शनिवार, १९ जुलै, २०२५

संत तूकाराम आणि संत रामदास यांच्या शिकवणीचे सद्य काळातील महत्त्व सांगणारे पुस्तक, तूका राम दास

आपल्याकडे संतपरंपरेची मोठी परंपरा आहे. या संतांनी जीवनाविषयीच्या अनेक समस्यांवर मोठा उपदेश केला आहे. मात्र आपल्या दुर्देवाने या संताच्या शिकवणीच्याऐवजी त्यांनी केलेल्या चमत्काराचीच चर्चा जास्त होताना दिसते. जसे संत ज्ञानेश्वरांनी रेड्याचा मुखातून गीता म्हणवली, भिंत चालवली.किंवा संत तूकाराम यांची कागदावर लिहलेली गाथा तीन दिवस पाण्यात राहुनसुद्धा तीन दिवसांनी जशीच्या तसी बाहेर आली‌.वगैरै. सध्याचा अत्यंत ताणतणावाच्या काळात या संताच्या उपदेशाचे महत्त्व अजूनच मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.संताच्या या  सध्याचा काळातील  शिकवणीचे महत्त्व आपणास समजते ,दैनिक लोकसत्ताच्या प्रकाशनविभागाकडून करण्यात आलेल्या 'तूका राम दास' या पुस्तकातून. संत तूकाराम यांच्या नावातील राम आणि संत रामदास यांच्या नावातील राम एकत्रच घेतलेल्या या पुस्तकातून आपणास या संताच्या शिकवणीचे सध्याचा काळातील महत्त्व समजून येते‌. सन २०१६साली दैनिक लोकसत्तात संत तूकाराम आणि संत रामदास यांच्या विषयी साप्ताहिक लेखमाला प्रसिद्ध झाली होती.याच लेखमालिकेचे हे पुस्तक. जे मी नुकतेच नाशिकमधील सुप्रसिद्ध वाचनालय सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावानाच्या मदतीने वाचले.
यात संत तूकाराम यांच्या विषयी २६ प्रकरणातून तर संत रामदास यांच्याविषयी २२प्रकरणातून सांगण्यात आले आहे. या पुस्तकातील प्रकरणे आधी सदर स्वरूपात वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेली असल्याने  छोटी आहेत. जी चटकन वाचून समजतात. या पुस्तकात दोन्ही संताचे चरीत्र सांगण्यात आलेले नाही तर तर सर्वच्या सर्व प्रकरणे संत तूकाराम आणि संत रामदास यांच्या शिकवणूतील वर्तमान संदर्भ आपणास उलगडून सांगतात.नाही म्हणायला पुस्तकाच्या संत तूकाराम महाराज यांच्या विषयीच्या भागातील पहिले दोन प्रकरणे संत तूकाराम महाराजांच्या वेळची परिस्थिती स्पष्ट करतात.तर शेवटचे प्रकरण संत तूकाराम यांच्या सदेह वैंकुठगमनाविषयी सांगतात. ते वगळता  पुस्तकातील अन्य ४५ प्रकरणे पुर्णत: या १७ व्या शतकातील संताचे सद्यस्थितीतील महत्त्व अधोरेखीत करतात. 
संत तूकाराम महाराज आणि संत रामदास स्वामी या काहीस्या समकालीन संतांमुळे समाजात चैतन्य कोणत्या प्रकारे आले‌. त्यांनी केलेल्या रचनांमध्ये त्यांनी केलेल्या न केलेल्या रचना देखील कोणत्या बेमालूम पद्धतीने कालांतराने घुसवण्यात आल्या . याउलट स्थिती संत तूकाराम यांच्याबाबत कशी उद्भवली.त्यांच्या ह्यातीत त्यांनी केलेल्या रचना इतरांनी स्वत:चा म्हणून कश्या वापरल्या.याबाबत संत तूकाराम यांची प्रतिक्रिया काय होती.समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध आणि मनाचे श्लोक वगळता अन्य कोणत्या रचना केल्या.कोणकोणत्या भाषेत केल्या.‌समर्थ रामदास स्वामी कोणकोणत्या विषयांत पारंगत होते.याविषयीची माहिती देखील या पुस्तकातून मिळते.
     पुस्तक मुळात वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह असले तरी  दोन तीन लेखांचा अपवाद वगळता लेख लोकसत्तात प्रसिद्ध झाले त्यावेळचा राजकीय स्थितीचा उल्लेख आढळत नाही‌. हे याचे वैशिष्ठच म्हणता येईल.मी या आधी वाचलेल्या या सारख्या पुस्तकात तत्कालीन राजकीय स्थितीचा उल्लेख मोठ्या प्रमाणात आढळतो .
पुस्तक वाचल्याने आपणास संत तूकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची सद्यस्थितीत देखील किती गरज आहे‌, हे समजते‌.पुस्तक फार मोठे नही जेमतेम २०६ पानांचे आहे‌.जे सहजतेने वाचून होते‌.पुस्तक छोटे असले तरी त्यातील आशय खुप मोठा आहे.मग वाचताय ना पुस्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)

माझ्या कालच्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याबाबद्दल माझा लेख वाचणाऱ्या,यावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. या प्...