या ब्लॉगवर आपण माझे पुस्तक वाचनावेळचे अनुभव , मी वाचलेली पुस्तके, याविषयी जाणून घेऊ शकाल या खेरीज माझे पर्यटनविषयक लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartetraveller.blogspot.com तर प्रचलित घडामोडीविषयक वाचायचे असल्यास www.ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com या ब्लॉगला भेट देऊ शकतात या खेरीज माझे ललित निबंधवजा लेखन वाचायचे असल्यास www.ajinkyatartelalitlekhan.blogspot.com तर या सर्व लेखनाचा एकत्रितपणे आनंद घेयचा असल्यास www.ajiankyatarte.blogspot.com या ब्लॉगला भेट द्यावी
लेखाचे विषय
- अच्युत गोडबोले यांनी लिहलेली (15)
- अनुवादित पुस्तके (9)
- अभिनेता गुरुदत्त (5)
- अर्थशास्त्राविषयक (2)
- इंग्रजी पुस्तक (2)
- इतिहास (4)
- कथासंग्रह (4)
- कादंबरी (7)
- काव्यसंग्रह (1)
- गिरीश कुबेर यांनी लिहलेली (6)
- गुन्हेगारी (1)
- चरित्र . (20)
- चीन (4)
- तंत्रज्ञान विषयक (10)
- दलित साहित्य (3)
- नाटक (1)
- नाशिक (6)
- नियतकालिके (7)
- पश्चिमी आशिया (3)
- प्रवासवर्णने (3)
- मराठी पुस्तके (69)
- महिलांच्या भावविश्वाशी निगडित (6)
- माझे स्वत:चे वाचनाच्यावेळचे अनुभव (8)
- मानसशास्त्र (8)
- माहितीपर (52)
- राजकीय (21)
- ललित लेखन (2)
- विद्रोही साहित्य (3)
- विनोदी या प्रकारात मोडणारे साहित्य (1)
- वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह (3)
- व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित (2)
- सर्वसाधारण (8)
- स्वातंत्र्यवीर सावरकर (1)
रविवार, १ डिसेंबर, २०२४
प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक,'सायबर अटॅक'
गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४
'चीन, रंग आणि ढंग', कोरोना पश्च्यातील चीन उलगडणारे पुस्तक
गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४
महाराष्ट्रातील सांस्कृतिक देवाघेवाण स्पष्ट करणारा दिवाळी अंक 'भवताल'
सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४
राजकारणाचे मर्म उलगडवून सांगणारी कादंबरी 'मुंबई दिनांक'
१६ नोव्हेंबर १९७९ ही फक्त एक तारीख नहिये. आपल्या मराठीतील ज्याला ऑल टाइम ग्रेट सिनेमा म्हणता येईल अश्या 'सिहासन' या चित्रपटाची प्रदर्शित होण्याची ती तारीख आहे . आपल्या चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट दिगर्शक निर्माते असलेल्या जब्बार पटेल यांची कलाकृती असलेला हा चित्रपट आज त्याला निर्माण होऊन ४५ वर्षे अर्थात २५ वर्षाची एक पिढी या हिशेबाने दोन पिढ्याच्या कालावधी होत असला असला तरी कालसुसंगत वाटतो, कंटाळवाणा होत नाही. यातच त्याचे महत्त्व अधोरेखित होते. चित्रपट यशस्वी होण्यामागे चित्रपटात अभिनय करणारे कलाकार जितके महत्वाचे असतात तीतकीच महत्वाची असते चित्रपटाची पटकथा. चित्रपटाची पटकथा सशक्त होणार का . यामध्ये पटकथा लिहणाऱ्या व्यक्तीप्रमाणेच किंबहुना कणभर जास्तच महत्त्वाची असते पटकथा. ज्या कथा कादंबरीवर आधारित आहे त्याचे सशक्त असणे सिंहासन हा चित्रपट ज्या दोन कांदबरीवर आधारित आहे त्या देखील तितक्याच सशक्त असल्याने चित्रपट जवळपास पन्नाशीत आला तरी आपल्याला खिळवून ठेवतो त्यामुळे या चित्रपटाची पटकथा ज्या दोन कादंबरीवर आधारित आहे त्या वाचण्याची मला पूर्वीपासून इच्छा होती सिंहासनच्या दोन कादंबरीपपैकी मी सिंहासन ही कादंबरी मी खूप दिवसापूर्वीच वाचली. मात्र 'मुबई दिनांक' ही कादंबरी वाचण्याची माझी इच्छा मात्र काही करणाने अपूर्णच राहत होती मात्र नुकतीच माझी 'मुबई दिनांक' ही कादंबरी वाचण्याची इच्छा पूर्ण झाली . मला ही कादंबरी कशी वाटली हे आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आजच्या या लेखाचे प्रयोजन (ज्यांना माझ्या सिंहासन या कादंबरीच्या लेखाविषयी जाणून घेयचे असेल त्यांनी लेखाच्या शेवटी असलेल्या लिंकवर क्लिक करावे
सिंहासन या कादंबरीप्रमाणे मुबई दिनांक या कादंबरीचे लेखन सुद्धा अरुण साधू यांनी केलेले आहे मात्र सिंहासन ही कादंबरी जशी वाचताना आनंद देते, सहजतेने समजते तसे दुर्दैवाने या कादंबरी विषयी म्हणता येऊ शकत नाही. कादंबरी अनेक ठिकाणी काहीशी कंटाळवाणी होते काही प्रसंग उगीचच काही गरज नसताना काहीसे ताणले गेले आहेत असे वाटते. सिंहासन या कादंबरीत जशी नाट्यमयता आहे पुढे काय घडू शकेल याचा अंदाज बांधता येत नाही. तसे मुबई दिनांक याबाबत होत नाही पुढे काय घडू शकेल याचा अंदाज बांधता येतो
सिंहासनपेक्षा अधिक ठळकपणे डिकास्टा याचा उल्लेख येतो डिकास्टावर लेखकाने जवळपास ५५ ते ६० पाने खर्ची घातली आहेत मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे यांचे पात्र देखील या कादंबरीत अधिक ठळक केले आहे तसेच मूळ चित्रपटात दाखवण्यता आलेला आणि सिंहासन या कादंबरीत ओझरता देखील उल्लेख नसणारा, स्मग्लर्स चे काळे विश्व दाखवणारा प्रसंग 'मुंबई दिनाक या कादंबरीत अधिक ऊतमपणे रंगवण्यात आला आहे डिकास्टा एव्हढीच सुमारे ५० ते ५५ पाने हा प्रसंग आणि या वेळी ज्याची हत्या होते त्या पाणीटकराचे भावविश्व उभारण्यासाठी लेखकाने उभारलेली आहेसिंहासन ही कादंबरी मुख्यतः मंत्रीमंडळातील अंतर्गत राजकारणावर भाष्य करते तर मुंबई दिनांक ही कादंबरी मुख्यतः मंत्रिमंडळाबाहेरील सत्ता नाट्यावर मार्मिक भाष्य करत बोट ठेवते . मुबई दिनांक या कादंबरीतील कथानक प्रामुख्याने पाच नायकांभोवती फिरते. स्टार वेस्टर्न या इंग्रजी दैनिकाचा मुख्य वार्ताहर, जो एका वारांगनेवर प्रेम करत असतो आणि ज्याने आपल्या प्रेमापोटी तिला ते काम करायला परावृत्त केले असते असा अय्यर, कामगार नेता डिकास्टा,,मंत्रालयात काम करणारा ३० वर्षीय अविवाहित आणि एका दुसऱ्या जातीतील मुलीवर प्रेम करणारा लहान भावाच्या तुलनेत स्वतःला कमी समजणार किरण वझे
आणि काही कौटूंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी वाममार्गाला लागलेला आणि आणि आता त्यातून बाहेर पडण्याची इच्छा असलेला पत्नी आणि बारा वर्षाची मुलगी असलेला पाणीटकर आणि मुखमंत्राची जिवाजीराव शिंदे हे कादंबरीचे मुख्य पाच नायक संपूर्ण कादंबरी त्यांच्या भोवती फिरते. कादंबरीची रचना प्रकरणनिहाय करण्यात आलेली असून प्रत्येक पात्राबाबत दोन प्रकरणे लेखकाने रचली आहेत जी एकामागून एक येतात सर्व पात्रांची पहिले प्रकरणे विस्तृत असून त्यामध्ये सुमारे दोन तृतीयांश पुस्तक लेखकाने खर्च केले आहे मी लेखाच्या सुरवातीला सांगितले त्या प्रमाणे पुस्तक काहीसे कंटाळवाणे होते ते या मोठ्या असणाऱ्या ठळक रुपाने मांडलेल्या पात्र रचनेमुळेचसिंहासन या मराठीतील ऑल टाइम ग्रेट म्हणता येईल अश्या चित्रपटाची मूळकथा आपल्यास चित्रपट समजण्यासाठी मदत तर करतेच मात्र राजकारण कसे चालते ? या बाबत देखील आपणास खूप मोठ्या प्रमाणात मदत करते. आपल्या येथील इंधनाचे भाव काय असतील आपण आपल्या घामाच्या पैशातील किती रक्कम कररूपाने देणार आहोत आपला कर सरकार कोणत्या कारणास्तव खर्च करणार आहे? आपल्या प्रदेशात कोणत्या नवीन उदयोग धंद्याच्या संधी निर्माण होणार आहेत हे सर्व राजकारणी व्यक्तीमार्फत समजते त्यामुळे राजकारण समजल्यास आपणस जवाबदार नागरिक होण्याच्या प्रक्रियेत मदत होऊ शकते त्यामुळे आपण हे पुस्तक वाचघायलाच हवे
सिंहासन या कादंबरीविषयी मी याच्या आधी लिहलेला लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2023/11/blog-post.html
बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४
मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणाऱ्या नॅनो टेक्नॉलॉजीची साविस्तर माहिती देणारे पुस्तक, 'नॅनोदय'
मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४
एका दुर्देवी प्रेम त्रिकोणाचा समग्र वेध घेणारे पुस्तक ' व्यस्त ओढीचा त्रिकोण'
आपल्या बॉलिवूडमध्ये अनेक प्रेम कहाण्या प्रसिद्ध आहेत. यातील काही कहाण्या या आनंदायी आहेत . तर काही प्रेम कहाण्यांना मात्र दुर्दैवाची कारुण्याची छाया आहे . या दुःखाची पार्श्वभूमी असलेल्या प्रेम कहाण्यांमध्ये अग्रक्रमामाने नाव येते ते , गुरुदत्त गीता दत्त आणि वहिदा रेहमान. या जोडीचे . एकीवर नितांत प्रेम असून देखील व्यावसायिक कारणास्तव जवळ आलेल्या एका दुसऱ्या व्यक्तिमत्वामुळे अक्षरशः कोंडीत सापडलेल्या गुरुदत्त यांचा या दुर्दवी मृत्यू या प्रेम कहाणीत झाला . त्यांच्या मृत्यूमुळे आपण एका प्रतिभावंत, कामाप्रती अत्यंत निष्ठावान असेलेल्या, प्रयोगशील, मात्र मनस्वी हळव्या अश्या अत्यंत हुशार असलेल्या एका ससिने अभिनेत्यासह सिने दिग्दर्शक सिने निर्मेत्यास सिने दिग्दर्शकास आपण तयां अकाली गमावलं . आपल्या बॉलीववूडची खूप मोठ्या प्रमाणात हानी यामुळे झाली त्यांचे एक्ली निधन झाले नसते तर आपण आतापर्यंत आपल्यापासून दूर असलेली ऑस्करची बाहुली अनेकदा पटकावली असती याबाबत कोणाशी शंका नसावी . गुरुदत्त यांच्या या अकाली जाण्याविषयी अनेकदा अनेक माध्यमात आणि अनेक भाषेत लेखन प्रसिद्ध झाले आहे मात्र तरीदेखील लोक त्यांच्या मृत्यूस ६० वर्षे झाली तरी अजूनही लिहीत आहेत . यातच त्यांचे थोरपण दिसून येते त्यांचा या अकाली जाण्याविषयीच लिहलेले एक पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील महत्वाची सांस्कृतिक संस्ख्या असेलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशियक यांच्य सहकार्याने वाचले . 'व्यस्त ओढीचा त्रिकोण या प्रतीक प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि कृ, दा. परांजपे लिखित या सुमारे १५० पानी पुस्तकात १० प्रकरणाद्वारे या दुर्दवी घटनेचा सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे यातील पहिल्या ५ प्रकरणात गुरुदत्त यांची चित्रपट सृष्टीतील कारकीर्द कॊणत्या प्रकारे बहरात गेली. याचा सविस्तर आढावा घेण्यात अली या आढाव्यात त्यांची वहिदा रेहमान यांच्याशी कोणत्या प्रकारे ओळख झाली हे सांगण्यात आले आहे तर शेवटच्या पाच प्रकरणात मोठ्या प्रमाणात वहिदा रेहमान यांच्यामुळे गुरु दत्त आणि गीता दत्त यांच्यात तणावाचे प्रसंग येऊ लागले त्याला गीता दत्त आणि गुरुदत्त वहिदा रेहमान यांच्या जवळपासच्या व्यक्तीमुळे कसे प्रकारे खतपाणी मिळाले याविषयी सविस्तरपणे सांगण्यात आले आहे पुस्तकाचे शीर्षक असलेल्या विषयाबाबत अर्थात गुरुदत्त गीता दत्तआणि वहिदा रहेमान यांच्यातील वादाबाबात भाष्य करताना लेखकांनी पुस्तकाची ६० %जागा व्यापली आहेतर ४० % जागा गुरुदत्त यांचा एकूण चित्रपट सृष्टीतील प्रवाश्यावर भाष्य करणारी आहे
पिवळ्या रंगाचे मुखपृष्ठअसलेल्या या पुस्तकावर असलेले गुरुदत्त गीता दत्त आणि वहिदा रहमान याचे कृष्णधवल फोटो आपले लक्ष चटकन वेधून घेतात, आणि ज्यांना या विषयाचे थोडीतरी पार्श्वभूमी असलेल्या ,माझ्यासारख्या अनेकाना वाचायला प्रवृत्त करताच .या पुस्तकात शेवटच्या पाच प्रकरणात गुरुदत्त यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाच्याद्वारे गुरुदत्त आणि वहिदा रहेमान हे एकत्र येत आहे असा गैरसमज गीता दत्त यांच्यात कसा बळकावला तो दूर कारण्यासासाठी गुरुदत्त यांनी काय काय प्रयत्न केले याविषयी माहिती देण्यात आला आहे पुस्तकाच्या मलपृष्ठावर आणि सुरवातीच्या प्रास्ताविकेत कादंबरी असा उललके असला तरी हे पुस्तक कोणत्याच प्रकारे कादंबरी असे वाटत नाही तर अत्यंत सोप्या भाषेत अनेक तांत्रिक गोष्टीला बगल देत ज्यांना या विषयाची काहीच माहिती नाही सध्या सर्वसामान्य व्यक्तींना या विषयाची माहिती देणारे
पुस्तक म्हणून या कडे बघावे लागेल मी जेव्हा हे पुस्तक हातात घेतले तेव्हा हा कादंबरी हा उल्लेख वाचला तेव्हा मला गो . नि . दांडेकर यांनी लिहलेल्या समर्थ रामदास स्वामी यांच्या 'दास डोंगरी राहतो ' या गोष्टीवेल्हाळ चरित्रासारखे हे पुस्तक असेल असे वाटले होते मात्र हे पुस्तक त्या प्रकारचे बिलकुल नाही गोष्टीवेल्हाळ पणा या पुस्तकात मला औषधाला अगदी १ % देखील आढळला नाही या पुस्तकात संपूर्णपणे गुरुदत्तचा उल्लेख एकेरी तो गुरुदत्त या प्रमाणे केलेला असला तरी त्यामुळे हे पुस्तक कादंबरी प्रकारात मोडता येऊ शकत नाही सुरवातीलाच्या एक दोन प्रकारात आपणस लेखन कादंबरीप्रमाणे काहीसे वाटते मात्र त्यानंतरच्या प्रकारांमध्ये हे पुस्तक पूर्णतः माहितीप्रधान लेखाचे स्वरूप घेतेआपणास या घटनेची संपूर्ण माहिती असली तरी हि माहिती किती सहजतेने सांगता येऊ शकते या साठी किना ज्यांना या विषयी काहीही माहिती नाही त्यांना या विषयाची टॉड ओळख होण्यासाठी आपण सर्वांनी किमान एकादफा तरी हे पुस्तक वाचायलाच
रविवार, २७ ऑक्टोबर, २०२४
जपानच्या कार्यसंस्कृतीतून देशाची ओळख करून देणारे पुस्तक 'जपान'
अविनाश भिडे यांनी त्यांच्या सुमारे पाच ते सहा महिन्याचा जपानच्या वास्तव्यात जपानची जी कार्यसंस्कृती अनुभवली त्याचे शब्दरूप म्हणजे मी वाचलेले हे पुस्तक होय. व्यवसायाने इंजिनियर आणि एका मेकॅनिकल कंपनीत उच्चपदस्थ असलेले, अविनाश भिडे हे भारतात कार्यरत असणाऱ्या, आपल्या कंपनीत बसवण्यात येणाऱ्या, एका यंत्राचे तांत्रीक प्रशिक्षण घेण्यासाठी, क्योटो मशिन कंपनीत गेले होते.त्यावेळी त्यांनी जपानची कार्यसंस्कृती जवळून अनुभवली. आपण अनुभवलेली जपानची संस्कृती त्यांना इतरांनी देखील अनुभवावी,असे वाटले.त्यामुळे त्यांनी आपले अनुभव पुस्तकरुपाने प्रसिद्ध केले.तेच हे सुमारे २००पानांचे पुस्तक. या पुस्तकाचे प्रकाशन सुकृत प्रकाशन करण्यात आलेले आहे.
उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे बीज असलेली कादंबरी, 'फकिरा'
आपल्या मराठीचे साहित्यविश्व अत्यंत समृद्ध आहे. उकृष्ट चित्रपट निर्मिती होऊ शकते अश्या कादंबरीची मराठीत अक्षरशः खाण आहे. गो नि दांडेकर यांची...
-
आपल्याला एखाद्या रमणीय तलावात बदक शांतपणे पोहतांना दिसले तरी आपल्याला शांत वाटणाऱ्या त्या तलावात बदकाचे स्वत:च्या देहाच्या खाली ...
-
मला अनेकजण अजिंक्य तूझा आवडता लेखक कोण ? असा प्रश्न सातत्याने विचारतात, त्या व्यक्तींना सविस्तर उत्तर देण्यासाठी आजचे लेखन . तर ...
-
कालचीच गोष्ट आहे , मला एका मित्राने फोन करून त्याच्या मुलाची व्यथा ऐकवली . त्यांची व्यथा अशी होती की, कितीही सांगितले...

















