शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४

प्रत्येक इतिहासप्रेमींनी संग्रही ठेवावे,असे पुस्तक, 'पेशवेकालीन महाराष्ट्र'

   
 आपल्यापैकी अनेकांना शालेय जीवनात इतिहास हा विषय आवडत नाही.कंटाळवाणा वाटतो.याचे महत्त्वाचे कारण तो म्हणजे राजकीय इतिहास असतो. इतिहासात वेळोवेळी राज्य केलेल्या व्यक्तींविषयी, त्यांनी केलेल्या युद्ध, लढाया आणि तह करार यांच्या विषयीची माहिती त्यात दिलेली असते. त्यांनी राज्य केले त्यांची माहिती जाणून आता काय उपयोग?या विचारातून इतिहासाकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र ही इतिहासाची एक बाजू झाली.त्या राज्यकर्त्यांनी ज्या समाजावर राज्य केले,त्या समाजाचा देखील एक इतिहास असतो. जसे एखाद्या प्रदेशातील राजकर्ते बदलतात, तसे हा इतिहास देखील बदलतो.त्यामुळे एखाद्या प्रदेशाचे संपुर्ण  आकलन होण्यासाठी त्या प्रदेशाचा राजकीय इतिहासाबरोबर सामाजिक इतिहास देखील आवश्यक ठरतो.,आणि तो जर आपलाच प्रदेश असेल तर विचारायलाच नको.आपले पुर्वज कोणत्या स्थितीत राहत होते.त्यांच्यापेक्षा आपण कोणत्या पद्धतीने वेगळे रहात आहोत?हे समजले तर सोन्याहुन पिवळे.आपल्या प्रदेशातील सामाजिक इतिहास समजला तर आपल्याला आपण कोण आहोत,हे सहजतेने समजते आपलीच आपल्याला नवी ओळख होते.आपल्या महाराष्ट्राचा बाबत बोलायचे झाल्यास, आपली ही गरज सहजतेने पुर्ण होते ती इसवी सन १९३० ते १९४० या दरम्यानचे विविध कालखंड एकत्रीतपणे विचारात घेता ८ वर्ष दैनिक केसरीचे संपादक असलेल्या वा. कृ. भावे यांनी लिहलेल्या, 'पेशवेकलीन महाराष्ट्र, महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास' या ग्रंथामुळे.जो मी नुकताच नाशिकमधील महत्त्वाची सांस्कृतिक संस्था असलेल्या सावानाच्या मदतीने वाचला.
         या ४५८ पानी ग्रंथात शिक्षणपद्धती,नगररचना, इमले‌ देवालये,मुर्तीकला  व चित्रकला, दास-दासी,  वैद्य व वैद्यक्रिया ,कवी व कीर्तनकार,समाजाची मनोरचना, व्यापार व उद्योगधंदे या सारख्या 31 घटकाद्वारे पेशवेकालीन महाराष्ट्राची आपणास ओळख  करुन दिली आहे..पुस्तकाची प्रथम आवृत्ती जरी १९५६साली प्रसिद्ध झालेली असली,तरी पुस्तकाचे बहुतांस लेखन १९३५साली करण्यात आल्याने पुस्तकाची भाषा त्यावेळच्या ग्रंथप्रामान्यानुसार आहे.मात्र तरी देखील भाषा सहजतेने समजते.(निदान मला तरी)
     पेशवे कालखंड आपल्या महाराष्ट्राचा विचार करता अत्यंत महत्तवाचा आहे. आपल्या भारतासाठी मध्ययुग १८५७पर्यत मानण्यात येते.त्याचा विचार करता मध्ययुगाच्या अखेरीस समाजजीवन कसे होते? तसेच कोणत्या प्रकारच्या समाजजीवनाद्वारे आपला अर्वाचीन (मॉडर्न इतिहास) इतिहास सुरू झाला ?तसेच छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्या दुर्देवी निधनानंतर महाराष्ट्राची सामाजिक व्यवस्था कोणत्या प्रकारची होती?‌हे समजण्यासाठी आपणास पेशवे कालखंड महत्त्वाचा ठरतो. पेशवे कालखंडाच्या अखेरच्या टप्प्यात बंगाल राज्यात ब्रिटिश राजवट सुरु झाली होती {1756 आणि 1765साली अनुक्रमे प्लासी आणि बक्सरची लढाई झाली.ज्यामुळे बंगालमध्ये ब्रिटीश सत्ता आली असे समजण्यात येते. या दरम्यान 1761 साली पानिपतचे तिसरे युद्ध झाले .तसेच इस्ट इंडीयाचे भारताचे शासन अभ्यासताना आपणास 1783चा रेग्युलेटिंग ॲक्ट दिसतो याचवेळी पुण्यात नारायण पेशव्याचा खुन झाला} त्यामुळे ब्रिटीश राजवट येण्याचा वेळची महाराष्ट्राची स्थिती समजण्यासाठी आपणास पेशवे कालखंड अत्यंत महत्त्वाचा ठरतो. ध चा मा करणे,अटकेपार झेंडा रोवणे, पानिपत होणे यासरख्या आता सहजतेने वापरत असलेल्या म्हणींचा उगम हा पेशवे कालखंडातील घटनांपासून झाला आहे.त्यामुळे पेशवे कालखंड आपणासाठी महत्त्वाचा  ठरतो.
    पेशवे कालावधीत स्वधर्मनिष्ठा आणि परधर्म सहिष्णुता कोणत्या प्रकारची होती?त्यावेळेस पाणीपुरवठाविषयक आणि इतर लोकोपयोगी कामे कसी पार पाडली जात? व्यापार उद्योगधंदे यांची आणि लोकांची स्थिती,समाजाची मनोरचना कसी होती?त्यावेळेस ग्रंथसंग्रह आणि ग्रंथवाचन ,गायन,वादन,नर्तन, कसे केले जात?त्याकाळातील सत्पुरुषाची  समाजसेवा,ग्रामव्यवस्था,जमीन महसुल पद्धती,मुलकी खाते,शेतकी खात्याच्या पद्धती,इतर राज्यव्यवस्थांची स्थिती कोणत्या प्रकारची होती?त्या काळात काशीयात्रेची स्थिती कशी होती?त्या काळातील स्वदेशी कापड आणि कपडे कसे असत? त्याकाळी दरबार आणि सणसमारंभ कोणत्या प्रकारचे असत?याची माहिती आपणास पुस्तक वाचताना मिळते.लेखकाने अखेरच्या ३२व्या प्रकरणात उपसंहार करताना, उत्तरेत अथवा दक्षिणेत ज्या प्रकारे भव्य बांधकामे आढळतात,त्या प्रकारची बांधकामे महाराष्ट्रात का आढळत नाही,यावर भाष्य केले आहे.महाराष्ट्रात पितृतुल्य समजल्या जाणाऱ्या न.चि.केळकर यांची ग्रंथाच्या गौरव करणारी प्रास्ताविका हा ग्रंथ किती अभ्यास करुन कष्ट घेवून तयार केला आहे.न.चि केळकर सारख्या श्रेष्ठतम व्यक्तीने कौतूक केलेला हा ग्रंथ आहे.
    आपल्याकडे पेशव्यांचा राजवटीबाबत अनेकांना राग आहे.पेशवाईत काही समाज घटकांवर अन्याय झाल्याचे दाखले देण्यात येतात‌.पेशवाईत विनाकारण होणाऱ्या खर्चाबाबत विविध दावे करण्यात येतात, त्यातील सत्यता बघण्यासाठी प्रत्येकाने हा ग्रंथ किमान एकदा तरी वाचायलाच हवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

समाजाचे दाहक चित्र दाखवून देणारे पुस्तक 'बलुतं'

मी या २०२६ वर्षी प्रामुख्याने आत्मचरित्र,चरित्र वाचण्याचे ठरवले आहे, हे एव्हाना तुम्हाला माहिती झालेच असेल. तर याचा मालिकेत समाविष्ट होणारे ...