सध्या आपल्या भारतात
सर्वाधिक चर्चीला जाणारा विषय
कोणता असेल ?
याचा
धांडोळा घेतला असता आपणास
चीनमार्फत जगात पसरलेला
कोरेंना व्हायरस याचा विचार
करावाच लागतो .
व्हॉटसपव्दारे
या विषयी विविध
प्रकारची माहिती सांगितली जात
आहे .
त्यात काही
प्रमाणात खोटी माहिती
देखील सांगण्यात येत
आहे .
या
पार्श्वभूमीवर या विषयाची मराठीत
शास्त्रीय स्वरूपाची माहिती देणारे
लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश
कुबेर यांचे "
युद्ध
जीवांचे -
जैविक आणि आणि
रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य आजार
"
या पुस्तकाचे महत्व अधिकच
अधोरेखित होते .
जैविक युद्ध
आणि रासायनिक हल्ल्यासारख्या
किचकट आणि काहीसा
कंटाळवाणा विषय
या पुस्तकामध्ये अत्यंत
सहजसोप्या ओघवत्या भाषेत मांडला
आहे .
पुस्तकाची भाषा
काहीही शास्त्रीय पार्श्वभूमी नसणाऱ्या
सर्वसामान्य व्यक्तींना समजेल अशी
असल्याने पुस्तक खूपच रंजक
झाले आहे .
पुस्तकाची बांधणी हार्ड
बाउंड पध्द्तीने न
करता पारंपरिक पद्धतीने
केली आहे . पुस्तकाची
रचना दोन भागात
केलेली असून पहिल्या
भागात सध्या
सर्वांच्या कळीच्या मुद्दा झालेल्या जैविक
हल्ल्याची माहिती देण्यात आली
आहे . ज्याचा सुरवातीला याचा
इतिहास सांगितलं आहे ज्यामध्ये
प्राचीन काळाच्या युरोपात पसरल्या
एका अनामिक रोगाच्या
साथीपासून सध्याच्या काळातील अँथ्रेक्स
, सार्स आदी रोगांच्या
आढावा घेण्यात आला
आहे . जैविक हल्ल्याची
संकल्पना ही आधुनिक
संकल्पना नसून प्राचीन
काळापासून ही संकल्पना
अस्तित्वात असल्याचे आपणास या
पुस्तकांद्वारे कळते . फक्त ही
संकल्पना प्राचीन काली काहीशी
विस्कळीत होती . तीला व्यवस्थित स्वरूप आधुनिक
काळात देण्यात आले
इतकाच तो काय
फरक . प्राचीन
काळी सुद्धा विविध
जैविक हत्यारे वापरण्याचे
प्रयोग झाले होते
, या बाबत अनेक
उदाहरणे या पुस्तकात
देण्यात आलेली आहेत . जसे
रोमन साम्राजाची विविध
युद्धे . गिरीश कुबेर यांच्या
या पुस्तकातीलबहुसंख्य उदाहरणे
हि युरोप खंडातील
किंवा प्राचीन चीनमधील
आहेत . त्याच्यातही युरोपातील उद्धरणे
संख्यने अधिक आहेत
.भारत आणि जपान
वगैरे भागात यावेळी
काय घडत होते
, याविषयी सादर पुस्तकाच्या
या भागात काहीच
सांगितले नाहीये . प्राचीन काळी
संपूर्ण अमेरिका खंड आणि
आफ्रिका खंडाचा उत्तर भाग
वगळता इतर भाग
जगाला माहिती नसल्याने
त्या भागाचा प्रश्नच
येत नाही . मात्र
हान्याय भारत जपान
आदी भागाला लावता
येत नसल्याने या
भागातील युद्धांचा समावेश करण्यात
येईल पाहिजे होता
असे मला वाटते
.

पुस्तकाच्या
दुसऱ्या भागात विविध रासायनिक
शस्त्रांची माहिती देण्यात आली
आहे .ज्यामध्ये जमिनीचा
क्रूरकर्मा हिटलर यांनी या
रासायनिक शस्त्रांचा कसा, वापर केला
? याची
माहिती देण्याबरोबर सध्या पोलीस
दलांच्यामार्फत सहजतेने वापरात असलेला
अश्रूधूर या सारख्या
शास्त्रांची माहिती तर देण्यात
आली आहेच त्या
प्रमाणे अनेक प्राणघातक
शस्त्रांची माहिती देण्यात आली
आहे . या भागात
महाभारताचा उल्लेख करण्यात आला
आहे . लेखकाच्या मते
प्राचीन इतिहासात याचे फारसे
दाखले मिळत नाहीत सुरवात
झाल्यावर हा प्राणघातक
शस्त्रांचा वापर सुरु
झाला . लेखकाने या प्रकारचानरसंहारककशग्स्त्रांच्या
निर्मितीचे श्रेय पुन्हा एकदा
पाश्चात्य देशांना दिले आहे
, त्यातही याच्या निर्मितीचे पातक
प्रामुख्याने जर्मनीच्या माथी मारलें
आहे मात्र पुस्तक
खूपच माहितीपूर्ण झाले
आहे .
मराठीत अर्थशास्त्र , विज्ञानाच्या
संदर्भात शास्त्रीय माहिती देणारी
पुस्तके सध्या पूर्वीपेक्षा अधिक
संख्येने निघत आहे
. त्या पुस्तकांच्या मालिकेतील हे पुस्तक
त्याच्या भाषाशैलीमुळे खूपच
रंजक झाले आहे
. प्रत्येकाने हे पुस्तक
वाचायलाच हवे . गिरीश कुबेर त्यांच्या
संपादकीयेतून बहुसंख्य लोकांना न
रुचणारी मते मांडत
असले तरी
त्यांची राजकीय मते बाजूला
ठेवून खऱ्या ज्ञानावर
प्रेम करणाऱ्या व्यक्तीने
वाचावेच असे हे
पुस्तक आहे . मग कधी
घेताय पुस्तक वाचायला
.