गुरुवार, ३१ जुलै, २०२५

ग्रामीण भागातील कष्टकरी व्यक्तींचे भाव विश्व उघडणारा कथासंग्रह 'हस्ताचा पाउस

आपल्या मराठीत विविध प्रकारचे साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.तसेच या साहित्यात समाजातील सर्व जातीच्या व्यवसायाच्या ,आर्थिकदृष्ट्या श्रीमंत,गरीब ,मध्यमवर्गीय असा सर्व स्तरातील व्यक्तींच्या जीवनाचे खुबीने चित्रण केलेले आढळते‌. साहित्याचा वैवध्येतेची परंपरा मराठी साहित्यात खुप वर्षापासून आढळते‌. या वैभवशाली  साहित्यातील  एक घटक म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर यांनी लिसलेला हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह .नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावानाच्या पुस्तक संग्राहलायतून मी  हे पुस्तक. मी नुकतेच वाचले.
   सुमारे ८ते १० पानी असलेल्या १२कथा या कथा संग्राहात समाविष्ठ करण्यात आलेल्या आहेत.प्रत्येक कथेचे सुत्र ग्रामीण जीवनात अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तीभोवती गुंफण्यात आले आहे‌. कथेमध्ये आवश्यक त्या ठिकाणी ग्रामीण महाराष्ट्रातील बोलीभाषेचा वापर देखील खुबीने केल्याचा दिसून येते.प्रत्येक कथा उलगडताना पार्श्वभुमीवर जास्त चर्चा लेखकाने केलेली नाही‌.अत्यंत हळुवारपणे मात्र न रेंगाळता सुरवातीच्या अर्ध्या ते एक पानात लेखकाने पात्र परिचय आणि पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे‌.
पहिल्या कथेचे शिर्षक 'देवा सटवा महार' हे आहे.या कथेत अज्ञानामुळे आणि गरिबीमुळे  एक महार समाजबांधव कसा नागवला जातो,त्याने बघितलेल्या स्वप्नाचा कसा चकाचूर होतो,हे १०पानांत लेखकाने मांडलयं वडार समाजबांधवांचे दैन्य दु:ख आपणास ९पानाच्या 'वडारवाडीच्या वस्तीत',या दुसऱ्या कथेतून समोर येतेय. पडकं खोपट या  कथेतून काही कारणाने गुन्हेगारीच्या चक्रात अडकलेल्या दोन कुटुंबप्रधान व्यक्तीमुळे कुटुंबाची कसी वाताहात हे समजते.ही या पुस्तकातील तिसरी कथा आहे. काळ्या तोंडाची आणि एकटा या अनुक्रम चौथ्या पाचव्या कथेतून प्राण्याचा भावना कथेतून डोकावतात.या दोन्ही कथांचे नायक आणि नायीका हे कुत्रे आहेत‌.पोकळी असे शिर्षक असलेल्या सहाव्या कथेतून काही कारणाने नोकरी न मिळाल्याने आणि व्यवसाय देखील करु न शकलेल्या प्रेमभंग झालेल्या माधव कुलकर्णी याचे व्यक्तीचित्र लेखक आपणासमोर उभे करतो‌.

 सातव्या कथेत श्याम नावाच्या आईवडील नसलेल्या आणि मोठ्या विवाहीत बहीणीच्या आधाराने लहान कुटुंबियांना सांभाळणाऱ्या श्याम नावाच्या प्रेमप्रकरणात अयशस्वी ठरलेल्या, आणि आपले दुःख कोणाला तरी सांगण्यासाठी आसुसलेल्या व्यक्तिरेखेसी लेखक आपली भेट करवून देतो.या कथेचे शिर्षक वसाण आहे.विपरीत घडले नाही या आठव्या कथेत एका जोगीण आणि तीला मदत करणाऱ्या विठ्ठलाचे भावविश्व आपणास दिसते. हस्ताचा पाऊस या कथेत आपणास गाढव आणि मालक यातील सबंध लेखक उलगडून सांगतो .हस्ताचा पाऊस ही या कथासंग्रहातील नववी कथा आहे.याच कथेवरून कथासंग्रहाचे नाव हस्ताचा पाऊस हे घेतले आहे.मायलेकाचा मळा या दहाव्या कथेत गावात एकेकाळी कुलकर्णीपद भुसवणाऱ्या मात्र घरातील व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर ते सोडून शांतपणे जीवन व्यतीत करणाऱ्या मात्र त्यावेळीच गावातील सावकरांकडून त्रास सहन करणाऱ्या मायलेकाची गोष्ट लेखक आपल्यापुढे सादर करतो. शेवटून दुसऱ्या असलेल्या ११व्या कथेत सुद्धा सांदीपान आणि त्याची आई येशा या मायलेकांची गोष्ट आहे.हे दोघे महार बांधव आहेत परिस्थितीने पिचलेले आहे.तर कथा संग्रहातील शेवटची बारावी कथा पती असताना प्रचंड श्रीमंती बघितलेल्या मात्र पती निधनानंतर गरीबीत जिवन जगणाऱ्या विधवा पत्नींची आणि तिच्या मुलाची गोष्ट सांगण्यात आली आहे‌
पुस्तकाच्या कथा सहजसोप्या चटकन समजणाऱ्या, आणि छोट्या आहेत.तसेच त्यामुळे मनोरंजन देखील उत्तम होते .तरी किमान एकदा तरी त्या वाचल्याच पाहिजे असे माझे मत आहे.

मंगळवार, २९ जुलै, २०२५

इस्राइलच्या गुप्तचर संस्थेची रंजक कहाणी सांगणारे पुस्तक 'मोसाद'

सध्या आपल्या मराठीत अनेक नवनविन विषयांवरील अनेक पुस्तके प्रसिद्ध होत आहेत.  महाराष्ट्राच्या शहरी भागातीलच नव्हे  ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या सर्वच प्रकाशकांकडून ही पुस्तके प्रसिद्ध करण्यात येत आहेत. पुर्वीपासून मराठीत असणारी इतर भाषेतील पुस्तके मराठी भाषेत अनुवादीत करण्याची परंपरा सध्या वेगाने विस्तारत आहे‌. याच मराठीच्या उत्तमोत्तम पुस्तकांचा परंपरेतील पुस्तके प्रसिद्ध करणारे एक महत्तवाचे प्रकाशन म्हणून आपण मधूश्री प्रकाशनाकडे   बघू शकतो‌.मुळचे नाशिक जिल्ह्यातील तालूक्याचे गाव देखील  नसणाऱ्या घोटीतून सुरवात केलेले आणि आता पुण्यात स्थिरावलेल्या  या प्रकाशनाकडून अच्युत गोडबोले यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली आहेत‌ हे आपणास माहिती असेलच‌.या पुस्तकांशिवाय मधूश्री प्रकाशनांकडून विविध देशांच्या गुप्तचर संस्थांची माहिती देणारी पुस्तके प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.त्यापैकी रॉ, एफबीआय, सीआयए, केजीबी या संस्थांवरील प्रत्येकी एक तर मोसादवरची दोन पुस्तके प्रमुख म्हणता येतील. मोसादवरील दोन पुस्तके  १६० आणि ३७६पानांची आहेत.त्यातील १६०पानांचे पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील प्रमुख वाचानालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेंचा मदतीने वाचले‌.
१६० पानांच्या या पुस्तकात ३० प्रकरणाद्वारे इस्राइलला मोसादची स्थापना करण्याची गरज का भासली,इस्राइल स्थापनेपुर्वीच मोसादच्या स्थापनेची सुरवात कसी झाली? मोसादची स्थापना झाल्यावर सुरवातीच्या काळात तीचे नियमन करताना इस्राइली पंतप्रधांनांकडून झालेल्या चूका, या चूकांवर त्यांनी कसे नियंत्रण मिळवले. मोसादबरोबरच स्थापन झालेल्या इस्राइलच्या अन्य गुप्तचर संस्था मोसादमध्ये कोणत्या पद्धतीने विलीन करण्यात आल्या.मोसादच नाही तर कोणत्याही देशातील गुप्तहेर संस्थांचे काम कसे चालते? मोसादने आतापर्यत यशस्वी केलेल्या मोहिमा, मोसादवर झालेले आरोप,त्यामागची कारणे,मोसादचा आपल्या गुप्तहेरांविषयी असलेला दृष्टिकोन, मोसादच्या सुरवातीच्या काळात तीला मिळालेली अमेरीकेची मदत या विषयी माहिती मिळते.
मूळ पुस्तक इंग्रजी आणि तामिळ भाषेत अनेक विषयांवर संशोधनपर मात्र रंजक आणि माहितीची वस्तुनिष्ठता जपत लिखाण करणाऱ्या नागसुब्रमणियन चोक्कनाथन यांनी इंग्रजी भाषेत लिहले आहे. एन चोक्कन या नावाने ते प्रसिद्ध आहे.मुळचा इंग्रजी भाषेतील पुस्तकाचा अभय नरहर जोशी यांनी अनुवाद केला आहे‌.मी मराठी अनुवाद वाचला आहे.अनुवादाची भाषा प्रवाही,सहज समजणारी आहे.मोसादचे बोधचिन्ह असलेले निळ्या रंगातील मध्ये पिवळा पट्टा असलेले आणि पुस्तकाचे नाव पांढऱ्या रंगात छापलेले मुखपृष्ठ आपले लक्ष चटकन वेधून घेते.
सध्या आपल्या भारतात गुप्तहेर संस्था गुप्तहेर यांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.त्या पार्श्वभुमीवर जगप्रसिद्ध अस्या मोसादची माहिती देणारे फाफटपसारा टाळणारे हे पुस्तक आपण वाचायलाच हवे‌

शनिवार, १९ जुलै, २०२५

संत तूकाराम आणि संत रामदास यांच्या शिकवणीचे सद्य काळातील महत्त्व सांगणारे पुस्तक, तूका राम दास

आपल्याकडे संतपरंपरेची मोठी परंपरा आहे. या संतांनी जीवनाविषयीच्या अनेक समस्यांवर मोठा उपदेश केला आहे. मात्र आपल्या दुर्देवाने या संताच्या शिकवणीच्याऐवजी त्यांनी केलेल्या चमत्काराचीच चर्चा जास्त होताना दिसते. जसे संत ज्ञानेश्वरांनी रेड्याचा मुखातून गीता म्हणवली, भिंत चालवली.किंवा संत तूकाराम यांची कागदावर लिहलेली गाथा तीन दिवस पाण्यात राहुनसुद्धा तीन दिवसांनी जशीच्या तसी बाहेर आली‌.वगैरै. सध्याचा अत्यंत ताणतणावाच्या काळात या संताच्या उपदेशाचे महत्त्व अजूनच मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.संताच्या या  सध्याचा काळातील  शिकवणीचे महत्त्व आपणास समजते ,दैनिक लोकसत्ताच्या प्रकाशनविभागाकडून करण्यात आलेल्या 'तूका राम दास' या पुस्तकातून. संत तूकाराम यांच्या नावातील राम आणि संत रामदास यांच्या नावातील राम एकत्रच घेतलेल्या या पुस्तकातून आपणास या संताच्या शिकवणीचे सध्याचा काळातील महत्त्व समजून येते‌. सन २०१६साली दैनिक लोकसत्तात संत तूकाराम आणि संत रामदास यांच्या विषयी साप्ताहिक लेखमाला प्रसिद्ध झाली होती.याच लेखमालिकेचे हे पुस्तक. जे मी नुकतेच नाशिकमधील सुप्रसिद्ध वाचनालय सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावानाच्या मदतीने वाचले.
यात संत तूकाराम यांच्या विषयी २६ प्रकरणातून तर संत रामदास यांच्याविषयी २२प्रकरणातून सांगण्यात आले आहे. या पुस्तकातील प्रकरणे आधी सदर स्वरूपात वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेली असल्याने  छोटी आहेत. जी चटकन वाचून समजतात. या पुस्तकात दोन्ही संताचे चरीत्र सांगण्यात आलेले नाही तर तर सर्वच्या सर्व प्रकरणे संत तूकाराम आणि संत रामदास यांच्या शिकवणूतील वर्तमान संदर्भ आपणास उलगडून सांगतात.नाही म्हणायला पुस्तकाच्या संत तूकाराम महाराज यांच्या विषयीच्या भागातील पहिले दोन प्रकरणे संत तूकाराम महाराजांच्या वेळची परिस्थिती स्पष्ट करतात.तर शेवटचे प्रकरण संत तूकाराम यांच्या सदेह वैंकुठगमनाविषयी सांगतात. ते वगळता  पुस्तकातील अन्य ४५ प्रकरणे पुर्णत: या १७ व्या शतकातील संताचे सद्यस्थितीतील महत्त्व अधोरेखीत करतात. 
संत तूकाराम महाराज आणि संत रामदास स्वामी या काहीस्या समकालीन संतांमुळे समाजात चैतन्य कोणत्या प्रकारे आले‌. त्यांनी केलेल्या रचनांमध्ये त्यांनी केलेल्या न केलेल्या रचना देखील कोणत्या बेमालूम पद्धतीने कालांतराने घुसवण्यात आल्या . याउलट स्थिती संत तूकाराम यांच्याबाबत कशी उद्भवली.त्यांच्या ह्यातीत त्यांनी केलेल्या रचना इतरांनी स्वत:चा म्हणून कश्या वापरल्या.याबाबत संत तूकाराम यांची प्रतिक्रिया काय होती.समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध आणि मनाचे श्लोक वगळता अन्य कोणत्या रचना केल्या.कोणकोणत्या भाषेत केल्या.‌समर्थ रामदास स्वामी कोणकोणत्या विषयांत पारंगत होते.याविषयीची माहिती देखील या पुस्तकातून मिळते.
     पुस्तक मुळात वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह असले तरी  दोन तीन लेखांचा अपवाद वगळता लेख लोकसत्तात प्रसिद्ध झाले त्यावेळचा राजकीय स्थितीचा उल्लेख आढळत नाही‌. हे याचे वैशिष्ठच म्हणता येईल.मी या आधी वाचलेल्या या सारख्या पुस्तकात तत्कालीन राजकीय स्थितीचा उल्लेख मोठ्या प्रमाणात आढळतो .
पुस्तक वाचल्याने आपणास संत तूकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची सद्यस्थितीत देखील किती गरज आहे‌, हे समजते‌.पुस्तक फार मोठे नही जेमतेम २०६ पानांचे आहे‌.जे सहजतेने वाचून होते‌.पुस्तक छोटे असले तरी त्यातील आशय खुप मोठा आहे.मग वाचताय ना पुस्तक

मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)

माझ्या कालच्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याबाबद्दल माझा लेख वाचणाऱ्या,यावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. या प्...