आचार्य अत्रे यांनी लक्ष्मीबाई टिळक यांना 'साहित्यलक्ष्मी' ही उपमा दिली होती,ती कशी खरी होती,हे आपल्याला या पुस्तकातून समजते ९१ प्रकरणातून कोणतेही रूढ अर्थाचे शिक्षण न घेता, कठीण परिस्थितीशी लढा देवून आपले व्यक्तीमत्व दुसऱ्यांना आदर्शवत वाटेल,असे कोणत्या पद्धतीने घडवू शकते,हे या पुस्तकातून आपल्यास समजते.
लक्ष्मीबाई टिळकांच्या आयुष्यातील बराच मोठा भाग नाशिकला गेला.नाशिक माझी जन्मभुमी असल्याने मी सुद्धा नाशिकला बराच काळ राहिलो आहे.तरी सुद्धा नाशिकचे नवे दर्शन मला या पुस्तकाच्या वाचनाने झाले.लक्ष्मीबाईंच्या वेळचे नाशिक अनुभवणे माझ्यासाठी सुद्धा वेगळाच आनंद देणारा अनुभव होता.
लक्ष्मीबाईंनी या पुस्तकाचे लेखन करताना फक्त स्वत:चे अनुभवच सांगितले आहे,असे नाहीये. तर १८६० ते १९२० या दरम्यानचे आपल्या महाराष्ट्राचे बदलते सांस्कृतिक जीवन सुद्धा लेखनातून उलगडले आहेत.एका अर्थाने हा महाराष्ट्राचा त्यावेळचा चालता बोलता इतिहास आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. साधरणत: लग्नानंतरचे भावविश्व त्यांनी यात मांडलेले आहे अर्थात थेट लग्नापासूनच सुरवात केली असे नसून लग्नासाठी स्थळ बघण्यापासूनचे आपले अनुभव यात सांगितले आहेत.
मी पुण्यात काही निमित्ताने मंडईतून बाजीराव रोडने पायी सारस बागेकडे जात असताना, केळकर संग्राहलयाजवळ एके ठिकाणी फुटपाथावर 'स्मृतिचित्रे' विकताना दिसले, आणि मी लगेच विकत घेतले.जसे झटकन विकत घेतले.तितक्याच झटकन वाचून देखील टाकले. त्यामुळे मला एक उत्तम पुस्तक वाचल्याचा अनुभव आला.तसा तो तूम्हाला येण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचावे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा