लेखाचे विषय

मंगळवार, १३ मे, २०२५

भारताच्या कुटनितीची माहिती देणारे पुस्तक, 'रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गुढकथा'

           सध्याचा भारत पाकिस्तान तणावाच्या काळात, युद्धाच्या बातम्या बघताना आपणास अरे अपल्या लष्कराला पाकिस्तानमधील दहशतवादी तळाची अचूक ठिकाणे कशी काय समजतात? असा प्रश्न पडू शकतो.तर याचे उत्तर आहे आपली गुप्तहेर संघटना, रिसर्च अँड अँनलिसीसस अर्थात रॉ या संघटनेचे जाळे.आपण अनेकदा इस्राइलची गुप्तहेर संघटनेच्या कारवाया ऐकतो‌ याच पद्धतीचे कामकाज करणारी मात्र अनेकदा पडद्याआड राहणारी संघटना म्हणजे रॉ.मराठीत न च्या बरोबर आणि इंग्रजीतसुद्धा मोजकेच लेखन झालेल्या रॉचे कार्य  नक्की कसे  चालते‌? देशहितासाठी त्यांनी आतापर्यत कोणते कार्य केले आहे? हे अचूकपणे समजून घेयचे असेल तर आपणास मनोविकास प्रकाशनाच्या 'रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गुढकथा' हे पुस्तक खुप उपयोगी पडते. सध्या मुंबई सकाळ चे संपादक असलेले  ज्येष्ठ पत्रकार रवी आमले या पुस्तकाचे लेखक आहेत. रवी आमले यांनी 300 पानांच्या या पुस्तकातून 24 प्रकरणाद्वारे
रॉ ने केलेल्या कार्याची ओळख करून दिली आहे. मी नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावानाच्या सहकार्याने नुकतेच हे पुस्तक वाचले.
         अत्यंत सहजसोप्या भाषेत  लिहलेल्या या पुस्तकात, प्राचीन भारतातील गुप्तहेरांचे कार्य कसे चालायचे? आर्य चाणक्य यांनी गुप्तहेरांबाबत काय लिहलेले आहे‌.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात गुप्तहेरांचे कार्य, ब्रिटीश राजवटीत गुप्तहेर संघटनांची सुरवात कोणत्या पद्धतीने झाली. स्वातंत्र्योत्तर भारतात गुप्तहेर संघटनांचा प्रवास कोणत्या पद्धतीने झाला .इंटेलिजियन्स ब्युरो कार्यरत असताना रिसर्च अँड अँनलिसीसस अर्थात रॉ च्या स्थापनेची गरज का निर्माण झाली.रॉचे कार्य कसे विस्तारत गेले.रॉने श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान तसेच बांगलादेशात कोणकोणत्या मोहिमा राबवल्या.सिक्किमच्या विलीनीकरणात रॉ ची काय भुमिका होती,याविषयी माहिती मिळतेच त्याच बरोबर इशान्य भारतातील बंडखोरी मोडण्याबाबत रॉने आखलेल्या मोहिमा, रॉ चे इंदिरा गांधीची हस्तक या दृष्टिकोनातून कसे खच्चीकरण करण्यात आले.काश्मीर मधील दहशतवाद्यांचा विरोधात रॉ ने कोणत्या मोहिमा राबवल्या.
पाकिस्तानात भारतविरोधी शक्तींना कोणत्या प्रकारे नेस्तनाबुत केले. पाकिस्तानमधील फुटीरतावादी गटांना कोणत्या प्रकारे छूपी मदत केली याविषयी सुद्धा माहिती देण्यात आली आहे.
   पुस्तकाच्या शेवटी जोडण्यात आलेली संदर्भ ग्रंथसुची तब्बल 11पानांची आहे.एव्हढ्या मोठ्य संदर्भ सुचीमुळे लेखकाने पुस्तक लिहण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत,हे सोदाहरण स्पष्ट करते. पुस्तक रॉ सारख्या देशाच्या दृष्टीने  महत्त्वच्या गोष्टीबाबत असल्याने गोपिनयतेमुळे अनेक गोष्टी उघड करता येत नाही तसेच काही गोष्टींची खात्रीशीर   माहितीच मिळत नसल्याने काही गोष्टींचा समावेश पुस्तकात करता येत नसल्याची कबुली लेखकाने आपल्या मनोगतातच दिली आहे.मात्र लेखकाच्या लेखनशैलीमुळे आपणापासून काही माहिती लपवली आहे,असे वाचकांना वाटतचं नाही.वाचकांना खिळवून ठेवण्यात लेखक यशस्वी ठरला आहे.वाचकांना ज्ञानाची गुहाच उलगडत असल्याचा अनुभव पुस्तक वाचताना येतो (किमान मला येतो)
  पाकिस्तानने भारताच्या काश्मीर भागातच नव्हे तर इशान्य भारतातील अनेक फुटीरतावाद्यांना संघटनांना दहशतवादी संघटनांना 1 956 पासूनच कोणत्या मा़ध्यमातून तसेच कोणत्या प्रकाराची मदत केली आहे? तसेच आंतरराष्ट्रीय राजकरणात दिसते ते सर्व खरे नसते.किंबहुना दिसते त्याचा पुर्णपणे 180 अंशात उलटी असणारी परिस्थिती ही सत्यस्थिती कसी असते‌ ज्याप्रमाणे  समुद्रातील हिमनगाचा फक्त 10 टक्के भागच वरती दिसतो त्या प्रमाणे कोणत्याही देशातील गुप्तहेर संघटनांचे कार्य कसे चालते‌.कोणत्याही देशात कोणत्या प्रकारच्या व्यक्ती हेरागिरीसाठी उपयुक्त असतात. गुप्तहेर फितूर का होतात? आपल्या 
 रॉ ला या प्रकारचा अनुभव आलेला आहे का? आलेला असल्यास त्याचा सामना रॉने कसा केला यासरख्या प्रश्नाची उत्तरे माहिती करुन घेयची असल्यास हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे‌

गुरुवार, २४ एप्रिल, २०२५

माझे आवडते लेखक (माझे वाचन भाग4)

मला अनेकजण अजिंक्य तूझा आवडता लेखक कोण ? असा प्रश्न सातत्याने विचारतात, त्या व्यक्तींना सविस्तर उत्तर देण्यासाठी आजचे लेखन . तर माझे आवडते लेखक आहेत. ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर आणि मराठी  ज्ञान भाषा व्हावी यासाठी झटणारे आणि मराठीत विविध विषयांवर माहितीपुर्ण असी 55पुस्तके लिहणारे अच्युत गोडबोले.  
     हो मला गिरीश कुबेर आवडतात‌. आपल्या मराठी संत वाड़मयातील सुप्रसिद्ध वचन 'उत्तमाची ते घ्यावे, मिळमिळत ते टाकून द्यावे,' हे वचन  मी अंगीकारत गिरीश कुबेर यांची देशांतर्गत मते बाजूला सारत त्यांच्यातील अर्थशास्त्रज्ञ आणि पश्चिमी आशियाविषयीचा अभ्यास यामुळे मला गिरीश कुबेर आवडतात‌.अच्युत गोडबोले यांच्याविषयी एका वाक्यात बोलायचे झाल्यास, मला ज्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात.त्याच प्रकारची पुस्तके अच्युत गोडबोले लिहीत असल्याने ते माझ्या आवडत्या दोन लेखकांपैकी एक झाले आहेत.
प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाला विविध कांगोरे असतात. व्यक्तीचा एखादा पैलू आपल्याला आवडत नसला, तरी त्यावरुन व्यक्तीला न्यायालयातील पिंजऱ्यात उभे करणे सर्वथा अयोग्यच.हे आपण गिरीश कुबेर यांच्या उदाहरणावरून सहजतेने समजावून घेवू शकतो.गिरीश कुबेर यांच्या देशांतर्गत मतांवरून आपण त्यांचे लेखनच वाचणार नाही,असे ठरवले तर, आपण पश्चिम आशियातील राजकारण, त्यांच्या अर्थकारण आणि त्याचा भारतीयांवर
होणारा परीणाम या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विषयाची सहजसोप्या मराठीत माहिती मिळण्यापासून निश्चितच मुकु,असे मला वाटते. माझ्या मते गिरीश कूबेर यांची देशांतर्गत मते मिळमिळीत म्हणून आपण दूर सारायला हवीत आणि अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय राजकारण यांना उत्तमाची ते घ्यावे असे म्हणत जवळ करायला हवे.
मी आतापर्यत गिरीश कुबेर यांची, एका तेलियाने, हा तेल नावाचा इतिहास आहे,अधर्म युद्ध, तेल नावाचं वर्तमान,
पुतीन,टाटायन, युद्ध जीवांचं  या सारखी अनेक पुस्तके वाचली आहेत. मी गिरीश कुबेर यांच्या वाचलेल्या पुस्तकातून मला ज्ञानचा मोठा खजिनाच गवसला .मला नव्याने मिळालेल्या माहितीत,त्यांचा राजकीय विचारधारणेचा लवलेश देखील दिसून आला नाही.गिरीश कुबेर ज्या विषयांवर पुस्तके लिहतात,त्या विषयांवर मराठीत अत्यंत सकस लिहणारे एका बोटाच्या पेरावर मोजता येतील इतकेच लोक लिहीतात, त्यामुळे ज्यांना मराठीत नविन काही माहितीवर्धक वाचायचे आहे‌.त्यांनी गिरीश कुबेर यांची देशांतर्गत राजकारणाविषयीची मते काहीसी बाजूला सारत त्याचे हे लिखाण वाचायलाच हवे, असे माझे प्रामाणिक मत आहे.
      अच्युत गोडबोले यांच्या विषयी बोलायचे झाल्यास, मराठीला ज्ञानभाषा करण्यसाठी झटणारा खचितच दुसरा कोणी असेल.एकमेकांशी दुरान्वये देखील काहीच संबंध नसलेल्या शाखांवर , विषयांवर सहजसोप्या चटकन समजणाऱ्या मराठी भाषेत ज्ञानवर्धक तब्बल 55 पुस्तके अच्युत गोडबोले यांनी लिहली आहेत.सध्याचा काळात एखादी भाषा किती जूनी आहे,ती किती लोकांची मातृभाषा आहे,यावर एखाद्या भाषेचे भवितव्य ठरणार नसून, या भाषेत किती ज्ञाननिर्मिती होते यावरच भाषेचे भविष्य ठरणार आहे.त्यामुळे या स्पर्धेत मराठी मागे पडु नये यासाठी झटणारे व्यक्तीमत्व म्हणून आपण अच्युत गोडबोले यांच्याकडे बघू शकतो. 
मला माझ्या आयुष्यात भेटलेल्या व्यक्ती, अनुभवयास आलेले प्रसंग यामुळे कथा कांदबरी काव्यसंग्रह,नाटक या सारख्या ललित साहित्यापेक्षा माहितीपर पुस्तकांची आवड निर्माण. झाली आहे‌.अच्युत गोडेबोले यांची ग्रंथनिर्मिती याच क्षेत्रातील असल्याने आपसुकच तारा जूळल्या आणि अच्युत गोडबोलै हे माझे आवडते लेखक झाले.ही आतापर्यत त्यांची नॅनोदय, आर्टिफिशीयल इंटेलिजियन्स, मनकल्लोळ भाग 1अणि 2, ऑटीझम, सायको थेरपीज,अर्थात, इन्फोटेक, इंडस्ट्री 4.0, कियमागार, असी सुमारे 12पुस्तके वाचली आहेत सर्वच पुस्तके तांत्रीक विषयाची असून देखील अत्यंत सहजसोप्या मराठी भाषेत लिहली गेली आहेत. इतर ठिकाणी आढळणारा मराठी तांत्रीक भाषेचा बोजडपणा त्यांचा लेखनात कुठेही आढळत नाही. व्यवहार रूळलेले इंग्रजी शद्बच वापरत त्यांनी संकल्पना समजवण्यावर अधिक भर दिल्याचे त्यांचे लेखन वाचताना जाणवते.मराठी संज्ञा वापरत लेखन अवघड करण्यापेक्षा प्रसंगी इंग्रजी परीभाषिक शद्ब वापरण संकल्पना समजण्यावर त्यांनी भर दिल्याने त्यांचे लेखन चटकन समजते. हे त्यांचे गुणवैशिष्ट त्यांना विविध शास्त्राविषयी लिहिणाऱ्या व्यक्तींपेक्षा वेगळे करते आणि माझे आवडते लेखक करते.
   व्यक्तीने सातत्याने वाचन करायला सुरवात केल्यावर व्यक्तीमध्ये एका विशिष्ट प्रकारचे वाचन करण्याची आवड निर्माण होते.या विशिष्ट प्रकारच्या वाचनातून आवडत्या लेखकाविषयी वाचकाच्या कल्पना तयार होतात. कोणताच लेखक किंवा लेखन प्रकार वाईट नसतोच. मात्र त्यासाठी वाचन करायला सुरवात करायला हवी...मग करताय ना वाचायला सुरवात ..बाकीच्या आवडीचा लेखनप्रकार आणि लेखक या गोष्टी होवूनच जातात ...

माझे वाचन याचा  तिसरा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

माझे वाचन याचा दुसरा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

माझे वाचन याचा पाहिला भाग वाचण्यसासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 


बुधवार, २३ एप्रिल, २०२५

मनोव्यापाराची इत्यंभुत माहिती देणारे पुस्तक मनकल्लोळ भाग 2

मन, आपल्या मानवाच्या सर्व व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारा मात्र सहजतेने न दाखवता येणारा शरीराचा भाग .आपण जे हसतो रडतो, चिडतो, दुसऱ्याशी व्यवहार करतो, निराश होतो, ते आपल्या मनामुळे.आपल्या व्यक्तीमत्वाचा बराच मोठा भाग नियंत्रीत केलेल्या मनाविषयी आपल्याला खुप कमी माहिती असते, असे एक सर्व्हेक्षण नुकतेच प्रसिद्ध झाले होते. आपल्याला मनाविषयी असलेल्या माहितीत शास्त्रीय  ठोस आधारावर माहितीपेक्षा ऐकिव, बिनबुडाच्या माहितीचाच भरणा अधिक असल्याचे या सर्व्हेक्षणातून आढळून आले होते.तर या मनाविषयी अचूक माहिती करुन घेण्यासाठी काय करावे ,तर या ठिकाणी आपल्या मदतीला येते, अच्युत गोडबोले आणि निलांबरी जोशी यांनी लिहलेले मनकल्लोळ भाग 1 आणि मनकल्लोळ भाग 2. त्यातील मनकल्लोळ भाग 1 मी या आधीच वाचले होते.तेव्हापासून याचा दुसरा भाग कधी वाचतो असे मला झाले होते.सा.वा.ना. या नाशिकमधील सर्वात जुन्या सांस्कृतिक संस्थेच्या सहकार्यामुळे माझी ही इच्छा नुकतीच पुर्ण झाली.
         पहिल्या भागाप्रमाणेच दुसरा भाग देखील माहितीने परीपुर्ण आहे.पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागात विविध उदाहरणे देवून अनेक संकल्पना, संज्ञा अत्यंत सोप्या सहज समजणाऱ्या. भाषेमध्ये स्पष्ट केलेले आहेत. काहीजण पहिला भाग वाचण्याच्या ऐवजी थेट दुसरा भाग वाचू शकतात, हे लक्षात घेऊन, पहिल्या भागात असणाऱ्या काही संकल्पना जसे मानसशास्त्रीय उपचारांच्या इतिहास, सी.बी.टी. सारख्या काही महत्त्वाचा उपचार पद्धती या दुसऱ्या भागातील पहिल्या दोन प्रकरणात स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. अर्थात पहिल्या भागात या संकल्पना सविस्तरपणे विस्तृत माहिती देऊन स्पष्ट केलेल्या आहेत मात्र या दुसऱ्या भागात या संकल्पनांची तोंड ओळख करून देण्यात आलेली आहे.  
            पहिल्याभागाप्रमाणेच याही भागात काही काही मानसिक विकारांची आजारांची माहिती आठ प्रकरणाद्वारे करून देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये स्क्रीझोफेनिया, मूड  डीसऑर्डर, पर्सनालिटी डीसऑर्डर, अतिरीक्त ताणतणावामुळे उद्भवणाऱ्या मानसिक व्याधी, न्युरो डेव्हलपमेट डीसऑर्डर,न्युरो कॉग्नेटिव्ह 
डीसऑर्डर यांची माहिती देण्यात आलेली आहे.या माहितीत या आजारांवर पुर्वी झालेले संशोधन, हे आजार होण्याची कारणे, यावर कोणते वैद्यकीय उपचार करण्यात येतात.या आजरांवर आधारीत चित्रपट , तसेच अन्य साहित्य निर्मिती यांची माहिती देण्यात आलेली आहे
 सध्याच्या इंटरनेटवर सर्च केल्यावर धबधबा कोसळावा,या पद्धतीने माहितीचा महापूर येत असण्याचा काळात, निव्वळ माहिती आणि  ज्ञान यातील फरक विश्वासात घेवून बिनचूक, सदोष परीपुर्ण माहिती जी ज्ञानाकडे झूकत आहे, ती मिळवण्याचा मार्ग म्हणून आपण या पुस्तकाकडे बघू शकतो‌.ज्यांना मानसशास्त्रातील 'म'सुद्धा माहिती नाही,त्यांना योग्य मार्ग या पुस्तकाच्या वाचनातून मिळू शकतो. तस बघायला गेलो तर हे मानसशास्त्राचा विद्यापीठाच्या क्रमिक अभ्यासक्रमाला नेमलेले पुस्तक नाही.मात्र तरीसुद्धा विद्यापीठाच्या स्तरावर मानससशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या  विद्यार्थ्यांना याचा निश्चितच फायदा होवू शकतो‌
कोणत्याही रुग्णात सुरवातीला उपचार दिल्यास त्याचा आजार चटकन बरा होतो.आजार बळावत नाही.
        सध्या मानसिक रूग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय, त्या पार्श्वभुमीवर मानसिक आजारांची मुलभुत माहिती होण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक किमान एकदा वाचायलाच हवे.




मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

जागतिक पुस्तक दिन विशेष !


आज 23 एप्रिल अर्थात  जागतिक पुस्तक दिन, त्यानिमित्ताने सर्व पुस्तक प्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा
इंग्रजी साहित्यातील एक महान साहित्यीक शेक्सपियर  याचा स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो आज या साहित्यकाराची जयंती(Birth anniversary ) आणि पुण्यस्मरण (Death anniversary )दिवस सुध्दा
     आजकाल पुस्तकाची परीभाषा अनेकार्थाने बदललली आहे. आता आता पर्यत मराठी भाषेत न आढळणारा आँडिओ बूक हा प्रकार आता मराठीत चांगलाच रुळला आहे.अनेक अँप त्यासाठी वापरली जात आहे.येत्या काही दिवसात प्रिंट आँन डिमांड मुळे पारंपारीक पुस्तकाची दूकानांचे स्वरुप पुर्णतः बदलून जाईल, मात्र पुस्तकाचे महत्व कमी होणे अशक्य. मध्यंतरी समाजमाध्यमांवर बराच रुळलेला मात्र कायदेशीर नसणारा प्रकार म्हणजे पुस्तकाचा पिडीएफ फाईल, हे सुद्धा पुस्तकाचे एक  साधनच म्हणता येवू शकते. माझ्या माहितीत असे दोन नियतकालीके आहेत, जी मला खुद्द प्रकाशकाकडूनच व्हाँटसप मार्फतच येतात, असो. किंडल सारख्या पुस्तकांविषयीच्या गँझेटमुळे वाचताना आपल्या डोळ्याला सोइस्कर होईल, असा प्रकाश ठेवता येतो, तसेच वाचताना एखाद्या शद्बाचा अर्थ माहिती नसल्यास त्याचा अर्थ देखील समजू शकतो, तसेच कागदी पुस्तकाच्या स्वरुपात‌ साठवल्यास ज्यास खुप जागा लागेल,असी पुस्तके अत्यंत कमी जागेत राहू शकतात.तसेच त्यांचे तेल, पाणी, वाळवी, अस्या गोष्टींपासून संरक्षण होते.  पुस्तकांसाठी बुक गंगा सारख्या वेबसाइट देखील उत्तम कार्य करत आहे.
पुस्तकांविषयी  होणाऱ्या कार्यक्रमांविषयी बोलायचे झाल्यास सध्याचा न्युज 18 लोकमत (त्यावेळचे आयबीएम लोकमत) चा अवश्य उल्लेख करावाच लागेल. पुर्वी या वृत्त वाहिनीवर दर रविवारी, "वाचाल तर वाचाल" हा पुस्तकांवर आधारित कार्यक्रम.होत असे.केतकी जोशी ह्या वृत्तनिवेदिका हा कार्यक्रम सादर करत.मात्र कालांतराने तो बंद पडला.   संसद टिव्हीवर किताबनामा हा पुस्तकांविषयी सध्या होणारा एक उत्कृष्ट कार्यक्रम आहे. याखेरीज डी.डी.सह्याद्रीवर वाचू आनंदे हा पुस्तकाविषयीचा कार्यक्रम होतो
 ह्या 3कार्यक्रमांचा अपवाद वगळता मला तरी पुस्तकांवर काही कार्यक्रम झाल्याचे मला माहिती नाही.
    सर्वसाधरणपणे मार्च महिन्यात दिल्लीच्या प्रगती मैदानात विश्व पूस्तक मेळा हे पुस्तकांचे  भल्लेमोठे पुस्तक प्रदर्शन भरते.(जगभरात डंका बजावणाऱ्या मराठी  भाषिकांच्या पुस्तकांचे या मेळ्यातील स्थान काय ,हे मात्र कृपया विचारू नका )जगभरातील नामवंत प्रकाशनाची पुस्तके वाचकांना हाताळता येतात.क्राँसवल्ड सारखी मोठी पुस्तकांची अनेक दूकाने पुण्यात आढळतात.(इतर महाराष्ट्रातील स्थिती विषयी मात्र कृपया विचारू नका ) आपल्याकडील मराठी साहित्य संमेलनातसुद्धा मोठ्या प्रमाणावर पुस्तक विक्री होते. जे एका उत्तम समाजाचे लक्षण म्हणता येईल.
      सध्या आपल्या मराठीचा विचार करता अनेक नवनवीन लेखकांची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत. पुर्वीपेक्षा वेगळ्या विषयांवरची ,मुळची इतर भाषेतील मात्र मराठीत अनुवादीत केलेली अनेक पुस्तके प्रसिद्ध होत आहे. काही प्रकाशक अडचणीत देखील आहेत. पुस्तकांचे लेखक आणि प्रकाशक यात अनेक विषयांवर वाद देखील आहे. मात्र ही त्रासदायक परीस्थिती नक्कीच बदलेल, अशी मला आशा आहे, आणि याच आशेवर मी तूमची रजा घेतोय, नमस्कार.

गुरुवार, १० एप्रिल, २०२५

पक्षीय राजकारणाचे मर्म उलगडवून सांगणारे साप्ताहिक, 'सरकारनामा'

एका ठिकाणी 3 व्यक्ती एकत्र आल्यावर राजकारणाला सुरवात होते. असे सुप्रसिद्ध राजशास्त्रातले  समीकरण आहे.मनुष्याचा उपजत असलेल्या स्वहित बघण्याचा स्वाभाव वैशिष्ट्यामुळे राजकरणाची निर्मिती होते.मनुष्याने कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी मनुष्याची कधीच पाठ न सोडणारी गोष्ट म्हणजे राजकारण असेही म्हटले जाते‌.तर असे हे राजकारण व्यक्तीगत स्वरुपाचे देखील असू शकते.किंवा समान एका ध्येयासाठी वेगवेगळी माणसे एकत्र आल्याने वेगवेगळ्या लोकांचा एक समुह या न्यात्याने विविध पक्षांचे देखील असू शकते‌.
    आपल्या भारतासारख्या खंडप्राय लोकशाहीप्रधान, आणि विविध प्रकारची विविधता असलेल्या देशात व्यक्तीगत राजकारणापेक्षा पक्षीय राजकारण अधिक यशस्वी होवू शकते ,हे नेत्यांचा लक्षात आल्याने आज  भारतात अनेक पक्ष स्थापन झालेले आहेत.नेते त्यांचा त्यांचा पक्षाच्या मार्फत राजकारण खेळत आपले इसिप्त साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. या पक्षीय राजकारणाचा देशाच्या प्रगतीवर मोठा परीणाम होत असल्याने त्याची काही प्रमाणात माहिती देशातील जागरुक जागृत नागरिक म्हणून आपणास असणे अत्यावश्यक ठरते.आणि या कामी मदतीला येते सकाळ माध्यम समुहाकडुन प्रकाशित करण्यात येणारे 'सरकारनामा' हे साप्ताहिक.
    आर्थिक गुंतवणूक, कृषी क्षेत्र, मनोरंजन या प्रकारच्या अनेक विषयांवर दर्जेदार साप्ताहिक, दैनिक प्रकाशन काढणारा माध्यम समुह म्हणून सकाळ माध्यम समुह ओळखला जातो .या दर्जेदार माहितीपर प्रकाशनापैकी एक असलेल्या या सरकारनामा साप्ताहिकामध्ये आपणास सद्यकालिन राजकारणाची पक्षनिहाय, प्रदेशनिहाय सविस्तर माहिती मिळतेच त्या शिवाय आंतरराष्ट्रीय राजकारण आणि ज्यांना भारतातील पक्षीय राजकारणाचा सखोल अभ्यास करायचा आहे,अस्या अभ्यासू लोकांसाठी त्यांचा अभ्यासाला मदत होईल अस्या पुस्तकाची माहिती देखील या साप्ताहिकातून मिळते‌ तसेच ज्यांना  स्वातंत्र्यापासून कोणते वळण घेत सध्याचे राजकारण उभे आहे याची माहिती हवी आहे,अस्या नागरिकांसाठी ज्येष्ठ पत्रकार राजकारणी कुमार सप्तर्षी, भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांच्या सारख्या धुरणींचा लेख हे सुद्धा या साप्ताहिकाचे वैशिष्ठ म्हणता येईल‌ .
      ए 3 टॅब लाइट या आकारातील 24 पानाचे दर शनिवारी प्रसिद्ध होणारे हे साप्ताहिक राजकारणाची आवड असलेल्या, राजकारणावर काही लिहण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच राज्याचा देशाच्या वाटचालीबाबत जागरुक असलेल्या नागरिकांसाठी मोठा अनमोल खजिना आहे.  प्रकाशन सुरु झाल्यावर मध्यंतरीचा खंड पडण्याचा कालावधी सोडुन सात वर्षाहुन अधिक काळ प्रसिद्ध होणारे साप्ताहिक मी गेल्या सप्टेंबर महिन्यापासून वाचत आहे. या साप्ताहिकामुळे माझी राजकीय समज मोठ्या प्रमाणात प्रग्लभ होण्यास मदत झाली. आपण जर हे साप्ताहिक वाचायला सुरवात केल्यावर आपली देखील राजकीय जाण विकसीत होईल,यात शंका नसावी. मग वाचता य ना हे 10 रुपयांचे मात्र अनमोल असी राजकीय भाष्य असणारे साप्ताहिक, 'सरकारनामा'.


सोमवार, ३१ मार्च, २०२५

सहजसोप्या शद्बात अर्थशास्त्राचा संकल्पना सांगणारे पुस्तक,'अर्थजिज्ञासा

 
 अर्थशास्त्र, आपल्या रोजच्या जीवनात पदोपदी सामोरे जावे लागणारा विषय. रोजच्या जगण्यात आपण भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर गोष्टी विकत घेतो, याचे दर महागाईशी निगडीत असतात.महागाई या घटकाचा शास्त्रीय अभ्यास अर्थशास्त्रात होतो. आपल्याकडे जरासे पैसे साठले की,ते आपण विविध ठिकाणी गुंतवतो .ही गुंतवणूक करण्याचे मार्ग अपणास अर्थशास्त्र शिकवतो.आपण एखादी गोष्ट खरेदी केल्यावर जी.एस.टी हा कर भरतो. देशातील  कररचनेचा अभ्यास अर्थशास्त्रात होतो. आपण रोजच्या आयुष्यात अनेक गोष्टी वापरतो त्यातील काही आपल्या देशात तयार झालेल्या नसतात तर इतर देशातून आपल्या देशात आयात झालेल्या असतात तर आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू उत्पादक जास्त नफा मिळवण्यासाठी दुसऱ्या देशात निर्यात करतात या आयात निर्यातीचा अभ्यास अर्थशास्त्रात होतो‌. आपण शि‌क्षण झाल्यावर रोजगाराचा संधी शोधतो, देशातील रोजगाराच्या संधी निर्माण होण्यात अर्थशास्त्र महत्त्वाची भुमिका बजावते.या आणि या सारख्या असंख्य बाबींमुळे अर्शशास्त्र आपणासी जोडले गेले आहे‌. सध्याचा धावपळीच्या स्पर्धेच्या जगात तर ही जोडणी दिवसोंदिवस अधिकच घट्ट होताना आपल्याला दिसतेय.
आजमितीस हा मजकूर लिहताना अर्थशास्त्र केवळ पिवळसर  कागदावर छापलेल्या वर्तमानपत्र किवा टिव्हीवर तळाच्या बाजुला वेगाने जाणाऱ्या दोन पट्यांवर काही नावे सरळ असणारा हिरवा त्रिकोण आणि उलटा लाल त्रिकोण चा संदर्भात दाखवणाऱ्या शेअर मार्केटविषयीच्या वृत्तवाहिन्यांपर्यत मर्यादित नाही.हे आपण वर बघीतलेच आहे‌.तर मित्रांनो या प्रकारे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेल्या या अर्थशास्त्रात अनेक संकल्पना आज सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा सहजतेने वापरतो मात्र या संकल्पना त्यास मुळातून समजल्या असतीलचअसे नाही अनेकादा अपुऱ्या ज्ञानातूनच त्या वापरात असल्याचे आपणास दिसते‌ या अपुऱ्या ज्ञानातूनच या संकल्पना वापरल्याने अनेकदा गोंधळ होण्याची शक्यता नाकरता येत नाही 
        मग या गोंधळावर उपाय तर काय,? तर या संकल्पना व्यवस्थित समजावून घेणे‌, आणि त्यासाठी आपल्याला मदत करतो. कॉण्टिनल प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि. नाशिकचे सुविख्यात चार्टड अकाउंट, वृत्तपत्रात सातत्याने अर्थशास्त्र विषयक लेखन करणारे,  नाशिकच्या बी‌.वाय.के महाविद्यालयात अध्यापनाचे कर्य केलेल्या डॉ.विनायक गोविलकर सर लिखित 
अर्थजिज्ञासा हा ग्रंथ.जो नाशिकमधील महत्त्वाची सार्वजनिक सांस्कृतिक संस्था सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक च्या मदतीने नुकतेच वाचले.
    755 पानांच्या या ग्रंथात सहजसोप्या सुगम मराठीत अर्थशास्त्राविषयक 155 संकल्पना समाजावून सांगितल्या आहेत.प्रत्येक संकल्पना 3ते 5पानात उलगडून सांगण्यात आली आहे.अन्य मराठी भाषेतील माहितीविषयक पुस्तकात अनेकदा आढळते ती गोष्ट अर्थात व्यवहारात रूढ नसलेल्या संस्कृतच्या प्रभावाखालील मराठी भाषेतील परीभाषिक  संज्ञेचा वापर या पुस्तकात आवश्यक तेव्हढाच केला आहे.अनेक ठिकाणी जर इंग्रजी भाषेतील शद्ब व्यवहारात रूढ असेल तर तोच वापरला आहे त्याचे विनाकारण मराठीकरण करत, कठीणपणा टाळला आहे‌. त्यामुळे वाचलेली माहिती चटकन समजते‌.एखाद्या संकल्पनेची माहिती ग्रथात नक्की कोठे आहे हे सहजतेने समजावे यासाठी अल्फाबेटीकली मराठी आणि इंग्रजी भाषेतील अनुक्रमणिका पुस्तकाच्या सुरवातीलाच देण्यात आल्याने, पुस्तक खऱ्या अर्थाने संदर्भ ग्रंथ म्हणून वापरता येतो.
लेखाच्या सुरवातीला सांगितले तसे व्यवहारत वावरताना आपला अर्थशास्त्रविषयक गोंधळ होवू नये, तसेच आपल्याकडून  दुसऱ्याशी बोलताना देखील अचूक बोलणे व्हावे, ज्यामुळे दुसऱ्याचा देखील गोंधळ होणार नाही .या साठी अर्थशास्त्रीय संकल्पना स्पष्ट करणारा हा ग्रंथ आपण एकदा तरी वाचायलाच हवा.

सोमवार, १७ मार्च, २०२५

बदलत्या तंत्रज्ञानाची सखोल सविस्तर माहिती देणारे पुस्तक 'इंडस्टी 4.0

        'सध्याचे जग तंत्रज्ञानाचे आहे. आता जगात तूमच्या शारिरीक शक्तीपेक्षा अधिक महत्व तंत्रज्ञानाचे आहे हे आपण रोजच्या जगण्यात पदोपदी अनुभवतोच, या सातत्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जगात आपण मागे पडू नये यासाठी आपण सर्वच जण आपल्यापरीने प्रयत्नशील देखील असतो .मी देखील या प्रयत्नात असताना मला एक खजिना गवसला तो म्हणजे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असलेल्या आय.बी एम.सारख्या प्रख्यात कंपनीत काही काळ कार्यरत असणारे डॉ .भुषण केळकर सरांनी लिहलेले इंडस्ट्री 4.0 हे पुस्तक.

      केळकर सरांच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाने पुस्तकाला परीपुर्ण केले आहेच हे सांगायला नकोच. सरांच्या अनेक विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी.केल्यामुळे डॉ.भूषण केळकर सरांचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रेष्ठत्व वेगळे सांगायलाच नको. डॉ.भूषण केळकर सरांनी लोकमतच्या ऑक्सिजन या तरुणाईसाठीच्या पुरवण्यांसाठी लिहलेल्या लेखांचे पुस्तकस्वरुपात पुनर्प्रकाशन म्हणजे हे पुस्तक .डॉ.भुषण केळकर सरांच्या त्या लेखमालिकेला त्यावेळी संपुर्ण महाराष्ट्रातील लेखमालिकेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे  आपणास आठवत असेलच.
त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या 53लेखांचे हे 144 पानाचे पुस्तक आपणास आर्टिफिशीयल इंटेलिजियन्स, ब्लॉक चेन, क्लाउड कम्प्युटिंग, इंडस्ट्री 4.0 भविष्यात येवू घातलेली इंडस्ट्री 5.0 या सारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवेगळ्या घटकांची विविध अंगाने माहिती देते.माहिती देताना या बदलला सामोरे जाण्यासाठी  स्वत:मध्ये असण्याची गरज असलेली कौशल्ये आपणास  कोणत्या प्रकारे आत्मसात करता येतील, हे देखील लेखकाने सांगितल्याने हे पुस्तक खऱ्या अर्थाने  जीवनावश्यक झाले आहे.पुस्तक पुर्वी वृत्तपत्रात लेख मालिके स्वरूपात प्रसिद्ध झाले असल्याने असेल कदाचित पुस्तकातील प्रत्येक प्रकरण सुटसुटीत चटकन समजणारे, आणि सहजसोप्या भाषेत लिहलेले जास्त मोठे नसणारे झाले आहे‌.ज्यामुळे पुस्तकाचे आकलन सहजतेने होते 
येणारा काळ हा फक्त आणि तंत्रज्ञानाचा असल्याने त्यात पारंगत होण्यासाठी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे


उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे बीज असलेली कादंबरी, 'फकिरा'

 आपल्या मराठीचे साहित्यविश्व अत्यंत समृद्ध आहे. उकृष्ट चित्रपट निर्मिती होऊ शकते अश्या कादंबरीची मराठीत अक्षरशः खाण आहे. गो नि दांडेकर यांची...