पुस्तकाचे लेखन 25वर्ष राज्यशास्त्राचे अध्ययन करणाऱ्या, अनुभवी प्राध्यापकाने केलेले असल्याने, पुस्तक अभ्यासपूर्ण झाले आहे. पुस्तकात नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघ ,2009 पुर्वीचा मालेगाव मतदारसंघ तर 2009साली मतदारसंघाचे पुनर्गठन झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या दिंडोरी मतदार संघ ,तसेच सध्या धुळे लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण,(सटाणा) आणि मालेगाव जिल्ह्याचा विचार करुन धुळे मतदार संघातील खासदारांची ओळख करून देण्यात आली आहे. धूळे लोकसभा मतदारसंघातील खासदारांची ओळख करून देताना त्यात बागलाण आणि मालेगाव तालूक्याचा समावेश झाल्यानंतरच्या काळातील खासदारांची माहिती देण्यात आलेली आहे.बागलाण आणि मालेगाव तालूक्याचा समावेश नसतानाच्या काळातील खासदारांची ओळख करून देण्यात आलेली नाही, हे आपण पुस्तक वाचण्याचा आधी माहिती करुन घेणे अत्यावश्यक आहे.
पुस्तक दोन भागात विभागले असून पहिल्या भागात जिल्ह्याचा राजकीय, सामाजिक, भौगोलिक या गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. तर दुसऱ्या भागात प्रकरणनिहाय प्रत्येक खासदारांची ओळख करुन देण्यात आलेली आहे.प्रत्येक खासदारावर एक, एक प्रकरण आहे. अनेकांना खासदार म्हटले की फक्त लोकसभेचे खासदार आठवतात.मात्र सदर पुस्तकात लोकसभेबरोबर जिल्हाशी या न त्या कारणाने संबंध आलेल्या राज्यसभा खासदारांची देखील ओळख करून देण्यात आली आहे.तसेच संसदेचे सदस्य नसलेल्या मात्र भारतीय राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तीमत्व असलेल्या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्यावर एक स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात आहे.
या पुस्तकात खासदारांची ओळख करुन देताना सुरवातीलाच त्यांचे संपूर्ण नाव अन्य कौंटुबिक माहिती, संपर्क पत्ता, आणि त्यांनी भुषवलेली विविध पदे यांची तक्ता स्वरुपात माहिती देवून या तक्त्यापुढे त्यांचा राजकीय प्रवास सांगितला आहे.राजकीय प्रवास सांगताना ही माहिती सहजसोप्या सर्वसामान्य जनतेला चटकन समजेल,अस्या स्वरुपात सांगितली आहे उगीचच पांडित्य दाखवण्याची सवय अनेक लेखकांना असते,मात्र याचा लवलेश देखील या पुस्तकात आढळतो नाही.
पुस्तक जरी पत्रकारांना अधिक उपयोगी पडत असले तरी, सध्याचे लोकसभा निवडणूकीचे वातावरण बघता आपण ज्या पदासाठी व्यक्तीला निवडून देणार आहोत,त्या पदावर आतापर्यंत कोणकोणत्या व्यक्ती, येवून गेल्या?, या व्यक्तींची सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी काय ,होती ? त्यांनी आपल्या परिसरात काय सुधारणा केल्या?याची माहिती मिळाल्यास आपणास लोकसभा निवडणूकीत योग्य खासदार पाठवणे सोपे होईल, म्हणून पत्रकार नसलेल्या व्यक्तीने देखील सदर पुस्तक वाचायलाच हवे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा