शनिवार, ३१ मे, २०२५

'केजीबी' रशियन गुप्तहेर संघटनेचा सविस्तर वृतांत

        केजीबी ....शीत युद्धाचा काळातील दोन महासत्तापैंकी एक असलेल्या  यू.एस.एस.अर
 अर्थात युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट ऑफ रिपब्लिक या देशाची  इस्राइलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनासारखीच प्रसिद्ध असलेली गुप्तहेर संघटना यु.एस.एस.आर ची शकले होवून  स्वतंत्र्य१४ देश निर्माण झाल्यावर पुर्वी केलेल्या कृष्णकृत्यांमुळे प्रसिद्ध झालेली संघटना, केजीबी .या केजीबीची सविस्तर आणि खऱ्या माहितीच्या पुस्तकांचा  आपल्या मराठीत काहीसा अभावच .मात्र ही पोकळी भरुन निघते आपल्या मराठीत अनेक उत्तोमोत्तम पुस्तके प्रसिद्ध करणाऱ्या मधूश्री प्रकाशनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेले केजीबी  या पुस्तकामुळे .नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या घोटी या छोटयासा गावात मुख्यालय असलेल्या मधूश्री प्रकाशनाकडून मराठी भाषेत अच्युत गोडबोले यांची अनेक पुस्तके तसेच विविध तांत्रीक विषयावरची अन्य लेखकाची पुस्तके, आणि सीआयए, मोसाद एफबीआय, रॉ या सारख्या गुप्तहेर संघटनांवर माहितीपुर्ण पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली आहेत‌.त्यातील केजीबी वरचे पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील सर्वात मोठे वाचनालय असलेल्या, सावाना अर्थात सार्वजनिक वाचानलय नाशिक यांचा संग्राहलयातून वाचले.

     
मुळ इंग्रजी भाषेत एन चोक्कन यांनी लिहलेल्या या पुस्तकाचे सुदर्शन आठवले यांनी मराठीत केलेले भाषांतर म्हणजे सदर 132पानाचे हे पुस्तक होय‌.या 132 पानाच्या छोटेखानी पुस्तकात 17प्रकरण आणि 2 परिशिष्टाद्वारे केबीजी या गुप्तहेर संघटनेच्या स्थापनेची पार्श्वभुमी, स्थापनेनंतर झालेला विकास,  या संघटनेने केलेल्या स्वत:च्याच देशातील नागरिकांच्या हत्या, संघटनेने केलेल्या कृष्णकृत्ये जगासमोर आणण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न ,या संघटनेला वेळोवेळी दिलेले आणि काही प्रसंगी काढून घेतलेले अधिकार,या संघटनेची प्रशासकीय रचना आणि त्यात वेळोवेळी झालेले  बदल ,यु.एस.एस.आर मधील नागरिकांच्या संघटनेविषयच्या मतांमध्ये वेळोवेळी झालेला बदल,या संघटनेत कार्यरत असणाऱ्या नागरिकांचा स्वत:च्या संघटनेविषयीची मते,केजीबी या संघटनेने दुसऱ्या देशात पसरवलेले गुप्तहेरांचे जाळे,केबीजीच्या विरोधात अन्य देशाकडून झालेल्या कारवाया,यु.एस.एस.आर च्या पतनानंतर संघटनेचे विद्यमान स्वरूप याविषयी आपणास माहिती मिळते.अनुवादीत पुस्तकाची भाषा सहजसोपी आहे.जी वाचून लगेच समजते.ओघवत्या भाषेत लिहलेल्या, या पुस्तकाचे वाचन केल्यास आपणास, केजीबीच्या पुर्वसुरी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,  चेका, ओजीपीयू, एनकेव्हीडी, जीयूजीबी,एनकेजीबी, एनजीबी, केआय,एमव्हीडी, या संघटनांची माहिती मिळते.
मराठीत गुप्तहेरांच्या कथा काही प्रमाणात असली तरी मराठीत गुप्तचर संघटनांची माहिती देणारी पुस्तके खुपच कमी आहेत. या अत्यंत मोजक्या पुस्तकांमध्ये समावेश होणारे हे पुस्तक आपण आंतराष्ट्रीय राजकराणात दिसते तसे मुळीच नसते, मित्र म्हणवणारी राष्ट्रे देखील एकमेकांच्या प्रदेशातच हेरगिरी करते.यासारख्या अनेक गोष्टीची माहिती मिळते. तरी या गोष्टीची माहिती करुन घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.
,
 
 

गुरुवार, २२ मे, २०२५

प्रत्येकाने वाचावाच असा ग्रंथ 'लोकमान्य ते महात्मा'

आपल्या मराठीला उत्तमोत्तम संदर्भग्रंथांची  मोठी दिर्घ परंपरा आहे‌.महाराष्ट्राच्या, भारताच्या जगाच्या इतिहास,सामाजिक जीवन,राजकीय जीवन यावर सविस्तर सखोलपणे माहिती देणारी कितीतरी ग्रंथ आपणास मराठीत आढळतात. त्याच प्रमाणे सुरवातीला एखाद्या दैनिकात,साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्त लेख मालिकेचे कालांतराने पुस्तक प्रसिद्ध केल्याचा समृद्ध इतिहास देखील मराठी पुस्तक विश्वाला आहे‌.आपल्या मराठीत असी अनेक पुस्तके आहेत जी ही दोन्ही निकषे, संदर्भ ग्रंथ  म्हणून उत्तम मुल्य आणि प्रथमत: मालिका स्वरूपात प्रसिद्धी नंतर पुस्तक रुपाने प्रसिद्धी हे पुर्ण करतात.पुस्तकाची गुणवत्ता उत्तम आहे हे दाखवणाऱ्या या दोन्ही निकषांची पूर्तता करणाऱ्या पुस्तकांच्या मांदियाळीतील मुकुटमणी होईल असे पुस्तक म्हणजे राजहंस प्रकाशनातर्फे आणि ज्येष्ट विचारवंत ,लेखक प्राध्यापक डॉ सदानंद मोरे यांनी लिहलेले लोकमान्य ते महात्मा हे पुस्तक. मोठ्या आकाराच्या सव्वा साडे सहाशे पानाच्या या पुस्तकाच्या दोन भागापैकी पहिला भाग मी नुकताच नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सार्वजनिक वाचानालय नाशिक अर्थात सावाना च्या ग्रंथ संग्राहालयाच्या मदतीने  वाचला. 
या ग्रंथाविषयी याच्या आधीच अनेकदा अनेक माध्यमात कित्येकांनी लिहलयं त्यामुळे या ग्रंथात काय आहे,हे आपणापैकी अनेकांना माहिती असणारचं. हे लेखन वाचणाऱ्यांपैकी बऱ्याच लोकांनी हा ग्रंथ सुद्धा वाचला असेल.याचा विचार करता मी हा ग्रंथ खुपच उशिरा वाचला असे कोणी म्हटत असल्यासह त्यात वावगे ठरणार नाही.मात्र देरसे आयें मगर दुरुस आये या हिंदी वाक्यप्रचारानुसार अखेर का होईना ,मी हा ग्रंथ वाचला हे उत्तम असे म्हणूया. आधीच सांगितल्यानूसार हा खुप प्रसिद्ध आणि बराच जूना संदर्भ ग्रथ असल्याने याच्याविषयी आधीच माहिती आहे असे समजून यात काय आहे, हे सांगण्यात मी वेळ घालवू इच्छित  नाही.मी मला हा ग्रंथ वाचून काय वाटले हे सांगतो  तरी जेन झी जनरेशनसाठी सांगायचे झाल्यास इसवीसन 1908ते इसवीसन 1945/48 पर्यत महाराष्ट्राचे भारतातील महत्त्व कसे बदलत गेले तसेच महाराष्ट्रातील जातीय राजकारण ,समाजकारण कसे बदलत गेले याविषयी सांगण्यात आले आहे असो
   तर मित्रानों या ग्रंथाच्या वाचनातून मला ब्राह्मण ब्राह्मणेत्तर संघर्ष त्याच्या विविध पैलुंसह समजला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज निर्मितीच्या कार्याचे विविध राजकीय पैलू, तेथून महाराष्ट्राने देशाला दिलेली दिशा, महाराष्ट्रातील विकासात ब्राह्मणांचे त्यातही अधिक ठळकपणे बोलायचे झाल्यास कोकणस्थ ब्राह्मणांचे योगदान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्मितीची पार्श्वभूमी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू महासभा यांच्यातील अन्योन्य संबंध,लोकमान्य टिळकांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या अनुयनांचा उडालेला गोंधळ ,लाल बाल पाल या देश पातळीवर महत्त्वाच्या तीन नेत्यांपैकी एक असलेल्या लोकमान्य टिळकाच्या निधनानंतर महाराष्ट्र पुन्हा देशपातळीवर सर्वमान्य होईल असे नेर्तत्व का उभा करु शकला नाही. लोकमान्य टिळकांच्या नंतर महाराष्ट्रात उदयास आलेले नेर्तत्व कसे विशिष्ठ जनसमुदायापर्यतच सिमित मर्यादीत का राहिले‌ ?महात्मा गांधीचा खुन एका महाराष्ट्रीय व्यक्तीने केल्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा देशपातळीवर कशी डागळली  या कलंकित प्रतिमेमुळे महाराष्ट्राला काय सोसावे भोगावे लागले या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली‌.नाही म्हणायला सदर ग्रंथातील लेख जेव्हा मालिकेच्या स्वरुपात साप्ताहिक सकाळमध्ये प्रसिद्व होत होते.त्यावेळी काही लेख वाचले होते‌.मात्र तेव्हाची माझी राजकीय समज यथातथाच असल्याने आणि तेव्हा लेख सलगपणे न वाचल्यामुळे मला फारसे समजले नव्हते.तेव्हापासून आतापर्यतचा विचार करता तूकड्यात न वाचता सलगपणे वाचणे आणि  यू.पी.एस.सी च्या परीक्षेमुळे आलेली समज,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  पुणे  विद्यापीठातून घेतलेल्या शिक्षणामुळे वाढलेले आकलन यामुळे तेव्हापेक्षा मला यावेळी हा ग्रंथ अधिअ उत्तमतेनेह समजला असे म्हटल्यास ते चूकीचे होणार नाही .
पूर्वी वाचले तेव्हा जेव्हढा ग्रंथ समजला त्यापेक्षा अधिक व्यापकतेने समजण्यासाठी या ग्रंथाचे पुनर्वाचन करण्यासाठी आणि महाराष्ट सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी हा ग्रंथ वाचावाच असे मी जाताजाता सांगू इच्छितो.


मंगळवार, १३ मे, २०२५

भारताच्या कुटनितीची माहिती देणारे पुस्तक, 'रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गुढकथा'

           सध्याचा भारत पाकिस्तान तणावाच्या काळात, युद्धाच्या बातम्या बघताना आपणास अरे अपल्या लष्कराला पाकिस्तानमधील दहशतवादी तळाची अचूक ठिकाणे कशी काय समजतात? असा प्रश्न पडू शकतो.तर याचे उत्तर आहे आपली गुप्तहेर संघटना, रिसर्च अँड अँनलिसीसस अर्थात रॉ या संघटनेचे जाळे.आपण अनेकदा इस्राइलची गुप्तहेर संघटनेच्या कारवाया ऐकतो‌ याच पद्धतीचे कामकाज करणारी मात्र अनेकदा पडद्याआड राहणारी संघटना म्हणजे रॉ.मराठीत न च्या बरोबर आणि इंग्रजीतसुद्धा मोजकेच लेखन झालेल्या रॉचे कार्य  नक्की कसे  चालते‌? देशहितासाठी त्यांनी आतापर्यत कोणते कार्य केले आहे? हे अचूकपणे समजून घेयचे असेल तर आपणास मनोविकास प्रकाशनाच्या 'रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गुढकथा' हे पुस्तक खुप उपयोगी पडते. सध्या मुंबई सकाळ चे संपादक असलेले  ज्येष्ठ पत्रकार रवी आमले या पुस्तकाचे लेखक आहेत. रवी आमले यांनी 300 पानांच्या या पुस्तकातून 24 प्रकरणाद्वारे
रॉ ने केलेल्या कार्याची ओळख करून दिली आहे. मी नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावानाच्या सहकार्याने नुकतेच हे पुस्तक वाचले.
         अत्यंत सहजसोप्या भाषेत  लिहलेल्या या पुस्तकात, प्राचीन भारतातील गुप्तहेरांचे कार्य कसे चालायचे? आर्य चाणक्य यांनी गुप्तहेरांबाबत काय लिहलेले आहे‌.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात गुप्तहेरांचे कार्य, ब्रिटीश राजवटीत गुप्तहेर संघटनांची सुरवात कोणत्या पद्धतीने झाली. स्वातंत्र्योत्तर भारतात गुप्तहेर संघटनांचा प्रवास कोणत्या पद्धतीने झाला .इंटेलिजियन्स ब्युरो कार्यरत असताना रिसर्च अँड अँनलिसीसस अर्थात रॉ च्या स्थापनेची गरज का निर्माण झाली.रॉचे कार्य कसे विस्तारत गेले.रॉने श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान तसेच बांगलादेशात कोणकोणत्या मोहिमा राबवल्या.सिक्किमच्या विलीनीकरणात रॉ ची काय भुमिका होती,याविषयी माहिती मिळतेच त्याच बरोबर इशान्य भारतातील बंडखोरी मोडण्याबाबत रॉने आखलेल्या मोहिमा, रॉ चे इंदिरा गांधीची हस्तक या दृष्टिकोनातून कसे खच्चीकरण करण्यात आले.काश्मीर मधील दहशतवाद्यांचा विरोधात रॉ ने कोणत्या मोहिमा राबवल्या.
पाकिस्तानात भारतविरोधी शक्तींना कोणत्या प्रकारे नेस्तनाबुत केले. पाकिस्तानमधील फुटीरतावादी गटांना कोणत्या प्रकारे छूपी मदत केली याविषयी सुद्धा माहिती देण्यात आली आहे.
   पुस्तकाच्या शेवटी जोडण्यात आलेली संदर्भ ग्रंथसुची तब्बल 11पानांची आहे.एव्हढ्या मोठ्य संदर्भ सुचीमुळे लेखकाने पुस्तक लिहण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत,हे सोदाहरण स्पष्ट करते. पुस्तक रॉ सारख्या देशाच्या दृष्टीने  महत्त्वच्या गोष्टीबाबत असल्याने गोपिनयतेमुळे अनेक गोष्टी उघड करता येत नाही तसेच काही गोष्टींची खात्रीशीर   माहितीच मिळत नसल्याने काही गोष्टींचा समावेश पुस्तकात करता येत नसल्याची कबुली लेखकाने आपल्या मनोगतातच दिली आहे.मात्र लेखकाच्या लेखनशैलीमुळे आपणापासून काही माहिती लपवली आहे,असे वाचकांना वाटतचं नाही.वाचकांना खिळवून ठेवण्यात लेखक यशस्वी ठरला आहे.वाचकांना ज्ञानाची गुहाच उलगडत असल्याचा अनुभव पुस्तक वाचताना येतो (किमान मला येतो)
  पाकिस्तानने भारताच्या काश्मीर भागातच नव्हे तर इशान्य भारतातील अनेक फुटीरतावाद्यांना संघटनांना दहशतवादी संघटनांना 1 956 पासूनच कोणत्या मा़ध्यमातून तसेच कोणत्या प्रकाराची मदत केली आहे? तसेच आंतरराष्ट्रीय राजकरणात दिसते ते सर्व खरे नसते.किंबहुना दिसते त्याचा पुर्णपणे 180 अंशात उलटी असणारी परिस्थिती ही सत्यस्थिती कसी असते‌ ज्याप्रमाणे  समुद्रातील हिमनगाचा फक्त 10 टक्के भागच वरती दिसतो त्या प्रमाणे कोणत्याही देशातील गुप्तहेर संघटनांचे कार्य कसे चालते‌.कोणत्याही देशात कोणत्या प्रकारच्या व्यक्ती हेरागिरीसाठी उपयुक्त असतात. गुप्तहेर फितूर का होतात? आपल्या 
 रॉ ला या प्रकारचा अनुभव आलेला आहे का? आलेला असल्यास त्याचा सामना रॉने कसा केला यासरख्या प्रश्नाची उत्तरे माहिती करुन घेयची असल्यास हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे‌

समाजाचे दाहक चित्र दाखवून देणारे पुस्तक 'बलुतं'

मी या २०२६ वर्षी प्रामुख्याने आत्मचरित्र,चरित्र वाचण्याचे ठरवले आहे, हे एव्हाना तुम्हाला माहिती झालेच असेल. तर याचा मालिकेत समाविष्ट होणारे ...