोडस एनएफसी  आणि रिमोट सेन्सिंग इंटरनेट ऑफ थिंग्स , सेन्सर्स आणि एंबेडेड सिस्टीम आदींची माहिती देण्यात आली आहे इतर महत्वाची तंत्र असे नाव असलेलय चवथ्या घटकात ६ प्रकरणाद्वारे ब्लॉकचें बिटकॉइन ३ डी प्रिंटींग , व्हर्चुएल रियालिटी , क्लाउड काम्पुटिंग गूगलग्लास आणि अंगमेन्डेतड रियालिटी आदींची तर नेटवर्किंग आणि इंटनेट या विषयीच्या विविध गोष्टींची माहिती आपणस पाचव्या घटकामध्ये मिळते सध्यासगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या मोबाईलच्या विषयी त्याच्या इतिहास , फ्रिक्वेन्सी रियुज जीपीएस आणि सीडीएम .एस एमएसएस ,जनरेशन्स आणि
कॉन्ह्र्जन या घटकाच्या आधारे माहिती सहाव्या भगत तीन प्रकरणाद्वारे मिळते  सध्या खूप चर्चेत असलेल्या अर्टिफीशियल इंटेलनजन्स या घटकाची माहिती आपणास ४ प्रकरणाद्वारे होते ती सातव्या घटकांमधून भविष्याचे तंत्रज्ञान असे नाव असलेल्या आठव्या भागात इंडस्ट्री ४ पाईंट ओ , बायो कम्प्युटर नॅनो कम्प्युटर क्वांटम कॉम्पुटर आदीची ओळख आपणस होते नववे प्रकरण आधीच्या तुलनेत बरेच किचकट असून यामध्ये पहिल्या प्रकरणात सांगितलेल्या बाईविषयी सविस्तर सर्व तांत्रिक बाबीचा समावेश करत माहिती देण्यात आली आहे 
      सध्या अनेकदा ऐकू येणारी बँडविथ ही संकल्पना मुळात काय आहे ईमेलचे कार्य कोणत्या कार्यपद्धतीवर चालते नेटवर्क टोपोलॉजीज म्हणजे काय ?नेटवर्क ट्रान्समिशनच्या पद्धती कोणत्या आहेत ? आदी संस्ख्या अनेक बाबींची ओळख आपणस हे पुस्तक वाचल्यावर होतेआपण इंटरनेटवर अनेकदा डेटा एककीकडून दुसरीकडे नेताना फाईल कॉम्प्रेस करतो त्यावेळी फाईलवर प्रत्यक्षात काय प्रकीर्या होते हि कॉम्प्रेस फाईल मूळ रूपात येते म्हणजे नक्की काय प्रक्रिया होते हे करण्यामागची मुळातील संकल्पना काय आहे नेटफ्लिक्सह सारख्या कंपन्यांचे कार्य असे कसे विस्तारित गेले आदींची माहितीआपणास या पुस्तकाद्वारे मिळते  पुस्तकामध्ये निव्वळ शाब्दिक माहिती देण्यात आलेली नसून योग्य त्या ठिकाणी योग्य अश्या आकृत्या वापरून विषय अधिकाधिक सोपा करण्याच्या लेखकाने  प्रयत्न केल्याचे आपणस पुस्तक वाचताना पदोपदी जाणवते 
ज्यांना  इन्फॉर्मनशन टेक्नॉलॉजी या विषयाचा काहीच गंध नाही अश्या व्यक्तीला या विषयात बऱ्यापैकी साक्षर करण्याचे कार्य हे पुस्तक वाचल्यामुळे होते मग वाचताय ना हे पुस्कात 

शुक्रवार, १७ मार्च, २०२३

१८५७च्या जिहाद : स्वातंत्र्य समराची नव्या अंगाने मांडणी करणारे पुस्तक

एखाद्या घटनेकडे  बघायचे अनेक दृष्टिकोन असू शकतात जर घटना इतिहासातील असेल तर हि गुंतागुंत अधिकच वाढते त्यातही देशाच्या इतिहासावर परिणाम करणारी घटना असेल तर हे दृष्टिकोनाचे कंगोरे अजूनच वाढतात त्यातील सर्वच मोठ्या प्रमाणात समाजमान्य असतील असेही  दृष्टिनच्या बाबतीतसमर्थकांपेक्षा विरोधातकांची टीकाकारांचीच संख्या जास्त असन्यासाच्या देखील संभव असू शकतो  मात्र असे असले तरी त्या दृष्टिकोणाकडे दुर्लक्ष करणे योग्य नसते हाताची पाचही बोटे सारखी नसली तरी आपण त्यांच्या स्वीकार करतोचना त्या प्रकारे याही दृष्टिकोचा पण स्वीकार करायला हवा जरआपण तो स्वीकार केला तर आणि तरच आपण त्या इतिहासीक घटनेला पूर्णपणे न्याय देणारे ठरू अन्यथा नाही भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात तर याचे महत्व अजूनच वाढते अल्पमतातील असले तरी त्यांचे मत समजवून घेणे त्यास योग्य अश्या नैतिक मार्गाचा अवलंब करत विरोध कारे यालाच खरी लोकशाही म्हणतात हाच दृष्टिकोन मनात घेत मी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेच्या मदतीने १८५७ चा जिहाद हे पुस्तक वाचले

      आपल्या भारताच्या इतिहासाचा विचार केला असता १८५७चा उठाव याकडे भारताचे स्वातंत्र्ययुद्ध या दृश्ष्टिकोनातून बघणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे मी सुद्धा याच मताचा पुरस्कर्ता आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या देशप्रेमींचा प्रयत्नामुळे समाजात या घटनेचा तयार झालेल्या प्रतिमेच्या विरुद्ध मत मांडणाऱ्या या पुस्तकात १० प्रकरणे आणि एक परिशिष्ट यांच्या मदतीने याचा पूर्णतः विरुद्ध मतप्रदर्शन केले आहे ३७६

पानाच्या या पुस्तकात पानाच्या तळाशी दिलेल्या तळटीपा आपल्याला लेखकाने दिलेल्या माहितीला पूरक अशी माहिती देत लेखकाचा मुद्दा अखोरेखित करण्यास मदत्तच देतात ,पुस्तकात लेखकाने वेळोवेळी संदर्भ पुरवले आहेत संदर्भ कसे अभ्यासावे हे पुस्तकाच्या सुरवातीला स्पष्ट केले आहे पुस्तकाच्या शेवटी पानमध्ये १६० पुस्तकांची संदर्भ यादी दिली आहे

     पुस्तकाच्या १० प्रकारांममध्ये पाचवे प्रकरण पूर्ण आणि आठवे प्रकरणाचा अपवाद वगळता अन्य सर्व पुस्तकामध्ये १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध नसून एका विशिष्ट धर्मियांनी ब्रिटिशनमुळे गेलेले त्यांचे राज्य सिहासन पुन्हा मिळावे यासाठी छेडलेलेले धर्मयुद्ध होते याचे दाखले देण्यात आले आहे पाचव्या प्रकरणात १८५७ चा उठाव कश्या प्रकारे लढण्यात येऊन ब्रिटिशांनी तो कोणत्या प्रकारे मोडूनकाढला हे सांगितले आहे तर आठव्या प्रकरणात दक्षिण भारतात या स्वातंत्र्य समराचे काय प्रतिसाद उमटले हे सांगितले आहे या प्रकरणात काही प्रमाणत धार्मिक टीका कमी आढळते पहिल्या प्रकरणात प्रास्ताविक असून लेखकाने हा ग्रन्थ का लिहला ? त्यासाठी संदर्भ ग्रंथ कसे एकत्रित केले याविषयी विवेचन करण्यात आली आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणात १७५७ च्या प्लासीच्या लढाईपाससून धार्मिक चळवळीद्वारे उठावाची स्थिती कशी निर्माण करण्यात अली हे सांगितले आहे चवथ्या

प्रकरणात उठावाची तत्कलीन परिस्थी सांगण्यात आली आहे सहाव्या सातव्या आणि आठवाव्या प्रकरणात भारताच्या विविध भगत उठावाचे प्रेरक आणि लाभधारक कोण होते या विषयी विवेचन करण्यात आले आहे व्य प्रकरणात स्वातंत्र्य समरातविविध सत्ताधिकारी वर्गाकडून प्रसिद्ध करण्यात  आलेल्या फतव्याची माहिती देण्यात आली आहे शेवटच्या दहाव्या प्रकरणात त्यावेळची सामाजिक सौदार्ह्य कसे होते याविषयी सांगितले आहे

         एखादी गोष्ट आपणास नावडू शकते एखादी गोष्ट आवडू शकते नावडत्या गोष्टीचा विरोध देखील आपण करू शकतो त्यात व्वगे देखील काही नाही मात्र आपण ज्या गोष्टीचा विरोध करत आहोत तिचे आपणास किमान काही नाही तरी माहिती असणे आवश्यक आहे एखाद्या गोष्टीची काहीच माहिती नसताना तिचा ईरोध करणे गैर आहे शेषराव मोरे यांच्या या पुस्तकात मांडलेल्या निष्कर्षाशी आपण असहमत असाल म्हणून आपण त्यास विरोध करत असू तर त्या पुस्तकात नाकी काय लिहले आहे याची आपणस काही अंशी तरी माहिती असणे आवश्यक आहे त्यासाठी तरी आपण हे पुस्तक किमान एकदा तरी वाचायलाच हवे मग वाचताय ना हे पुसतक

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...