सोमवार, ३१ मार्च, २०२५

सहजसोप्या शद्बात अर्थशास्त्राचा संकल्पना सांगणारे पुस्तक,'अर्थजिज्ञासा

 
 अर्थशास्त्र, आपल्या रोजच्या जीवनात पदोपदी सामोरे जावे लागणारा विषय. रोजच्या जगण्यात आपण भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर गोष्टी विकत घेतो, याचे दर महागाईशी निगडीत असतात.महागाई या घटकाचा शास्त्रीय अभ्यास अर्थशास्त्रात होतो. आपल्याकडे जरासे पैसे साठले की,ते आपण विविध ठिकाणी गुंतवतो .ही गुंतवणूक करण्याचे मार्ग अपणास अर्थशास्त्र शिकवतो.आपण एखादी गोष्ट खरेदी केल्यावर जी.एस.टी हा कर भरतो. देशातील  कररचनेचा अभ्यास अर्थशास्त्रात होतो. आपण रोजच्या आयुष्यात अनेक गोष्टी वापरतो त्यातील काही आपल्या देशात तयार झालेल्या नसतात तर इतर देशातून आपल्या देशात आयात झालेल्या असतात तर आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू उत्पादक जास्त नफा मिळवण्यासाठी दुसऱ्या देशात निर्यात करतात या आयात निर्यातीचा अभ्यास अर्थशास्त्रात होतो‌. आपण शि‌क्षण झाल्यावर रोजगाराचा संधी शोधतो, देशातील रोजगाराच्या संधी निर्माण होण्यात अर्थशास्त्र महत्त्वाची भुमिका बजावते.या आणि या सारख्या असंख्य बाबींमुळे अर्शशास्त्र आपणासी जोडले गेले आहे‌. सध्याचा धावपळीच्या स्पर्धेच्या जगात तर ही जोडणी दिवसोंदिवस अधिकच घट्ट होताना आपल्याला दिसतेय.
आजमितीस हा मजकूर लिहताना अर्थशास्त्र केवळ पिवळसर  कागदावर छापलेल्या वर्तमानपत्र किवा टिव्हीवर तळाच्या बाजुला वेगाने जाणाऱ्या दोन पट्यांवर काही नावे सरळ असणारा हिरवा त्रिकोण आणि उलटा लाल त्रिकोण चा संदर्भात दाखवणाऱ्या शेअर मार्केटविषयीच्या वृत्तवाहिन्यांपर्यत मर्यादित नाही.हे आपण वर बघीतलेच आहे‌.तर मित्रांनो या प्रकारे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेल्या या अर्थशास्त्रात अनेक संकल्पना आज सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा सहजतेने वापरतो मात्र या संकल्पना त्यास मुळातून समजल्या असतीलचअसे नाही अनेकादा अपुऱ्या ज्ञानातूनच त्या वापरात असल्याचे आपणास दिसते‌ या अपुऱ्या ज्ञानातूनच या संकल्पना वापरल्याने अनेकदा गोंधळ होण्याची शक्यता नाकरता येत नाही 
        मग या गोंधळावर उपाय तर काय,? तर या संकल्पना व्यवस्थित समजावून घेणे‌, आणि त्यासाठी आपल्याला मदत करतो. कॉण्टिनल प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि. नाशिकचे सुविख्यात चार्टड अकाउंट, वृत्तपत्रात सातत्याने अर्थशास्त्र विषयक लेखन करणारे,  नाशिकच्या बी‌.वाय.के महाविद्यालयात अध्यापनाचे कर्य केलेल्या डॉ.विनायक गोविलकर सर लिखित 
अर्थजिज्ञासा हा ग्रंथ.जो नाशिकमधील महत्त्वाची सार्वजनिक सांस्कृतिक संस्था सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक च्या मदतीने नुकतेच वाचले.
    755 पानांच्या या ग्रंथात सहजसोप्या सुगम मराठीत अर्थशास्त्राविषयक 155 संकल्पना समाजावून सांगितल्या आहेत.प्रत्येक संकल्पना 3ते 5पानात उलगडून सांगण्यात आली आहे.अन्य मराठी भाषेतील माहितीविषयक पुस्तकात अनेकदा आढळते ती गोष्ट अर्थात व्यवहारात रूढ नसलेल्या संस्कृतच्या प्रभावाखालील मराठी भाषेतील परीभाषिक  संज्ञेचा वापर या पुस्तकात आवश्यक तेव्हढाच केला आहे.अनेक ठिकाणी जर इंग्रजी भाषेतील शद्ब व्यवहारात रूढ असेल तर तोच वापरला आहे त्याचे विनाकारण मराठीकरण करत, कठीणपणा टाळला आहे‌. त्यामुळे वाचलेली माहिती चटकन समजते‌.एखाद्या संकल्पनेची माहिती ग्रथात नक्की कोठे आहे हे सहजतेने समजावे यासाठी अल्फाबेटीकली मराठी आणि इंग्रजी भाषेतील अनुक्रमणिका पुस्तकाच्या सुरवातीलाच देण्यात आल्याने, पुस्तक खऱ्या अर्थाने संदर्भ ग्रंथ म्हणून वापरता येतो.
लेखाच्या सुरवातीला सांगितले तसे व्यवहारत वावरताना आपला अर्थशास्त्रविषयक गोंधळ होवू नये, तसेच आपल्याकडून  दुसऱ्याशी बोलताना देखील अचूक बोलणे व्हावे, ज्यामुळे दुसऱ्याचा देखील गोंधळ होणार नाही .या साठी अर्थशास्त्रीय संकल्पना स्पष्ट करणारा हा ग्रंथ आपण एकदा तरी वाचायलाच हवा.

सोमवार, १७ मार्च, २०२५

बदलत्या तंत्रज्ञानाची सखोल सविस्तर माहिती देणारे पुस्तक 'इंडस्टी 4.0

        'सध्याचे जग तंत्रज्ञानाचे आहे. आता जगात तूमच्या शारिरीक शक्तीपेक्षा अधिक महत्व तंत्रज्ञानाचे आहे हे आपण रोजच्या जगण्यात पदोपदी अनुभवतोच, या सातत्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जगात आपण मागे पडू नये यासाठी आपण सर्वच जण आपल्यापरीने प्रयत्नशील देखील असतो .मी देखील या प्रयत्नात असताना मला एक खजिना गवसला तो म्हणजे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असलेल्या आय.बी एम.सारख्या प्रख्यात कंपनीत काही काळ कार्यरत असणारे डॉ .भुषण केळकर सरांनी लिहलेले इंडस्ट्री 4.0 हे पुस्तक.

      केळकर सरांच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाने पुस्तकाला परीपुर्ण केले आहेच हे सांगायला नकोच. सरांच्या अनेक विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी.केल्यामुळे डॉ.भूषण केळकर सरांचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रेष्ठत्व वेगळे सांगायलाच नको. डॉ.भूषण केळकर सरांनी लोकमतच्या ऑक्सिजन या तरुणाईसाठीच्या पुरवण्यांसाठी लिहलेल्या लेखांचे पुस्तकस्वरुपात पुनर्प्रकाशन म्हणजे हे पुस्तक .डॉ.भुषण केळकर सरांच्या त्या लेखमालिकेला त्यावेळी संपुर्ण महाराष्ट्रातील लेखमालिकेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे  आपणास आठवत असेलच.
त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या 53लेखांचे हे 144 पानाचे पुस्तक आपणास आर्टिफिशीयल इंटेलिजियन्स, ब्लॉक चेन, क्लाउड कम्प्युटिंग, इंडस्ट्री 4.0 भविष्यात येवू घातलेली इंडस्ट्री 5.0 या सारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवेगळ्या घटकांची विविध अंगाने माहिती देते.माहिती देताना या बदलला सामोरे जाण्यासाठी  स्वत:मध्ये असण्याची गरज असलेली कौशल्ये आपणास  कोणत्या प्रकारे आत्मसात करता येतील, हे देखील लेखकाने सांगितल्याने हे पुस्तक खऱ्या अर्थाने  जीवनावश्यक झाले आहे.पुस्तक पुर्वी वृत्तपत्रात लेख मालिके स्वरूपात प्रसिद्ध झाले असल्याने असेल कदाचित पुस्तकातील प्रत्येक प्रकरण सुटसुटीत चटकन समजणारे, आणि सहजसोप्या भाषेत लिहलेले जास्त मोठे नसणारे झाले आहे‌.ज्यामुळे पुस्तकाचे आकलन सहजतेने होते 
येणारा काळ हा फक्त आणि तंत्रज्ञानाचा असल्याने त्यात पारंगत होण्यासाठी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे


रविवार, ९ मार्च, २०२५

निखळ आनंद देणारे पुस्तक,' माझा बायकोचा नवरा'

   
विनोदाचे मानवी जिवनातील‌ स्थान अत्यंत महत्तवाचे आहे. जिवंतपणी जाळते,तीला चिंता म्हणतात. मनुष्याने चिंतेपासून दुर राहण्यासाठी आनंदी राहिले पाहिजे.संकटे येतात आणि जातात.मानवाने आनंदी राहिले तर  या संकाटाचा तो सहजतेने तोंड देवू शकतो. या प्रकराची विधाने आपण अनेकदा वाचतो ,ऐकतो. आनंदी राहण्यासाठी अनेक उपाय योजता येतात.त्यात अनेक व्यक्तींकडून वापरण्यात आलेला उपाय म्हणजे, विनोदी साहित्य वाचणे.आपल्या मराठीला मोठ्या प्रमाणात विनोदी साहित्याचा वारसा आहे.पु.ल.देशपांडे, व.पु.काळे,
चि.वि.जोशी अस्या अनेक लेखकांनी विनोदाला एका उत्तम उंचीवर नेवुन ठेवला आहे.याच परंपरेतील एक पुस्तक म्हणजे नाशिकचे ज्येष्ठ साहित्यीक नरेश महाजन सरांनी लिहलेले आणि शद्बमल्हार प्रकाशनातर्फे प्रकाशित पुस्तक माझा बायकोचा नवरा'हे पुस्तक. मी नाशिकमधील सर्वात जूने वाचनालय 'सार्वजनिक वाचनालय नाशिक' अर्थात सावानाच्या मदतीने नुकतेच वाचले.
        160 पानी या पुस्तकात 13 विनोदी कथा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.विनोद म्हटला की टिव्हीवरील कार्यक्रमांमुळे  सध्याचा काळात आपल्यासमोर सहजतेने येणारे चित्र अर्थात भाषेची पातळी घसरणे, पुरषांनी महिला वर्गाचे कपडे घालणे याचा लवलेषशी या कथांमध्ये आढळत नाही.तर असे न करताही सहजतेने रोजच्या आयुष्यात घडणारे प्रसंगही कोणत्या सहजतेने विनोद निर्मितीचा दृष्टीने खुलवता येतात,याचे दर्शन आपणाला नरेश महाजन सरांच्या या कथांमधून होते.
सध्या नाशिक परीसरात अनेकदा घडणाऱ्या वन्यप्राण्याचा मानवी वस्तीतील प्रवेशावर पहिली कथा आधारीत आहे.यामुळे घडणाऱ्या गमती जमंती,आणि मानवी स्वाभाव हे कथेचे बीज आहे.त्यानंतरच्या कथांचा विचार करता, दहावी परिक्षेचे पर्यवेक्षण, आदेश बांडेकर यांच्या होम मिनीस्टर या कार्यक्रमात प्रवेश मिळण्यासाठी महिलांची झुंबड, मृत पत्नीचे भुत दिसणे,  कथा, लेखकाच्या एका छोट्यासा गावातील मुलाखत,तंटामुक्ती अभियानात यश मिळावे या प्रयत्नात गावकरीच कसा अडथळा होतात, राजकीय पक्षांच्या साठेमारीत एक व्यक्ती कोणत्या पद्धतीने स्वत:चा फायदा करुन घेते, एका प्रसिद्ध व्यक्तीची हत्या कोणी केली,याचा पोलीसी तपास आदि अनेक प्रसंगावर आधारीत कथा या कथासंग्रहात आहे.ज्या वाचकाला पुस्तक वाचताना खिळवून ठेवतात.
पुस्तकातील प्रत्येक कथेतील प्रसंग लेखक नरेश महाजन सरांनी मोठ्या सहजतेने कथेत गुंफले आहेत.ज्यामुळे कथा
मोठ्या प्रमाणात वाचणीय झाल्या आहेत..कोणतीही कथा वाचताना कंटाळवणी होत,कथा अर्ध्यावर सोडून पुढची कथा वाचण्याची इच्छाच होत नाही.
पुस्तक वाचल्यावर कोणत्याही व्यक्तीचा तणाव सहजतेने पळून जाईल,यात शंका नसावी, तणावरहित आयुष्य जगल्यास आपलै आयुष्य वाढते.तर मग जास्त वर्ष जगण्यासाठी वाचणार ना हे पुस्तक!

प्रत्येक कुमारवयीन मुला- मुलीने वाचलेच पाहिजे असे पुस्तक ' यस आय एम गिल्टी'

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कुमारवयीन टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा ठसा त्यांच्या पुढील संपूर्...