एखाद्या व्यक्तीची एखाया विषयावरची मते आपणास पटली नाहीत ,म्हणून त्या व्यक्तीच्या सर्वच कामाकडे कानाडोळा कारणे तसे चुकीचेच .समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे "उत्तमाची ते घ्यावे, मिळमिळीत ते टाकुनी द्यावे हे वचन याबाबत अमलात आणले तर आपला फायद्याचं असतो . ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुमार यांना हे वचन चपखल लागू होते त्यांची देशातील\राजकारणाविषयीची मते काहीही असो ते क्षणभर बाजूला ठेवत बघितले तर त्यांच्या आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नैसर्गिक इंधनाच्या विषयातील हुकूमत नाकारता येणे अवघडच . या विषयावर त्यांनी चार पुस्तके लिहली आहेत ती म्हणजे हा "तेल नावाचा इतिहास आहे. एका तेलियाने अधर्म युद्ध आणि तेल नावाचे वर्तनमान. या पुस्तकातील तेल नावाचे वतर्मान हे पुस्तक मी नुकतंचसार्वजनिक वाचनायलाय नाशिक यांच्यासहकार्याने वाचले (त्यातील हा "तेल नावाचा इतिहासआहे .आणि एका तेलियाने हि पुस्तके मी या आधीच वाचली आहेत ज्यांना त्याविषयी जाणून घेयचे असेल त्यांनी या लेखाच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे )
सुमारे सव्वा दोनशे पानाच्या या पुस्तकात तेरा प्रकरणाद्वारे या पुस्तकात तेल आणि सध्याच्या जागतिक राजकारणाची माहिती दिली आहे दक्षिण मलेरिकेतील व्हेनिझुला या देशातील आणि अमेरिकेचे संबंध कोणत्या कारणामुळे खराब झाले? तेल किमतीतील चढउताराराचा आपल्या देशातील राजकारणावर कशा फरक पडला ?इस्लामिक स्टेट ऑफइराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेची निर्मिती होण्यामागची पार्श्वभूमी काय होती ?अन्य दहशतव्वदी संघटनेच्या तुलनेत ती अधिक धोकादायक कशी ? २०११ साली झालेल्या अरब स्प्रिंग मागेतेलाच्या राजकारणाची काय भूमिका होती ? आफ्रिका खंडातील तेल उत्पादक देशातील दहशत्वादला साह्य ठरतील अश्या राजकीय घटना कोणत्या ? पश्चिम आशियाई देशांच्या तेल विषयक काहीश्या मनमानी कारभाराला छाप बसावा या ससाठी भारत आणि अमेरिकेने काय उपाययोजना केल्या या तेल विषयक घडामोडींसह भविष्यात इलेट्रीक वाहने आल्यावर ते राजकारणे कसे बदलू शकते / इलेट्रीक वाहन निर्मितीचा काय इतिहास आहे याबाबत पुस्तकामध्ये आपणास मिळते
पुस्तकाची भाषा अत्यंत सोपी असल्याने पुस्तक सहजतेने समजते पुस्तक कुठेही कंटाळवाणे बोजड होत नाही लेखाच्या ओघात ज्यांचे नामउल्लेख आलेले आहेत त्यांच्या फोटो वापरला असल्याने फक्त मजकुराचीच भारंभार भरती असल्यावर लेखाला येणारा बोजडपणा कुठेही जाणवत नाही पुस्तकासाठी वापरलेली फॉन्टसाईझ देखील उत्तम आहे त्यामुळे डोळ्यांवर विशेष ताण येत नाही त्यामुळे पुस्तक वाचनाची रंजकता वाढते
आपल्या मराठीत सध्या अनेक विषयावरची नवनवीन पुस्तके येत आहेत ज्यामुळे मराठी समृद्ध होत आहे हे नक्की मात्र या जागतिक राजकारण आणि त्याचा केंद्रबिंदू असलेल्या ऊर्जासाधनाची मालकी या विषयवरची पुस्तके काहीशी कमीच आहे हि उणीव हे पुस्तक काही अंशी भरून काढते गिरीज कुबेराचा भारतीय राजकारांविषयीचा दृष्टिकोन काहीसा संजमान्यतेच्या विरोधात जात असला तरी तो क्षणभर बाजूला ठेवत हे पुस्तक वाचल्यास आपणस नवीन माहिती नक्कीच मिळू शकेल याबाबत खात्री बाळगा मग वाचतायना हे पुस्तक
( हा "तेल नावाचा इतिहास आहे .आणि एका तेलियाने या पुस्तकाविषयी मी आधी लिल्ल्या लेखाविषयी जाणून घेण्यासासाठी पुढील लिंकवर क्लीक करा )
https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2018/12/blog-post.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा