सुमारे पावणे दोनशे पानांच्या या पुस्तकात ८प्रकरणाद्वारे अच्युत गोडबोले यांनी या विकारांची, हा विकार ज्या व्यक्तींना आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबियांची यामुळे काय होरपळ होते? तसेच स्वतः च्या मुलाला असणाऱ्या या विकारामुळे त्यांना कसे कष्ट सहन करावे लागले ?या विषयीची माहिती दिली आहे. या विकाराविषयीच्या माहितीत, मुळात हा विकार काय आहे? वैद्यकीय परिभाषेत यांचे वर्गीकरण कसे करतात? हा विकार का होतो? कोणकोणत्या प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींना हा विकार असल्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे, ती कितपत खरी असू शकते? सांस्कृतिक विश्वात ,या ऑटीझम विकारांचे चित्रण करण्यात आलेले आहे? हे संकट भविष्यात असे अक्राळविक्राळ स्वरुप धारण करु शकते? ऑटीझमवर कोणते आणि कस्या प्रकारचे उपचार केले जातात?हा विकार वयाच्या विविध टप्प्यांवर कोणती वळणे घेतो?अन्य मानसिक विकारापेक्षा हा विकार कसा वेगळा आहे? याबाबत कोणते गैरसमज आहेत? या गैरसमजाची वास्तविक स्थिती काय आहे ?ऑटीझमची सुरवातीची लक्षणे काय? ती वयाच्या कोणत्या टप्प्यावर दिसून येतात?भारतात आणि जगात ऑटीझमबाबत काय स्थिती आहे? ऑटीझमचे शिकार झालेल्या व्यक्ती कस्या प्रकारे वर्तन करतात,? कुटुंबियांनी आपल्या पाल्यास हा विकार आहे,हे कसे ओळखावे? ऑटीझमबाबत कोणत्या संस्था, व्यक्ती मदत करतात?
लेखनाची भाषा अच्युत गोडबोले यांच्या अन्य लेखनासारखीच सहजसोपी चटकन समजणारी आहे या सारखीच शास्त्रीय माहिती देणाऱ्या पुस्तकात आढळणारा मराठी परीभाषेचा वापर अच्युत गोडबोले यांचा या पुस्तकात देखील टाळला आहे. अच्युत गोडबोले यांनी समाजात रूढ झालेले मुळातील इंग्रजी शद्ब आपल्या लेखनात तसेच ठेवले आहेत, ज्यामुळे विषय चटकन समजतो.
आपण स्वतः एखाद्या समस्येने ग्रस्त नसलो भविष्यात देखील ग्रासणार नसू तरी देखील समाजातील दुःखाबाबत माहिती असणे हे निरोगी मानसिकतेचे लक्षण समजले जाते.त्यामुळे आपल्या निरोगी मानसिकतेसाठी आपण हे पुस्तक वाचायलाच हवे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा