लेखाचे विषय

बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४

मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणाऱ्या नॅनो टेक्नॉलॉजीची साविस्तर माहिती देणारे पुस्तक, 'नॅनोदय'

       
 आपल्या सर्वांचेच आयुष्य गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात बदलले आहेत १९९० ते २००० या दहा वर्षाच्या  आसपास जन्मलेल्या माझ्यासारख्याव्यक्तींचे  आयुष्य त्यांच्या पालकांपेक्षा पुर्णतः वेगळे ठरले  या बदलला या काळात अत्यंत झपाट्याने  झालेली  तंत्रज्ञनातील प्रगती असे ठराविक साच्याचे उत्तर देता येते असले तरी अधिक सविस्तरपणे आणि बिनचूकपाने उत्तर देयचे झाल्यास या मागे या मागे  नॅनो टेक्नॉलॉजी आणि आता आपल्या जीवनाच्या अविभाज्य भाग होऊ घातलेली कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिनयस ) यामुळे आपले जीवन मागच्या पिढीच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे हे नाकारून चालणार नाही .तंत्रज्ञानातील प्रगतीपेक्षा नॅनो टेक्नॉलॉजी  आणि कृत्रिम बुद्धिमत्ता(आर्टिफिशियल इंटेलिजिनयस )  या डाँग गोष्टीमुळे आपले जीवन मोठ्या प्रमाणात बदलले आहे त्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिनयस ) हे क्षेत्र अजूनही बाल्यावस्थेत आहे असे म्हण्टले तरी चालू शकते कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिनयस ) यामध्ये  भविष्यातअजून मोठ्या प्रमाणात प्रगती होऊन  आपण सध्या कल्पनाही करू शकणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात बदल घडतील हे नक्की तर नॅनो टेक्नॉलॉजी  हे क्षेत्र पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात स्थिरावले आहे.आज  नॅनो टेक्नॉलॉजीची या क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात संशोधन होत असले तरी त्याचे आकर्षण काहीसे कमी झाले आहे मात्र गेल्या काही वर्षात मानवी राहणीमानात काय बदल झाला हे अभ्यासण्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजीची मुळातून माहिती  आहे. आणि आपली ही  गरज पूर्ण होते ती, राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित  'नॅनोदय' या पुस्तकामुळे.  अच्युत गोडबोले यांनी डॉ. माधवी सरदेसाई यांची मदत घेऊन लिहलेले हे पुस्तक मी नुकतेच वाचले 
            'नॅनोदय'या पुस्तकामुळे आपणस आपणास  नॅनो टेक्नॉलॉजीचा इतिहास, त्यामागची तांत्रिक माहिती, आणि तिचा वापर कोणकोणत्या क्षेत्रात कोणत्या प्रकारे होत आहे आणि शास्त्रज्ञांच्या मते हे तंत्रज्ञान अजून कोणत्या प्रकारे वापरता येऊ शकते याविषयी रंजक माहिती मिळते अच्युत गोडबोले यांच्या अन्य माहितीविषयक पुस्तकात  असते त्याप्रमाणे या पुस्तकात देखील इंग्रजी संकल्पनाच वापरलेल्या आहेत अन्य शास्त्राविषयक
पुस्तकात जसे संकल्पना मराठीत स्पष्ट करताना संकल्पनांचे ओढून ताणून संस्कृतचा आधार घेत मराठीकरण केले असते त्याचा मागसुस देखील या पुस्तकात नाही व्यवहारात वापरण्यात येणारया इंग्रजी संकल्पनाच या मराठी भाषेतील पुस्तकात वापरल्या आहेत त्यामुळे पुस्तक सहजतेने समजते 
            सुमारे २७५ पानाच्या या पुस्तकात १५ प्रकरणाद्वारे नॅनो टेक्नॉलॉजी ही संकप्लना समजवून सांगताना लेखनाने या विकास केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी , या क्षेत्रात कोणत्या प्रकारे होते हे स्पष्ट केलेलं आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री या विज्ञानाच्या शाखेत नॅनो टेक्नॉलॉजी चा वापर कसा होतॊ हे सांगतान लेखकाने अणूची अंतर्गत  रचना, रेणूची अंतर्गत रचना, एखाद्या पदार्थातील अणूचे परस्परांमध्ये  असणारी  विविध बले आकर्षण तसेच क्वाटम मॅकेनझीम . या संकल्पना सविस्तरपणे स्पष्टतसे केल्या आहेत तसेच या संकल्पना आणि नॅनो टेक्नॉलॉजी याच्याही सहसंबंध सविस्तरपणे उलगडून सांगितला आहे . बायोलॉजी विषयी सांगताना त्यांनी सूक्ष्मजीवांच्या मानवी आयुष्यात असणारे महतव आणि त्यामुळे  होणारे नुकसान  नॅनो टेक्नॉलॉजीकसे टाळता येईल   तसेच क्लोन तंत्रज्ञानाचे फायदे तोटे आणि त्याच्या  नॅनो टेक्नॉलॉजीशी असणारा सहसंबंध  शस्त्रकियेमध्ये होणारे चांगले बदल ,शेतीत कोणत्या प्रकारे चांगली पिके घेता येतील या विषयी सांगितले आहे  नॅनो टेक्नॉलॉजीमुळे होणाऱ्या बदलात अच्युत गोडबोले यांनी औद्योगिक उत्पादनात काय बदल
होतील यावर प्रकाश टाकताना रोबोनॅनोटिक्स  ही संकल्पना पुस्तकाची सुमारे १० पाने खर्च करून सविस्तर सांगितली आहे   नॅनो टेक्नॉलॉजीमुले माहिती आणि दूरसंचार क्षेत्र पूर्णतः बदलून जाईल  देखील शकणार नाही असे बदल या क्षेत्रात होतील असे अच्युत  या पुस्तकात  सांगितले आहे त्यासाठी पुस्तकातील २० पाने खर्च करण्यात आलेली आहे पुस्तकातील सुरवातीचा एक त्रितीयांश भाग अर्थात ८० पाने लेखकाने  नॅनो टेक्नॉलॉजीच्या इतिहासावर सांगितला आहे यामध्ये लोक  तंत्रज्ञान वापरत होते का ? असल्यास कोणत्या पद्धतीने वापरत असतील तसेच १९९० पर्यंत  नॅनो टेक्नॉलॉजी या क्षेत्रात काय संशोधन झाले याविषयी सांगितले आहे 
           सध्या सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी बोलले जात असले तरी  नॅनो टेक्नॉलॉजीमुळे आपल्या  आमूलार्ग बदल झाला आहे त्यामुळे तंत्रज्ञान आपणास माहिती असल्यास सोन्याहून पिवळे आपण जी गोष्ट वापरतो त्यातील मूलभू समजणे ती गोष्ट वापरण्यास आवश्यक नसले तरी तो आनंद अवर्णनीयच त्यासाठी  तरी हे पुस्तक वाचणे आवश्यक 
 

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

एका दुर्देवी प्रेम त्रिकोणाचा समग्र वेध घेणारे पुस्तक ' व्यस्त ओढीचा त्रिकोण'

       

  आपल्या बॉलिवूडमध्ये अनेक प्रेम कहाण्या प्रसिद्ध आहेत. यातील काही कहाण्या या आनंदायी आहेत . तर काही प्रेम कहाण्यांना मात्र दुर्दैवाची कारुण्याची छाया आहे . या दुःखाची पार्श्वभूमी असलेल्या प्रेम कहाण्यांमध्ये अग्रक्रमामाने नाव येते ते , गुरुदत्त  गीता दत्त आणि वहिदा रेहमान. या जोडीचे . एकीवर नितांत प्रेम असून देखील व्यावसायिक कारणास्तव  जवळ आलेल्या  एका दुसऱ्या व्यक्तिमत्वामुळे अक्षरशः कोंडीत सापडलेल्या गुरुदत्त यांचा या दुर्दवी मृत्यू  या प्रेम कहाणीत झाला . त्यांच्या मृत्यूमुळे आपण एका प्रतिभावंत, कामाप्रती अत्यंत निष्ठावान असेलेल्या, प्रयोगशील,  मात्र मनस्वी हळव्या अश्या अत्यंत हुशार असलेल्या एका ससिने अभिनेत्यासह सिने दिग्दर्शक सिने निर्मेत्यास सिने दिग्दर्शकास आपण तयां अकाली गमावलं . आपल्या बॉलीववूडची खूप मोठ्या प्रमाणात हानी यामुळे झाली त्यांचे एक्ली निधन झाले नसते तर आपण आतापर्यंत आपल्यापासून दूर असलेली ऑस्करची बाहुली अनेकदा पटकावली असती याबाबत कोणाशी शंका नसावी .  गुरुदत्त यांच्या या अकाली जाण्याविषयी अनेकदा अनेक माध्यमात आणि अनेक भाषेत लेखन प्रसिद्ध झाले आहे मात्र तरीदेखील लोक त्यांच्या मृत्यूस ६० वर्षे झाली तरी अजूनही लिहीत आहेत . यातच त्यांचे थोरपण दिसून येते त्यांचा या अकाली जाण्याविषयीच लिहलेले एक पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील महत्वाची सांस्कृतिक संस्ख्या असेलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशियक यांच्य सहकार्याने वाचले . 

 'व्यस्त ओढीचा त्रिकोण या प्रतीक प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि कृ, दा. परांजपे लिखित या सुमारे १५० पानी पुस्तकात १० प्रकरणाद्वारे या दुर्दवी घटनेचा सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे यातील पहिल्या ५ प्रकरणात गुरुदत्त यांची चित्रपट सृष्टीतील कारकीर्द कॊणत्या प्रकारे बहरात गेली. याचा सविस्तर आढावा घेण्यात अली या आढाव्यात त्यांची वहिदा रेहमान यांच्याशी कोणत्या प्रकारे ओळख झाली हे सांगण्यात आले आहे तर शेवटच्या पाच प्रकरणात मोठ्या प्रमाणात वहिदा रेहमान यांच्यामुळे गुरु दत्त आणि गीता दत्त यांच्यात तणावाचे प्रसंग येऊ लागले त्याला गीता दत्त आणि गुरुदत्त वहिदा रेहमान यांच्या जवळपासच्या व्यक्तीमुळे कसे प्रकारे खतपाणी मिळाले याविषयी सविस्तरपणे सांगण्यात आले आहे पुस्तकाचे शीर्षक असलेल्या विषयाबाबत अर्थात गुरुदत्त गीता दत्तआणि वहिदा रहेमान यांच्यातील वादाबाबात भाष्य करताना लेखकांनी   पुस्तकाची ६० %जागा व्यापली   आहेतर ४० % जागा गुरुदत्त यांचा एकूण चित्रपट सृष्टीतील प्रवाश्यावर भाष्य करणारी आहे  

पिवळ्या  रंगाचे मुखपृष्ठअसलेल्या या पुस्तकावर असलेले गुरुदत्त गीता दत्त आणि वहिदा रहमान याचे कृष्णधवल फोटो आपले लक्ष चटकन वेधून घेतात, आणि ज्यांना या विषयाचे थोडीतरी पार्श्वभूमी असलेल्या ,माझ्यासारख्या अनेकाना वाचायला प्रवृत्त करताच .या पुस्तकात शेवटच्या पाच प्रकरणात गुरुदत्त  यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाच्याद्वारे गुरुदत्त आणि वहिदा रहेमान हे एकत्र येत आहे असा गैरसमज गीता दत्त यांच्यात कसा बळकावला तो दूर कारण्यासासाठी गुरुदत्त यांनी काय काय प्रयत्न  केले  याविषयी माहिती देण्यात आला आहे पुस्तकाच्या मलपृष्ठावर आणि सुरवातीच्या प्रास्ताविकेत कादंबरी असा उललके असला तरी हे पुस्तक कोणत्याच प्रकारे कादंबरी असे वाटत नाही तर अत्यंत सोप्या भाषेत  अनेक तांत्रिक गोष्टीला बगल देत ज्यांना या विषयाची काहीच माहिती नाही सध्या सर्वसामान्य व्यक्तींना या विषयाची माहिती देणारे

पुस्तक म्हणून या कडे बघावे लागेल मी जेव्हा हे पुस्तक हातात घेतले तेव्हा हा कादंबरी हा उल्लेख वाचला तेव्हा मला गो . नि . दांडेकर यांनी लिहलेल्या समर्थ रामदास स्वामी यांच्या 'दास डोंगरी राहतो ' या गोष्टीवेल्हाळ चरित्रासारखे हे पुस्तक असेल असे वाटले होते मात्र हे पुस्तक त्या प्रकारचे बिलकुल नाही गोष्टीवेल्हाळ पणा या पुस्तकात मला औषधाला अगदी १ % देखील आढळला नाही या पुस्तकात संपूर्णपणे गुरुदत्तचा उल्लेख एकेरी तो गुरुदत्त या प्रमाणे केलेला असला तरी त्यामुळे हे पुस्तक कादंबरी प्रकारात मोडता येऊ शकत नाही सुरवातीलाच्या एक दोन प्रकारात आपणस लेखन कादंबरीप्रमाणे काहीसे वाटते मात्र त्यानंतरच्या प्रकारांमध्ये हे पुस्तक पूर्णतः माहितीप्रधान लेखाचे स्वरूप घेते 

आपणास या घटनेची संपूर्ण माहिती असली तरी हि माहिती किती सहजतेने सांगता येऊ शकते या साठी किना ज्यांना या विषयी काहीही माहिती नाही त्यांना या विषयाची टॉड ओळख होण्यासाठी आपण सर्वांनी किमान एकादफा तरी हे पुस्तक वाचायलाच 

 

रविवार, २७ ऑक्टोबर, २०२४

जपानच्या कार्यसंस्कृतीतून देशाची ओळख करून देणारे पुस्तक 'जपान'

             
      जेव्हा आपण कोणतेही कारण असो आपला प्रदेश सोडुन दुसऱ्या देशात जातो,तेव्हा नवीन प्रदेश आपल्याशी विविध प्रकारे संवाद साधत असतो.तेथील पर्यटनस्थळे आपण ज्या प्रदेशात आलोय,त्या प्रदेशाचा ऐतिहासिक वारसा तसेच त्या प्रदेशावर निसर्गाने केलेली उधळण सांगत असतात, तर आपल्या वास्तवात आपल्या ज्या लोकांशी संपर्क येतो ते लोक त्या लोकांची परदेशी लोकांविषयीची भावना, तेथील कार्यसंस्कृती, तेथील समाजजीवनातील व्यक्तींचे स्थान, त्यांची स्वत:च्या प्रदेशाविषयीची भावना तसेच दुसऱ्या ज्या प्रदेशातून आपण आलेलो असतो,त्या प्रदेशाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता याविषयी माहिती देत असतात.या संवादातून आपणास त्या प्रदेशाची मोठ्या प्रमाणात माहिती मिळते.या माहितीमुळे आपले त्या प्रदेशाशी आपली नाळ देखील जोडली जावू शकते असी नाळ जोडली गेल्यास आपण सातत्याने त्या प्रदेशात जावू इच्छितो,तेथील लोकांशी आपली मैत्री देखील होते. आपण दुसऱ्या प्रदेशात गेल्यावर आपणास आलेले अनुभव जर लिहुन प्रसिद्ध केले तर आपले अनुभव वाचून इतर लोकसुद्धा त्या प्रदेशाविषयी माहिती करुन घेवू शकतात.त्यामुळे प्रवासवर्णने अत्यंत महत्ताची ठरतात.आपल्या मराठीत पु.ल.देशपांडे यांची प्रवासवर्णने अत्यंत प्रसिद्ध आहेत.सध्याचा काळात मीना प्रभू यांनी लिहलेली प्रवासवर्णने विशेष प्रसिद्ध आहेत.याच प्रवासमालिकेत समाविष्ट होवू शकेल असे प्रवासवर्णन मी नुकतेच सार्वजनिक वाचानावल नाशिक या नाशिकमधील सर्वात जून्या सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित संस्थेच्या सहकार्याने वाचले.
                          अविनाश भिडे यांनी त्यांच्या सुमारे पाच ते सहा महिन्याचा जपानच्या वास्तव्यात  जपानची जी कार्यसंस्कृती अनुभवली त्याचे शब्दरूप म्हणजे मी वाचलेले हे पुस्तक होय. व्यवसायाने इंजिनियर आणि एका  मेकॅनिकल कंपनीत उच्चपदस्थ असलेले, अविनाश भिडे हे भारतात कार्यरत असणाऱ्या, आपल्या कंपनीत बसवण्यात येणाऱ्या, एका यंत्राचे तांत्रीक प्रशिक्षण घेण्यासाठी, क्योटो मशिन कंपनीत गेले होते.त्यावेळी त्यांनी जपानची कार्यसंस्कृती जवळून अनुभवली. आपण अनुभवलेली जपानची संस्कृती त्यांना इतरांनी देखील अनुभवावी,असे वाटले.त्यामुळे त्यांनी आपले अनुभव पुस्तकरुपाने प्रसिद्ध केले.तेच हे सुमारे २००पानांचे पुस्तक. या पुस्तकाचे प्रकाशन सुकृत प्रकाशन करण्यात आलेले आहे.

                सुमारे २०० पानाच्या या पुस्तकात ५७ विविध प्रकरणातून लेखकाने आपले वैयक्तिक अनुभव मांडले आहेत. या पुस्तकातून आपणास जपानी लोकांची आपल्या कार्याप्रती असलेली आत्मियता, त्यांची देशाप्रती असणारी निष्ठा, देशाचे अतिप्रगत तंत्रज्ञान, तेथील सामाजिक समरसता, परदेशी लोकांप्रती विशेषत: भारतीयांबाबत असणारी आपुलकी अस्या विविध गोष्टीची माहिती मिळते.प्रत्येक प्रकरणाच्या सुरवातीला  या प्रकरणात काय वाचायला मिळणार हे पानाच्या एका बाजूला वेगळ्या रंगसंगतीत दिले आहे,त्यामुळे प्रत्येक प्रकरण सहजतेने समजते.पुस्तकाची भाषा सहजसोपी आहे.तसेच प्रत्येक प्रकरण जास्त लांबण न लावता आटोपशीर पद्धथतीने लिहलेले असल्याने अत्यंत वाचणीय झाले आहे,जे सहजतेने समजते.पुस्तकाची भाषा खुप सोपी  सहजतेने समजणारी आहे.
                       जपानची कार्यसंस्कृतीविषयी बोलताना लेखकाने  त्यांची झिरो डिफेटेव्ह पद्धत,त्यांचे वेळेचे नियोजन, कायझेन पद्धत, टिम स्पिरीट,कोणत्याही गोष्टीचे सुक्ष्म नियोजन,इतरांचा साहनभुतीपुर्वक विचार करण्याची वृत्ती, क्वालिटी सर्कल ही संकल्पना वाडवडीलांच्या कर्तुत्वावर टिमकी वाजवण्यापेक्षा  स्वकर्तृत्वाला जपानला देण्यात आलेले महत्व आपणास सांगितले आहे. जपानी लोकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाविषयी बघायचे झाल्यास पुस्तकाचे वाचन केल्याने आपणास जपानची खाद्यसंस्कृती, तेथील लोकांची परिसर स्वच्छतेबाबतची खोलवर रुजलेली जाणिव, आपल्या वारकरीसारखी तेथील दिंडीची परंपरा, तेथील पोलीसी व्यवस्था,लोकांंची दुसऱ्यास मदत करण्याबाबतचा सहजभाव, वाहतूकीचे नियम पाळण्याचा त्यांची सहजवृत्ती,आदिंविषयी माहिती मिळते‌.तर त्यांचा बुलेट
ट्रेन,डायव्हरविरहीत ट्रेन ,टोकियो  टॉवर यांच्यविषयी वाचल्याने आपणास जपानचे तंत्रज्ञानातील हुकूमत समजून येते. तर लेखकाने आपल्या कामाच्या ठिकाणी, राहण्याचा ठिकाणी  बरोबर असलेल्या लोकांबरोबर केलेल्या चर्चेतून आपणास जपानी लोकांचा भारताविषयीचा स्नेह,तसेच जपानी लोकांचा देशाभिमान, याविषयी माहिती मिळते..
आपण स्वत: जपानला गेले असल्यास आपले अनुभव ताडून बघण्यासाठी आणि न गेल्यास भारतात राहुन देखील जपान अनुभवण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे..





रविवार, १ सप्टेंबर, २०२४

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुमारे ६० टक्के नैसर्गिक इंधनाची वाहतूक ज्या प्रदेशातून होते ते इराणचे अखात ते हेच.या इराणच्याआ आखातापासून जगातील अत्यंत स्फोटक प्रदेशाला सुरवात होते जी त्यानंतर समुद्र पुन्हा आत जातो ,त्या ठिकाणाला अर्थात लाल समुद्राला वळसा घालत आफ्रिका खंडाच्या उत्तर दिशेकडील काही देश घेवून स्थिरावते .अरब महाद्विप, पश्चिम आशिया किंवा युरोपीय वसाहातवादी देशांच्या चष्म्यातून बघीतल्यास मध्यपुर्व (middel east) या विविध नावाने ओळखला प्रदेश तो हाच.नैसर्गिक उर्जासाधनांनी अत्यंत श्रीमंत किंबहुना याच श्रीमंतीच्या जोरावर अनेकदा जगाला भंडावून सोडणाऱ्या या प्रदेशाविषयी आपल्या मराठीत काहीसे कमी लिहले गेलेले आढळते‌. जे काही मराठीत लेखन उपलब्ध आहे,त्यामध्ये तेथील पर्यटन स्थळांची माहिती,या प्रदेशात बांधकांम मजूर म्हणून नोकरी करणाऱ्या भारतीयांचे अनुभव विश्व  याचाच जास्त भरणा आपणास दिसतो . मात्र देशांतर्गत राजकारण, तेथील समाजजीवन २०व्या शतकाच्या सुरवातीला त्या भागात नैसर्गिक इंधनाचे साठे सापडल्यावर अचानक श्रीमंती आल्यामुळे बदललेले आर्थिक जीवन ,या नैसर्गिक इंधनाचे नियंत्रण आपल्याकडे असावे,यासाठी युरोप खंडाच्या पश्चिमेकडील देशांनी आणि अमेरिकेने खेळलेल आंतरराष्ट्रीय राजकारण.या आंतराष्ट्रीय राजकारणाला उत्तर म्हणून या प्रदेशात उभ्या राहिलेल्या विविध संघटना आणि त्यांची वाटचाल याविषयी आपणाकडे फारच कमी बोलले जाते, मात्र ही कमतरता बऱ्याच अंशी कमी होते ते याबाबत आपल्या देशांतर्गत राजकीय भूमिकेमुळे अनेकांचे नावडते संपादक झालेले गिरीश कुबेर यांनी लिहलेल्या पुस्तकामुळे. गिरीश कुबेर यांनी पश्चिम आशियाशी संबंधित ,एका तेलियाने, हा तेल नावाचा इतिहास आहे, तेल नावाचं वर्तमान, अधर्म युद्ध असी विविध पुस्तके लिहली आहेत.त्यातील अधर्म युद्ध हे पुस्तक मी नुकतेच वाचले.
३००पानांच्या या पुस्तकात या प्रदेशातील देशांचा प्रकरणनिहाय इतिहास वर्तमान याचा आढावा घेण्यात आला आहे.या प्रदेशातील सामाईक इतिहासाचा आढावा घेतल्यास पुर्व युरोपीय साम्राज म्हणजेच तूर्की साम्राजाचे पतन ही सर्वात मोठी घटना आहे.त्यामुळे हा आढावा तेव्हापासून म्हणजे १९व्या शतकाच्या उत्तरार्ध म्हणजे १८५० पासून घेण्यात आला आहे. तूर्की साम्राजचे विघटन झाल्यावर येथे नवे सत्ताधिश कसे तयार झाले.‌ पश्चिमी युरोपीय राष्ट्रांनी आपले व्यापारी हितसंबंध सुरक्षीत करण्यासाठी या सत्ताधीकारी आणि त्यांचा विरोधकांचा कसा वापर केला. प्रदेशात नैसर्गिक इंधनाचे साठे सापडल्यावर त्यावर पडड्यामागून आपलेच नियंत्रण राहिल,यासाठी त्यांनी खेळलेले राजकारण .जगात इतरत्र पश्चिमी युरोपीय देशांनी ज्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात गळे काढले ते मानवी हक्क त्यांनीच या प्रदेशात कसे पायदळी तूडवले. तसेच सत्ता संघर्षात फक्त स्वत:चाच फायदा बघत अमेरिकेच्या गटातील भांडवलशाही देशांनी कम्युनिष्ठांचा या प्रदेशात निर्माण केलेला बागलबुवा, आणि तो कमी करण्यासाठी त्यांनी या प्रदेशावर लादलेले विनाकारणचे युद्ध.स्वत:च्या नियंत्रणात देशाचा सत्ताधिकारी नाही,हे बघून देशातील जनतेची काहीही मागणी नसताना तो अन्याय करतो असे कारण देत त्याला सत्तेपासून दूर करत देशात राजकीय अस्थैर्य निर्माण करणे.या सारख्या केलेल्या गोष्टी  दरम्यानच्या काळात या सर्व घडामोंडींमुळे त्या प्रदेशात निर्माण झालेला धार्मिक अहंपणा, कट्टरता,आणि त्याची विविध संघटनेत झालेली विभागणी ,त्याचे स्वरूप.या प्रदेशात असणाऱ्या देशांच्या सत्ताधाऱ्यांनी या प्रदेशाच्या विकासासाठी त्याला आधुनिक स्वरूप देण्यासाठी केलेले प्रयत्न,त्याला आलेले यशापयश,या यशापयशाची कारणे. या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे हे पुस्तक होय. या पुस्तकात सौदी अरेबिया,इराण इराक, कुवेत सयुंक्त अरब अमिरात,अफगाणिस्तान पाकिस्तान बहरीन इजिप्त, अल्जेरीया,सिरीया,लिबिया, पॅलेस्टाईन,इस्राइल, लेबनॉन,या प्रदेशाचा आढावा घेतला आहे.
मी आधीच सांगितल्याप्रमाणे या पुस्तकाचे लेखन करणारे गिरीश कुबेर त्यांच्या देशांतर्गत राजकारणाविषयी घेतलेल्या भुमिकेमुळे अनेकांचे नावडते आहेत.मात्र ते लक्षात ठेवत हे पुस्तक वाचायचेच नाही असे ठरवल्यास आपण एका महत्त्वाचा ज्ञानाला मुकु हे नक्की. या उलट समर्थ रामदास स्वामी यांचा ',उत्तमाची ते घ्यावे, मिळमिळत ते टाकूनी द्यावे,असा संदेश आचरणात आणत ,गिरीश कुबेर यांची देशांतर्गत राजकरणाविषयीची मते मिळमिळीत म्हणून टाकून दिल्यास आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील ज्ञान उत्तम समजून त्या विषयीचे हे पुस्तक वाचल्यास आपणास एक फार मोठा खजिना सापडेल याबाबत खात्री बाळगा.मग वाचणार ना हे पुस्तक.
अजिंक्य तरटे 

९५५२५९९४९५
९४२३५१५४०० 

इमेल पत्ता 

ajinkya.tarte2 @gmail.com

 


रविवार, १० मार्च, २०२४

माझे वाचन (भाग३)

   
मला आठवतं माझ बालपण चांदोबा, ठकठक, चंपक किशोर आदी मासिकांनी समृध्द केल. काही दिवसापुर्वी मी पेपर स्टाँलला भेट दिली असता जाणवले की काही कार्टुन काँमिक्सचा अपवाद वगळता बहूतेक बालसाहित्य बंद झालंय .रविवारी येणाऱ्या  वृत्तपत्राच्या बालसाहित्याचा पुरवण्यांनी वाचनाची गोडी लावली . आजकाल अपवाद वगळता वृत्तपत्रांनी बालसाहित्याची पुरवणी देणे बंदच केलंय. त्यामुळे ज्यामुळे मला वाचनाची गोडी लागली.ती गोष्ट सध्याचा मुलांना मिळणे काहीसे अवघड आहे.आताच्या मुलांच्या पालकांना आता अन्य स्त्रोत शोधून आपल्या पाल्यांना वाचनाची गोडी लावावी लागेल.
              पुढे माध्यमिक शाळेत असताना शाळेतील ग्रंथपालांनी माहितीपर पुस्तकांची गोडी लावली त्यामुळे माझे ज्ञान समृद्ध होण्यास मदत झाली 
मी लहानपणी नाशिक येथील सार्वजनिक वाचानालयाचा बालविभागाचा सक्रिय सभासद होतो.त्यामुळे देखील माझे वाचन बरेच समृध्द झाले मला अनेक व्यक्ती लहानपणी माझी आवड लक्षात घेवून गोष्टींची पुस्तके भेट स्वरूपात देत असे‌.त्यातून माझी वाचनाची आवड घट्ट होत गेली आता देखील लहान मुलांना भेट देताना आवर्जून पूस्तकेच भेट दिली तर त्यांना वाचनाची गोडी लागू शकते‌.‌काही जण आताच्या मुलांच्या भावविश्वाशी जोडले जाईल असे लेखन होत नाही,असे म्हणतील त्यांना माझे सांगणे आहे की,भलेही सध्याच्या
मुलांशी जवळीक साधणारे लेखन कमी असेल मात्र हे लिखाण पुर्णतः थांबलेले नाही .शोधा म्हणजे सापडेल ,या वाक्यप्रचाराच्या अनुषंगाने शोधल्यास आजच्या मुलांच्या भावविश्वाशी एकरुप होणारे लेखन नक्कीच सापडेल
                      मी जे बाल साहित्य वाचले, त्यात निखळ मनोरंजन अधिक असे.बाल मनावर संस्कार करायचे आहेत, हा विचार मनात धरून मुलांना कंटाळवाणे वाटेल,असे साहित्य मी तरी फार  वाचलेले नाही. काही दिवसांपूर्वी व्हाटसपवर मुलांना देण्यासाठी संस्कारक्षम बालसाहित्य नाही, म्हणून ओरड करणारी एक पोस्ट बघीतली होती त्या पार्श्वभूमीवर मुद्दामुन संस्कारक्षम बालसाहित्य हा विचार मी लहानपणी बघितला नाही.काही महिन्यांपूर्वी नाशिकमधील एका ख्यातनाम बाल साहित्याची निर्मिती करणाऱ्या एका ज्येष्ठ साहित्यकारासी या संदर्भात बोलणे झाले असता संस्कार करण्याची प्रथा बालसाहित्यात आणण्याचा कृतीला त्यांनी विरोध केला होता त्यांच्यामते संस्कार आणि बालसाहित्य पुर्णतः वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांची एकमेकांत 

सरमिसळ केल्यामुळे दोन्ही गोष्टिंचा विचका होतो‌ त्यामुळे संस्कार होत नाहीत आणि मुलांना वाचनाची गोडी देखील लागत नाही.माझ्या सुदैवाने मी लहानपणी जे साहित्य वाचले त्यात ही गल्लत माझ्यासाठी तरी झाली नाही,आणि मला वाचनाची गोडी लागली.चांदोबा या मासिकात संस्कार करणाऱ्या काही कथा असतं मात्र त्यातून अत्यंत सुक्ष्म संस्कार होत असे तर मनोरंजन मोठ्या प्रमाणात होत असे त्यामुळे त्यांना मनोरंजन करणारे लेखन म्हणूनच बघावे लागेल.चंपकमधून संस्कार नाहीच्याच पातळीवर होत असे. मनोरंजन मात्र मोठ्या पातळीवर होत असे.आणि याच मनोरंजनामुळे मला वाचनाची गोडी लागली ‌याच गोडीतून मी पुढे राहता झालो.ज्याचे दृश्यस्वरुप आपल्या पुढे दिसतच आहे ‌
 
 दुसऱ्या भागाची लिंक 

 
पहिल्या भागाची लिंक 
 


सोमवार, ४ मार्च, २०२४

जागतिक स्तरावरच्या अभिजात साहित्यिकांची ओळख मराठी भाषिकांना करून देणारे पुस्तक "झपुर्झा भाग ३"

 
 साहित्याला जगाचा आरसा समजण्यात येते. जगात जे काही चांगले वाईट घडते,ते सर्व साहित्यिक आपल्या लेखनाद्वारे समाजापुढे मांडतो. त्यामुळे साहित्याचे वाचन केल्यास आपणास प्रत्यक्ष अनुभव आला नाही,तरी समाजातील चांगल्या वाटायची आपणास योग्य प्रकारे जाण होते. त्यामुळे साहित्याची निर्मिती करणारा साहित्यिक अत्यंत महत्त्वाचा आहे,समाजाचे जमेच्या बाजू उणिवा त्याला कश्या दिसतात,यावर त्याचे साहित्य कसे असेल?ते खरंच समाजाचे प्रतिनिधित्व करेल का,?हे ठरते‌.विचारवंता सारखाच साहित्यिक हा त्या विशिष्ट काळाचे अपत्य असतो. त्यामुळे साहित्यिकांचा चरित्रांचा  अभ्यासावरून त्या काळाचा अंदाज बांधता येतो.तसेच त्या साहित्यिकांचे लेखन किती अस्सल समजायचे ते समजते.
आपल्याकडे साहित्यिकांच्या चरित्रांचा अभ्यास करणारी पुस्तके कमीच आहेत.त्यातही जी आहेत ती मुख्यतः इंग्रजीतच.अस्सलिखित इंग्रजी समजू शकणारा बोलू शकणारा वर्ग आजही कमीच आहे. आजही बहुसंख्य भारतीय त्यांचा मातृभाषेतच संवाद करतो‌.त्यामुळे बहुसंख्य भारतीय या अभ्यासापासून दूरावतात.नेमकी हीच बाब हेरून मराठीला ज्ञानभाषा होण्यासाठी झटणारे अच्युत गोडबोले यांनी जागतिक स्तरावर नावाजलेल्या साहित्यिकांची ओळख करून देणारी झपुर्झा ही वृत्तमालिका एका वर्तमानपत्रासाठी लिहली‌.पुढे ही वृत्तमालिका त्यांनी विविध भागाच्या पुस्तकांसाठी अधिक विस्ताराने लिहिली याच विस्तारीत मालिकेतील तिसरे पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील सर्वात जूनी सांस्कृतिक संस्था सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या सहकार्याने वाचले.
झपुर्झाच्या या तिसऱ्या भागात १९ साहित्यिकांचा परिचय सुमारे 400पानाच्या माध्यमातून करुन देण्यात आला आहे.ज्यामध्ये स्वामी विवेकानंद यांना ज्याचा कवितेद्वारे ईश्वर भेटीची आस लागली ,असे कवी विल्यम वर्डसवर्थ, इंग्रजी भाषेतील पहिले कवी म्हणून ओळखले जाणारे जेफरी चॉसर, अमेरीकेतील प्रमुख विनोदी लेखन करणारे मार्क टेनी, जिवंत असताना दुर्लक्षी गेलेली मात्र  मृत्यूपश्चात  आपल्या लेखणीद्वारे सुप्रसिद्ध झालेली जॉर्ज इलीयट ही लेखिका आदि प्रमुख आहेत.
      साहित्यिकांची ओळख करून देताना सदर लेखक इथे जन्मला,त्यांचा पालकांचे हे नाव आणि हा व्यवसाय होता.त्याचे शिक्षण इथे झाले त्याचा मृत्यू वयाचा इतक्या वर्षी या प्रकारे इथे झाला.त्याने हा व्यवसाय केला ?त्यांनी हीपुस्तके लिहिली.त्याचा लेखनाचे वैशिष्ट्य हे वैशिष्ट्य होते‌.असी ठोकळेबाज माहिती वजा ओळख करुन न देता, काहीस्या अलंकारिक पद्धतीने सुरवातीला त्यांचा ठळक नामोल्लेख टाळत, त्यांच्या आयुष्यातील एखाद्या प्रसंगाचे वर्णन करत नाट्यमय केला आहे.ज्यामुळे पुस्तक चरीत्राचे असून देखील कंटाळवाणे,नुसतीच माहिती देणारे न होता वाचणीय वाचकाला गुंतवून ठेवणारे झाले आहे. मात्र हे करत असताना संबंधित साहित्यिकांची संपूर्ण तपशिलवार माहिती वाचकाला मिळेल वाचकास  फक्त वरवरचीच माहिती मिळेल ,त्यास साहित्यिकांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा उलगडा होणार नाही,या उणीवांपासून आपले लेखन दूर राहिलं.वाचकाला अभ्यासाचे क्रमिक पुस्तक वाचले असे वाटेल.विद्यापीठाच्या अभ्यासास मदत करणारे लेखन वाटेल याची लेखकाने काळजी घेतल्याचे पुस्तक वाचताना जाणवते.     
      या पुस्तकाच्या वाचनातून आपणास १९ व्या शतकाचा दुसऱ्या अर्ध्या भागात(१८५०नंतर) आणि १९ शतकाच्या पहिल्या अर्ध्या भागात (१९५० पर्यंत) पश्चिम युरोप आणि अमेरिकेतील समाजजीवन कसे होते? त्यावेळच्या साहित्यिकांना लेखन करताना कोणत्या समस्या येत असत. साहित्यिक कोणत्या आर्थिक सामाजिक वर्गातून येत
असत.ते कोणत्या विषयावर प्रामुख्याने लेखन करत.साहित्यीकांचा या प्रकारच्या लेखनामुळे इंग्रजी, फ्रेंच आदि भाषेत साहित्याची परिभाषा कस्या प्रकारे विकसित झाली. याविषयी माहिती मिळते‌.
     निलांबरी जोशी यांच्या मदतीने अच्युत गोडबोले यांनी  लिहिलेल्या या पुस्तकामुळे भारताच्या बाहेरील जगात साहित्य कसे विकसित होत आहे? कसे विकसित झाले? .तेथील समाजजीवनाचा तेथील साहित्यावर कसा परीणाम झाला ?आदि प्रश्नांबाबत आपणास सविस्तर माहिती मिळते ,मग वाचणार ना पुस्तक 

बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

नाशिकची इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक, "तपोभूमी नाशिक"


नाशिक, महाराष्ट्रातील चवथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर.स्वातंत्र्यवीर सावरकर,दादासाहेब फाळके, श्रीपाद अमृत डांगे, यांच्यासारख्या अनेक नामवंत व्यक्तींची जन्मभूमी असणारे शहर.जगात ज्या ४ ठिकाणी कुंभमेळा भरतो त्यातील एक ठिकाण म्हणजे नाशिक.खाद्यपेयांचा विचार करता द्राक्ष वाइन निर्यातीद्वारे आपल्या भारताला मोठ्या प्रमाणात परदेशी चलन मिळवून देणारे शहर म्हणजे नाशिक ‌. तर अस्या नाशिकची इतिहास काळापासून जडण घडण कशी झाली.दक्षीण काशी असी ओळख असणाऱ्या या शहर आणि परिसरात कोणकोणती मंदिरे आहेत? त्यांचा इतिहास काय आहे? तसेच प्राचीन काळात नाशिकला  कोणकोणत्या परदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे? नाशिकचे सांस्कृतिक जीवन कोणत्या पद्धतीने समृध्द आहे? नाशिकची प्रसिद्ध व्यक्तिमत्वे कोणती? नाशिकची जगभरात ओळख असणारा कुंभमेळा मुळात काय आहे? कुंभमेळा कस्या प्रकारे आयोजित करण्यात येतो?नाशिक परिसरात कोणकोणत्या लेण्या आहेत? नाशिक परिसरात नाशिक वगळता कोणकोणती धार्मिक स्थळे आहेत? या सारख्या नाशिकविषयी आपणास पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची योग्य उत्तरे आपणास हवी असतील तर आपणास महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत असणारे ज्येष्ठ पत्रकार रमेश पडवळ सरांनी लिहलेल्या तपोभूमी नाशिक या पुस्तकाखेरीज अन्य सक्षम उपाय तो कोणता? मी नुकताच नाशिकमधील महत्त्वाची सांस्कृतिक संस्था असणाऱ्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावनाच्यामार्फत वाचले.
 या प्रकाशनातर्फे प्रकाशित या पुस्तकात सुमारे २०४ पानांच्या या पुस्तकात सहजसोप्या भाषेत,ओघवत्या भाषेत वर सांगितलेल्या गोष्टींची माहिती दिली आहे. पुस्तक माहितीवर आधारित असले तरी अन्य माहितीच्या पुस्तकांप्रमाणे हे पुस्तक रटाळ कंटाळवाणे झालेले नाही.तर वाचकांची नाशिकच्या बाबतचे जाणून  घेण्याबाबतची भुक  काहीप्रमाणात वाढवणारे,आणि या वाढलेल्या भुकेची तितक्याच ताकदीने पुर्तता करणारे झाले आहे. पुस्तक वाचतांना कुठेही  कंटाळा येणार नाही,याबाबत लेखकाने काळजी घेतल्याचे पुस्तक वाचतान सहजतेने लक्षात येते‌.पुस्तकात पहिल्या परिच्छेदात सांगितलेल्या प्रश्नांची प्रकरणनिहाय माहिती देण्यात आलेली आहे.आपण पुस्तकाचे लेखक रमेश पडवळ सर यांना त्यांच्या मटा हेरीटेज वॉकमुळे ओळखतो‌.मटा हेरीटेज ,वॉकच्या वेळी दिसणारे त्यांचे व्यक्तीमत्तातील गुणवैशिष्टे,अभ्याक त्यांचा,या पुस्तक लेखनात सुद्धा जाणवतो.
सदर पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेली संदर्भसुची त्यांनी पुस्तक निर्मितीसाठी घेतलेले कष्ट दाखवून देते‌.सध्याचा इंटरनेटच्या काळात एखाद्या परीसराविषयी माहिती सहजतेने उपलब्ध असताना तीच कॉपी पेस्ट न करता संदर्भग्रंथ
अभ्यासून पुस्तक लिहल्यातून त्यांची पत्रकारीता किती उच्च दर्ज्याची आहे,हे समजते‌ महाराष्ट्र टाइम्स सारख्या नामांकित वर्तमानपत्रात विविध जबाबदाऱ्या सांभळत त्यांनी सदर लेखन केले आहे ‌,जे खरोखरीच कौतूकास्पद आहे.समर्थ रामदास स्वामी यांची"दिसामंजी काहीतरी लिहावे,शहाणे करुन सोडावे सकल जन " ही उक्ती रमेश पडवळ सरांनी सार्थ केल्याचे पुस्तक वाचताना जाणवते.
आपणास ज्या प्रदेशात राहतो, तेथील माहिती असणे,हे चांगल्या व्यक्तीमत्वाची ओळख आहे ‌.त्यामुळे किमान नाशिककरांनी हे पुस्तक वाचायलाच हवे.

उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे बीज असलेली कादंबरी, 'फकिरा'

 आपल्या मराठीचे साहित्यविश्व अत्यंत समृद्ध आहे. उकृष्ट चित्रपट निर्मिती होऊ शकते अश्या कादंबरीची मराठीत अक्षरशः खाण आहे. गो नि दांडेकर यांची...