लेखाचे विषय

विचसारसरणी -हिंदुत्ववादी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विचसारसरणी -हिंदुत्ववादी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

वारसा ६७ वर्षाचा

१३ ऑगस्ट १९६० या दिवसाला मराठी पत्रकारितेत अनन्य साधारण महत्व आहे .नुकत्याच काही महिन्यापूर्वी द्विभाषिक मुंबई राज्यातून मराठी भाषिकांचे महाराष्ट्र हे राज्य साकारले होते. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यासाठी मराठी व्यक्तीने मोठा लढा उभारला होता. या संघर्षातून मिळालेल्या महाराष्ट्राचा तेथील जनतेचा विकास करण्याचा प्रयत्न सर्वच जण करत होता.मात्र से असून देखील  त्यावेळी असणाऱ्या अनेक समस्यांना वाचा फोडण्यात येत नव्हते .मात्र ते विषय महत्वाचे होते समाजावर या समस्यांचा मोठा परिणाम होत होता   अश्या या वातावरणात ज्याच्या घरात समाज सुधारणेचा मोठा वारसा आहे अश्या तिशीतील एक युवक  जो मुळात एका नावाजलेल्या साप्ताहिकात व्यंगचित्रकार म्हणून काम करत आहे तो तेथील नोकरी सोडून स्वतःचे एक व्यंगचित्राद्वारे सामाजितल उणिवा अवगुणांवर कोणालाही त्रास होणार नाही मात्र अचूक संदेश देता येईल  असे साप्ताहिक सुरु करण्याचा तो दिवस आहे. त्या तिशीतील युवकाने सुरु केलेले साप्ताहिक अजून देखील सुरु आहे आज या साप्तहिकाला पण मार्मिक म्हणून ओळखतो आणि ते सुरु करणारे होते श्रद्धेय आदरणीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे .  २०२६ ऑगस्ट  १३ रोजी  मार्मिक सुरु होऊन ६७ वर्ष  पूर्ण होत आहेत त्यामुळे पूर्वी अनेकांचेअत्यंत  आवडते असणारे मात्र आता सध्याच्या राजकीय स्थितीमुळे काहीसे कमी आवडणाऱ्या मार्मिकच्या वर्धापनदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 

मराठी पत्रकारितेच्या इतिहासात ‘मार्मिक’ या साप्ताहिकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. . त्या काळात समाजातील अनेक प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळत नव्हते. अशा वेळी ‘मार्मिक’ने केवळ बातम्यादेण्यापेक्षा समाजातील विसंगती, अन्याय आणि राजकीय ढोंग यांवर व्यंगचित्रे व लेखांच्या माध्यमातून थेट प्रकाश टाकला.

‘मार्मिक’ची खरी ओळख म्हणजे त्यातील धारदार व्यंगचित्रे. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुशल हातातून साकारलेली ही व्यंगचित्रे तिखट, टोचणारी आणि वास्तववादी होती. सामान्य माणसाच्या मनातील भावना आणि नाराजी यांना चित्ररूप देण्याची ताकद ‘मार्मिक’मध्ये होती. त्यामुळे वाचकांना केवळ माहिती मिळत नव्हती, तर त्यांना विचार करायलाही भाग पाडले जात होते.

या साप्ताहिकाने मराठी माणसांच्या हक्कांसाठी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला. विशेषतः मुंबईतील स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी ‘मार्मिक’ने

सातत्याने भूमिका मांडली. याच विचारसरणीमधून पुढे सामाजिक आणि राजकीय पातळीवर मोठी चळवळ उभी राहिली. त्यामुळे ‘मार्मिक’ हे केवळ साप्ताहिक न राहता एका परिवर्तनशील आंदोलनाचे माध्यम बनले.

‘मार्मिक’ची भाषा साधी, थेट आणि प्रभावी होती. त्यामुळे ते सर्वसामान्य वाचकांपर्यंत सहज पोहोचले. लेखनातील स्पष्टता आणि व्यंगचित्रातील नेमकेपणा यामुळे या साप्ताहिकाने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. अनेक तरुण व्यंगचित्रकार आणि लेखकांसाठी ‘मार्मिक’ हे प्रेरणास्थान ठरले.

.सध्याच्या राजकीय वातावरणामुळे मार्मिक आता काहीसे मागे पडले असले तरी एकेकाळी मराठी पत्रकारितेत व्यंगचित्रांचा प्रभावी वापर करून समाजमनावर ठसा उमटवण्याचे कार्य ‘मार्मिक’ने केले होते हे नाकारता येणे अशक्यच . . हसवत-हसवत विचार करायला लावणारे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे साप्ताहिक मराठी अस्मितेचा बुलंद आवाज म्हणून मार्मिक  सदैव स्मरणात राहीलहे नक्की 

.

शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

साप्ताहिक ‘विवेक’ : विचारजागृती आणि संस्कृती संवर्धनाचे प्रभावी माध्यम

आपल्या भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर या नव्या देशाची वाटचाल वेगाने प्रगतीच्या वाटेवर व्हावी.गुलामीच्या ब्रिटिश राजवटीत  थांबलेला किंबहुना जाणीपूर्वक थांबवण्यात आलेला विकास समाजाच्या सर्व थरात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेगाने व्हावा . गुलामीचे जोखड जुगारून  हा देश पुन्हा कधीही गुलामीच्या साखळीत अडकू नये.मोठ्या कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित राहावे .यासासाठी देदश्तील प्रत्येक घटक नव्या उत्सहात काम करू लागला/ या भारलेल्या वातावरणात काम करणी वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक काम करत होते . तसेच त्यांचे मार्ग सुद्धा वेगवेगळे होते विचारसरणी आणि कार्यपद्धती वेगवेगळे असले तरी त्यांचे उद्दिष्ट एकच होते भारताचं सर्वांगीण विकास. या एकाच उद्दिष्टसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती समूहामध्ये नाव घ्यावेच लागेल असा समूह म्हणजे हिंदुस्थान प्रकाशन आणि त्यांनी २६ सप्टेंबर १९४८  पासून सुरु केलेले साप्ताहिक विवेक

स्वातंत्र मिळाल्यानंतरच्या नव्या ऊर्जेच्या वातावरणात अनेक साप्ताहिके सुरु झाली त्यातील बहुतांशी विविध कारणांनी बंद  पडली त्यानंतर सुरु झालेली देखील बंद पडली मात्र आज ७५ वर्ष होऊन सध्या दिमाखात सुरु असलेली  ‘साप्ताहिक विवेक’ हे मराठी पत्रकारितेतील एक महत्त्वपूर्ण आणि विचारप्रधान नियतकालिक आहे. समाजजीवनातील विविध अंगांचा अभ्यास करून राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची जपणूककरण्याचे कार्य या साप्ताहिकाने सातत्याने केले आहे. भारतीय संस्कृती, राष्ट्रभावना आणि सामाजिक जाणीवा यांचा प्रसार करण्यासाठी ‘विवेक’ची भूमिका विशेष उल्लेखनीय ठरते.

या साप्ताहिकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील लेखनाची सखोलता आणि अभ्यासपूर्ण मांडणी. राजकारण, अर्थकारण, शिक्षण, विज्ञान, इतिहास, साहित्य आणि सामाजिक घडामोडी अशा विविध विषयांवर ‘विवेक’मध्ये नियमितपणे लेख प्रसिद्ध होतात. त्यामुळे वाचकांना केवळ माहिती मिळत नाही, तर त्या मागील विचारसरणी आणि व्यापक संदर्भ समजून घेण्याची संधी मिळते. अनेक नामवंत लेखक, विचारवंत आणि अभ्यासक या साप्ताहिकातून आपले विचार मांडत असतात. साप्ताहिक विवेक एका विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कर्ता आहे असा आरोप त्यावर सातत्याने केला जातो मात्र मी गेल्या कित्येक महिन्यापासून मी साप्ताहिक विवेकाचा वाचक आहे मला तरी तसे आढळले नाहीये. नाही म्हणायला देशविघातक प्रवृत्ती विरोधात यावर सातत्याने बोलले  जाते आता देशविघातक शक्तींच्या प्रेमात असणाऱ्या व्यक्तींना साप्ताहिक  विवेक एकांगी वाटणारच,असो . 

‘विवेक’चा उद्देश केवळ माहितीपुरता मर्यादित नसून वाचकांच्या विचारप्रक्रियेला चालना देणे हा आहे. सामाजिक प्रश्नांवर तर्कसंगत विश्लेषण, मूल्याधिष्ठित भूमिका आणि सकारात्मक दृष्टीकोन यांमुळे हे साप्ताहिक वाचकांमध्ये वेगळी ओळख निर्माण करते. भारतीय परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधत समाजाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न साप्ताहिक विवेकमधून केला आत असल्याचे  या साप्ताहिकाचे सात्यत्याने वाचन केल्यास सहजतेने लक्षात येते 

याशिवाय ‘विवेक’चे विशेषांक आणि दिवाळी अंक हे त्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या अंकांमधून विविध विषयांवर सखोल, संशोधनपर आणि दर्जेदार लेखन वाचकांना उपलब्ध होते. विविध क्षेत्रांतील तज्ञ व्यक्तींचे लेख, मुलाखती आणि लेखमालिका यांमुळे साप्ताहिकाची गुणवत्ता अधिक वृद्धिंगत होते.

एकंदरीत, ‘साप्ताहिक विवेक’ हे केवळ एक नियतकालिक नसून समाजजागृती, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रीय विचारांची रुजवण करणारे प्रभावी माध्यम आहे. समाजाला सजग, संवेदनशील आणि राष्ट्राभिमानी बनविण्यात त्याचे योगदान निश्चितच मोलाचे आहे.हे नाकारता  अशक्यच. 


राष्ट्रीय प्रतीकांच्या उभारणीची प्रेरणादायी गोष्ट- कथा विवेकानंद शिला स्मारकाची

कन्याकुमारी , अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे वगळता भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक असलेले एक असे शहर आहे , जि...