भारत चीन संबंधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफशियल इंटेलिजियन्स क्षेत्रात चीन करत असलेली प्रगतीमुळे काय फरक पडू शकतो आणि का फरक पडणार ? याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.तसेच गेल्या दोन वर्षापासुन सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धामुळे भारत आणि चीन राजनैतिक संबंधावर देखील हे पुस्तक भाष्य करते.या खेरीज भारताला चीनच्या विचारसरणीचे, आर्थिक लष्करी आणि राजकीय आव्हान भविष्यात कसे असेल या मुद्द्यांवर देखील या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे
या 360 पानांच्या पुस्तकाचे 4 भागात विभाजन करण्यात आले आहे. पहिल्या भागात इसवीसनाच्या पुर्वी दिड हजारापासून सन 1949मध्ये चीनमध्ये कम्युनिष्ट राजवट येण्यापर्यतच्या कालखंडातील चीनच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेण्यात आला आहे.कोणतीही एका देशातील राजकीय राजवट दुसऱ्या देशाच्या बाबत विशिष्ट अशी भुमिका का घेते ?हे समजण्यासाठी त्या देशातील ती विशिष्ट राजवट कोणत्या स्थितीत त्या देशात सत्ताधिकारी झाली ?हे माहिती असणे आवश्यक आहे.तसेच आताच्या राजवटीच्या भुमिकेशी त्याच्या आधीच्या राजवटीच्या भुमिकेचा काय संबंध आहे ?हे समजणे आवश्यक असते. हे माहिती करुन घेण्यासाठी आपल्याला दुसऱ्या प्रदेशाचा इतिहास माहिती असणे आवश्यक आहे असे स्पष्टीकरणलेखकाने चीनचा इतिहास मांडतांना प्रस्तावनेत दिले आहे सुमारे एक तृतीयांश पाने लेखकाने यासाठी खर्ची घातली आहेत.
दुसऱ्या भागात 1949ते 1989 या 40 वर्षात चीनमध्ये झालेले ग्रेट लिप फॉरवर्ड, सांस्कृतिक क्रांती सारखे उपक्रम तिआनमेन चौकातील आंदोलन, माओच्या कार्यकाळात झालेले अत्याचार ,त्याविषयीची सध्याच्या पिढीची मते ही मते होण्यामागची कारणे, तसेच जगात चीनविषयक दृष्टिकोन, माओचा चीनने जागतिक राजकारणात कोणते स्थान घ्यावे याबाबतची मते,चीन रशिया संबंध ,भारत चीन युद्ध ,त्यावेळच्या चीनची सामाजिक स्थिती, चीन पाकिस्तान राजनैतिक संबध ,रशिया चीन राजनैतिक संबंध माहिती देण्यात आली आहे यासाठी लेखकाने सुमारे 80 पाने खर्ची घातली आहेत.
तिसऱ्या भागात 1989 नंतरच्या काळात चीनने कोणत्या पद्धतीने प्रगती केली? त्या काळात भारतात असलेली राजकीय स्थिती कशी होती?या राजकीय स्थितीमुळे आपले चीनकडे कसे दुर्लक्ष झाले.याच दरम्याने सेव्हियत सोशालिस्ट रशिया आणि पुर्व युरोपातील साम्यवादी राजवटी कोसळत असताना चीनमध्ये साम्यवादी राजवट कशी काय शिल्लक राहिली ? तिआनमेन चौकातील आंदोलनामुळे चीनमध्ये निर्माण झालेली अस्थिरता चीनने कोणती आर्थिक पाउले उचलून दुर केली.डेन जिंपिंग, यांच्याकडून हु जिताओ ,शी जिनपिंग यांच्यकडे सत्तेचा पट कसा फिरला ? चीनचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या महत्तकांक्षा काय आहेत?चीनने त्याचा इतिहासाचा व्हिटीम कार्ड म्हणून कोणत्या खुबीने वापर केला ? चीनचा बेल्ट अँड रोड महाप्रकल्प काय आहे.चीनची ए.आय मधील प्रगती कसी झाली याविषयी 60पानातून आपणास माहिती मिळते.
चौथ्या भागात सुमारे 60 पानात लेखक भारत आणि चीन यांच्यातील राजनैतिक संबंध भविष्यात कसे असतील या राजनैतिक संबंधात आपणास कोणती आव्हाने पेलावी लागतील याविषयी चार प्रकरणातून माहिती देतो.पहिल्या प्रकरणात भारतीयांसह जगातील अनेकांना चीनच्या एकपक्षीय हुकुमशाहीचे वाटणारे आकर्षण आणि लोकशाहीत त्यामुळे होणारे बदल.चीनचा आपली प्रगती एकपक्षीय राजवटीमुळे झाली?हे सांगण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे भारतीयांवर पडणारा प्रभाव त्यांचा साम्यवादाकडे झुकणारा कल याविषयी सांगण्यात आले आहे. चीनचे भारताला असणाऱ्या आर्थिक आव्हान स्पष्ट करताना दुसऱ्या प्रकरणात भारत आणि चीन या दोन्ही देशातील अर्थव्यवस्थेचा आकार त्यांच्या वाढीचा वेग, दोन्ही अर्थव्यवस्थेतील जमेच्या आणि नकारात्मक बाबी याविषयी लेखक सांगतो तिसऱ्या प्रकरणात लेखक चीनचे राजनैतिक आणि लष्करी संकट याविषयी लेखक माहिती देतो.ज्यात दोन्ही देशांचा संरक्षणावर होणारा खर्च, संरक्षण होण्यासाठी दोन्ही देशांची सीमावर्ती भागातील विकासकामे, चीनच्या परराष्ट्र धोरणातील भारताचे स्थान, पाकिस्तान चीन मैत्री, त्या दोघांनी एकाचवेळी आक्रमण केल्यास होणारी भारताची स्थिती, भारताच्या महासत्ता होण्यात चीन कोणत्या प्रकारे अडथळा आणत आहे, आणि या अडथळ्याचा धोरणाची भविष्यातील वाटचाल कोणत्या प्रकारे होईल.याविषयी लेखकाने सांगितले आहे चौथ्या भागाच्या चौथ्या प्रकरणात लेखकाने पुस्तकाचा समारोप करताना भारताने चीनच्या प्रगतीमधून काय धडे घ्यावे ,हे सांगितले आहे
आपला खरा शत्रू पाकिस्तान नसून चीन आहे.त्यामुळे तेथील समाजजीवनाची आणि त्या देशाची विविध क्षेत्रात प्रगती कशी झाली? तसेच या प्रगतीचे पुढील टप्पे काय असतील?हे आपणास माहिती असणे अत्यावश्यक आहे.या बाबींची माहिती होण्यासाठी आपण हे पुस्तक वाचायलाच हवे.











