बुधवार, ८ जानेवारी, २०२५

चरित्र भारताच्या अद्वितीय पंतप्रधानांचे ,नरसिंहालोकन'

         
 पी व्ही. नरसिंहराव.  स्वातंत्र्योत्तर भारताचा वाटचालीचा आढावा आपण जर पंतप्रधानानुसार घेण्याचे ठरवल्यास अग्रक्रमाने घ्यावेच लागेल असे नाव . स्वतः पंतप्रधान होण्याच्या आधीचे सरकार बहुमत नसल्यामुळे कोसळले  असताना, स्वतःचे अल्पमतातील सरकार देशावर मोठ्या  प्रमाणात बदल होतील  असा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आधीपेक्षा पूर्णतः विरुद्ध  निर्णय  घेऊन तो अमलात आणणे तसेच देशातील धार्मिक विद्वेष कडेलोटाच्या स्थितीवर जाऊन पोहोचला असताना ती स्थिती नियंत्रणात आणणे य सारखे  महत्वाचे निर्णय घेत   पूर्ण  पाच चालवण्याचा भीम पराक्रम करणारे पंप्रधान म्हणून आज आपण त्यांना ओळखतो . पी व्ही नरसिंहराव हे काँग्रेसचे नेहरू गांधी परिवार सोडून झालेले पहिले पंतप्रधान होय.त्य्नाच्याच कार्यकाळात आपण मुक्त अर्थव्यवसंस्थेचे धोरण स्वीकारले. भारताच्या इतिहासातील काळा अध्याय असलेला बाबरी मशिदीचे पडणे मुबंईत बॉम्बस्फोट होणे या घटना देखील त्यांच्याच कार्यकाळातील इतकी सारी आव्हाने असताना त्यांना स्वतःच्या काँग्रेस पक्षातील नेत्याच्या पाडापाडीच्या राजकारणाला देखील सामोरे जावे लागले  १० भारतीय भाषा आणि इंग्रजी आणि स्पॅनिश उत्तम प्रकारे बोलू शकणाऱ्या या पंतप्रधानचे विनय सीतापती यांनी लिहलेले आणि अवधूत डोंगरे यांनी मराठीत अनुवाद केलेले चरित्र मी नुकतेच नाशिकमधील मोठी सांस्कृतिक संस्था सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या मदतीने वाचले 
        संदर्भ शब्दसूचीचा अपवाद वगळता २८६ पाने असलेल्या  या पुस्तकात  १५ प्रकरणाद्वारे लेखकाने पी व्ही नरसिंहराव यांचे चरित्र आपल्यासमोर मांडले आहे . पुस्तकाचे पहिले प्रकरण सध्याच्या राजकारणात कळीचा मुद्दा होऊ शकेल अश्या काँग्रेसने नरसिंहराव यांच्या कायमद्वेषच केला का ? या मुद्याभोवती गुंफलेले आहे अर्धवट जळलेले पथिक असे शीर्षक असलेल्या या प्रकरणात नरसिंहराव यांचे निधन झाल्यावर त्यांचे अत्यंसंस्कार नवी
दिल्लीत का झाले नाहीत ? काँग्रेसकडून त्यांच्या कुटूंबियांच्या इच्छा कोणत्या प्रकारे अव्हेरण्यात आली. हे सांगण्यात आले आहे यानंतरच्या दुसऱ्या ते चवथ्या प्रकरणाप्रर्यंत त्याचे राष्ट्रीय राजकारणात प्रवेश कारण्यापर्यंतचे जीवनप्रवास सांगण्यात आला आहे ज्यामध्ये त्यांनी हैदराबादच्या निझामाविरोधात घेतलेला सहभाग त्यांनी भूषवलेले अंधरप्रदेशचे मुख्यमंत्रीपद मुख्यामंत्री पदावरून झालेली त्यांची गच्छन्ति त्या नंतर त्यांना भोगवायला लागलेला राजकीय संन्यास याविषयी सांगितले आहे 
           पाचव्या प्रकरणापासून चौदाव्या प्रकरणापर्यंत त्यांचे राष्ट्रीय राजकारण उलगडण्यात आले आहे तर शेवटच्या पंधराव्या प्रकरणात त्यांचा राजकीय  जीवनाचा सर्वसाधारण आढावा घेण्यात आला आहे  , पाचव्या प्रकारांपासून चौदाव्या प्रकरणापर्यंत पी व्ही नरसिंहराव यांच्या राष्ट्रीय जीवनाचा आढावा घेताना त्यांचे आणि गांधी परिवाराशी विशेषतः सोनिया गांधी यांच्याशी असणारे संबंध , त्यांच्या गळ्यात मारलेले  काँग्रेसचे अधयाक्षपद ते पंतप्रधानपदी येण्याच्या आधी त्यांनी भूषवलेली विविधे केन्द्रीय मंत्रीपदे  त्यांना एका मठाकडून आलेली अध्यक्ष होण्याची देण्यात आलेली संधी ,पंतप्रधानपदी आल्यावर त्यांनी जागतिक परिस्थितीचे भान राखत भारताच्या परराष्ट्र  धोरणात केलेला बदल ,भारताला अण्वस्त्रक्षम
करण्यासाठी त्यांनी उचललेली  पाऊले  तसेच लेखाच्या सुरवातीला सांगितले तसे अयोद्धा प्रकरण , मुक्त अर्थव्यवस्था  यांची त्यांनी केलेली सोडवणूक, त्यांनी केलेले प्रशासनातील बदल सांगितले आहेत शेवटच्या सिंह कोल्हा मूषक असं शीर्षक असेल्या पंधराव्या प्रकरणात त्यांनी स्वनुभावातून तयार केलेली राजकीय नीतीवर लेखकाने प्रकाश टाकला आहे 
          सध्या राजकीय नेते आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी एकमेकांवर आरोप करतात आता जिवंत नसलेल्या व्यक्तीविषयी विविध दावे प्रतिदावे करतातत्यामुळे आपला गोंधळ होऊ शकतो तो गोंधळ न होण्यस्साठी वस्तुस्थिती आपणस माहिती असणे आवश्यक ठरते . हि वास्थुस्थिती माहिती करून घेण्याच्या उत्तम उपाय म्हणजे त्यांचे चरित्र आत्मचरित्र वाचून घेणे आणि त्यासासाठीच हे पुस्तक किमान एकदा तरी वाचलेच पाहिजे  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रत्येक कुमारवयीन मुला- मुलीने वाचलेच पाहिजे असे पुस्तक ' यस आय एम गिल्टी'

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कुमारवयीन टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा ठसा त्यांच्या पुढील संपूर्...