लेखाचे विषय

बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४

मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणाऱ्या नॅनो टेक्नॉलॉजीची साविस्तर माहिती देणारे पुस्तक, 'नॅनोदय'

       
 आपल्या सर्वांचेच आयुष्य गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात बदलले आहेत १९९० ते २००० या दहा वर्षाच्या  आसपास जन्मलेल्या माझ्यासारख्याव्यक्तींचे  आयुष्य त्यांच्या पालकांपेक्षा पुर्णतः वेगळे ठरले  या बदलला या काळात अत्यंत झपाट्याने  झालेली  तंत्रज्ञनातील प्रगती असे ठराविक साच्याचे उत्तर देता येते असले तरी अधिक सविस्तरपणे आणि बिनचूकपाने उत्तर देयचे झाल्यास या मागे या मागे  नॅनो टेक्नॉलॉजी आणि आता आपल्या जीवनाच्या अविभाज्य भाग होऊ घातलेली कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिनयस ) यामुळे आपले जीवन मागच्या पिढीच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे हे नाकारून चालणार नाही .तंत्रज्ञानातील प्रगतीपेक्षा नॅनो टेक्नॉलॉजी  आणि कृत्रिम बुद्धिमत्ता(आर्टिफिशियल इंटेलिजिनयस )  या डाँग गोष्टीमुळे आपले जीवन मोठ्या प्रमाणात बदलले आहे त्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिनयस ) हे क्षेत्र अजूनही बाल्यावस्थेत आहे असे म्हण्टले तरी चालू शकते कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिनयस ) यामध्ये  भविष्यातअजून मोठ्या प्रमाणात प्रगती होऊन  आपण सध्या कल्पनाही करू शकणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात बदल घडतील हे नक्की तर नॅनो टेक्नॉलॉजी  हे क्षेत्र पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात स्थिरावले आहे.आज  नॅनो टेक्नॉलॉजीची या क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात संशोधन होत असले तरी त्याचे आकर्षण काहीसे कमी झाले आहे मात्र गेल्या काही वर्षात मानवी राहणीमानात काय बदल झाला हे अभ्यासण्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजीची मुळातून माहिती  आहे. आणि आपली ही  गरज पूर्ण होते ती, राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित  'नॅनोदय' या पुस्तकामुळे.  अच्युत गोडबोले यांनी डॉ. माधवी सरदेसाई यांची मदत घेऊन लिहलेले हे पुस्तक मी नुकतेच वाचले 
            'नॅनोदय'या पुस्तकामुळे आपणस आपणास  नॅनो टेक्नॉलॉजीचा इतिहास, त्यामागची तांत्रिक माहिती, आणि तिचा वापर कोणकोणत्या क्षेत्रात कोणत्या प्रकारे होत आहे आणि शास्त्रज्ञांच्या मते हे तंत्रज्ञान अजून कोणत्या प्रकारे वापरता येऊ शकते याविषयी रंजक माहिती मिळते अच्युत गोडबोले यांच्या अन्य माहितीविषयक पुस्तकात  असते त्याप्रमाणे या पुस्तकात देखील इंग्रजी संकल्पनाच वापरलेल्या आहेत अन्य शास्त्राविषयक
पुस्तकात जसे संकल्पना मराठीत स्पष्ट करताना संकल्पनांचे ओढून ताणून संस्कृतचा आधार घेत मराठीकरण केले असते त्याचा मागसुस देखील या पुस्तकात नाही व्यवहारात वापरण्यात येणारया इंग्रजी संकल्पनाच या मराठी भाषेतील पुस्तकात वापरल्या आहेत त्यामुळे पुस्तक सहजतेने समजते 
            सुमारे २७५ पानाच्या या पुस्तकात १५ प्रकरणाद्वारे नॅनो टेक्नॉलॉजी ही संकप्लना समजवून सांगताना लेखनाने या विकास केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी , या क्षेत्रात कोणत्या प्रकारे होते हे स्पष्ट केलेलं आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री या विज्ञानाच्या शाखेत नॅनो टेक्नॉलॉजी चा वापर कसा होतॊ हे सांगतान लेखकाने अणूची अंतर्गत  रचना, रेणूची अंतर्गत रचना, एखाद्या पदार्थातील अणूचे परस्परांमध्ये  असणारी  विविध बले आकर्षण तसेच क्वाटम मॅकेनझीम . या संकल्पना सविस्तरपणे स्पष्टतसे केल्या आहेत तसेच या संकल्पना आणि नॅनो टेक्नॉलॉजी याच्याही सहसंबंध सविस्तरपणे उलगडून सांगितला आहे . बायोलॉजी विषयी सांगताना त्यांनी सूक्ष्मजीवांच्या मानवी आयुष्यात असणारे महतव आणि त्यामुळे  होणारे नुकसान  नॅनो टेक्नॉलॉजीकसे टाळता येईल   तसेच क्लोन तंत्रज्ञानाचे फायदे तोटे आणि त्याच्या  नॅनो टेक्नॉलॉजीशी असणारा सहसंबंध  शस्त्रकियेमध्ये होणारे चांगले बदल ,शेतीत कोणत्या प्रकारे चांगली पिके घेता येतील या विषयी सांगितले आहे  नॅनो टेक्नॉलॉजीमुळे होणाऱ्या बदलात अच्युत गोडबोले यांनी औद्योगिक उत्पादनात काय बदल
होतील यावर प्रकाश टाकताना रोबोनॅनोटिक्स  ही संकल्पना पुस्तकाची सुमारे १० पाने खर्च करून सविस्तर सांगितली आहे   नॅनो टेक्नॉलॉजीमुले माहिती आणि दूरसंचार क्षेत्र पूर्णतः बदलून जाईल  देखील शकणार नाही असे बदल या क्षेत्रात होतील असे अच्युत  या पुस्तकात  सांगितले आहे त्यासाठी पुस्तकातील २० पाने खर्च करण्यात आलेली आहे पुस्तकातील सुरवातीचा एक त्रितीयांश भाग अर्थात ८० पाने लेखकाने  नॅनो टेक्नॉलॉजीच्या इतिहासावर सांगितला आहे यामध्ये लोक  तंत्रज्ञान वापरत होते का ? असल्यास कोणत्या पद्धतीने वापरत असतील तसेच १९९० पर्यंत  नॅनो टेक्नॉलॉजी या क्षेत्रात काय संशोधन झाले याविषयी सांगितले आहे 
           सध्या सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी बोलले जात असले तरी  नॅनो टेक्नॉलॉजीमुळे आपल्या  आमूलार्ग बदल झाला आहे त्यामुळे तंत्रज्ञान आपणास माहिती असल्यास सोन्याहून पिवळे आपण जी गोष्ट वापरतो त्यातील मूलभू समजणे ती गोष्ट वापरण्यास आवश्यक नसले तरी तो आनंद अवर्णनीयच त्यासाठी  तरी हे पुस्तक वाचणे आवश्यक 
 

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

एका दुर्देवी प्रेम त्रिकोणाचा समग्र वेध घेणारे पुस्तक ' व्यस्त ओढीचा त्रिकोण'

       

  आपल्या बॉलिवूडमध्ये अनेक प्रेम कहाण्या प्रसिद्ध आहेत. यातील काही कहाण्या या आनंदायी आहेत . तर काही प्रेम कहाण्यांना मात्र दुर्दैवाची कारुण्याची छाया आहे . या दुःखाची पार्श्वभूमी असलेल्या प्रेम कहाण्यांमध्ये अग्रक्रमामाने नाव येते ते , गुरुदत्त  गीता दत्त आणि वहिदा रेहमान. या जोडीचे . एकीवर नितांत प्रेम असून देखील व्यावसायिक कारणास्तव  जवळ आलेल्या  एका दुसऱ्या व्यक्तिमत्वामुळे अक्षरशः कोंडीत सापडलेल्या गुरुदत्त यांचा या दुर्दवी मृत्यू  या प्रेम कहाणीत झाला . त्यांच्या मृत्यूमुळे आपण एका प्रतिभावंत, कामाप्रती अत्यंत निष्ठावान असेलेल्या, प्रयोगशील,  मात्र मनस्वी हळव्या अश्या अत्यंत हुशार असलेल्या एका ससिने अभिनेत्यासह सिने दिग्दर्शक सिने निर्मेत्यास सिने दिग्दर्शकास आपण तयां अकाली गमावलं . आपल्या बॉलीववूडची खूप मोठ्या प्रमाणात हानी यामुळे झाली त्यांचे एक्ली निधन झाले नसते तर आपण आतापर्यंत आपल्यापासून दूर असलेली ऑस्करची बाहुली अनेकदा पटकावली असती याबाबत कोणाशी शंका नसावी .  गुरुदत्त यांच्या या अकाली जाण्याविषयी अनेकदा अनेक माध्यमात आणि अनेक भाषेत लेखन प्रसिद्ध झाले आहे मात्र तरीदेखील लोक त्यांच्या मृत्यूस ६० वर्षे झाली तरी अजूनही लिहीत आहेत . यातच त्यांचे थोरपण दिसून येते त्यांचा या अकाली जाण्याविषयीच लिहलेले एक पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील महत्वाची सांस्कृतिक संस्ख्या असेलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशियक यांच्य सहकार्याने वाचले . 

 'व्यस्त ओढीचा त्रिकोण या प्रतीक प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि कृ, दा. परांजपे लिखित या सुमारे १५० पानी पुस्तकात १० प्रकरणाद्वारे या दुर्दवी घटनेचा सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे यातील पहिल्या ५ प्रकरणात गुरुदत्त यांची चित्रपट सृष्टीतील कारकीर्द कॊणत्या प्रकारे बहरात गेली. याचा सविस्तर आढावा घेण्यात अली या आढाव्यात त्यांची वहिदा रेहमान यांच्याशी कोणत्या प्रकारे ओळख झाली हे सांगण्यात आले आहे तर शेवटच्या पाच प्रकरणात मोठ्या प्रमाणात वहिदा रेहमान यांच्यामुळे गुरु दत्त आणि गीता दत्त यांच्यात तणावाचे प्रसंग येऊ लागले त्याला गीता दत्त आणि गुरुदत्त वहिदा रेहमान यांच्या जवळपासच्या व्यक्तीमुळे कसे प्रकारे खतपाणी मिळाले याविषयी सविस्तरपणे सांगण्यात आले आहे पुस्तकाचे शीर्षक असलेल्या विषयाबाबत अर्थात गुरुदत्त गीता दत्तआणि वहिदा रहेमान यांच्यातील वादाबाबात भाष्य करताना लेखकांनी   पुस्तकाची ६० %जागा व्यापली   आहेतर ४० % जागा गुरुदत्त यांचा एकूण चित्रपट सृष्टीतील प्रवाश्यावर भाष्य करणारी आहे  

पिवळ्या  रंगाचे मुखपृष्ठअसलेल्या या पुस्तकावर असलेले गुरुदत्त गीता दत्त आणि वहिदा रहमान याचे कृष्णधवल फोटो आपले लक्ष चटकन वेधून घेतात, आणि ज्यांना या विषयाचे थोडीतरी पार्श्वभूमी असलेल्या ,माझ्यासारख्या अनेकाना वाचायला प्रवृत्त करताच .या पुस्तकात शेवटच्या पाच प्रकरणात गुरुदत्त  यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाच्याद्वारे गुरुदत्त आणि वहिदा रहेमान हे एकत्र येत आहे असा गैरसमज गीता दत्त यांच्यात कसा बळकावला तो दूर कारण्यासासाठी गुरुदत्त यांनी काय काय प्रयत्न  केले  याविषयी माहिती देण्यात आला आहे पुस्तकाच्या मलपृष्ठावर आणि सुरवातीच्या प्रास्ताविकेत कादंबरी असा उललके असला तरी हे पुस्तक कोणत्याच प्रकारे कादंबरी असे वाटत नाही तर अत्यंत सोप्या भाषेत  अनेक तांत्रिक गोष्टीला बगल देत ज्यांना या विषयाची काहीच माहिती नाही सध्या सर्वसामान्य व्यक्तींना या विषयाची माहिती देणारे

पुस्तक म्हणून या कडे बघावे लागेल मी जेव्हा हे पुस्तक हातात घेतले तेव्हा हा कादंबरी हा उल्लेख वाचला तेव्हा मला गो . नि . दांडेकर यांनी लिहलेल्या समर्थ रामदास स्वामी यांच्या 'दास डोंगरी राहतो ' या गोष्टीवेल्हाळ चरित्रासारखे हे पुस्तक असेल असे वाटले होते मात्र हे पुस्तक त्या प्रकारचे बिलकुल नाही गोष्टीवेल्हाळ पणा या पुस्तकात मला औषधाला अगदी १ % देखील आढळला नाही या पुस्तकात संपूर्णपणे गुरुदत्तचा उल्लेख एकेरी तो गुरुदत्त या प्रमाणे केलेला असला तरी त्यामुळे हे पुस्तक कादंबरी प्रकारात मोडता येऊ शकत नाही सुरवातीलाच्या एक दोन प्रकारात आपणस लेखन कादंबरीप्रमाणे काहीसे वाटते मात्र त्यानंतरच्या प्रकारांमध्ये हे पुस्तक पूर्णतः माहितीप्रधान लेखाचे स्वरूप घेते 

आपणास या घटनेची संपूर्ण माहिती असली तरी हि माहिती किती सहजतेने सांगता येऊ शकते या साठी किना ज्यांना या विषयी काहीही माहिती नाही त्यांना या विषयाची टॉड ओळख होण्यासाठी आपण सर्वांनी किमान एकादफा तरी हे पुस्तक वाचायलाच 

 

रविवार, २७ ऑक्टोबर, २०२४

जपानच्या कार्यसंस्कृतीतून देशाची ओळख करून देणारे पुस्तक 'जपान'

             
      जेव्हा आपण कोणतेही कारण असो आपला प्रदेश सोडुन दुसऱ्या देशात जातो,तेव्हा नवीन प्रदेश आपल्याशी विविध प्रकारे संवाद साधत असतो.तेथील पर्यटनस्थळे आपण ज्या प्रदेशात आलोय,त्या प्रदेशाचा ऐतिहासिक वारसा तसेच त्या प्रदेशावर निसर्गाने केलेली उधळण सांगत असतात, तर आपल्या वास्तवात आपल्या ज्या लोकांशी संपर्क येतो ते लोक त्या लोकांची परदेशी लोकांविषयीची भावना, तेथील कार्यसंस्कृती, तेथील समाजजीवनातील व्यक्तींचे स्थान, त्यांची स्वत:च्या प्रदेशाविषयीची भावना तसेच दुसऱ्या ज्या प्रदेशातून आपण आलेलो असतो,त्या प्रदेशाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता याविषयी माहिती देत असतात.या संवादातून आपणास त्या प्रदेशाची मोठ्या प्रमाणात माहिती मिळते.या माहितीमुळे आपले त्या प्रदेशाशी आपली नाळ देखील जोडली जावू शकते असी नाळ जोडली गेल्यास आपण सातत्याने त्या प्रदेशात जावू इच्छितो,तेथील लोकांशी आपली मैत्री देखील होते. आपण दुसऱ्या प्रदेशात गेल्यावर आपणास आलेले अनुभव जर लिहुन प्रसिद्ध केले तर आपले अनुभव वाचून इतर लोकसुद्धा त्या प्रदेशाविषयी माहिती करुन घेवू शकतात.त्यामुळे प्रवासवर्णने अत्यंत महत्ताची ठरतात.आपल्या मराठीत पु.ल.देशपांडे यांची प्रवासवर्णने अत्यंत प्रसिद्ध आहेत.सध्याचा काळात मीना प्रभू यांनी लिहलेली प्रवासवर्णने विशेष प्रसिद्ध आहेत.याच प्रवासमालिकेत समाविष्ट होवू शकेल असे प्रवासवर्णन मी नुकतेच सार्वजनिक वाचानावल नाशिक या नाशिकमधील सर्वात जून्या सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित संस्थेच्या सहकार्याने वाचले.
                          अविनाश भिडे यांनी त्यांच्या सुमारे पाच ते सहा महिन्याचा जपानच्या वास्तव्यात  जपानची जी कार्यसंस्कृती अनुभवली त्याचे शब्दरूप म्हणजे मी वाचलेले हे पुस्तक होय. व्यवसायाने इंजिनियर आणि एका  मेकॅनिकल कंपनीत उच्चपदस्थ असलेले, अविनाश भिडे हे भारतात कार्यरत असणाऱ्या, आपल्या कंपनीत बसवण्यात येणाऱ्या, एका यंत्राचे तांत्रीक प्रशिक्षण घेण्यासाठी, क्योटो मशिन कंपनीत गेले होते.त्यावेळी त्यांनी जपानची कार्यसंस्कृती जवळून अनुभवली. आपण अनुभवलेली जपानची संस्कृती त्यांना इतरांनी देखील अनुभवावी,असे वाटले.त्यामुळे त्यांनी आपले अनुभव पुस्तकरुपाने प्रसिद्ध केले.तेच हे सुमारे २००पानांचे पुस्तक. या पुस्तकाचे प्रकाशन सुकृत प्रकाशन करण्यात आलेले आहे.

                सुमारे २०० पानाच्या या पुस्तकात ५७ विविध प्रकरणातून लेखकाने आपले वैयक्तिक अनुभव मांडले आहेत. या पुस्तकातून आपणास जपानी लोकांची आपल्या कार्याप्रती असलेली आत्मियता, त्यांची देशाप्रती असणारी निष्ठा, देशाचे अतिप्रगत तंत्रज्ञान, तेथील सामाजिक समरसता, परदेशी लोकांप्रती विशेषत: भारतीयांबाबत असणारी आपुलकी अस्या विविध गोष्टीची माहिती मिळते.प्रत्येक प्रकरणाच्या सुरवातीला  या प्रकरणात काय वाचायला मिळणार हे पानाच्या एका बाजूला वेगळ्या रंगसंगतीत दिले आहे,त्यामुळे प्रत्येक प्रकरण सहजतेने समजते.पुस्तकाची भाषा सहजसोपी आहे.तसेच प्रत्येक प्रकरण जास्त लांबण न लावता आटोपशीर पद्धथतीने लिहलेले असल्याने अत्यंत वाचणीय झाले आहे,जे सहजतेने समजते.पुस्तकाची भाषा खुप सोपी  सहजतेने समजणारी आहे.
                       जपानची कार्यसंस्कृतीविषयी बोलताना लेखकाने  त्यांची झिरो डिफेटेव्ह पद्धत,त्यांचे वेळेचे नियोजन, कायझेन पद्धत, टिम स्पिरीट,कोणत्याही गोष्टीचे सुक्ष्म नियोजन,इतरांचा साहनभुतीपुर्वक विचार करण्याची वृत्ती, क्वालिटी सर्कल ही संकल्पना वाडवडीलांच्या कर्तुत्वावर टिमकी वाजवण्यापेक्षा  स्वकर्तृत्वाला जपानला देण्यात आलेले महत्व आपणास सांगितले आहे. जपानी लोकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाविषयी बघायचे झाल्यास पुस्तकाचे वाचन केल्याने आपणास जपानची खाद्यसंस्कृती, तेथील लोकांची परिसर स्वच्छतेबाबतची खोलवर रुजलेली जाणिव, आपल्या वारकरीसारखी तेथील दिंडीची परंपरा, तेथील पोलीसी व्यवस्था,लोकांंची दुसऱ्यास मदत करण्याबाबतचा सहजभाव, वाहतूकीचे नियम पाळण्याचा त्यांची सहजवृत्ती,आदिंविषयी माहिती मिळते‌.तर त्यांचा बुलेट
ट्रेन,डायव्हरविरहीत ट्रेन ,टोकियो  टॉवर यांच्यविषयी वाचल्याने आपणास जपानचे तंत्रज्ञानातील हुकूमत समजून येते. तर लेखकाने आपल्या कामाच्या ठिकाणी, राहण्याचा ठिकाणी  बरोबर असलेल्या लोकांबरोबर केलेल्या चर्चेतून आपणास जपानी लोकांचा भारताविषयीचा स्नेह,तसेच जपानी लोकांचा देशाभिमान, याविषयी माहिती मिळते..
आपण स्वत: जपानला गेले असल्यास आपले अनुभव ताडून बघण्यासाठी आणि न गेल्यास भारतात राहुन देखील जपान अनुभवण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे..





उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे बीज असलेली कादंबरी, 'फकिरा'

 आपल्या मराठीचे साहित्यविश्व अत्यंत समृद्ध आहे. उकृष्ट चित्रपट निर्मिती होऊ शकते अश्या कादंबरीची मराठीत अक्षरशः खाण आहे. गो नि दांडेकर यांची...