लेखाचे विषय

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

ओळख एका हुकूमशहा सताधिकाऱ्याविषयीच्या पुस्तकाची -

  "वाचाल  तर वाचाल, ' "एखाद्या व्यक्तींकडे असणारी ग्रंथसंपदा हीच खरी संपत्तीकिंवा समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेल्या प्रमाणे , "दिसामाजी काहीतरी ते लिहावे ,प्रसंगी अखंडित वाचित जावे ,शहाणे करून सोडावे जना" अशी आपणास वाचनाचे महत्व अधोरेखित करणारी वचने आपणास ज्ञात आहेतच . मात्र अनेकजण आपल्या  दैनंदिन अश्या व्यस्त वेळापत्रकामुळे इच्छा  असूनदेखील आपली वाचनाची भूक भागवू शकत नाही, अश्या लोंकाना सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात मिळणारी सुट्टी देखील कोणत्या पर्वणीसारखीच भासणार ना ? मी देखील या पर्वणीचा सदुपयोग साधत माझे गेल्या कित्येक दिवसापासून शांततेत वाचेल म्हणून  काहीसे दूर ठेवलेले ज्येष्ठ  पत्रकार श्री गिरीश कुबेर यांनी लिहलेल्या " पुतीन - महासतेच्या इतिहासाचे अस्वस्थ  वतर्मान " या पुस्तकाचे वाचन केले .   या पुस्तकावर या  आधी बरेच  काही लिहून आले आहे .न्यूज18लोकमत  (त्या वेळेचे आयबीएन लोकमत ) या वृत्तवाहिनीवर त्यांच्या रविवारी होणाऱ्या  पुस्तकविषयक कार्यक्रमात याचा उल्लेख करण्यात आला होता , हे आपल्यापैकी अनेकांना स्मरत असेलच . या सर्व बाबींचा विचार करता मी काहिस्या उशिरानेच सदर पुस्तक वाचावयास घेतले .

                जगातील एके काळच्या असणाऱ्या 2 महासत्तेपैकी एक असणाऱ्या   रशियाचा इसवीसनाच्या 9व्या

शतकापासून सद्यस्थितीपर्यंत  आढावा यात घेण्यात आलेला आहे .ज्यामध्ये सुमारे एक तृतीयांश भागात  हा रशियाचा  9व्या शतकापासून सध्याचे  राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या पर्यतचा आढावा घेण्यात आला आहे .तर अन्य भागात पुस्तकाच्या नावात असणाऱ्या पुतीन यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला आहे .  पुस्तकाची भाषा गिरीश कुबेर यांच्या इतर पुस्तकांसारखीच सोपी आणि रंजक असल्याने पुस्तक इतर पुस्तकांसारखेच खिळवूनठेवते . रशियाच्या झेंड्याच्या रंगामध्ये विचारमग्न अवस्थेतील पुतीन यांची प्रतिमा पुस्तक आपल्याकडे अक्षरशः खेचून घेते

पुस्तकाची प्रस्तावना ही श्री गिरीश कुबेर यांनीच लिहलेली असून त्यामध्ये त्यांनी सदर विषयावर पुस्तक का लिहले ? हे सांगताना त्यांचा लेखनप्रवास कोणत्या वळणाने झाला ? या प्रवासात त्यांना कोणा कोणाची साथ मिळाली याबाबत सांगितले आहे ? पुस्तकाची रचना एकूण 16प्रकरणात केलेली आहे . पहिल्या चार प्रकरणात पुतीन सत्तासिहासनावर आरूढ होण्यापर्यंतचा रशियाचा इतिहास सांगितला आहे . पुढील दोन प्रकरणात पुतीन यांच्या वैयक्तिक इतिहासावर लेखकाने प्रकाश टाकला आहे . अंतिम दोन प्रकरणात त्यांच्या समस्त वाटचालीचा आढावा घेण्याबरोबरच रशियाची पुनः एकदा  महासता बनण्यामागची मानसिकता विशद केली आहे . अन्य प्रकरणामध्ये पुतीन यांच्या अध्यक्षपदाच्या वाटचालीचा आढावा त्यांनी घेतलेल्या निर्णयांमधून आणि केलेल्या कृतीमधून घेतलेला आहे . मात्र या प्रकारांमध्ये त्याचे चित्रण काहीश्या नकारत्मकतेने केल्याचे मला वाटते .

राजहंस प्रकाशन सारख्या मातब्बर प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे . पुस्तकाची रचना नेहमीच्या कागदाच्या  कव्हरमध्ये केलेली आहे . जर त्याची रचना हार्ड बाउंड मध्ये केलेली असली तर पूस्तक अधिक आकर्षक झाले असते , असो .

       आपल्या मराठीत अश्या विषयांवर हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लेखक लेखन करतात , त्या पार्श्वभूमीवर गिरीश कुबेर यांचे हे पुस्तक प्रत्येकाने किमान एकदा तरी डोळ्यासमोरून घातलेच पाहिजे . मला माहिती आहे , कुबेरांची ते लोकसताच्या संपादकीयातून मांडत असणारी मते काही जणांना आवडत नाहीत , मात्र कुबेरांच्या त्या मताच्या मागमूसदेखील या पुस्तकातून आढळत नाही . त्यामुळे ज्यांना जागतिक इतिहास आणि त्याचे वर्तमानातील परिणाम याचा मराठीमध्ये अभ्यासयाचा आहे ,अश्या व्यक्तींनी त्यांची संपादकीयेतून येणारी मते क्षणभर बाजूला ठेवून हे पुस्तक वाचायलाच हवे

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०

"युद्ध जीवांचे -जैविक आणि आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य आजार " आजच्या काळात वाचायलाच हवे असे पुस्तक

सध्या आपल्या भारतात सर्वाधिक चर्चीला जाणारा विषय कोणता असेल ? याचा धांडोळा घेतला असता आपणास चीनमार्फत जगात पसरलेला कोरेंना व्हायरस याचा विचार करावाच लागतोव्हॉटसपव्दारे या विषयी विविध प्रकारची माहिती सांगितली जात आहे . त्यात काही प्रमाणात खोटी माहिती देखील सांगण्यात येत आहेया पार्श्वभूमीवर या विषयाची  मराठीत शास्त्रीय स्वरूपाची माहिती देणारे लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर यांचे "युद्ध जीवांचे -जैविक आणि आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य आजार " या पुस्तकाचे महत्व अधिकच अधोरेखित होते . जैविक युद्ध आणि रासायनिक हल्ल्यासारख्या किचकट आणि काहीसा कंटाळवाणा  विषय या पुस्तकामध्ये अत्यंत सहजसोप्या ओघवत्या भाषेत मांडला आहे . पुस्तकाची भाषा काहीही शास्त्रीय पार्श्वभूमी नसणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना समजेल अशी असल्याने पुस्तक खूपच रंजक झाले आहे .

             पुस्तकाची बांधणी हार्ड बाउंड पध्द्तीने करता पारंपरिक पद्धतीने केली आहे . पुस्तकाची रचना दोन भागात केलेली असून पहिल्या भागात  सध्या सर्वांच्या कळीच्या मुद्दा  झालेल्या  जैविक हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे . ज्याचा  सुरवातीला  याचा इतिहास सांगितलं आहे ज्यामध्ये प्राचीन काळाच्या युरोपात पसरल्या एका अनामिक रोगाच्या साथीपासून सध्याच्या काळातील अँथ्रेक्स , सार्स आदी रोगांच्या आढावा घेण्यात आला आहे . जैविक हल्ल्याची संकल्पना ही आधुनिक संकल्पना नसून प्राचीन काळापासून ही संकल्पना अस्तित्वात असल्याचे आपणास या पुस्तकांद्वारे कळते . फक्त ही संकल्पना प्राचीन काली काहीशी विस्कळीत होती . तीला  व्यवस्थित स्वरूप आधुनिक काळात देण्यात आले इतकाच तो काय फरक  . प्राचीन काळी सुद्धा विविध जैविक हत्यारे वापरण्याचे प्रयोग झाले होते , या बाबत अनेक उदाहरणे या पुस्तकात देण्यात आलेली आहेत . जसे रोमन साम्राजाची विविध युद्धे . गिरीश कुबेर यांच्या या पुस्तकातीलबहुसंख्य उदाहरणे हि युरोप खंडातील किंवा प्राचीन चीनमधील आहेत . त्याच्यातही युरोपातील उद्धरणे संख्यने अधिक आहेत .भारत आणि जपान वगैरे भागात यावेळी काय घडत होते , याविषयी सादर पुस्तकाच्या या भागात काहीच सांगितले नाहीये . प्राचीन काळी संपूर्ण अमेरिका खंड आणि आफ्रिका खंडाचा उत्तर भाग वगळता इतर भाग जगाला माहिती नसल्याने त्या भागाचा प्रश्नच येत नाही . मात्र हान्याय भारत जपान आदी भागाला लावता येत नसल्याने या भागातील युद्धांचा समावेश करण्यात येईल पाहिजे होता असे मला वाटते .

   पुस्तकाच्या दुसऱ्या भागात विविध रासायनिक शस्त्रांची माहिती देण्यात आली आहे .ज्यामध्ये जमिनीचा क्रूरकर्मा हिटलर यांनी या रासायनिक शस्त्रांचा कसा,  वापर केला ?  याची माहिती देण्याबरोबर सध्या पोलीस दलांच्यामार्फत सहजतेने वापरात असलेला अश्रूधूर या सारख्या शास्त्रांची माहिती तर देण्यात आली आहेच त्या प्रमाणे अनेक प्राणघातक शस्त्रांची माहिती देण्यात आली आहे . या भागात महाभारताचा उल्लेख करण्यात आला आहे . लेखकाच्या मते प्राचीन इतिहासात याचे फारसे दाखले मिळत नाहीत  सुरवात झाल्यावर हा प्राणघातक शस्त्रांचा वापर सुरु झाला . लेखकाने या प्रकारचानरसंहारककशग्स्त्रांच्या निर्मितीचे श्रेय पुन्हा एकदा पाश्चात्य देशांना दिले आहे , त्यातही याच्या निर्मितीचे पातक प्रामुख्याने जर्मनीच्या माथी मारलें आहे मात्र पुस्तक खूपच माहितीपूर्ण झाले आहे .

               मराठीत अर्थशास्त्र , विज्ञानाच्या संदर्भात शास्त्रीय माहिती देणारी पुस्तके सध्या पूर्वीपेक्षा अधिक संख्येने निघत आहे . त्या पुस्तकांच्या मालिकेतील हे पुस्तक त्याच्या भाषाशैलीमुळे  खूपच रंजक झाले आहे . प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवे . गिरीश कुबेर  त्यांच्या संपादकीयेतून बहुसंख्य लोकांना रुचणारी मते मांडत असले  तरी त्यांची राजकीय मते बाजूला ठेवून खऱ्या ज्ञानावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीने वाचावेच असे हे पुस्तक आहे . मग कधी घेताय पुस्तक वाचायला .

शनिवार, ४ जानेवारी, २०२०

विश्व पुस्तक मेळा आणि मराठी पुस्तक विश्व


 आज 5 जानेवारीला  हा लेख लिहीत असताना नवी दिल्लीला प्रगती मैदान येथे पुस्तकप्रेमींचा कुंभमेळा म्हणून ज्यास सहजतेने संबोधता येईलअसा  विश्व पुस्तक मेळा  मोठ्या दिमाखात सुरु आहे . 4 जानेवारीला सूरु  झालेला हा वाचकांचा कुंभमेळा 12जानेवारी पर्यंत चालू असेलमात्र जगातील 17व्या क्रमांकाची मातृभाषा असणाऱ्या मराठीचे या विश्व पुस्तक मेळ्यात स्थान काय आहे ? याचा आढावा घेतला असता समोर येणारे चित्र फारसे उत्साहवर्धक नाही . कोणत्याही मराठी वृत्तवाहिन्यांवर याची एक मिनिटाची देखील बातमी मी बघितली नाही . मराठी साहित्यविश्वात साहित्य संमेलनाचे जे अनन्य साधारण महत्व आहे , तेच किंबहुना त्याहून कणभर अधिक असे महत्व जागतिक आणि भारतीय साहित्याचा विचार करता या विश्व साहित्य मेळाचे आहे . मात्र त्या ठिकाणी मराठीचे तुरळक अस्तिव आहे . मराठीतील साहित्याचा अवीट गोडवा जगासमोर येण्याची एक उत्तम संधी यामुळे मराठी भाषिकांकडून निसटून गेली आहे . भारताचा विचार करता मराठी भाषिक आज तिसऱ्या क्रमांकावर आहेत . जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणाऱ्या  देशात जिथे 21 अधिकृत भाषा आहेत . अश्या देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या तिसऱ्या क्रमांकावयावरच्या भाषेच्या बाबतीत अशी स्थिती असणे नक्कीच भूषणावह नाही .

                      आज जगभरात वाचक कोणत्या विषयावरची पुस्तके वाचतात ?  त्या विषयावरची पुस्तके मराठीत आहेत का ? नसल्यासत्या विषयावर मराठीत सहजतेने लिहू शकतील अश्या व्यक्ती आहेत का ? हा सर्व शोध मराठीच्या तुरळक अस्तित्वामुळे थांबला आहे . आज मराठीत अनेक नवीन विषयावर पुस्तके निघत आहेत .

त्याची गती यामुळे वाढली असती . मी मूळची अन्य भाषेतील मात्र मराठीत अनुवाद झालेली अनेक पुस्तके बघतो , मात्र त्या तुलनेत मूळची मराठीतील मात्र अन्य भाषेत भाषांतरित झालेली पुस्तके बघावयाला

मिळत नाहीत . जर खूप मोठ्या संख्येने मराठी प्रकाशक या ठिकाणी आले असते , तर या चित्रात नक्कीच बदल झाला असता हे नक्की . मूळचा  शेस्कपियरने इंग्रजी भाषेत आणलेला सॉनेट हा काव्य रचनेचा प्रकार मराठीत केशवसुतांनी आणला तो भाषा भेटीतूनच . या भाषा भेटीची एक अत्यंत छान संधी  विश्व पुस्तक मेळ्यात पुरेश्या प्रमाणत  सहभागी झाल्याने मराठी भाषिकांकडून निसटून गेली आहे . महाराष्ट्र सरकारतर्फे पुस्तकांचं गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील भिलवड  हे गाव विकसित करण्यात आले खरे . मात्र हे प्रयत्न पुरेशे नाहीत वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी अजून जोमाने प्रयत्न करणे

अत्यावश्यक असल्याचे सध्या सुरु असणाऱ्या नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरील विश्व पुस्तक मेळ्यातील मराठीचा स्थितीवरून दिसून येते आहे अर्थात या चित्रात सकारात्मक बदल करण्याचे प्रयत्न सर्व पातळीवर सुरु आहेत . त्याला चांगले फळ लवकरच लागेल अशी अशा व्यक्त करून सध्या पुरते थांबतो . नमस्कार .

सोमवार, ३१ डिसेंबर, २०१८

तेलाचे राजकारण आणि मराठी पुस्तके -

आपल्या सर्वांच्या आयुष्याशी या ना त्या कारणाने जोडला गेलेला घटक म्हणजे जैवइंधने . या इंधनाविषयी आपल्या मराठीत लिहली गेलेली पुस्तके मी नुकतीच वाचली . ती म्हणजे "हा तेल नावाचा इतिहास आहे" आणि "एका तेलियाने " दोन्ही पुस्तके एकाच लेखकांनी लिहलेली आहे. लेखकाचे नाव आहे गिरीश कुबेर . जेव्हा  मला या पुस्तकांविषयी समजले तेव्हा अधाशीपणाने मी ती पुस्तके वाचून काढली.

आपल्या मराठीत इतक्या  सोप्या भाषेत या विषयातील गुंतागुंत समजून सांगणारी पुस्तके मला तरी आढळली नाहीत कोणाला माहीती  असल्यास सांगावे मला आवडेल.

एका तेलियाने या पुस्तकात आखाती देशातील सत्ताधिकाऱ्याविषयी माहिती मिळते . अमेरिकेची या सत्ताधिकाऱ्याना कश्या प्रकारे फूस होती , या विषयी माहिती मिळते.  तेल आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे . त्याच्या किमती "ओपेक" या संघटनेमार्फत कश्या प्रकारे नियंत्रित करून जगाच्या आर्थिक मुठ्या आवळल्या जातात ? लोकशाहीविरोधी असूनही व्हिएतनाम सारखी भूमिका घेता सौदी अरेबिया या देशातील राजघराण्याविषयी अमेरिकेची सहानभूती का ? अमेरिकेवर कुप्रसिद्ध असणारा /११ चा दहशतवादी हल्ला करणारा ओसामा बिन लादेन मुळात कशी अमेरिकेचीच निर्मिती आहे ?तसेच  नंतर ज्या सत्ताधिकाऱ्यांची त्याच्याकडे प्राणघातक शस्त्रे आहेत या आरोपातून हत्या करण्यात आली तो सत्ताधिकारी म्हणजे सद्दाम हुसेन कश्या प्रकारे  अमेरिकेचीच निर्मिती आहे अशीही रंजक माहिती या पुस्तकातून मिळते .

     तर हा तेल नावाचा  इतिहास" या मध्ये आपणास तेलाच्या शोध कश्याप्रकारे लागला; युरोपातील लोकांनी कश्या प्रकारे कंपन्या स्थापून  आखाती देशातील लोकांचे शोषण केले याची माहिती मिळते,  त्याच प्रमाणे आशियातील पहिली विहिर पश्चिम आशियात नव्हे तर भारतातील आसाम मध्ये खणण्यात आली . .या तेलाची

किमंत युरोपीय लोकांनी  आणि अमेरिकी लोकांनी ओळखून सुरवातीला आखाती  देशातील लोकांना कश्या प्रकारे मूर्ख  बनवले ; त्यांच्यातील दुहीचा  स्वतःच्या फायद्यासाठी कश्या प्रकारे फायदा करून घेतला;  आज  पेट्रोल आणि डिझेलच्या आपण ज्या मोठ मोठया कंपन्या बघतो त्यांची सुरवात कश्या प्रकारे झाली  , या विषयीची माहिती मिळते

दोन्ही पुस्तके राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत .तेलाच्या राजकारणाविषयी माहिती पाहिजे असल्ल्यास हि पुस्तके वाचायलाच हवीत .गिरीश कुबेर यांनी तेलावर एकूण तीन पुस्तके लिहली आहेत ती म्हणजे हि दोन आणि "अधर्म युद्ध" हे पुस्तक

उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे बीज असलेली कादंबरी, 'फकिरा'

 आपल्या मराठीचे साहित्यविश्व अत्यंत समृद्ध आहे. उकृष्ट चित्रपट निर्मिती होऊ शकते अश्या कादंबरीची मराठीत अक्षरशः खाण आहे. गो नि दांडेकर यांची...