मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

भारताच्या वैभवशाली वारश्याची ओळख करुन देणारे पुस्तक, 'सिंधू -हरवलेली संस्कृती'

आपल्या भारताला आदिम काळापासून मोठा वैभवशाली वारसा मिळालेला आहे.  आहे.मानवाला लेखन कला अवगत नव्हती त्या म्हणजेच इतिहासकारांचा मते pre history काळ असो किंवा मानवाला लेखनकला अवगत होती मात्र अद्याप तीचा उलगडा मानवाला झालेला नाही अस्या कालखंडात अर्थात proto hostory कालखंड असो किंवा इतिहासकारांच्या मते ज्याला history peroid  (ज्याचे accient ,mideverial, modern असे तीन भाग पडतात) म्हणतात त्या कालखंडातील असो या सर्वच कालखंडात भारताला वैभवशाली वारसा  मिळाल्याचे इतिहासाच्या शास्त्रीय पद्धतीने संशोधनातून  वारंवार सिद्ध झाले आहे.याच विस्तीर्ण कालखंडातील एक महत्तवाचा टप्पा म्हणजे सिंधु सरस्वती संस्कृतीचा कालखंड होय. आपल्या दुर्दैवाने भारताच्या या प्राचीन वारस्याची माहिती  देणाऱ्या पुस्तकाची आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वानवा आहे.मात्र काळकुट्ट अंधारात मिणमिणती पणती मोठ्या प्रमाणात उजेड निर्माण करते त्याचप्रमाणे हा अभाव दुर करण्याचे काम सनय प्रकाशनतर्फे प्रकाशित अनुवादीत पुस्तक 'सिंधू हरवलेली संस्कृती' हे पुस्तक काही प्रमाणत करते .
मुळातील लंडन येथील Reaktion Publishication चे The indus: Lost civilization नावाच्या 2015 साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचा हा अनुवाद आहे.नाशिकमधील सर्वात जूने वाचानालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या मदतीतून मी हे पुस्तक नुकतेच वाचले .
    या पुस्तकात 240 पानांमधून 12प्रकरणांमधून या संस्कृतीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.ज्यात या संस्कृतीच्या अधिकृत शोध लागण्याचे मानण्यात येते त्या 1923 चा रेल्वेमार्ग तयार करण्याचा घटनेच्या आधीपासून या ठिकाणाबाबतची विविध तज्ञ्ज व्यक्तींची मते काय होती.मोहोंनजारो आणि या संस्कृतीचे अवशेष सापडलेल्या अन्य ठिकाणी  आतपर्यतच्या  उत्खनातून काय सापडले आहे.? या संस्कृतीचे समाज जीवन, व्यापारी जीवन  कसे होते? या संस्कृतीच्या धार्मिक कल्पना काय असू शकतात.?सिंधु सरस्वती संस्कृतीचा बाहेरील जगाशी कोणत्या प्रकारे आणि कोणत्या माध्यमातून संपर्क होता, ही संस्कृती कोणत्या कारणाने नष्ट झाली? या संस्कृतीचाविकास कोणत्या कालखंडात आणि कस्या प्रकारे झाला? तीच्या लिपीच्या कितपत उलगडा झाला आहे,?उलगडा करण्यातील अडचणी आणि सुगम बाजू कोणत्या ? या सांस्कृतिक विविध बाबींचा हिंदू धर्मातील बाबींवर कोणत्या प्रकारे प्रभाव आहे.?सिंधू संस्कृतीने आपल्यासाठी कोणता वारसा ठेवला आहे याचा प्रामुख्याने समावेश करता येईल.
       मी वाचले तो मुळच्या इंग्रजी पुस्तकाचा शीतल भांगरे यांनी केलेला  मराठीतील अनुवाद होता.मी मराठीत अनुवादीत झालेली काही पुस्तके वाचली आहेत,त्या अनुभवावर सांगतोय,या पुस्तकाची भाषा खुपशी बोजड, कृत्रिम वाटते‌‌. पुस्तक माहितीपुर्ण असल्याने देखील भाषा अशी असू शकते मात्र या भाषेमुळे पुस्तक वाचताना काहीसे कंटाळवाणे होते.वाचताना वाचकाला खिळवून ठेवण्यात पुस्तक काहीसे कमी पडते असे माझे निरीक्षण आहे‌.मात्र

पुस्तकात ठिक ठिकाणी गरजेनुसार सिंधू सरस्वती संस्कृतीतील अवशेषांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.त्यामुळे विषय समजायला मदत होते.अन्य अनुवादीत पुस्तकांप्रमाणे अनुवादकाचे मनोगत ही गोष्ट या पुस्तकात आढळत नाही. पुस्तकाच्या सुरवातील देण्यात आलेल्या कालानुक्रमामुळे सिंधू सरस्वती संस्कृतीचा विकास कधी झाला ,तिचा शोध कधी लागला ,या दरम्यान त्या प्रदेशात मोठ्या कोणत्या घटना घडल्या हे समजते. 
    सिंधू सरस्वती संस्कृतीमध्ये सांडपाण्याची भुमिगत व्यवस्था उत्तम होती, तसेच मोठे रुंद रस्ते असल्याचे  पुरावे सापडले आहेत.दुर्देवाने आज याच प्रदेशात मोडणाऱ्या आपल्या भारतात याची उणीव आहे.या उणीवांवर मात करायची आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाल किल्यावरुन जाहिरपणे सांगावे लागल्याचे आपणास आठवत असेलचं, जे आपणासाठी भुषणावह नाहीये‌.तरी हा कलंक दुर होण्यासाठी करावयाच्या प्रयत्नामध्ये आपल्याला या प्राचीन वारस्याची मोठी मदत होवू शकते मात्र त्यासाठी आपल्याला त्याची माहिती असणे आवश्यक आहे.आणि त्यासाठी आपण हे पुस्तक वाचायलाच हवे.

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

नाशिकचा इतिहास , समृध्द वारसा सांगणारे पुस्तक,'नासिक डायरी'

         नाशिक, रंगपंचमीच्या दिवशी रहाडामध्ये उतरुन रंग खेळण्याची अनोखी प्रथा असलेले शहर, कुरमुऱ्यांचा तिखट चिवडा, मिसळ आणि वाइनसाठी प्रसिद्ध असलेले शहर,आदिवासी ,खानदेशी ,आणि पश्चिम महाराष्ट्राच्या संगमावर वसलेले शहर म्हणजे नाशिक., दक्षीण काशी असी ओळख असलेले तांब्याच्या वैशिष्टपुर्ण भांड्यांसाठी प्रसिद्ध असलेले शहर म्हणजे नाशिक.या  नाशिकला फार पुर्वीपासूनचा इतिहास आहे, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आतापर्यतच्या वाटचालीत,इतिहासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या अनेकांची जन्मभुमी कर्मभुमी नाशिक शहर आहे.या नाशिक शहरालगत असलेल्या लेण्यांना मोठा वैभवशाली इतिहास आहे. या सर्व खजिन्याची माहिती करुन घेयची असल्यास महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीत  कार्यरत असलेल्या रमेश पडवळ सरांनी लिहलेल्या 'नाशिक डायरी या पुस्तकाखेरीज दुसरा उत्तम पर्याय तो कोणता? नाशिकमधील सर्वात जूने वाचनालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक च्या संग्राहालयात असलेले हे पुस्तक मी नुकतेच वाचले.रमेश पडवळ सरांनी नाशिकवर हे पुस्तक धरुन ५पुस्तके लिहली आहेत.त्यापैकी मी वाचलेले हे दुसरे पुस्तक. मी या आधी त्यांचे तपोभूमी नाशिक हे पुस्तक वाचले होते.ते या पुस्तकाप्रमाणेच माहितीपुर्ण होते. त्या पुस्तकाविषयी ज्यांना जाणून घेयचे असेल त्यांनी या लेखाच्या शेवटी असलेल्या लिंकवर क्लिक करावे.
     272 पानांच्या या पुस्तकात लेखकाने 24प्रकरणाद्वारे प्राचीन युगातील नाशिकच्या परीसरात राज्य करणारे सातवाहन राज घराणे, नाशिकमधील कर्तुत्वान महिला, नाशिकमधील शिक्षणक्षेत्र, नाशिकमध्ये झालेला ख्रिस्ती धर्माचा प्रसार,रामकुंड परीसरात असलेल्या समाधी, नाशिकमधील विविध शाहीर, स्वातंत्र्यवीर सावरकर, रामदास स्वामी यांनी टाकळी परीसरात केलेले केलेले कार्य, नाशिक शहरात असलेल्या पांडवलेणी आणि चामरलेणी, नाशिक परीसरात जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या पेशवेकालीन सरदार  या सारख्या घटकांची माहिती दिलेली आहे. तसेच नाशिकचा विविध ग्रंथात आलेला उल्लेख,नाशिक परीसरातील महानुभाव पंथाची धार्मिक स्थळे, तसेच ब्रिटीश काळातील नाशिकची छायाचित्रे आणि चित्र काढणारे छायाचित्रकार आणि चित्रकार नाशिक परीसरातील मारुतीची मंदिरे, नाशिक शहरातील जूनी पाणी पुरवठ्याची व्यवस्था कशी होती या विषयीची माहिती आपणास या पुस्तकातून समजते.
              पडवळ सरांनी कोव्हिड 19 च्या साथरोगात लागू करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनच्या काळात नाशिककरांचे धैर्य अबाधित राहावे यासाठी फेसबुकवर लिहलेल्या लेखांचा संग्रह म्हणजे सदर पुस्तक होय.पुस्तकाची भाषा सहजसोपी चटकन समजणारी आहे.पुस्तक हे नाशिकविषयी माहिती देणारे असून देखील लिहतांना वापरलेल्या पुस्तक अत्यंत वाचणीय झाले आहे,कंटाळवाणे वाटत नाही.विषय कितीही कठीण असला तरी तो सहजसोप्या दुसऱ्याला सहजतेने समजेल या पद्धतीने मांडू शकतो तो उत्कृष्ट शि‌क्षक असतो असे म्हणतात या कसोटीचा विचार करता हे पुस्तक या कसोटीवर 100टक्के खरे ठरते.पुस्तक माहिती देणारे असले तरी पुस्तकाची गोष्टीवेल्हाळ स्वरूपाची भाषा हे या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ठ म्हणता येईल.
         आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शहराला काहीना काही इतिहास आहे.जो शालेय अभ्यासक्रमात शिकवला जातोच असं नाही.मात्र आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाच्या सध्याचा सामाजिक ,राजकीय जीवनावर या इतिहासाचा मोठा प्रभाव असतो.आपणाला सध्या भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे मुळ या इतिहासात दडलेले असते.त्यामुळे आपणास तो माहिती असणे आवश्यक ठरते‌.याला नासिक डायरी सारखी पुस्तके  मोलाची मदत करतात..नाशिक सारख्या मोठ्या शहराछा महाराष्ट्रावर मोठा प्रभाव असतो त्यामुळे नाशिकचा इतिहास नाशिककरांखेरीज अन्य लोकांनी देखील वाचणे अत्यावश्यक आहे ज्यात हे पुस्तक मदत करते, मग वाचणार ना हे पुस्तक 

मी या आधी रमेश पडवळ सरांच्या वाचलेल्या पुस्तकाची अर्थात तपोभूमी नाशिक, या पुस्तकाची मी करुन दिलेली ही ओळख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2024/02/blog-post_55.html

मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)

माझ्या कालच्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याबाबद्दल माझा लेख वाचणाऱ्या,यावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. या प्...