सध्या आपल्या भारतात सर्वाधिक चर्चीला जाणारा विषय कोणता असेल ? याचा धांडोळा घेतला असता आपणास चीनमार्फत जगात पसरलेला कोरेंना व्हायरस याचा विचार करावाच लागतो . व्हॉटसपव्दारे या विषयी विविध प्रकारची माहिती सांगितली जात आहे . त्यात काही प्रमाणात खोटी माहिती देखील सांगण्यात येत आहे . या पार्श्वभूमीवर या विषयाची मराठीत शास्त्रीय स्वरूपाची माहिती देणारे लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर यांचे "युद्ध जीवांचे -जैविक आणि आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य आजार " या पुस्तकाचे महत्व अधिकच अधोरेखित होते . जैविक युद्ध आणि रासायनिक हल्ल्यासारख्या किचकट आणि काहीसा कंटाळवाणा विषय या पुस्तकामध्ये अत्यंत सहजसोप्या ओघवत्या भाषेत मांडला आहे . पुस्तकाची भाषा काहीही शास्त्रीय पार्श्वभूमी नसणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना समजेल अशी असल्याने पुस्तक खूपच रंजक झाले आहे .
पुस्तकाची बांधणी हार्ड बाउंड पध्द्तीने न करता पारंपरिक पद्धतीने केली आहे . पुस्तकाची रचना दोन भागात केलेली असून पहिल्या भागात सध्या सर्वांच्या कळीच्या मुद्दा झालेल्या जैविक हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे . ज्याचा सुरवातीला याचा इतिहास सांगितलं आहे ज्यामध्ये प्राचीन काळाच्या युरोपात पसरल्या एका अनामिक रोगाच्या साथीपासून सध्याच्या काळातील अँथ्रेक्स , सार्स आदी रोगांच्या आढावा घेण्यात आला आहे . जैविक हल्ल्याची संकल्पना ही आधुनिक संकल्पना नसून प्राचीन काळापासून ही संकल्पना अस्तित्वात असल्याचे आपणास या पुस्तकांद्वारे कळते . फक्त ही संकल्पना प्राचीन काली काहीशी विस्कळीत होती . तीला व्यवस्थित स्वरूप आधुनिक काळात देण्यात आले इतकाच तो काय फरक . प्राचीन काळी सुद्धा विविध जैविक हत्यारे वापरण्याचे प्रयोग झाले होते , या बाबत अनेक उदाहरणे या पुस्तकात देण्यात आलेली आहेत . जसे रोमन साम्राजाची विविध युद्धे . गिरीश कुबेर यांच्या या पुस्तकातीलबहुसंख्य उदाहरणे हि युरोप खंडातील किंवा प्राचीन चीनमधील आहेत . त्याच्यातही युरोपातील उद्धरणे संख्यने अधिक आहेत .भारत आणि जपान वगैरे भागात यावेळी काय घडत होते , याविषयी सादर पुस्तकाच्या या भागात काहीच सांगितले नाहीये . प्राचीन काळी संपूर्ण अमेरिका खंड आणि आफ्रिका खंडाचा उत्तर भाग वगळता इतर भाग जगाला माहिती नसल्याने त्या भागाचा प्रश्नच येत नाही . मात्र हान्याय भारत जपान आदी भागाला लावता येत नसल्याने या भागातील युद्धांचा समावेश करण्यात येईल पाहिजे होता असे मला वाटते .
पुस्तकाच्या
दुसऱ्या भागात विविध रासायनिक
शस्त्रांची माहिती देण्यात आली
आहे .ज्यामध्ये जमिनीचा
क्रूरकर्मा हिटलर यांनी या
रासायनिक शस्त्रांचा कसा, वापर केला
? याची
माहिती देण्याबरोबर सध्या पोलीस
दलांच्यामार्फत सहजतेने वापरात असलेला
अश्रूधूर या सारख्या
शास्त्रांची माहिती तर देण्यात
आली आहेच त्या
प्रमाणे अनेक प्राणघातक
शस्त्रांची माहिती देण्यात आली
आहे . या भागात
महाभारताचा उल्लेख करण्यात आला
आहे . लेखकाच्या मते
प्राचीन इतिहासात याचे फारसे
दाखले मिळत नाहीत सुरवात
झाल्यावर हा प्राणघातक
शस्त्रांचा वापर सुरु
झाला . लेखकाने या प्रकारचानरसंहारककशग्स्त्रांच्या
निर्मितीचे श्रेय पुन्हा एकदा
पाश्चात्य देशांना दिले आहे
, त्यातही याच्या निर्मितीचे पातक
प्रामुख्याने जर्मनीच्या माथी मारलें
आहे मात्र पुस्तक
खूपच माहितीपूर्ण झाले
आहे .
मराठीत अर्थशास्त्र , विज्ञानाच्या
संदर्भात शास्त्रीय माहिती देणारी
पुस्तके सध्या पूर्वीपेक्षा अधिक
संख्येने निघत आहे
. त्या पुस्तकांच्या मालिकेतील हे पुस्तक
त्याच्या भाषाशैलीमुळे खूपच
रंजक झाले आहे
. प्रत्येकाने हे पुस्तक
वाचायलाच हवे . गिरीश कुबेर त्यांच्या
संपादकीयेतून बहुसंख्य लोकांना न
रुचणारी मते मांडत
असले तरी
त्यांची राजकीय मते बाजूला
ठेवून खऱ्या ज्ञानावर
प्रेम करणाऱ्या व्यक्तीने
वाचावेच असे हे
पुस्तक आहे . मग कधी
घेताय पुस्तक वाचायला
.