सोमवार, २२ जानेवारी, २०२४

मराठीला खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा करणारे पुस्तक इंडस्ट्री 4.0

       

  आताच काळात आपले सर्व जीवन  तंत्रज्ञानाशिवाय चालणे अशक्यच आहे हे नाकारण्यात काही अर्थ नाही उठल्यापासून झोपेपर्यंत आपले सर्व जीवन हे तंत्रज्ञानाने व्यापून राहिलेले आहे . ऑफिसमधील काम असो किंवा ऑफिस सुटल्यावर आपण घरी येण्यासाठी वापरत असलेली साधने असो हि सर्व तंत्रज्ञानाचीच किमया असो जास्त दूर कश्याला जायचे आता तुम्ही हा जो मजकूर वाचत आहात ती पण तंत्रज्ञानाचीच किमया . जगात कोणतीही  गोष्ट कायमस्वरूपी नसते असे म्हणतात मात्र या गोष्टीला एक अपवाद आहे तो म्हणजे तंत्रज्ञानाचा विकास हो तंत्रज्ञाचा विकास पूर्वीपण होत होता आताही होत आहे आणि भविष्यलत देखील होता असेल भले त्याची गती कमी जास्त असेल मात्र तंत्रज्ञाचा विकास याला मरण नाही त्या अर्थाने तो अमर आहे 
             आता अश्या तंत्रज्ञाचा वापर करताना या गोष्टी कश्या प्रकारे कार्यान्वित होतात ? हे कळलेच पाहिजे हि अट  नसली तरी आपण जी गोष्ट वापरत आहे त्या गोष्टीमागचा कार्यकारण भाव समजल्यास सोन्याहून पिवळे म्हणतात ते हेच असे सहजतेने म्हणता येते
          इंग्रजीत या बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती देणारी अनेक पुस्तके सध्या आहेत आणि दिवसोंदिवस त्यात भरच पडत आहे मात्र कोणतीही गोष्ट आपल्या मातृभाषेत समजल्यास अधिक सहजतेने समजते एखाद्या  गोष्टीची किमान तोंडओळख मातृभाषेत  झाल्यास त्या गोष्टीचे अधिकचे सखोल ज्ञान आपण दुसऱ्या भाषेत सहजतेने घेऊ शकतो .असे जागतिक संशोधन आहे  मात्र कोणतीही गोष्टीचे सखोल अध्ययन करण्यासाठी मुळात ती गोष्ट समजणे आवश्यक असते आपल्या दुर्दैवाने मोठी साहित्यिक परंपरा असलेली पंरपरा असलेली आपली मराठी याबाबत बरीच मागे आहे सध्याच्या तंत्रज्ञांचा काळात एखाद्या भाषेत किती वर्षाची साहित्य पंरंपरा आहे यावरून भाषा टिकणारी नाही तर त्या भाषेत किती ज्ञान निर्मिती होते का,?  ती भाषा ज्ञान भाषा होणार का? यावरून हे टिकणार आहे आणि मराठीचा हा कलंक पुसण्याचे काम आपल्या मराठीत अच्युत गोडबोले सातत्याने करत असतात त्यांचा याच धडपडीचे प्रतीक ज्याला मराठीला खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा करणारे पुस्तक म्हणता येईल असे इंडस्ट्री 4.0 हर पुस्तक मी नुकतेच 
 नाशिकमधील सर्वात जुनी सांस्कृतिक संघटना सावानाच्या सहकार्याने वाचले 
      सध्या कोणी काही म्हणो एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी पुस्तके नेहमीच उपयोगी पडतात स्वतःच्या नोटस काढण्यासाठी एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी व्हिडीओ पेक्षा पुस्तके नेहमीच उपयोगी पडतात . व्हडिओमुळे एखादी गोष्ट समजते असे वाटते मात्र कालांतराने तो गोष्ट तितक्याच सहजतेने विसरले जाण्याची शक्यता देखील
मोठी असते या उलट पुस्तकामुळे एखादी गोष्ट समजावून घेतल्यास ती गोष्ट लवकर विसरत नाही त्यामुळे पुस्तकांना मरण नाही त्यातही अत्यंत वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञाच्या मुळातील संकल्पना समजण्यास तर आपणास पुस्तकाचाच आधार घ्यावा लागणार आणि इंड्रस्टी 4.0  हे पुस्तक या कसोटीवर पूर्णतः खरे ठरते सुमारे ३६० पानाच्या या पुस्तकात ६ भागातून आपणास या अतिशय नव्या असणाऱ्या तंत्रज्ञाची आपणास आपल्याला समजले अश्या सोप्या मराठीत लेखकाने ओळख करून दिली आहे 
 मराठीत असणाऱ्या तंत्रज्ञ विषयक पुस्तकांची एक समस्या असेलेली मराठी परिभाषेचा अतिशय जास्त प्रमाणात वापर आणि रूढ झालेल्या इंग्रजी शब्दाचा खूपच तुरळक वापर हि समस्या अच्युत गोडबोले यांच्या अन्य पुस्तकासारखी याही पुस्तकात आढळत नाही रूढ झालेल्या इंग्रजी संकल्पनाच त्यांनी पुस्तकात वापरलेल्या असल्याने या बदलत्या तंत्रज्ञाची मूलभूत माहिती घेऊन वाटल्यास अधिकची माहिती आपण इंग्रजीत सहजतेने घेऊ शकतो 
या पुस्तकांतच्या पहिल्या भागात  4.0 हि संकल्पना समजावून सांगितली आहे या भागात औद्योगिक विकास कसा झाला याचा आढावा घेत हि संकल्पना समजवून सांगितली आहे दुसऱ्या भागात सध्या विशेष चर्चेत असलेली आर्टिफिशियल इंटेलिजियन्स हि संकल्पना ४ प्रकरणातून स्पष्ट केली आहे या भागाच्या पहिल्या प्रकरणात आर्टिफिशियल इंटेलिजियन्स म्हणजे काय हे सांगितले आहे दुसऱ्या प्रकरणात रोबोटिक्स हि संकल्पना तर तिसऱ्या प्रकरणात एक्स्पर्ट सिस्टीम आणि नॅचरल प्रोसेसिंग विषयी महती देण्यात अली आहे मशिन लर्निग आणि चाटबॉक्स विषयीची माहिती अनुक्रमे पुढच्या दोन प्रकरणातून आपणस मिळते तिसऱ्या भागात आपणास बिग डेटा हि संकल्पना आपणस माहिती होते चवथ्या भागात इंटरनेट ऑफ थिंग्स . ऑर्ग्यूमेंट रियालिटी आणि क्लाउड कॉम्पयटिंगविषयीची माहिती आपणस तीन प्रकरणातून मिळते पाचव्या आणि सहाव्या प्रकारांत आपणस ३ डी प्रिटिंग ब्लॉकचेन,५ जी आणि भविष्यातील वाटचाल याविषयी माहिती मिळते 
   लेखात सुरवातीलाच सांगितल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी पुस्तकाला मरण नाही आणि गोष्ट जर तंत्रज्ञांविषयी असेल तर विचारायलाच नको मग वाचणार ना हे पुस्तक 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...