एकूण 87 गझल या काव्यसंग्रहात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्या सर्वच गझल खूपच सुंदर आहेत. उत्कृष्ट गझलेचा कसोट्या असणाऱ्या रदिक,काफिया आणि अलामत आणि वृत्त यांचे उत्तम भान या गझलांमध्ये राखलेले आपणास दिसते.सखोल आणि अथांग आशय याचा देखील यागझल रचनांमध्ये उत्तम पद्धतीने भान राखल्याचे या रचनांचे वाचन केले असता आपणास दिसते.
सोसताना उन्हाची काहीली
सावलीची धर्मशाळा पाहिली ओळखीच्या आरशाने जाणले
सुरकुत्यातुन ही जवानी राहिली
किंवा
असे कसे मनतले जाणतात पुस्तके
विचारही नवे -जूने खोडतात पुस्तके
जरी कधी न बोललो एकट्यात मोकळे
मनातल्या मनातही बोलतात पुस्तके
तसेच
ही जरी लाचार काही सोबतीची माणसे
वाटती आधार काही सोबतीची माणसे
वादळाला झेलताना भोवताली पाहिलीर काही सोबतीची माणसे
आणि
कोरडा उल्लेख ओल्या नात्याचा
बेगडी आवेष खोट्या नात्याचा
शद्ब काही क्षेपणास्त्र होताना
पाहिला विध्वंस नात्यानात्याचा
यासारख्या उत्कृष्ठ उत्तमोत्तर गझला या काव्य संग्रहात आहेत. या गझला सहजसोप्या मराठीत लिहलेल्या आहेत.त्यामुळे सहजतेने समजतात. पुस्तक खुप मोठे नाही तर 96 पानी आहे.तसेच प्रत्येक गझल स्वतंत्र्य पानावर असून एक गझल सुमारे एक तृतीयांश पानावर छापलेली आहेत.त्यामुळे पुस्तक एका दिवसात सहजतेने वाचूनहोते.सूट्टीच्या दिवशी एका दिवसात किंवा रोज रात्री झोपताना दहा पंधरा मिनीटे पुस्तक वाचल्यास आठवड्याभरात पुस्तक सहजतेने वाचून होते.गझल हा काव्यप्रकार समजून घेण्यासाठी हे पुस्तक आपणास खुप उपयोगी पडते,मग वाचणार ना हे पुस्तक.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा