रविवार, ३० नोव्हेंबर, २०२५

शोध एका प्रग्लभ आणि विक्षीप्त व्यक्तीमत्वाचा 'प्यासा'

काही व्यक्तिमत्त्वे मोठी विलक्षण असतात. त्यांच्या विषयी कितीतरी वेळा, कितीतरी वेळ बोलत राहिलो. लिहीत राहिलो तरी दरवेळी त्यांच्याविषयी काय लिहायचे ,काय बोलायचे याचा विचार केला तर दरवेळी कोणतातरी वेगळा मुद्दा , व्यक्तिमत्त्वातील आतापर्यंत फारशा चर्चित ना गेलेला पैलू आपणस गवसतो . आणि आपल्याला या  व्यक्तिमत्त्वाची पूर्ण माहिती झाली आहे.असे वाटत असताना आपणाला या व्यक्तीची पुरेशी माहिती नाही याची जाणीव होते. आज ३० नोव्हेंबर २०२५ रोजी  रात्री साडेदहाच्या सुमारास हा मजकूर लिहीत असताताना  ज्यांचे निधन होऊनच ६० वर्ष झाली आहेत, तरी   ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय बॉलिवूवंडचा इतिहासच लिहिता येणार नाही.  किंबहुना त्यांना  वगळून इतर सर्व व्यक्तींची माहिती लिहिली तरी त्या इतिहासाची किंमत सकाळी शौचास बसण्यासाठीचा कागद अशीच करावी लागेल असे बॉलिवूवडमधील सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक, सिने निर्माते, सिने अभिनेते, सिने दिग्दर्शक असा सर्वच क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या वसंतकुमार शिवशंकर पदुकोण उपाख्य गुरुदत्त यांचा समावेश  अश्याच काही विलक्षण व्यक्तिमत्वांमध्ये करावा लागेल. 

तर या विलक्षण प्रतिभेच्या मात्र त्यावेळी चक्रम, सटकलेले व्यक्तिमत्त्व  म्हणून  ज्यांना आपण सहज ओळखू शकतो  अश्या वंसतकुमार शिवशंकर पदुकोण उपाख्य गुरुदत्त यांच्या चित्रपट निर्मितीतील आणि वैयक्तिक आयुष्यातील प्रवास सांगणारे राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले सुधीर नांदगावकर लिखित ' प्यासा'हे पुस्तक मी नुकतेच वाचले. गुरुदत्त यांचा आकस्मित मृत्य झाल्यावर त्याचा घरी सर्वात पहिले जे पत्रकार पोहोचले होतेत्यापैकी एक म्हणजे म्हणजे पुस्तकाचे लेखक सुधीर  नांदगावकर होते अर्थात ती त्यांच्या करियरची सुरवात होती.करियरच्या उमेदवारीचा  काळात त्यांना त्यावेळच्या बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाला अर्थात गुरुदत्तला भेटण्याची इच्छा होती जी त्यांना त्या गुरुदत्तच्या निधनाच्या वेळी त्या ठिकाणी सर्वात  पहिले पोहोचून मिळाली असो 

  ३०८ पानाच्या या पुस्तकातून २५ प्रकरणातून लेखकाने गुरुदत्त यांचे विवाहपूर्व कौटुंबिक जीवन विवाहापश्चात त्यात झालेले विनाशकारी बदल  सुरवातीची आर्थिक स्थिती , त्यांचे नृत्य विषयक शिक्षण त्यांच्या चित्रपट श्रुष्टीतील प्रवेश ,चित्रपट श्रुष्टीत होणारे बदल त्यांनी कोणत्या प्रकारे बघितले ? इतरांना कोणत्या प्रकारे बघायला लावले ? पहिल्यांदा भागीदारीत आणि नंतर स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था कोणत्या प्रकारे काढली ? चित्रपट निर्मितीसाठी ते कोणत्या प्रकारे अभ्यास करत ? सहकलांकारांविषयी त्यांची मते,भूमिका काय होती ? त्यांची

चित्रपट निर्मिती कोणत्या प्रकारे घेत ? गीता दत्त  यांच्याशी त्याचे संबंध का दुरावले ? संबंध दुरावू नयेत यासाठी गुरुदत्त यांनी काय प्रयत्न केले ?  गीता दत्त यांच्याशी संबंध दुरवण्यामागे गुरुदत्त यांनी त्यांना गाण्यास केलेला विरोध, गीता दत्त यांच्या मनात वहिदा रेहमान यांच्याविषयी असलेली  अधी गुरुदत्त त्यांणी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात झोकून दिल्यामुळे त्यांचे संसाराकडे झालेले दुर्लक्ष आणि सरतेशेवटी दक्षिण मुंबई  उच्चभू परिसरातील पेडर रोडमधील घरात झालेला  मृत्यू याविषयी सांगते. पुस्तकाच्या अखेरच्या २५ व्या प्रकरणाच्या शेवटच्या काही पानांत लेखकाने गुरुदत्त यांचे अचानक झालेले निधन ही आत्महत्या नव्हती तर तो हार्ट अटॅकच होता हे गुरुदत्त यांचे फॅमिली डॉक्टर रिबिनो यांचा हवाला सांगितले आहे . 


गुरुदत्त यांच्या विषयीची दोन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत गुरुदत्त यांच्या चित्रपट निर्मितीविषयी सांगणारे ग्रंथाली प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि अरुण खोपकर लिखित 'गुरुदत्त तीन अंकी शोकांतिका' हे पहिले पुस्तक  आणि सत्या सरन यांनी लिहलेले त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करणारे 'त्या १० वर्षातील गुरुदत्त' .हि पुस्तके त्यांत माहितीपूर्ण असली तरी गुरुदत्त यांच्या एकाच पैलूवर प्रकाश टाकतात . मात्र रोहन प्रकर्षानतर्फ़े प्रकशित या पुस्तकात आपणास वंसतकुमार शिवशंकर पदुकोण उपाख्य गुरुदत्त यांच्या वैयक्तिक आणि चित्रपट निरिटी अश्या दोन्ही पैलूंची ओळख होते. त्यामुळे हे पुस्तक या दोन्ही प्रसिद्ध पुस्तकांपेक्षा काहीसे वेगळे ठरते मग वाचणार ना हे पुस्तक ! 

गुरुदत्त तीन अंकी शोकांतिका' या पुस्तकाविषयी मी लिहलेले वाचण्यसासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartebookreview.blogspot.com/search/label/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%20%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4?updated-max=2018-11-20T23:48:00-08:00&max-results=20&start=4&by-date=false


त्या १० वर्षातील गुरुदत्त' .' या पुस्तकाविषयी मी लिहलेले वाचण्यसासाठी पुढील लिंकवर क्लिक करा


https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2018/11/blog-post.html


अजिंक्य तरटे 

९५५२५९९४९५ 

९४२३५१५४०० 





 



 
 


मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५

मानसशास्त्राची सर्व बाजूने सविस्तर आणि रंजक पद्धतीने माहिती देणारे पुस्तक 'मनात'

मानसशास्त्र , आपल्या शरीरातील सर्वात विस्मयकारी अवयवव असलेल्या मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. काही अपवाद वगळता प्रामुख्याने कला शाखेच्या विद्यर्थ्यांनी शिकण्याचा विषय म्हणजे मानसशास्त्र . आता काही परिस्थिती वेगाने बदलतीये, अनेक हुशार विद्यार्थी ठरवून कला शाखेत प्रवेश घेत आहेत. मात्र पूर्वी ज्याला इतर कुठे प्रवेश मिळाला नाही, अश्या विद्यार्थ्यांनी पदवी मिळवण्यासासाठी कुठे प्रवेश घ्यावा तर कला शाखेत. आणि अश्या कला शाखेतील एक विषय म्हणजे मानसशात्र . मुळात  हा विषय ज्या शाखेत प्रामुख्याने शिकवला जातो ती शाखाच दुर्लक्षित त्यामुळे विषयाकडे सुद्धा दुर्लक्ष होणे आलेच. मात्र आपल्या सर्व हालचालीवर , वर्तनावर, अन्य लोकांशी असलेल्या नातेसंबंधावर भावनांवर, पर्यायाने आपल्या संपूर्ण आयुष्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणारा महत्वाचा घटक म्हणजे मानसशास्त्र  हि जाणीव सध्या मोठ्या प्रमाणात विकसित होत असल्याने सध्या विविध आस्थापनात नोकरी भरती करणाऱ्या व्यक्ती आपण ज्यांना भरती करून घेत आहोत र्त्यांची मानसिक स्थिती काय आहे ? हे विविध चाचण्यांतून समजून घेत आहेत. 

त्यामुळे आपल्या सर्वाना मानसशास्त्राची किमान तोंडओळख असणे सध्याच्या काळात आवश्यक आहे. आपल्या दुर्दैवाने आपल्या मराठीत सर्वसामान्यांना उपयुक्त ठरेल, समजेल अश्या पद्धतीने आणि प्रकारची मानसशात्राची  माहिती देणाऱ्या पुस्तकाची मोठ्या प्रमाणात वाणवा आहे. आपल्या मराठीतील मानसशास्त्राची माहिती देणारी बहुसंख्य पुस्तके अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने लिहण्यात आलेली आहेत ज्यामुळे ज्याला मानसशास्त्राची  फक्त तोंड ओळख करून घेयचीआहे त्यात पारंगत होण्याची इच्छा नाही त्याला देखील  कारण नसताना रटाळ पुस्तके वाचावी लागतात.तसेच या पुस्तकाची भाषा देखील परिभाषेत अडकलेली असल्याने समजायला अडचण येते. याला ऊत्तर काय तर  जे मानसशास्त्राचे अभ्यासक नाही अश्या सर्वसामान्य व्यक्तींना उपयुक्त ठरेल अश्या पद्धतींची माहिती ती देखील रंजक पद्धतीने देण्यात आलेली पुस्तके वाचणे आणि या कामात आपल्याला मदत करते . अर्थशास्त्र, संगीत, अकाउंटिंग, गणित नॅनो टेक्नॉलॉजी, ए  आय, साहित्य, नैसर्गिक शात्राच्या विविध शाखा, व्यवस्थापनशास्त्र, मानसशास्त्र  अश्या विविध क्षेत्रातील  विविध बाबींवर मराठीत सहजसोप्या  मराठीत माहितीपूर्ण पुस्तके लिहणाऱ्या अच्युत गोडबोले यांनी लिहलेले 'मनात हे पुस्तक. जे मी नुकतेच वाचले 

अच्युत गोडबोले यांच्या इतर पुस्तकांप्रमाणेच याही पुस्तकात वापरलेल्या भाषसेबाबत त्यांना पूर्ण मार्क देणे आवश्यकच आहे.  याही पुस्तकांची भाषा सहजसोपी ज्याला मानशास्त्राची काहीही पार्श्वभूमी नाही, अश्या त्यांना देखील या शास्त्राची मोठ्या प्रमाणात माहिती करून देणारे पुस्तक म्हणून पण या पुस्तकाकडे बघू शकतो. क्रमिकपुस्तकात असलेला बोजडपणा या पुस्तकात आढळत नाही. पुस्तक सोप्या भाषेत लिहायचे आहे मग करा माहितीत काटछाट, हाही मुद्दा या पुस्तकात आढळत नाही. यात संगीतलेल्या घटकांविषयी मोठ्या प्रमाणात सविस्तर माहिती या पुस्तकातून आपणास मिळते. पुस्तक विविध विभागात विभागले आहे. त्यामुळे जर आपणास एखद्या ठराविक घटकाचीची माहिती हवी असेल तर आपण तो शोधू शकतो, प्रत्येक  विभाग प्रकरणात विभागाला आहे त्यामुळे विषय समजण्यात काहीही अडचण येत नाही. या पुस्तकात एकूण १७ विभाग आहेत. प्रत्येक विभाग हा स्वतंत्र्य पुस्तक म्हणून बघितला तरी हरकत नसावीअशी या पुस्तकांची रचना आहे ढोबळमानाने मानसशास्त्रावरच्या  १७ वेगवेगळ्या पुस्तकांचे एकत्रयीपणे छापलेले ७०० पानाचे पुस्तक म्हणजे सदर पुस्तक होय . मन कितीही अथांग आह. आपण त्यापैकी किती लहान भाग जाणतो ,हे सांगणारे पुस्तकाचे निळसर हिरव्या रंगातील हिमनगाच्या पार्श्वभूमीवरील मेंदूचे छायाचित्र आपणास पुस्तकाकडे सहजतेने खेचून घेते. 

अच्युत गोडबोले यांचे  मानसशास्त्रावरील मी वाचलेले हे सहावे पुस्तक. मी आधी अच्युत गोडबोले यांची मानसशास्त्रावरील मनकल्लोळ  भाग १ आणि २ ,सायकोथेरपीज . ऑटिझम, संवाद ही पुस्तके वाचली आहेत . मात्र मनात या पुस्तकातील माहिती उचलून पुन्हा दिली आहे. असे आढळत नाही. अपवादात्मक स्थितीत माहिती पुन्हा दिल्याचे आढळते मात्र याचे प्रमाण २ ते अडीच टक्क्याच्या पुढे नाही त्यामुळे त्याकडे दुर्लक्षच केलेले बरे असो .या पुस्तकात आपणास  भारतीय संस्कृतीतील मानसशास्त्राविषयक दृष्टिकोन , युरोपीय आणि अमेरिकन मानशास्त्रज्ञांनी केलेला अभ्यास, त्यांनी मांडलेल्या विविध संकल्पना, मानसिक आरोग्याचा आणि विकारबाबत झालेले वेगवेगळे संशोधन , या संशोधनाचे विविध टप्पे, विविध मानसिक विकारांचे ,आजारांची,व्याधींची माहिती , मानसिक आजार बरे व्हावे किंबहुना होऊच नये  यासाठी कोणते मानसशास्त्रीय उपाय  योजले जातात  मानसशास्त्रांच्या विविध उपशाखांची माहिती, तसेच मानसशास्त्राशी जवळचा संबंध असलेले भावनांक, बुध्यांक  आदी विषयांची माहिती देण्यात  आली आहे.

भारतीय संस्कृतीतील मानसशास्त्राविषयक दृष्टिकोन सांगताना लेखकाने हिंदू धर्म ,बौद्ध धर्म, जैन धर्म अन्य पारंपरिक बाबींची माहिती दिली आहे .तसेच भारतीय सारखीच प्राचीन संस्कृती असलेल्या ग्रीक संस्कृतीतील मानसशास्त्राविषयक तसेच मनोरुग्णालायची स्थिती कशी सुधारत गेली मनोविकाराविषयी माहिती पहिल्या भागात सांगितली आहे दुसऱ्या भागात मेंदू आणि मज्जसंस्र्थानची माहिती देण्यात आली आहे तिसऱ्या आणि चवथ्या भागात अनुक्रमे सिग्मनफ्राईड पर्यतची मानसशास्त्राची वाटचाल आणि सिग्मनफ्राईड आणि युंग यांनी घातलेली भर सांगण्यात आली आहे. भाग क्रमांक ५ ,७, ,८,९ आणि १० मध्ये एक्सपिरिमेंटल सायकोलॉजी गेस्टेलास्ट सायकोलॉजी, डेव्हल्पमेंटल सायकोलॉजी, सोशल सायकोलॉजी ह्युमिनिस्टिक सायकोलॉजी यांची याचा क्रमाने माहिती देण्यात आली आहे सहाव्या भागात बिव्हेरिझम ची माहिती लेखकाने दिली आहे तर ११ व भाग आणि १२ तसेच भाग १३ वा अनुक्रमे बुध्यांक , व्यक्तिमत्व आणि भावना या घटकावर भाष्य करतो. १४ आणि १५ व भाग पुन्हा एकदा आपणांला अनुक्रमे कोंगीटीव्ह आणि परस्पेशन या मानसशास्त्राच्या उपशाखांबाबत माहिती देतो. शेवटून दुसरा भाग ऑटिझम,ओसीडी फोबिया, स्किझोफेनिया, डिप्रेशन, चिंता या आजाराविषयी माहिती देते .तर शेवटचे १७ वे प्रकरण विविध उपचार पद्धतीच्या थेअरीविषयी  आपणास माहिती देते 

लेखाच्या सुरवातीला सांगितले  त्या परिमाणे मानसशास्त्र  सध्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्याने आपणास या विषयाची तोंड ओळख होण्यासाठी आपण हे पुस्तक वाचायलाच हवे

सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५

मानवी भूगोलाच्या दुर्लक्षित उपशाखेला अर्थात वाहतूक भूगोल ला समर्पित दिवाळी अंक 'भवताल'

आपल्याकडे शहाणपण ज्या कारणाने येते, त्यामध्ये केल्याने देशांतरण या  घटकाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.  आपल्या मराठीत मीना प्रभू, पु. ल . देशपांडे या सारख्या काही लेखकांनी त्याच्या प्रवासाची वर्णने लिहून त्यांना भेट देताना काय काय अनुभव आले आहेत. हे सांगितले आहेच.  मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रात समावेश होणाऱ्या कल्याण, पनवेल आदी क्षेत्रातून रोज हजारो नागरिक मुख्य मुंबई शहरात येतच असतात, आपल्याकडे धार्मिक हेतू मनात ठेवून ज्या यात्रा आयोजित करण्यात येत असतात . त्यामध्ये आपणास मोठ्या प्रमाणात प्रवास देखील करावा लागतो. असे असून देखील भूगोलाच्या दोन मुख्य शाखांपैकी एक असलेल्या मानवी भूगोलाची एक उपशाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'वाहतूक भूगोल या विषयात त्याचा समावेश करून आपण या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र ज्याप्रमाणे  जेव्हा मोठ्या प्रमाणात अंधार असतो तेव्हा मिणमिणती पणती मोठ्या प्रमाणात उजेड करत असते.  त्या प्रमाणे  वाहतूक भूगोल या विषयवार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात असताना गेल्या कित्येक वर्षांपासून पर्यावरण  या विषयातील विविध संकल्पनेवर आधारित दिवाळी अंक प्रकाशित करणाऱ्या 'भवताल ' या संस्थेकडून या वर्षीचा दिवाळी अंक 'वाहतूक या संकल्पनेवर आधारित प्रकाशित करण्यात आला आहे 

सुमारे २५० पानाच्या या दिवाळी अंकात वाहतूक या संकल्पनेच्या मोठ्या प्रमाणात आढावा घेण्यात आला आहे. ज्यामध्ये माणसांनी प्रवास करायला कधी आणि का सुरवात केली ? माणसांनी कोणत्या मार्गानी प्रवास केला ? या दरम्यान त्यांना विश्रांती घेयची असल्यास काय सोयी सुविधा होत्या ? त्या कोणी निर्माण केल्या होत्या ? त्या सुविधांविषयी त्या वेळच्या नागरिकांनी काय लिहले आहेत ?  नागरिकांनी या साठी कोणती साधने वापरली ? वाहतूक भूगोल या भूगोलाच्या उपशाखेतील शास्त्रज्ञांनी वरील प्रश्नाची उत्तरे कोणत्या प्रकारे शोधली ? जगभरात प्रवाश्याची साधने कोणती होती ? या काळात जगभरातील कोणी कोणी आपल्या भारताला भेट दिली ? त्यांनी त्यासाठी येताना आणि जाताना कोणती साधने वापरली ?त्यावेळी त्यांना कोणते अनुभव आले  वरील प्रश्नाच्या उत्तरातून त्यावेळच्या समाजजीवनाविषयी काय काय माहिती मिळते ? या सारख्या असंख्य प्रश्नाची उत्तरे आपणास या दिवाळी अंकांच्या वाचनाने मिळतात 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यातमहत्वाचे योगदान असलेल्या सुरतेची स्वारी तसेच दक्षिणेची स्वारी कोणत्या प्रकारे राबवण्यात आली ?  पर्यटनाच्या निमित्ताने अनेक लेण्यांना भेट देतो ? पूर्वीच्या काळी प्रवासाच्या दरम्यान या लेण्यांना काय महत्त्व  होते ?  महाराष्ट्रातच लेण्या मोठ्या संख्येनं का आढळतात ? पूर्वीच्या काळी डोंगर दऱ्यातून लोक कोणत्या प्रकारे प्रवास करत असे ?  त्यावेळच्या प्रशासनकडून कोणत्या प्रकारे याची निगा राखण्यात येत असे ? त्यासाठी काही करप्रणाली होती का ?  व्यक्तीच्या प्रवाश्यामुळे काही गावांना महत्व आले होते का ? त्याच्या सुबत्तेचे कारण कोणते होते ?  लोकांनी जल प्रवाशाची सुरवात कोणत्या प्रकारे केली ? पूर्वी नागरिक कोणत्या मार्गावर जल प्रवास करत होते ? तेर प्रवास कोणत्या कालावधीत करत असे ? जगातील सर्वच

लोक सारख्याच पद्धतीने प्रवास करत होते का ? जल प्रवाश्यामुळे जगाच्या भूगोलात काही बदल झाला का ?  झाला असल्यास कोणता बदल झाला ? तो कोणी आणि कोणत्या पद्धतीने केला ?  आपल्या भारतातील व्यक्ती प्रवाश्यासाठी जगात कुठे कुठे जात असत ? त्या ठिकाणी जाऊन ते काय करत असत ? शास्त्रज्ञांनी या विषयीची माहिती कोणत्या प्रकारे मिळवली त्याविषयीची रंजक माहिती देखील दिवाळी अंकाच्या वाचनाने आपणास समजते .

 प्रवासववर्णन या वाहतुकीच्या मुळाशी असलेल्या घटकाला, तसेच आपल्या मराठीत खूपच कमी बोलल्या जाणणाऱ्या हवाई वाहतूक आणि अंतराळ प्रवास या घटकांना देखील या अंकात स्थान देण्यात आले आहे. हवाई वाहतुकीचे नियमन कोणत्या प्रकारे केले जाते?  विमान वाहतूक आणि  हेलीकॅप्टर वाहतूक यामध्ये काय फरक आहे ? याविषयीची माहिती या अंकात देण्यात आली आहे.  

दिवाळी अंकावर आक्षेप घेणाऱ्या व्यक्ती अनेकदा आपल्या मराठीत सध्या फक्त जाहिराती छापून पैसे मिळावे या हेतून दिवाळी अंक छापले जातात.  दिवाळी अंकात साहित्यविषयक मजकूर कमी आणि जाहिरातीच जास्त असल्याचा आक्षेप घेतात .मात्र या अंकात त्याचा लवलेश देखील जाणवत नाही. सुमारे अडीचशे पानाच्या अंकात फक्त एकच जाहिरात देण्यात आलेली आढळते ती देखील मधल्या पानावर आहे . कव्हर पेजेसवर नाही हे आपण लक्षात घेयला हवे . जाहिरात ना घेता दिवाळी अंक काढता येतो तो लोकप्रिय देखील करता येतो हे 'भवताल 'आपणास दाखवून देतो . ज्यांना खरोखरीच काही उत्तम वाचायचे आहे त्यांना भवताल हा एक उत्तम पर्याय आहे . मग वाचणार ना ' भवताल ' 

मागील वर्षांचा अर्थात २०२४ चा भवतालचा दिवाळी अंक कसा होता ? जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 



२०२३ चा भवतालचा दिवाळी अंक कसा होता ? जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 




२०२२ चा भवतालचा दिवाळी अंक कसा होता ? जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 






मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)

माझ्या कालच्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याबाबद्दल माझा लेख वाचणाऱ्या,यावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. या प्...