गुरुवार, १० एप्रिल, २०२५

पक्षीय राजकारणाचे मर्म उलगडवून सांगणारे साप्ताहिक, 'सरकारनामा'

एका ठिकाणी 3 व्यक्ती एकत्र आल्यावर राजकारणाला सुरवात होते. असे सुप्रसिद्ध राजशास्त्रातले  समीकरण आहे.मनुष्याचा उपजत असलेल्या स्वहित बघण्याचा स्वाभाव वैशिष्ट्यामुळे राजकरणाची निर्मिती होते.मनुष्याने कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी मनुष्याची कधीच पाठ न सोडणारी गोष्ट म्हणजे राजकारण असेही म्हटले जाते‌.तर असे हे राजकारण व्यक्तीगत स्वरुपाचे देखील असू शकते.किंवा समान एका ध्येयासाठी वेगवेगळी माणसे एकत्र आल्याने वेगवेगळ्या लोकांचा एक समुह या न्यात्याने विविध पक्षांचे देखील असू शकते‌.
    आपल्या भारतासारख्या खंडप्राय लोकशाहीप्रधान, आणि विविध प्रकारची विविधता असलेल्या देशात व्यक्तीगत राजकारणापेक्षा पक्षीय राजकारण अधिक यशस्वी होवू शकते ,हे नेत्यांचा लक्षात आल्याने आज  भारतात अनेक पक्ष स्थापन झालेले आहेत.नेते त्यांचा त्यांचा पक्षाच्या मार्फत राजकारण खेळत आपले इसिप्त साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. या पक्षीय राजकारणाचा देशाच्या प्रगतीवर मोठा परीणाम होत असल्याने त्याची काही प्रमाणात माहिती देशातील जागरुक जागृत नागरिक म्हणून आपणास असणे अत्यावश्यक ठरते.आणि या कामी मदतीला येते सकाळ माध्यम समुहाकडुन प्रकाशित करण्यात येणारे 'सरकारनामा' हे साप्ताहिक.
    आर्थिक गुंतवणूक, कृषी क्षेत्र, मनोरंजन या प्रकारच्या अनेक विषयांवर दर्जेदार साप्ताहिक, दैनिक प्रकाशन काढणारा माध्यम समुह म्हणून सकाळ माध्यम समुह ओळखला जातो .या दर्जेदार माहितीपर प्रकाशनापैकी एक असलेल्या या सरकारनामा साप्ताहिकामध्ये आपणास सद्यकालिन राजकारणाची पक्षनिहाय, प्रदेशनिहाय सविस्तर माहिती मिळतेच त्या शिवाय आंतरराष्ट्रीय राजकारण आणि ज्यांना भारतातील पक्षीय राजकारणाचा सखोल अभ्यास करायचा आहे,अस्या अभ्यासू लोकांसाठी त्यांचा अभ्यासाला मदत होईल अस्या पुस्तकाची माहिती देखील या साप्ताहिकातून मिळते‌ तसेच ज्यांना  स्वातंत्र्यापासून कोणते वळण घेत सध्याचे राजकारण उभे आहे याची माहिती हवी आहे,अस्या नागरिकांसाठी ज्येष्ठ पत्रकार राजकारणी कुमार सप्तर्षी, भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांच्या सारख्या धुरणींचा लेख हे सुद्धा या साप्ताहिकाचे वैशिष्ठ म्हणता येईल‌ .
      ए 3 टॅब लाइट या आकारातील 24 पानाचे दर शनिवारी प्रसिद्ध होणारे हे साप्ताहिक राजकारणाची आवड असलेल्या, राजकारणावर काही लिहण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच राज्याचा देशाच्या वाटचालीबाबत जागरुक असलेल्या नागरिकांसाठी मोठा अनमोल खजिना आहे.  प्रकाशन सुरु झाल्यावर मध्यंतरीचा खंड पडण्याचा कालावधी सोडुन सात वर्षाहुन अधिक काळ प्रसिद्ध होणारे साप्ताहिक मी गेल्या सप्टेंबर महिन्यापासून वाचत आहे. या साप्ताहिकामुळे माझी राजकीय समज मोठ्या प्रमाणात प्रग्लभ होण्यास मदत झाली. आपण जर हे साप्ताहिक वाचायला सुरवात केल्यावर आपली देखील राजकीय जाण विकसीत होईल,यात शंका नसावी. मग वाचता य ना हे 10 रुपयांचे मात्र अनमोल असी राजकीय भाष्य असणारे साप्ताहिक, 'सरकारनामा'.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)

माझ्या कालच्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याबाबद्दल माझा लेख वाचणाऱ्या,यावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. या प्...