सूमारे सव्वाशे पानांची ही लघू कांदबरी विविध प्रकरणांमध्ये विभागली गेली आहे. या कादंबरीत एका प्रगत जीवसृष्टीतील एक मुलगा एका अपघातामुळे एकटाच आपल्या पृथ्वीवर येतो ,त्यांचे संगोपन भारतात केले जाते.ही प्रगत जीवसृष्टी त्यांचा तारा मृत्यूपंथाला लागला असल्याने इतर ठिकाणी जगण्याचा आधार शोधत असते. अपघातामुळे पृथ्वीवरआलेला हा मुलगा त्याचा मुळ ग्रहातील लोकांशी संवाद साधू शकतो का? त्याला संवाद साधण्यासाठी पृथ्वीवरील लोकांची मदत होते का? पृथ्वीवरील लोकांना तो आपला नाही,तर परग्रहवासी आहे? हे समजते का? जर समजले तर त्यांची प्रतिक्रिया काय असते? या सारख्या असंख्य प्रश्नांच्या उत्तरासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.
पुस्तकाचे लेखन करताना डॉ.जयंत नारळीकरांनी भाषा अत्यंत प्रवाही केली आहे.त्यामुळे विविध वैज्ञानिक संकल्पना सहजतेने समजतात. विज्ञानातील क्लिष्टपणा त्यांनी मोठ्या खुबीने टाळलायं. डॉ.जयंत नारळीकरांचे हे दूसरे पुस्तक मात्र हा नवखापणा त्यांचा लेखनात दिसत नाही. . जर समजा परग्रहवासी सापडले तर ते आपल्या पृथ्वीवरील व्यक्तींशी कसे वागतील? हे सांगता येणे अवघड आहे. ते प्रगत असतील तर आपल्याला प्रगत होण्यासाठी मदत करतील की, आपल्या पृथ्वीवर ज्याप्रमाणे प्रगत युरोपीय राष्ट्रांनी रेड अमेरीकन लोकांना त्रास देवून जवळपास नष्ट केले तसे आपणास नष्ट करतील याबाबत काहीच सांगता येत नाही.त्या पार्श्वभूमीवर पुस्तकाचे नाव विशेष महत्त्वाचे ठरते तसे बघायला गेले तर, "प्रेषित" यांचा अर्थ खरेतर देवाचांदूत या अर्थाने घेतला जातो. प्रेषित हा लोकांचे कल्याण करतो.तेच नाव त्यांनी आपल्या पुस्तकाला दिले आहे. त्यामुळे कांदबरीत वर्णन केलेला परग्रहवासी खरोखरच प्रेषित होतो का,? हे समजण्यासाठी पुस्तक वाचायलाच हवे.
अजिंक्य तरटे
9552599495
9423515400
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा