लेखाचे विषय

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२६

लोकमान्य टिळकांच्या राजकीय जीवनावर भाष्य करणारे चरित्र - मंडालेच्या राजबंदी

आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला विविध कंगोरे असतात , असे मानसशात्रात मानले जाते . या सर्व कंगोरेच्या एकत्रीकरणतुंन आपले व्यक्तिक्त्व घडते .एकाचवेळी सर्वांच्या सर्व कंगोरे सामोरे येतीलच असे नाही .किंबहुना येतच नाहीत. त्यामुळे एखाद्याला आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्तवाचे आकलन होईलच अस ठामपणे सांगता येत नाही . आपल्या सारख्या सर्वसाम्याची ही  कथा तर स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या बहुआयामी प्रकांड पंडित तीक्ष्ण बुद्धीच्या व्यक्तिमत्वाविषयी ही बाब तर आणखी  प्रखर होते. 
लोकमान्य टिळकांचीच गोष्ट करायची झाल्यास त्याच्या राजकीय सुधारणा आधी  आणि सामाजिक सुधारणा नंतर  याविषयी च्या मातांना महत्व देयचे की सामाजिक एकतेच्या माध्यमातून जातिभेद मिटत असल्याने सामाजिक सुधारणांच्या भाग म्हणता येईल अश्या  छत्रपती शिवाजी महाराज यांची  जयंती, सार्वजनिक गणेशोत्सव यांचा विचार करत त्यांनी काही प्रमाणात  सामाजिक सुधारणा देखील केल्या असे म्हणायचे असा प्रश्न निर्माण होतो . माझ्यामते या सारख्या प्रश्नाचे ऊत्तर हवे असल्यास आपणास या सारख्या थोर  व्यक्तिमत्वाच्या विविध कंगोरेना समोर ठेवत लिहिलेली चरित्रे मदत करतात . लोकमान्य टिळकांच्या पहिल्या राजद्रोहाच्या बंदिवासला १०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांनी लिहिलेले आणि राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित मंडालेच्या राजबंदी हे पुस्तक याच प्रकारचे आहे.  लोकमान्य टिळकांच्या  राजकीय जीवनावर भाष्य करणारे चरित्र म्हणजे मंडालेच्या राजबंदी असे आपण म्हणू शकतो  

अरविंद गोखले लिखित आणि राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेले ‘मंडालेचा राजबंदी’ हे पुस्तक लोकमान्य टिळकांच्या अढळ विचारशक्तीची, राष्ट्रनिष्ठेची आणि संघर्षाची प्रभावी ओळख करून देते.एखाद्या राष्ट्रनेत्याला आपल्या देशापासून हजारो किलोमीटर दूर नेऊन तुरुंगात डांबले, तर त्याचा आवाज थांबेल आणि त्याचे विचारही थांबतील, असे सत्ताधाऱ्यांना वाटू शकते. मात्र असे वाटणे चुकीचे ठरू शकते याची जाणिव लोकमान्य टिळकांच्या बंदिवासातून इंग्रजांना कोणता प्रकारे झाली याची माहिती आपणस या ३०० पानी  पुस्तकातून मिळते . 

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या योगदानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ब्रिटिश सत्तेविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवल्याची किंमत त्यांना कारावासाच्या रूपाने मोजावी लागली. भारतापासून दूर असलेल्या मंडाले येथे त्यांना ठेवण्यात आले. अपरिचित वातावरण, कठीण परिस्थिती,
एकाकीपणा आणि शारीरिक कष्ट यांमुळे हा काळ त्यांच्या मनोधैर्याची कसोटी पाहणारा होता. मात्र
राष्ट्रकार्यासाठी समर्पित झालेल्या टिळकांची विचारशक्ती आणि आत्मविश्वास या प्रतिकूल परिस्थितीतही डळमळला नाही. आपल्या  कारागृहातील कालावधीचा सुयोग्य वापर करतआर्टिक होम ऑफ वेदाज आणि गीतारहस्य या महान ग्रंथाची रचना कारण्यासह, जर्मनी पाली भाषा सवयंअध्यायाच्या मार्फत कोणत्या पद्धतीने आत्मसात करायच्या  वस्तुपाठच त्यांनी त्यांनी आपल्या आचरणतून कोणत्या पद्धतीने घालून दिला , हे आपल्यास या पुस्तकातून समजते . 

लोकमान्य टिळकांना त्यांच्या आयुष्यात जे तीन कारावास भोगायला लागले त्यापैकी सर्वत कठीण कारावास असलेल्या मंडालेच्या संदर्भ देऊन शीर्षक असलेल्या या पुस्तकात अरविंद गोखले यांनी  मंडालेच्या कारावासाकडे केवळ एका ऐतिहासिक घटनेच्या रूपात पाहिलेले नाही. त्या घटनेमागील राजकीय परिस्थिती, टिळकांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची मानसिकता आणि राष्ट्रवादी विचार यांचा मागोवा घेत त्यांनी या पर्वाचे अधिक व्यापक चित्र उभे केले आहे. त्यामुळे वाचकाला टिळकांच्या जीवनातील एक महत्त्वाचा कालखंड समजतो आणि त्याचवेळी तत्कालीन भारताचे राजकीय वातावरणही उलगडत जाते. मी वाचली ती पुस्तकाची ४ आवृत्ती होती याचवथ्या आवृत्तीत आधीच्या तीन आवृत्तीत नसलेल्या लोकमान्य टिळकांना भोगाव्या लागलेल्या पहिल्या कारावासाची गोष्ट देखील समाविष्ट केली आहे  १७  प्रकरणात विभागलेल्या या पुस्तकातील ९ वे प्रकरण लोकमान्य टिळकांच्या  दुसऱ्या राजद्रोहाच्या खटल्याची माहिती देते . पण क्रमांक १३१ ते २०२ असे सुमारे ७० पाने असलेल्या या प्रकरणात या खटल्यात न्यायालयासमोर आलेला युक्तिवाद मांडण्यात आला आहे ज्याद्वारे लोकमान्य टिळकांच्या बुद्धिमत्तेची आपणासझलक पाहायवास मिळते. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर
यांच्या राजकीय सुधारणा पहिले की  सामाजिक सुधारणा पहिले य वादावर पहिल्या प्रकरणात काही प्रमाणात उल्लेख केला आहे जे ५ पानाचे आहे त्यानंतर सुमारे अर्ध्या ते पाऊण  एका पानाच्या अपवाद वगळता संपूर्ण पुस्तक लोकमान्य टिळकांचार राजकीय त्यातही त्यांना भोगायला लागलेल्या २ राजद्रोहविषयी माहिती देते   स्वातंत्र्य हे केवळ राजकीय ध्येय नसून त्यासाठी वैयक्तिक सुख-सोयींचा त्याग करण्याची तयारी असावी, हा संदेशलोकमान्य टिळकांनी  त्यांच्या जीवनातून दिल्याचे पुस्तक वाचताना  प्रकर्षाने जाणवते 

या पुस्तकाचे आणखी एक महत्त्व म्हणजे ते इतिहासाकडे पाठ्यपुस्तकी नजरेने पाहण्याऐवजी त्यामागील मानवी आणि वैचारिक पैलू समजून घेण्याची संधी देते. कारावासातील एकाकीपणा आणि संकटे यांचा सामना करताना ध्येयाशी प्रामाणिक राहण्याची टिळकांची वृत्ती वाचकाला प्रेरणा देते. त्यातून स्वाभिमान, धैर्य, चिकाटी, राष्ट्रनिष्ठा आणि प्रतिकूल परिस्थितीतही न खचण्याची शिकवण मिळते.आज स्वातंत्र्य आपल्यासाठी सहज
उपलब्ध असलेले वास्तव आहे. त्यामुळे त्यामागे असलेला त्याग आणि संघर्ष अनेकदा विस्मरणात जातो. अशा वेळी ‘मंडालेचा राजबंदी’सारखे पुस्तक इतिहासातील संघर्षांची केवळ आठवण करून देत नाही, तर त्या संघर्षातून निर्माण झालेल्या मूल्यांचा पुनर्विचार करण्यास भाग पाडते.

एका राजबंदीच्या कारावासाची कथा म्हणून सुरू होणारे हे पुस्तक अखेरीस विचारांच्या स्वातंत्र्याची, अढळ राष्ट्रनिष्ठेची आणि ध्येयासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची कथा बनते. इतिहासाची आवड असणाऱ्या तसेच प्रेरणादायी चरित्रात्मक लेखन वाचू इच्छिणाऱ्या प्रत्येक वाचकाने अनुभवावे असे हे पुस्तक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकमान्य टिळकांच्या राजकीय जीवनावर भाष्य करणारे चरित्र - मंडालेच्या राजबंदी

आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला विविध कंगोरे असतात , असे मानसशात्रात मानले जाते . या सर्व कंगोरेच्या एकत्रीकरणतुंन आपले व्यक्तिक्त्व घडत...